ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, September 15, 2014

Think before you react!

Mr. K Laxman, a BJP MLA opposes Tennis star Sania Mirza being designated the brand ambassador of Telangana. Why? Because according to Mr. Laxman, Sania is "Pakistan's daughter-in-law". Well, however foolish this statement is, more foolish are his supporters who spread this ‘news’ through social media and in all other possible ways. This topic fuels hot discussions between pro-BJP and anti-BJP (or more specifically, between Hindutva-wadi and others). The objective of such statements is to keep the issue (of Hindu-Muslim) burning. Once this objective is achieved, the image-saver of BJP comes into picture. “Indian tennis star Sania Mirza meets Prime Minister Narendra Modi after her victory in the US Open mixed doubles!” All is well that ends well...

Sakshi Maharaj, a BJP MP from Unnao, publicly alleges that Madarasa's across the country are imparting “education of terror” and “love jihad”. He claims that Muslim youth in Madarasa's are being motivated for “love jihad” with offers of cash rewards - Rs.11 lakh for an “affair” with a Sikh girl, Rs.10 lakh for a Hindu girl, and Rs.7 lakh for a Jain girl. Usha Thakur, a BJP MLA in Madhya Pradesh (and also state BJP vice-president) has asked party workers to ensure that Muslim youths are not allowed to enter Garba venues in her constituency, Indore (3), during the upcoming annual Nav Durga festival. She alleges that Hindu girls are lured by Muslim youths and converted to Islam as part of the “love jihad” conspiracy to distort population ratio in the country. Another great discovery and our media-savvy young generation voluntarily jumps in to spread this ‘news’ through WhatsApp, Facebook, Twitter, and what not… Again, the objective of such statements is to keep the issue (of Hindu-Muslim) burning. Once this objective is achieved, the fire-fighter of BJP comes into picture. "Arey yeh Love Jihad hai kya? Hume nahi maloom!” says Home Minister Rajnath Singh in a press conference. Again, all is well that ends well…

This Modus Operandi works well with blind-followers and non-thinkers, who are available in huge numbers in our country. Throw a piece of bone and these followers keep chewing it for hours and days and months and years. They never try to verify whether it is a real bone or just a piece of rubber or wood thrown at them to fool them. Some non-highlighted MLA or MP or party leader makes a controversial and too obvious statement and the public is stirred with confused emotions and reactions. Then, someone from the top takes charge and denies or ‘disowns’ the statement or the person him/herself on behalf of BJP as a party. We have been seeing this since long now… once it was Babri issue, then Section 370, then reservation issue, then some trivial topics like Paki Bahu and Love Jihad. If you are among the followers, just stop and think before you perform your ‘duty to spread such news’ among your network. Think of what you are gaining from this, personally or as a society. Think what you would do when the top bosses of the party that you follow disown the very topic that you have already given your time, energy, and emotions to. Think how this is going to help our country become a superpower!

In short, think before you react! Think before you spread something foolish and baseless! Think before someone ‘uses’ you for their own personal benefit...


Share/Bookmark

Tuesday, July 22, 2014

व्हीजन शेअरींग

आपलं ड्रीम, आपलं व्हीजन इतरांसोबत शेअर केलं आणि त्यांना ते कळालं, की फार आनंद होतो. मग आपल्या व्हीजनबद्दल इतरांशी बोलणारी माणसं तयार होतात. याला मी 'माणसं बांधणं' म्हणतो. (हे बांधणं 'टायिंग'च्या नव्हे तर 'कन्स्ट्रक्टिंग'च्या अर्थानं!) मी रोज अशी माणसं बांधतोय, तुम्हीही या. व्हीजन खूप सोप्पंय - कुणाला हरवायचं नाही, कुणाचं ओरबडायचं नाही. फक्त जे आपलं आहे ते पुरेपूर वापरायचं आणि ते अजून छान बनवून पुढं 'पास ऑन' करायचं. येताय ना मग?


Share/Bookmark

Saturday, July 19, 2014

खरा नेता

"राजकारणात वाइटांची गर्दी वाढत असंल, तर याचा अर्थ असाही होतो, की त्यांना निवडून देणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. हे सारं घडत असताना आपण नेत्याची व्याख्याही बदलत असतो. चांगला नेता कोण? जो प्रत्येक लग्नाला जातो आणि ज्याच्यामुळं लग्न दोन-चार तास लांबणीवर पडतं, तो...? जो प्रत्येक मयताला जातो आणि तो गेल्याशिवाय मयताला अग्नी लागत नाही किंवा ज्याच्यावर मातीही पडत नाही, तो?... जो लग्न ठरवायला जातो आणि मोडायलाही जातो, तो?... जो पोलिस ठाण्यात वारंवार जाऊन ट्रॅफिकचे नियम तोडणाऱ्या पोरांना सोडवून आणतो, तो?... लोकप्रतिनिधींची मूलभूत कर्तव्यं बाजूला पडली असून, समाजानंच त्यांच्यावर नवी कर्तव्यं लादली आहेत. दिल्लीत तोंड न उघडणारा, मुंबईत विधानसभेत न जाणारा नेता आपल्याला आता चालतो. तो फक्त लग्नाला आणि मयताला आला तरी भागतं.. जे काम तलाठ्यानं आणि सरकारी दवाखान्यातल्या कंपाउंडरनं करायचं असतं, त्यात हा नेता लक्ष घालतो. लोकप्रिय नेता म्हणून चमकोगिरी करायला लागतो... मी हलवल्याशिवाय समाज हलणार नाही, मी चालवल्याशिवाय समाज चालणार नाही आणि मी बोलतं केल्याशिवाय समाज बोलणार नाही, असं सांगणारा खरा नेता, की लोकांना स्वावलंबी, स्वाभिमानी बनवणारा खरा नेता, याचा फैसला करण्याची वेळ आता आली आहे. आपण नको त्या ठिकाणी निष्ठा टाकून निष्ठावान कार्यकर्ते होणार, की निष्ठावान नागरिक होणार, हेही ठरवण्याची वेळ आली आहे."

- उत्तम कांबळे


Share/Bookmark

Tuesday, July 15, 2014

स्वस्त आणि महाग

हातात घालायचं घड्याळ, अंगावर घालायचे कपडे, खिशात ठेवायचा मोबाईल लोकांना ब्रँडेड आणि स्टँडर्डच लागतो, कितीही महाग असला तरी! पण पोटात जाणारा पदार्थ स्वस्तच लागतो, मग तो सबस्टँडर्ड असला तरी चालतो 'थोडासा'...

Share/Bookmark

Saturday, July 12, 2014

बजेट २०१४ आणि मीडिया

यावेळच्या बजेटबद्दल मीडिया संशयास्पदरीत्या पॉझिटीव्ह दिसतंय. राजकारण आणि अर्थकारण या दोन परस्परावलंबी असल्या तरी वेगवेगळ्या गोष्टी आहेत याची जनतेला जाणीव करुन देण्याऐवजी, निवडणूकपूर्व राजकारणाचाच पुढचा अध्याय म्हणून हे बजेट प्रोजेक्ट केलं जातंय. ज्या महत्त्वाच्या अर्थसंकल्पीय मुद्द्यांवरुन विरोधक आणि मीडिया गेल्या वर्षापर्यंत 'सरकार'ला झोडपत होते, तेच (एफडीआय, पीपीपी, धार्मिक खिरापतीसारखे) मुद्दे याही बजेटमधे आहेतच. आणि इन्कमटॅक्ससाठी उत्पन्नाची मर्यादा तब्बल पन्नास हजारांनी वाढवल्याची हेडलाईन छापण्यापूर्वी मीडियानं या गोष्टीचा अभ्यास करायला हवा होता की, गेल्या वर्षी दोन लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतंच, शिवाय पाच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणा-यांना दोन हजारांचा रिबेट मिळत होता इन्कम टॅक्समधून. याचा अर्थ, दोन लाखांपुढील वीस हजार टॅक्सेबल इन्कमदेखील टॅक्स-फ्री होतं. या बजेटमधे हे लिमिट प्रत्यक्षात तीसच हजारांनी वाढवण्यात आलं आहे. देशाचं बजेट तयार करताना, निवडणुकीतल्या घोषणा आणि आश्वासनं बाजूला ठेवून, १९९१ पासून २०१३ पर्यंतच्या बजेटचीच सुधारीत व विस्तारीत आवृत्ती सादर करावी लागते/लागणार हे नव्या सरकारनं देखील मान्य केलेलं असताना, काहीतरी क्रांतिकारी बजेट हाती लागल्याचा मीडियाचा कांगावा हास्यास्पदच नाही का?


