Sunday, June 20, 2010

कोहिनूर तो हरपुनी गेला...


ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्राज तथा वि. वा. शिरवाडकर यांना श्रद्धांजली -
दै
. केसरी, २० मार्च १९९९






कुसुमाग्रज गेले. मराठी साहित्याच्या अवकाशातील एक तारा निखळला. पण इतर अनेक तार्‍यांपैकी एक, यापेक्षा काही वेगळे अस्तित्व या तार्‍याचे होते. आपले स्वतःचे सौरमंडल निर्माण करुन सार्‍या ब्रह्मांडाला आपल्याभोवती फिरायला लावणार्‍या सूर्याचे तेज या महामानवाकडे होते.

"सात रंगांची मैफल वाहे येथे हवेतून;
येथे मरणही नाचे मोरपिसारा लेवून"

असा एक उल्हासदायी आनंदलोक निर्माण करताना विश्वामित्रांचाच उत्साह त्यांच्यात सामावत असे. इहलोकाच्या दुःखी, निराश सृष्टीला आव्हान देणारी एक प्रबळ, हसरी प्रतिसृष्टी त्यांनी उभी केली. आपल्या लेखणीच्या जोरावर त्यांनी अनेक वादळे शमविली. अनेक निराशेचे डोंगर पचविले आणि साहित्य रसिकांसमोर सारे जीवन उलगडून सादर केले. जीवनाची मजा कशी लुटायची असते, मरणाला कसे सामोरे जायचे असते, प्रेम कसे नि कुणावर करायचे असते, निराशा कशी टाळायची असते, आशा कशी जपायची असते, अशी अनेक प्रकारची शिकवणूक त्यांनी आपल्या साहित्यातून आपल्याला दिली. असा एक दिलदार मार्गदर्शक गेल्याचे दुःख सहन करण्यापलीकडचे आहे. कुसुमाग्रजांनी दाखवलेला मार्ग जपण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे. सूर्य बुडाला तरी, जाता जाता आपले तेज तो चंद्राजवळ देऊन जातो. त्याचप्रमाणे आपल्याला ही साहित्य-ज्योत तेवत ठेवायची आहे. कुसुमाग्रजांची महानता शब्दांत कैद करण्यापलीकडची आहे. त्यांची स्मृती जागवणे हे म्हणूनच तर अवघड काम आहे.

"अखेर मी कोण स्मृती जागवणारा?
स्मृतीच मला जगवतात.
अखेर मी कोण शब्द जपणारा?
शब्दच मला जपतात."

ती आणि मी

मज पटते ना कधी, अश्रू ढाळायला
ती म्हणते हृदय लागते, रडू यायला,
विचारते ती पाहतोस कोणा, स्वप्नांमध्ये
मी म्हणतो त्यासाठी झोप, लागते यायला.

Monday, June 14, 2010

भ्रम


राजा असे राणी असे, अन्‌ असे गुलाम कुणी
कागदांवर राज्य करीती, लाल कुणी काळे कुणी,
मज नसे भ्रम हा, एक्का मोठा की राजा मोठा
पान असेन मी हुकुमाचे, भले म्हणा दुर्री-तिर्री कुणी.

Sunday, June 13, 2010

अंतर

तुझी आठवण माझ्या मनात
सलत राहते एकटेपणात,
वाटते दोघांमधले अंतर
विरुन जावे एका क्षणात...

स्वप्न-स्मृती

स्वप्नातले जग तुझे नि माझे
स्वप्नामध्ये मी पाहतो,
जागेपणी त्या स्वप्न-स्मृती
श्वासांत माझ्या गुंफतो...

नकळत

खरंच आपल्याही नकळत
आपण किती जवळ आलो,
एकमेकाला जिंकण्याच्या नादात
किती सहज दोघंही हरलो...

प्रेम

माणसानं आयुष्यात
एकदातरी प्रेम करावं,
तीरावर नाही पोहोचलं
तरी भिजण्याचं सुख लुटावं...

कडवे

माझे जीवनगाणे
मलाच गायचे आहे,
तुझेही एक कडवे
त्यात गुंफायचे आहे...

स्वभाव

भावनांच्या विश्वात
व्यवहाराचा अभाव असतो,
स्वप्नातच रमण्याचा
एखाद्याचा स्वभाव असतो...

दुवा

दुवा माँगते है खुदासे,
आप हमेशा मुस्कुराते रहें,
कभी खुश थे आप हद से ज्यादा,
वो हसीन पल हमारी याद दिलाएं...

दूरी

रुठोगे हमसे कबतक, जरा इस दिल का खयाल किजिए,
मनाने के लिए मिलना जरुरी है, इस दूरी का एहसास मत दिलाईए...

क्या होता है प्यार

दिलमें चाहत, होठोंपे इकरार
आँखोंसे कर दिया, हमको बेकरार;
नादान थे हम, अब तक ना समझे
आपको देखतेही जाना, क्या होता है प्यार...

पलभरकी जिंदगी

खुशियाँ पलभरकी, फिर गम है उम्रभर;
कौन जानता है लेकिन, पलभरकी ही तो है जिंदगी...

हमसफर

कहते है साथ ना चले, वो हमसफर नहीं,
आज दूर सही आपसे, सफर अभी खत्म तो नहीं...

Friday, June 11, 2010

पाऊस

बाहेर पडणारा पाऊस
खिडकीतून बघणारा मी.

अंगणातल्या मातीचा गंध -
नभातून धरणीवर
जणू अत्तराचा सडा,
सृष्टीची ही उधळण
खिडकीतून बघणारा मी.

भिजलेली सडक -
नुकतीच न्हालेली
जणू श्यामल तरुणी,
सडकेचं हे नवं रुप
खिडकीतून बघणारा मी.

पावसाच्या मार्‍यात हिरवं झाड -
लाजेनं चूर झालेली
जणू नवी नवरी,
पावसाची ही सारी किमया
खिडकीतून बघणारा मी.

पावसात भिजू नये म्हणून
बाहेर न पडणारा मी -
खिडकीतून पाऊस बघताना
नकळत चिंब झालोय,
तुझ्या आठवणींनी...

- अक्षर्मन