Share/Bookmark

Thursday, July 10, 2014

प्रोड्युसर आणि कन्झ्युमर

ओपन मार्केटमधे जितके (छोटे आणि स्थानिक) प्रोड्युसर जास्त तितकी मोठ्या उद्योगसमूहांसाठी स्पर्धा जास्त आणि मार्केटवर ताबा मिळवण्याची, मोनोपॉलीची शक्यता कमी. त्यामुळं छोटे-छोटे उत्पादक संपवणं आणि निर्मात्यांचं उपभोक्त्यांमधे रुपांतर करणं विशिष्ट उद्योगसमूहांच्या भरभराटीसाठी आवश्यक होऊन बसतं. शेतीच्या इंडस्ट्रियलायझेशनचा प्लॅन, शेतजमिनींची झपाट्यानं होत असलेली गुंठेवारी, शेतक-यांना मिळणा-या सवलतींविषयी इतर जनतेच्या मनात पेरली जाणारी असंतोषाची भावना, या सगळ्याकडं समाजातल्या सर्वच घटकांनी डोळे उघडून बघण्याची वेळ आलेली आहे. आज शेतकरी जात्यात असेल तर इतर व्यावसायिक सुपात आणि बाकीची जनता पोत्यात, एवढाच काय तो फरक!


Share/Bookmark

Wednesday, July 9, 2014

घरच्या मिरचीची गोष्ट

मिरजेजवळच्या भोसे गावात शेतक-यांच्या ग्रुपला भेटायला गेलो होतो. चर्चा शेतकरी-अडते-ग्राहक यावर आली तेव्हा एका शेतक-यानं सांगितलेला अनुभव -

"वडलांनी शेतात मिरची लावली होती. मिरची काढून मिरज मार्केटला पोचवायची होती. दीडशे रुपये देऊन तीन बायका लावल्या होत्या मिरची काढायला. मी तेव्हा मिरजेला नोकरी करायचो. जाता-जाता मार्केटला मिरचीचं पोतं पोच करायला वडलांनी सांगितलं. मोटरसायकलवर पोतं टाकून निघालो. गाडी सुरु करताना वडलांनी घरातून एक रिकामी पिशवी आणून दिली आणि सांगितलं, घरची मिर्ची हाय, जाता-जाता मिरजेच्या काकाकडं थोडी दिऊन जा. तिथून निघालो ते थेट मिरज मार्केटला. मोटरसायकलवर पोतं बघून तिथला एकजण पुढं आला. 'काय घिऊन आलाय?' मी सांगितलं - मिरची. म्हणाला, 'कशाला आणलाय? कोण इचारतंय इथं मिर्चीला?' मी निम्मा गार झालो. म्हटलं, घिऊन तर आलोय. किती मिळत्याल बोला. जरा अंदाज घेत बोलला - एका पोत्याचं पन्नास! मी म्हटलं, दीडशे रुप्ये निस्ती मजुरी झाल्या मिर्ची काढायची. मोटरसायकलवर घिऊन आलोय त्ये येगळंच. मिर्ची लावल्यापास्नं किती खरीचल्यात त्ये तर सांगतच न्हाई... मग होय-न्हाय करत शेवटी शंभरला तयार झाला. मला पण कामावर जायला उशिर होत होता. शंभर रुपये घेऊन पोतं टाकलं आणि कामावर गेलो. दुपारी जेवणाच्या सुट्टीत वडलांनी दिलेली रिकामी पिशवी बघितली आणि काकांसाठी मिरच्या काढायच्या राह्यल्या ते आठवलं. घरची मिरची, एवढं सांगून काकांकडं पोचवली नाही तर घरी गेल्यावर शिव्याच पडतील. तसाच पुन्हा निघालो, मार्केटला आलो. तो सकाळचा माणूस कुठं दिसेना, पण त्याच्याकडनं मिरच्या घेऊन विकायला बसलेल्या बायका सापडल्या. त्यांच्याकडं गेलो नि सांगितलं, जरा ह्या पिशवीत मिरच्या भरुन द्या. त्यांनी विचारलं, किती दिऊ? मी म्हटलं, द्या चार-पाच किलो, घरच्याच हैत! असं म्हटल्यावर बाई तागडी ठिऊन माझ्याकडं बघाय लागली. म्हणाली, कुठनं आलायसा? चार रुप्ये पाव हाय मिर्ची. किती भरु सांगा. मी म्हटलं, अवो सकाळी मीच टाकून गेलोय की पोतं तुमच्यासमोर. तवा काडून घ्याची राह्यली म्हून परत आलो. बाई काय ऐकंना. काकांकडं तर मिरची द्यायचीच होती. शेवटी झक मारत साठ रुपये देऊन चार किलो मिरची विकत घेतली आणि काकांकडं पोच केली!"

उत्पादक ग्राहक झाला की काय होतं याचं उत्तम उदाहरण. म्हणून तर मी नेहमी म्हणतो, प्रोड्युस करु शकणा-यांनी कन्झ्युमर होणं ही डेव्हलपमेंट नाहीये भौ! :-)


Share/Bookmark

Saturday, June 28, 2014

संपर्क

ज्या कारणास्तव मी टीव्ही आणि न्यूजपेपरपासून लांब राहतो, त्याच कारणास्तव मी व्हॉट्सअॅप वापरत नाही. टीव्हीच्या स्क्रीनवर काहीतरी दाखवलं जातंय म्हणून बघत राहणं जसं मला मान्य नाही तसंच कनेक्टीव्हिटीच्या नावाखाली केव्हाही पाठवले जाणारे कुठलेही मेसेज वाचत राहणंही मला झेपत नाही. टचमधे राहण्यासाठी फेसबुक, ई-मेल वगैरे ऑप्शन आहेतच. इन केस ऑफ इमर्जन्सी, व्हॉट्सअॅपच काय, एसेमेसही मला रिलायबल वाटत नाही. फोन लावायचा ना डायरेक्ट! तेव्हा व्हॉट्सअॅपवरुन माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असाल तर, सॉरी! ई-मेल पाठवा, फेसबुकवर पिंग करा, एसेमेस करा, किंवा सरळ फोन लावा आणि बोला... यू आर ऑल्वेज वेलकम! ;-)


Share/Bookmark

Thursday, June 12, 2014

मेट्रो

मुंबईच्या चकाला (अंधेरी) स्टेशनवरुन वर्सोव्याला जायचं होतं.
नविन रिलायन्स मेट्रोच्या घाटकोपर-वर्सोवा रुटवरच चकाला स्टेशन असल्यानं मेट्रो प्रवासाचा चान्स मिळाला.
चकाला स्टेशनवर लोकलच्या मानानं कमी असली तरी बर्‍यापैकी गर्दी होती.
तिकीटासाठी रांगेत उभं रहावं लागलं नाही. टच्‌-स्क्रीन किऑस्कवर ती सोय केली होती.
डेस्टीनेशन वर्सोवा सिलेक्ट केल्यावर मशिननं दहा रुपये मागितले.
दहाची नोट मशिनमधे टाकली की एक प्रिंटेड रिसीट आणि एक प्लास्टिकचं टोकन बाहेर!
एन्ट्री गेट आपोआप उघडझाप होणारं. गेटवर टोकन ठेवलं की गेट उघडणार.
(रिलायन्स मेट्रोचं प्रीपेड कार्ड असेल तर टोकन घ्यायची पण गरज नाही. शंभर रुपयांचं रिचार्ज, एक वर्षाची व्हॅलिडिटी. गेटवर टोकनऐवजी कार्ड ठेवलं की गेट उघडणार आणि चकाला स्टेशनची एन्ट्री तुमच्या नावावर. मग जिथं उतरणार त्या स्टेशनवर एक्झिटला कार्ड ठेवलं की त्या स्टेशनपर्यंतचं भाडं कार्डवरुन परस्पर कट. मस्त ना?)
मग एन्ट्री झाल्यावर सिक्युरिटी चेक.
त्यानंतर कुठंही कसलंही चेकींग, कसलीही रांग नाही.
प्लॅटफॉर्मवर मेट्रो आली की दरवाजे आपोआप उघडतात. आत गेलो की बंद होतात.
आतमधून मेट्रो पूर्ण एसी! मुंबईत!!
बाहेरुन वेगवेगळे डबे दिसले तरी आतून सलग पॅसेज. बेंच फक्त दोन बाजूंना, मधे उभं राहण्यासाठी रिकामी जागा. उभं राहताना आधारासाठी बार, सर्कल, हँडल...
पुढचं स्टेशन कुठलं येणार, याची स्पीकरवरुन अनाऊन्समेंट. शिवाय दरवाजावर त्या स्टेशनच्या नावाचा इंडिकेटर. ज्या बाजूचा दरवाजा उघडणार तिकडचा वेगळा इंडिकेटर.
वर्सोवा लास्ट स्टेशन. दहाव्या मिनिटाला बाहेर.
एक्झिट गेटवर प्लास्टिक टोकनसाठी कॉईन-बॉक्ससारखी फट. त्यात टोकन टाकलं की गेट उघडणार. पुन्हा कुठलं चेकींग, टी.सी. काहीच भानगड नाही.
हेच अंतर बाय रोड जायला म्हणे अर्ध्या-पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागतो. मेट्रोनं फक्त दहा मिनिटं.
शिवाय ती दहा मिनिटंसुद्धा एसीमधे!
मुंबईचा लोकल प्रवासपण असा करता आला तर...?


Share/Bookmark

Sunday, June 8, 2014

काय शिकवायचं आणि काय नाही?

लहानपणापासून, रामानं रावणाला मारलं, पांडवांनी कौरवांना संपवलं, शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, अशा हिंसक गोष्टी संदर्भहीन पद्धतीनं शिकवल्यावर, मोठेपणी गांधीजींचं अहिंसेचं तत्वज्ञान पटण्याची अपेक्षा कशी करता येईल? सुष्ट कोण आणि दुष्ट कोण हे कसं आणि कुणी ठरवायचं? पौराणिक व ऐतिहासिक गोष्टींमधला संदर्भ काढून टाकून, फक्त मारामारी आणि भव्यदिव्य युद्धांवर फोकस करणारी 'ब्रेकिंग न्यूज' स्टाईल शिकवण्याची पद्धत बदलली पाहिजे, असं नाही का वाटत? युद्धामागची परिस्थिती आणि लॉजिक लक्षात न घेता, प्रत्यक्ष युद्धवर्णनात आपण जास्त रंगून जात नाही ना, याचं भान शिक्षकांनी आणि पालकांनी राखलंच पाहिजे. ज्या धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजव्यवस्थेत आपण राहतो आहोत तिथल्या शाळांमधून, धर्मांची शिकवण, क्षत्रियाचा धर्म म्हणून 'वध' माफ, मुसलमान 'परके' म्हणून त्यांची कत्तल, अमूक या धर्मातला मोठा नेता, तमूक त्या जातीचा तारणहार, अशा कन्फ्युजिंग आणि मिसलीडिंग गोष्टी वेचून काढून टाकल्या पाहिजेत. आडनावावरुन जात ओळखायचा खेळ आपल्या पिढीपासून तरी बंद केला पाहिजे. शाळा-कॉलेजच्या वर्षांमधे मुलांना कोणत्याही अर्जावर जात-धर्म लिहिण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. संदर्भहीन इतिहास शिकवण्यापेक्षा, वर्तमान आणि भविष्यात उपयोगी पडेल असं सामाजिक भान - सिव्हिक सेन्स, सहिष्णुता, आपण करत असलेल्या कामाप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा, अनुकंपा - कम्पॅशन, कला-क्रीडा-विचारांनी आयुष्य समृद्ध बनवण्याचं कौशल्य, अशा कितीतरी गोष्टी पुढच्या पिढीला शिकवल्या पाहिजेत. फुटकळ अस्मितांमधे गुरफटून जाण्याऐवजी, 'आपल्या' देशाप्रती आपल्या जबाबदार्‍या व त्यायोगे उपभोगायला मिळणारं स्वातंत्र्य नि अधिकार जाणून घेणं मुलांसाठी जास्त महत्त्वाचं नाही का? हे सगळं पटत असेल तर, सरकारनं सिलॅबस बदलावा - शाळेनं शिक्षक बदलावेत, वगैरे शेळ्या न हाकता, तुम्ही काय कराल, हे उंटावरुन खाली उतरुन सांगा. मी स्वतः तर करतोच आहे, तुम्हालाही काही करावंसं वाटलं तर या. खूप हातांची आणि डोक्यांची गरज आहे इथं. शेवटी प्रश्न नवी पिढी घडवण्याचा आहे ना!


Share/Bookmark

Thursday, June 5, 2014

जात आणि शास्त्रप्रामाण्य

"जात ही मनाची अवस्था किंवा वृत्ती आहे. जातिविनाश म्हणजे भौतिक बंधनांचा विनाश नव्हे. जातिविच्छेद म्हणजे मनोवृत्तीतील परिवर्तन... हिंदू जातिभेद पाळतात कारण ते बुद्धिहीन वा अमानुष आहेत म्हणून नव्हे, तर ते धर्मपरायण असल्यामुळे! याला त्यांच्या मनात जातीय वृत्ती रूजविणारा धर्म जबाबदार आहे. खरा शत्रू जातिभेद पाळणारे लोक नसून त्यांना तो धर्म पाळावयास शिकविणारी शास्त्रे आहेत. त्यामुळे शास्त्रप्रामाण्यावरील श्रद्धा नष्ट करणे हाच खरा उपाय आहे. लोकांच्या श्रद्धा व मते यांची जडणघडण शास्त्रे करीत असताना आणि त्यांचा लोकांच्या मनावरील पगडा कायम असताना तुम्हाला यशाची अपेक्षा कशी करता येईल? धर्मशास्त्रप्रामाण्यास स्वत: आव्हान द्यायचे नाही, लोकांना शास्त्रांच्या आज्ञांवर विश्वास ठेवू द्यायचा आणि पुन्हा त्यांच्या वागणुकीवर व कृतींवर अमानुष, अविवेकी अशा विशेषणांनी टीका करायची, हा समाजसुधारणेचा मार्ग विपरीतच म्हटला पाहिजे. श्रीमान गांधींसकट कुणीही ही गोष्ट लक्षात घेतलेली दिसत नाही की, लोकांच्या कृती म्हणजे शास्त्रांचा त्यांच्या मनावर झालेल्या संस्कारांचा परिपाक होय. त्यामुळे त्यांची वागणूक ज्या शास्त्रांवर आधारित आहे त्या शास्त्रांवरील विश्वास उडाल्यावाचून ते आपले वर्तन बदलणार नाहीत. म्हणून समाजसुधारकांचे सर्व प्रयत्न फसले यात नवल नाही... धर्मशास्त्रांच्या जोखडातून प्रत्येक स्त्री-पुरुषास मुक्त करा. म्हणजे मग पहा, ते स्वत:च सहभोजन व आंतरजातीय विवाह करतात की नाही!.... शास्त्रप्रामाण्य धुडकावण्याची भगवान बुद्धाने जी भूमिका स्वीकारली ती तुम्ही स्वीकारा!"

- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'दि अॅनहिलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकातून


Share/Bookmark

Tuesday, June 3, 2014

माणूस गेला की...

माणूस आहे तोपर्यंत सगळं आहे.
माणूस गेला की...
मग कसला जय नि कसला पराजय.
कसलं राजकारण, कसली निवडणूक.
कसली सत्ता, कसलं पद.
कसले मनसुबे, कसले डावपेच.
माणूस आहे तोपर्यंत सगळं आहे.
माणूस गेला की संपलं सगळं!

Share/Bookmark

Monday, June 2, 2014

कलंदरी

दंगलीच्या अफवा, दहशतीचं वातावरण, व्यक्तिगत नि व्यावसायिक नुकसानीतून होणारी चिडचिड... या सगळ्यावर उतारा म्हणजे कालची उषाकुमारींची गझल मैफल - कलंदरी. उषाकुमारींच्या स्वरचित मराठी गझलांचं शास्त्रीय संगीतावर आधारीत सादरीकरण. पुण्यातल्या उद्यान प्रसाद हॉलमधे. उषाकुमारी रचित माझ्या या आवडत्या रुबाईशिवाय निवेदन पूर्ण कसं झालं असतं...

कायमचे धडधडणारे मन शांत करावे क्षणभर कोणी
जहरामधले जहरीलेपण कमी करावे क्षणभर कोणी
एक एक एकटेपणाच्या लाटा मजवर करीती हल्ला
चंद्रकिनारी चंद्रकमानीमधून यावे क्षणभर कोणी

Share/Bookmark

धर्म आणि जात

धर्म आणि जात या कृत्रिम गोष्टींनी माणसाचं पार माकड करुन टाकलंय. किती शिकण्यासारखं आहे जगात. किती फिरण्यासारखं आहे. केवढी पुस्तकं आहेत वाचलीच पाहिजेत अशी. किती सिनेमे आहेत बघितलेच पाहिजेत असे. किती गाणी आहेत गुणगुणावीतच अशी. केवढी माणसं आहेत भेटलीच पाहिजेत अशी. आणि माणूस काय करतोय तर, माझा धर्म श्रेष्ठ का तुझा, माझी जात वरची का तुझी... कशी संपवायची ही जात? कसं सोडवायचं माणसाला धर्माच्या कचाट्यातून? मला जे सुचतंय ते मी करतोयच. तुम्हीही विचार करा आणि सांगा अजून काय करता येईल...


Share/Bookmark

Sunday, June 1, 2014

दुकान बंद

दुकानासाठी सामान खरेदी करत लक्ष्मी रोडवरुन कोथरुडकडं येत होतो.
दुकानातून फोन आला, कोथरुडला कसलीतरी दंगल झालीय, सगळी दुकानं बंद करायला लावलीत.
कोथरुडात येईपर्यंत तरी काही वेगळं जाणवत नव्हतं.
करिश्मा सोसायटीपासून मात्र  दुकानं बंद-बंद दिसू लागली.
पुढच्या चौकातल्या पुतळ्याकडं लक्ष गेलं. दंगल म्हटलं की पुतळा आठवलाच पाहिजे ना.
नाही नाही, शिवाजी महाराजांचा नव्हता! महर्षी कर्वेंचा पुतळा.
याची कोण काय विटंबना करणार? आणि केलीच तर त्यासाठी कोण दंगा करणार?
पुढच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडं पण नीट बघितलं.
पुतळा ठीक होता, पण खाली खूप माणसं जमली होती.
भगवे झेंडे घेतलेली, भगवे नाम ओढलेली तरुण माणसं.
शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर गंभीर चेहर्‍यानं गर्दी करुन उभी होती.
पुढं-पुढं सगळीच दुकानं बंद दिसत होती.
दुकानात आलो. शटर उघडलं. काम चालू केलं.
शेजारुन माहिती मिळाली - काल रात्री कुणीतरी कुठंतरी शिवाजी महाराजांची आणि बाळासाहेब ठाकरेंची विटंबना केली म्हणे. त्यामुळं कोथरुडात पण दंगा झाला. मुसलमानांची दुकानं-बिकानं फोडली म्हणे.
आमचं दुकान सोडून बाकी सगळी दुकानं बंद होती. कस्टमर येत होते.
थोड्या वेळानं आठ-दहा बाईक्सवरुन वीस-पंचवीस पोरं आरडाओरडा करत, घोषणा देत निघून गेली.
त्यामागोमाग तीन-चार गाड्यांवरुन काही टगे आले.
बंद कर रे शटर, कळत नाय का सगळं बंद आहे. चल रे, बंद कर दुकान, बंद कर!
फुल्ल आरडाओरडा, दमदाटी.
चेहर्‍यावर भाव काहीतरी महान देशकार्य करतोय असे. इतर वेळी चेहर्‍यावरची माशीपण उडणार नाही, पण आत्ता माज, मग्रूरी अगदी ओसंडून वाहतीय.
बंद केलं शटर... थोड्या वेळासाठी.
आणखी काय करता येईल?


Share/Bookmark

Saturday, May 31, 2014

सत्पात्री दान

दुकानात एक वयस्कर बाई आल्या. आमचं हिंदुराष्ट्राला वाहिलेलं एक पाक्षिक की साप्ताहिक काहीतरी आहे म्हणाल्या. तुमच्या दुकानाची त्यात जाहिरात द्या म्हणाल्या. मी विचारलं, तुम्ही काय छापता त्यात? त्या म्हणाल्या, हिंदु संस्कृतीचं रक्षण, हिंदु बांधवांची जागृती, आपल्या धर्माच्या ख-या परंपरांचा प्रसार, इतर धर्मियांची कारस्थानं, वगैरे वगैरे. मी नम्रपणे म्हणालो, सॉरी! मी तुम्हाला जाहिरात देऊ शकत नाही. यावर बाई म्हणाल्या, ठीक आहे. मग देणगी द्या. समर्थ हिंदुराष्ट्रासाठी हे सत्पात्री दान करा. तुम्हाला हजार पटीत फायदा होईल. एक रुपया दिलात तर तुम्हाला हजार मिळतील. मी पुन्हा म्हटलं, सॉरी! ही आमची व्यवसायाची जागा आहे. इथं आम्ही कसलंही दान, देणगी, वर्गणी देत नाही. बाई ऐकेचनात. म्हणाल्या, ठीक आहे. पैसे नका देऊ. आमच्या पन्नास-शंभर लोकांना चहा-नाष्टा स्वरुपात तरी सत्पात्री दान द्या. मी म्हटलं, हे चालेल. पण आम्ही चहा-नाष्टा नाही बनवत. चिकन-मटण बिर्याणी, पापलेट, सुरमई... माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच बाई अशक्य वेगानं पाय-या उतरून चक्क पळून गेल्या!


Share/Bookmark

Friday, May 30, 2014

संवाद

संवाद कसा साधायचा, हा प्रश्न नसतोच मुळी. प्रश्न असतो - संवाद साधावासा वाटतोय की नाही, हा! एकदा संवाद साधायचा ठरवलाच, तर संवादासाठी खूप माध्यमं सापडतील. पण संवाद साधावासाच वाटत नसेल, तर मात्र खिशात मोबाईल, डेस्कवर कॉम्प्युटर, ड्रॉवरमधे फुलस्केप नि लिफाफा, सगळं असून नसल्यासारखंच. म्हणजे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कितीही पुढं गेली तरी कम्युनिकेशनच्या ऊर्मीला ओव्हरराईड करु शकणारच नाही, बरोबर ना?


Share/Bookmark

Tuesday, May 27, 2014

ताण

"...जास्त कामाचा ताण होत नाही. ताण होतो जबाबदारीचा, वेळेच्या अभावाचा. कामाच्या जागी मदतीच्या अभावाचा... प्रत्यक्ष काम माणसाला घातक नाही; पण कामापासून मिळणा-या फळाची आकांक्षा माणसावर जबाबदारीचं व वेळेचं ओझं निर्माण करते... काम माणसाला मारत नाही. आधुनिक औद्योगिक संस्कृतीत काम ज्या प्रकारचं व ज्या परिस्थितीत करावं लागतं, ती परिस्थिती माणसाला मारते."

- डॉ. अभय बंग यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग'मधून


Share/Bookmark

Friday, May 23, 2014

वेळ

७६ वर्षांचा माणूस म्हणतोय, अजून खूप काही करायचं बाकी आहे पण वेळ कमी पडतोय. आणि तिशीतला माणूस टाईम 'पास' करण्यासाठी टीव्हीसमोर बसलाय.


Share/Bookmark

Thursday, May 22, 2014

लोकप्रतिनिधी

लोकप्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या अपेक्षा, अधिकार, आणि जबाबदार्‍या असतात. यांपैकी लोकप्रतिनिधींचे अधिकार आणि जबाबदार्‍या राज्यघटनेत नमूद केल्यानुसार ठरलेल्या असतात. अपेक्षा मात्र स्थल-काल-व्यक्तिपरत्वे बदलत जातात. स्थानिक प्रश्नांवर काम करुन निवडून येणारे, व्यक्तिगत करिष्म्यावर निवडून येणारे, आणि योग्य 'टायमिंग' साधून निवडून येणारे असे काही प्रकार आपल्याला लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, अशा सर्व स्तरांवर दिसतात. पण यांपैकी किती लोकप्रतिनिधी राज्यघटनेतील अधिकार व जबाबदार्‍यांनुसार काम करत असतील? मुळात हे अधिकार नि जबाबदार्‍या काय आहेत, हे तरी निवडून येणारे आणि निवडून देणारे या दोघांना ठाऊक असतील का? शाळेतलं नागरिकशास्त्र, लोकसभेतील खासदारांची संख्या आणि विधानसभेतील आमदारांची संख्या पाठ करण्यापलिकडं खरंच जातं का? की त्याची आता कुणाला गरजच वाटत नाही?


Share/Bookmark

Wednesday, May 21, 2014

व्हॉट्स ऑन युवर माईन्ड?

फेसबुक वापरायला सुरु केलं तेव्हा फ्रेन्डलिस्टमधे काही जवळच्या मित्र-मैत्रिणींचीच नावं होती. त्याआधी जे काही लिहायचंय ते ब्लॉगवर लिहित होतो. फेसबुकवर लाईक्स आणि कॉमेंट्समुळं लिहिण्याची पोच मिळायला लागली. त्यामानानं ब्लॉगवर कॉमेंट्स येण्याचं प्रमाण खूपच कमी होतं. जसजशी फ्रेन्डलिस्ट वाढत गेली तसतशी लाईक्स नि कॉमेंट्सची संख्यादेखील वाढत गेली. मग कुणी-कुणी लाईक केलं, कुणी कॉमेंट केली, हे बघायची उत्सुकता वाढली. एखाद्या स्टेटसला लाईक मिळाले नाहीत, किंवा अपेक्षेपेक्षा कमी मिळाले तर काहीतरी चुकल्यासारखं वाटू लागलं. मग तेच स्टेटस थोड्या वेगळ्या शब्दांत मांडलं तर लाईक्स वाढतील का? की एखाद्या ग्रुपमधे पोस्ट केलं तर जास्त लाईक्स मिळतील? की रात्री उशिरा अपडेट केल्यामुळं वाचलंच गेलं नसेल? दिवसाच स्टेटस अपडेट केलेलं चांगलं का? असे अनेक विचार सुरु झाले. मग लाईकींग आणि कॉमेंटींग पॅटर्नचा अभ्यास झाला. ऑफीस टाईममधे लाईक जास्त मिळतात, म्हणजे ऑफीसमधेच लोकांना फेसबुकवर भटकायला जास्त वेळ मिळतो बहुतेक. काही फ्रेन्ड्स विशिष्ट प्रकारच्या स्टेटसलाच लाईक करतात, इतर स्टेटसकडं दुर्लक्ष करतात. काहींना मराठीच स्टेटस आवडतात, तर काहींना इंग्रजीच स्टेटस समजतात. असं करता-करता, मुळात स्टेटस काय टाकायचं यापेक्षा त्यावर प्रतिक्रिया काय येणार, यावर जास्त विचार होऊ लागला. म्हणजे, फेसबुक विचारतं - व्हॉट्स ऑन युवर माईन्ड? आणि आपण आपलं - व्हॉट विल बी ऑन आदर्स माईन्ड्स? - मधे अडकून पडतो. या सगळ्या भानगडीत, मला काय सांगावंसं वाटतंय ते बाजूलाच राहिलं आणि काय सांगितलेलं 'फ्रेन्ड्स'ना आवडेल, यावर विचार शिफ्ट झाले.

मग असं वाटलं की, जे काही आपल्याला म्हणायचंय ते एकदा म्हणून टाकलं की पुन्हा त्याचे लाईक्स नि कॉमेंट्स (आणि ते स्टेटससुद्धा!) स्वतःला दिसलंच नाही तर? म्हणजे प्रायव्हसी सेटींगमधे काहीतरी 'पब्लिक एक्सेप्ट सेल्फ' असा विचित्र पर्याय निवडता आला तर? म्हणजे मग एकदा पहिली गोष्ट सांगून झाली की डायरेक्ट दुसर्‍या गोष्टीवरच विचार सुरु. पुन्हा ते पहिल्या गोष्टीचे लाईक्स नि कॉमेंट्स नि शेअर्स, असल्या भानगडीच नकोत. नाही तरी, ज्याला आपल्यापर्यंत प्रतिक्रिया पोचवायचीच असेल त्याला किंवा तिला, मेसेज / ई-मेल / पत्र / फोन एवढे पर्याय उपलब्ध आहेतच की. मग ते कॉमेंट-कॉमेंट खेळण्यात कशाला वेळ घालवायचा? मग लाईक्स वाढले म्हणून शेफारूनही जायला नको, की लाईक्स कमी म्हणून नाराजही व्हायला नको. बघूयात का ट्राय करुन?


Share/Bookmark

Tuesday, May 6, 2014

स्पर्धा आणि यश

आचार्य रजनीश एक कथा सांगायचेः कुत्र्यांच्या जगातील एक गणमान्य कुत्रा एकदा दिल्ली पदयात्रेवर निघाला. त्यांच्या शिष्यांनी समारोहपूर्वक कलकत्त्याहून त्यांना निरोप दिला. मजल-दरमजल करत तीन महिन्यांनी महाराज दिल्लीला पोहोचणार, असा कार्यक्रम आखला होता. दिल्लीतील अनुयायांनी जंगी स्वागत करण्यासाठी स्वागत समिती देखील बनवली होती. तीन महिन्यांनी कुत्रा महाराज दिल्लीला पोहोचणार म्हणून वर्गणी गोळा करायला लागले. आणि अचानक दहाव्याच दिवशी महाराज दिल्लीत येऊन थडकले.

"महाराज आपण किती महान! तीन महिन्यांचा प्रवास दहा दिवसांत पूर्ण केला. कुत्ता महाराजकी जय!" अनुयायांनी जयघोष केला.

"महाराज, आपण हा चमत्कार कसा साधला? आणि आपल्या अंगावर एवढ्या जखमा कशा?"

"मी दहा दिवसांत स्वतःच्या मर्जीने नाही रे पोहोचलो! कलकत्त्याहून निघालो. पहिल्या पडावाच्या गावी पोहोचलो. थकलो होतो. आराम करावा, काही खावं म्हणून मोठ्या आशेने गावात शिरलो, तर त्या गावातले कुत्रे भुंकत माझ्या मागे लागले. त्यांच्या भीतीने पळत सुटलो. निदान पुढील गावात तरी विसावा मिळेल म्हणून आशेने पोहोचलो, तर तिथले कुत्रे अजून क्रूर व भयानक निघाले. लचकेच तोडायला अंगावर आले. माझ्या जलद प्रवासाचं हे रहस्य आहे. अरे, कलकत्त्याहून दिल्लीपर्यंत कोठल्याच मुक्कामावर मला उसंत घेऊ दिली नाही हो!" धापा टाकत थकले भागलेले जखमी कुत्रा महाराज रडकुंडीला येत बोलले.

अशा धावण्यालाच आजच्या युगात स्पर्धा, व दिल्लीला पोहोचण्याला यश म्हणतात.

(डॉ. अभय बंग यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' या पुस्तकातून)


Share/Bookmark

Tuesday, April 15, 2014

सगळीच माणसं दिसतात...

सगळीच माणसं दिसतात कशी वैतागलेली
डोकी फुटलेली अन्‌ हातात दगड घेतलेली

कणाकणात असतो म्हणे देव वसलेला
मग का इथं मशिदी तिथं मंदीरं बांधलेली

प्रत्येकाचा शेवट तर मातीत ठरलेला
मग अमरत्वाची कसली ही भूल पडलेली

काय अर्थ असल्या खोट्या जगण्याला
वर्षं नुसतीच वाया गेली की हो जगलेली


Share/Bookmark

Sunday, April 13, 2014

एका इंटरव्ह्यूची गोष्ट


"सत्य कल्पनेहून रंजक असते"
(या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक असून प्रत्यक्ष जीवनातील व्यक्ती वा प्रसंगांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

"हॅलो, रजत शर्मा जी?"
"बोला, पंतप्रधान नरेन्द्रभाई..."
"अरे, अजून इलेक्शन व्हायच्या आहेत. भावी पंतप्रधान म्हणा..."
"इलेक्शन काय, होत राहतील हो. पण तुम्हीच आमचे पंतप्रधान! मोदी मोदी मोदी..."
"बास बास बास! गेले पाच-सहा महिने तेच ऐकतोय सारखं. तुम्ही अजून टेन्शन देऊ नका."
"तुम्हाला कसलं आलंय टेन्शन, नरेन्द्रभाई? तुम्ही तर स्वतःच देशातल्या सगळ्या प्रश्नांवर रामबाण उपाय आहात. जय श्रीराम."
"जय श्रीराम. जय श्रीराम."
"बरं, फोन कशासाठी केला होतात? काही विशेष काम माझ्याकडं?"
"हो तर. जरा विशेषच काम आहे. तुम्ही तुमच्या चॅनलवर कुठलातरी मुलाखतीचा कार्यक्रम चालवता ना?"
"हो हो, 'आप की अदालत'. त्यासाठीच तर एवढा फेमस आहे ना मी."
"काय म्हणालात? 'आप' की अदालत? बाप रे, तुम्हीपण 'आप'चा झाडू घेतला का काय हातात?"
"अहो नाही नाही नरेन्द्रभाई, ते केजरीवालचं 'आप' म्हणजे 'आम आदमी'चं. हे 'आप' म्हणजे आपल्या-आपल्यातलं. हॅ हॅ हॅ."
"हॅ हॅ हॅ, पण म्हणजे ते पत्रकार लोक घेतात तसलीच मुलाखत ना?"
"हो तसलीच, फक्त सेट असतो कोर्टाचा. आणि ज्याची मुलाखत घ्यायचीय त्याला आम्ही उभं करतो आरोपीच्या पिंजर्‍यात."
"अरे बापरे! कोर्ट? आरोपीचा पिंजरा?"
"पण तुम्ही कशाला घाबरताय नरेन्द्रभाई? तुम्हाला तर सुप्रिम कोर्टानं क्लीन चिट दिलीय ना?"
"अहो क्लीन चिट नाही ती शर्मा जी. 'सबळ पुराव्यांअभावी आरोप सिद्ध होत नाहीत', असं म्हटलंय. त्यामुळं अजूनही पुरावे बाहेर येऊ नयेत म्हणून खूप सावध रहावं लागतं हो."
"बरं बरं, ते मुलाखतीचं काय म्हणत होता तुम्ही?"
"हां, ते काँग्रेसवाले आणि 'आप'वाले सगळीकडं सांगत फिरतायत की, मोदी मुलाखतीला घाबरतो, मोदी पत्रकारांना घाबरतो."
"हॅ, एवढंच ना? मग घ्यायची एखादी जंगी पत्रकार परीषद. नाहीतर असं करा ना, तुम्हाला मुलाखत द्यायचीच आहे असं जाहीर करुन टाका एकदा. मग बघा तो करणसुद्धा तुमच्या मागं-मागं फिरेल मुलाखत घ्यायला..."
"......"
"हॅलो, हॅलो नरेन्द्रभाई! हॅलो..."
"हां हॅलो."
"ओह्‌, मला वाटलं फोन कट झाला की काय?"
"नाही, मी लाईनवरच आहे. जरा पाणी पिऊन घेतलं. ते करण थापरचं काय म्हणत होता तुम्ही?"
"कोण? मी? हां हां, ते करण थापर नाही करण जोहरचं म्हणत होतो मी. म्हटलं करण जोहरपण मागं-मागं फिरेल तुमची मुलाखत घ्यायला..."
"अच्छा अच्छा, करण जोहर काय? मला वाटलं पुन्हा करण थापर... बरं ते जाऊ दे, तुमच्या त्या आपल्या-आपल्या अदालतमधे का नाही बोलवत तुम्ही मला?"
"खरंच आयडीया चांगली आहे. नाही तरी तुम्हाला खूप चांगला टीआरपी मिळतोय सध्या. आमच्या चॅनेलचं तर नशीब उघडलं म्हणायचं. बोला, कधी ठेवायचा इंटरव्ह्यू?"
"ते ठरवू नंतर. आधी माझ्या काही अटी आहेत इंटरव्ह्यूसाठी, त्यावर बोलूयात का?"
"हो हो, नक्कीच! मला मान्य आहेत तुमच्या सर्व अटी..."
"अहो आधी काय अटी आहेत त्या ऐकून तरी घ्या!"
"बरं, बोला काय अटी आहेत तुमच्या?"
"त्या अरविंद केजरीवालनं सभा आणि पत्रकार परीषदा घेऊन खूप प्रश्न विचारुन ठेवलेत आधीच. त्यातला एकपण प्रश्न तुमच्या लिस्टमधे नसला पाहिजे."
"हो हो, मंजूर. सारखे-सारखे तेच-तेच प्रश्न विचारत असतो तो. मी जरा वेगळे प्रश्न विचारेन."
"छान. मी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवतोय लोकसभेची. एकाच मतदारसंघातून का नाही लढवत, असं विचारायचं नाही."
"मंजूर, तुम्ही दोनच काय ५४३ मतदारसंघांतून उभे राहिलात तरी नाही विचारणार."
"माझं लग्न, माझी बायको, मी आधीच्या निवडणुकांच्या वेळी ही माहिती का लपवली, यातलं काहीही विचारायचं नाही."
"कबूल, तुमचं लग्न ही तुमची खाजगी बाब आहे. त्यावर मी कशाला प्रश्न विचारेन. हां, पण गांधी फॅमिलीत कोण कुणाचा मुलगा, कोण कुणाची सून, यावर बोललं तर चालेल ना?"
"चालेल चालेल. पुढं ऐका. एका बाईवर पाळत ठेवायला सांगितली होती मी, खाजगी कारणातून. त्यावर अजिबात प्रश्न विचारायचा नाही."
"कारण खाजगी होतं ना, मग नाही विचारणार."
"अमित शाहबद्दल प्रश्न विचारायचा नाही."
"तोबा तोबा! अमित शाह, माया कोडनानीबद्दल बिल्कुल काही विचारणार नाही."
"छान! गॅसच्या किंमतीबद्दल मला विचारायचं नाही. अंबानीच्या रिलायन्सबद्दल पण विचारायचं नाही..."
"काळजीच करु नका. सांगितलं ना, केजरीवालनं विचारलेला एकपण प्रश्न रिपीट होणार नाही याची काळजी घेईन मी."
"येडीयुरप्पा, श्रीरामलू, पासवान यांच्याबद्दल चर्चा करायची नाही."
"नाही करणार. पण काँग्रेसच्या मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार, आदर्श घोटाळा, वगैरे?"
"हां त्यावर बोला सारखं-सारखं. झालंच तर मुलायमसिंगच्या गुंड मंत्र्यांबद्दल पण विचारा. फक्त अमित शाह, येडीयुराप्पा..."
"नाही नाही, त्यांची नावं नाही घेणार. एक काम करा नरेन्द्रभाई, तुम्हीच सांगा मी कुठले प्रश्न विचारु..."
"हां हे ठीकाय. असं विचारा की, राहुल गांधी हे म्हणाला त्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? किंवा सोनिया गांधी तुम्हाला काहीतरी म्हणाल्या, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? किंवा मुलायम असं म्हणाला ते बरोबर आहे का? किंवा मोबाईलवर, फेसबुकवर 'अबकीबारमोदीसरकार' कसं गाजतंय, त्यावर चर्चा करा. अगदी खाजगीच प्रश्न विचारायचा असेल तर, माझे कपडे, ड्रेसिंग सेन्स, फॅशन डिझायनर, याबद्दल विचारा."
"ब्रिलियण्ट नरेन्द्रभाई! हा अगदी आगळावेगळा एपिसोड होणार आहे 'आप की अदालत'चा. पण मी काय म्हणतो, थोडेसे तरी विरोधी प्रश्न विचारावे लागतीलच मला. नाहीतर लोकांना शंका येईल, हा इंटरव्ह्यू आहे की तुमची सभा?"
"हं, बरोबर आहे तुमचं म्हणणं. असं करा, मला विरोध करणार्‍या अडवाणी, जसवंतसिंग, मुरली मनोहर जोशी, यांच्याबद्दल विचारा अवघड प्रश्न."
"हे चालेल. ठीकाय तर मग, मी तयार आहे. बोला कधी घ्यायचा इंटरव्ह्यू?"
"ते सांगतो मी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा."
"अजून काही राहिलं का नरेन्द्रभाई?"
"इंटरव्ह्यू सुरु झाल्यापासून संपेपर्यंत सारखा 'मोदी मोदी' असा घोष होत राहिला पाहिजे."
"एवढंच ना? तो तर मी आत्तापासूनच सुरु करतोय... मोदी मोदी मोदी..."
"धन्यवाद. भेटू या मग 'आप की अदालत'मधे!"


Share/Bookmark

Thursday, April 3, 2014

What happens when someone...

When someone claims to change the entire situation,
Not with logic but with a magic wand,
When we expect mortal men to become Gods who will uplift us,
Without we taking any efforts ourselves,
It is sure that these men will grow larger than life,
And we will be left with nothing but repenting upon choices we made,
And decisions we didn't take!

Share/Bookmark

Wednesday, April 2, 2014

आपणच

आपणच आपली थोपटावी पाठ
आपणच सांगावा आपलाच थाट

आपणच करावी आपलीच चर्चा
चर्चेत लावावी दुसऱ्यांची वाट

आपणच बांधावे आपलेच देऊळ
स्वतःलाच म्हणावे अनाथांचा नाथ

आपणच म्हणावी आपलीच आरती
सोबतीला घ्यावी चमच्यांची साथ

मिळेल तिकडून मिळवावा फायदा
नंतर घालावी कंबरेत लाथ

Share/Bookmark

Thursday, March 27, 2014

देश युवा है, हम युवा हैं

देश युवा है, हम युवा हैं
जीतेंगे, विश्वास हुवा है

आने दो जो आँधी आये
पक्का अपना बेस हुवा है

सोच है, जोश है, और हमारे
बडे-बुजुर्गों की दुवा है

सबको लेकर साथ है चलना
दिल को ये एहसास हुवा है

देश युवा है, हम युवा हैं
जीतेंगे, विश्वास हुवा है


Share/Bookmark

Thursday, March 20, 2014

या माजावरती औषध काय?

शिवसेनेच्या प्रसिद्ध ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ पासून मनसेच्या ‘गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा’ पर्यंतचा प्रवास जर तुम्हाला नवनिर्माणाचं आणि सुराज्याचं चिन्ह वाटत असेल तर या ‘माजरोगा’ची लागण तुम्हालाही झाली आहे, हे नक्की. शाळेत प्रतिज्ञा म्हणायची - 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत...' आणि प्रत्यक्षात मात्र धर्म, जात, राज्य, शहर, वस्ती, अशा नवनवीन मुद्द्यांवर भेदभाव करायचा. हा ‘आपल्या’तला नाही असं दिसलं की लागले सगळेच चोची मारायला. मग ‘आपल्या’सारखेच शंभर कावळे जमा करायचे आणि सण-समारंभ, जयंत्या-पुण्यतिथ्यांच्या निमित्तानं शक्तिप्रदर्शन करत फिरायचं. अशा मिरवणुकांमधल्या स्पीकरचा वाढता आवाज हा मिरवणुकीत सहभागी झालेल्या जनतेच्या ढासळणार्‍या आत्मविश्वासाचं प्रतिक असतं, असं मला नेहमी वाटतं. जेवढा आवाज मोठा, तेवढी माणसं भेदरलेली. आपण कुठल्याही प्रकारे श्रेष्ठ नाही, आपल्यामधे कसलंही विशेष कौशल्य, क‌र्तृत्व नाही, त्यामुळं एकंदरीतच आपला निभाव लागणं कठीण आहे, याची कळत-नकळत जाणीव झालेली माणसं ‘आपल्या’सारख्याच असुरक्षित इतरांचा शोध घेतात आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. पण...

चार टाळकी एकत्र आली की विधायक कामांऐवजी विध्वंसक कामाचंच प्लॅनिंग सुरु होतं, याचं कारण काय? एक तर 'गर्दीचा आयक्यू हा त्यातील सर्व माणसांच्या आयक्यूचा लसावि असतो', हे वैश्विक सत्य. त्यातून आपल्याकडं (भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, त्याहून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात, आणि त्याहून म्हणजे पुण्यात) भयंकर सुबत्ता आणि स्थैर्य आलेलं आहे. फारसं काम न करता प्रत्येकाला मुबलक (व गरजेपेक्षा जास्त) पैसा मिळतोय. सरकार, प्रशासन, पोलिस वगैरे खूप म्हणजे खूपच सहिष्णुतेनं आणि दयाबुद्धीनं नागरिकांना वागवतायत. (हे वाक्य उपहासानं लिहिलेलं नाही. पुण्याबाहेरील किंवा महाराष्ट्राबाहेरील प्रशासन आणि पोलिसांची भूमिका लक्षात घेतल्यास आपण खूप सुरक्षित आहोत, हे मान्य करावंच लागेल!) आपल्याकडं भूकंप, ज्वालामुखी, महापूर, वगैरे नैसर्गिक आपत्तीदेखील यायची शक्यता दूरदूरपर्यंत नाही. अशा परिस्थितीत, आपण अजिंक्य, अमर, अविनाशी वगैरे झाल्यासारखं जन्तेला वाटण्यात काही आश्चर्य नाही. (इथं ‘जन्ता’ म्हणजे ‘आप’वाले म्हणतात तसे फक्त झोपडपट्टीत राहणारे लोक नव्हे. पैशानं, शिक्षणानं, जातीनं, नोकरीनं, किंवा व्यवसायानं माणसाची लेव्हल ठरवून बरेचजण ‘आम जनते’च्या व्याख्येतून स्वतःची सुटका करुन घेतात. पण ही सगळी आवरणं काढून एकंदरीत माणसांचे स्वभाव, वृत्ती, आणि वर्तणूक यांच्या कसोटीवर ‘जनते’ची व्याख्या केली गेली पाहिजे.) या जन्तेला आपल्या आर्थिक आणि सामाजिक स्थैर्याचं आणि सुबत्तेचं श्रेय स्वतःकडंच राखून, उरलेलं अपयश, समस्यांबद्दल मात्र राजकारण, प्रशासन, सरकारला दोष द्यायचा आहे. आणि हा जो धर्माचा, जातीचा, भाषेचा, गावाचा, नावाचा, पैशाचा वगैरे माज आहे ना, त्याची मुळं या स्थैर्य आणि सुबत्तेतच आहेत!

हा आहे आपला आजार. पुण्यात दिवसाढवळ्या बाईकवरुन गोळ्या झाडत दहशतवादी फिरत नाहीत. नदीवरच्या पुलांनीच जोडल्या गेलेल्या पुणे शहराला येता-जाता ‘पूल उडवून देऊ’, अशा धमक्या मिळत नाहीत. पुण्यात (व आजूबाजूच्या मोठ्या परिसरात) कंपन्या बंद पडल्या, नोकर्‍या मिळत नाहीत, वगैरे परिस्थिती सध्याही नाही आणि नजिकच्या भविष्यकाळात येईल असंही दिसत नाही. उलट, नोकरी-धंदा न करता निव्वळ बापजाद्यांच्या जमिनी विकल्या तरी आपल्यासहित पुढच्या काही पिढ्यांची सोय होऊ शकेल, अशी परिस्थिती. प्रत्येक धर्माला, जातीला किमान एक तरी प्रभावशाली नेता मिळालेला आहे, जो त्या-त्या सीझनमधे ‘आपल्या’ जन्तेला चुचकारायचं काम बिनचूक करतोय. इतक्या सुरक्षित आणि कम्फर्टेबल वातावरणात, मुळातच ‘सेन्स’चा अभाव असणार्‍या (खरंतर नॉन्सेन्सच म्हणायचं होतं) जन्तेला माज नाही चढणार तर काय होणार?

आता यावर उपचाराचे दोनच पर्याय -

पहिला, अस्थैर्य निर्माण करणं, जन्तेला पुन्हा दरिद्री बनवणं, बेसिक सर्व्हायवलसाठी स्ट्रगल करायला लावणं.

आणि दुसरा, हे स्थैर्य आणि ही सुबत्ता अशीच टिकवून, त्यांचा विवेकबुद्धीनं अधिक प्रगतीसाठी वापर करणं.

आता आम जनतेच्या व्याख्येत स्वतःलासुद्धा कन्सिडर करुन, यांपैकी कुठला पर्याय सोपा (किंबहुना शक्य) वाटतोय, सांगू शकाल?


Share/Bookmark

Wednesday, March 19, 2014

शिवजयंती… परत?

आज पुणं कसं बाळंतिणीच्या खोलीसारखं सजलंय. सगळीकडं भगव्या लंगोट्या वाळत घातलेल्या दिसतायत... काल रात्री बारा वाजता मोटारसायकलींच्या पुंगळ्या काढून 'जय भवानी जय शिवाजी' किंचाळत 'तरुणाई' रस्त्यांवर सांडली होती. आज दिवसभर कर्कश्श आवाजात पोवाडे आणि असंबद्ध गाणी (हो, आत्ताच 'ये देश है वीर जवानों का' आणि 'गणराज रंगी नाचतो' ऐकून आलोय) वाजवली जातायत. संध्याकाळी तर 'चिकनी चमेली' आणि 'तुझा झगा' वगैरे हमखास ऐकायला (आणि बघायला) मिळणार, तेही 'भव्य' स्वरुपात (हो, आमचं महाराजांवरचं प्रेमच भव्य-दिव्य आहे ना!).

होय, आज शिवजयंती आहे… परत!! आत्ता गेल्या महिन्यातच तर झाली होती? असू दे, असू दे. महाराज आहेत ते, मराठी आणि हिंदू माणसाचे (मूळ)हृदयसम्राट. त्यांच्यावर कुठं शंका घ्यायची? उगाच भावना दुखावल्या जातील, नाही का? वर्षातून दोनदाच काय, मासिक जयंती साजरी करा भौ… आपल्या बापाचं काय जातंय? नाही तरी मराठी माणसाला अभिमान वाटावं अशी गोष्ट शंभर-दोनशे वर्षांतून एखादीच घडते. मग पुढं वर्षानुवर्षं, पिढ्यान्‌पिढ्या नुसती जयंती आणि पुण्यतिथी.

आता यावर आजूबाजूचे काही ‘वैचारिक हिंदुत्ववादी’ (विरोधाभास वाटतोय खरा, पण लेट्स अझ्युम) म्हणतात की, “जयंती-स्मृतिदिन वगैरे साजरे केलेच पाहिजेत, जेणेकरुन या थोर विभूतींचा वसा पुढे घेऊन जाता येईल. शिवाय या दिवशी काही चांगले आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमही होतातच. पेला अर्धा आहे अजून… तळाला गेलेला नाही”, वगैरे वगैरे!

खरं सांगायचं तर, हे 'अर्धा पेला' तत्त्वज्ञान म्हणजे स्वतःची फसवणूक आहे. शिवजयंती किंवा सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यांसमोर काय चित्र उभं राहतं, हा प्रश्न आपल्या आजूबाजूच्या लोकांना (आणि स्वतःलाही) विचारून बघा. किती जण 'चांगले आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम, विचारांचा वसा' वगैरे उत्तर देतात पहा. सगळ्यांच्या दृष्टीनं हे असले सण आणि जयंत्या-मयंत्या म्हणजे डोक्याला तापच असतो. ट्रॅफीकची वाट, रस्त्यांचा सत्यानाश, कानांवर अत्याचार, अतिउत्साही भक्तांचा आणि कार्यकर्त्यांचा माज, अशाच गोष्टी समोर येतात. हे वास्तव स्विकारल्याशिवाय त्यावर उपाय शोधता येणार नाही. त्यामुळं आपला समाज आजारी आहे, हे सत्य स्वीकारणं गरजेचं आहे! आम्ही निरोगी आहोत, या भ्रमात राहिल्यास उपचाराची आशाच उरणार नाही…

असो. आता येत्या १४ एप्रिलच्या आंबेडकर जयंतीची तयारी महिनाभर आधीच जोमात सुरु आहे. १४ एप्रिलची होर्डींग्ज १२ मार्चलाच लावली गेलीत. तेवढ्या आठवड्याभरात पुण्यातले कुठले रस्ते टाळायचे, याची यादीच बनवली पाहिजे. म्हणजे किमान स्वतःपुरता मनस्ताप तरी टाळता येईल, नाही का?


Share/Bookmark

Saturday, March 1, 2014

मकान की ऊपरी मंज़िल पर अब कोई नहीं रहता

मकान की ऊपरी मंज़िल पर अब कोई नहीं रहता

वो कमरे बंद हैं कबसे
जो चोबीस सीढियां जो उन तक पहुँचती थी, अब ऊपर नहीं जाती

मकान की ऊपरी मंज़िल पर अब कोई नहीं रहता
वहाँ कमरों में, इतना याद है मुझको
खिलौने एक पुरानी टोकरी में भर के रखे थे
बहुत से तो उठाने, फेंकने, रखने में चूरा हो गए

वहाँ एक बालकनी भी थी, जहां एक बेंत का झूला लटकता था.
मेरा एक दोस्त था, तोता, वो रोज़ आता था
उसको एक हरी मिर्ची खिलाता था

उसी के सामने एक छत थी, जहाँ पर
एक मोर बैठा आसमां पर रात भर
मीठे सितारे चुगता रहता था

मेरे बच्चों ने वो देखा नहीं,
वो नीचे की मंजिल पे रहते हैं
जहाँ पर पियानो रखा है, पुराने पारसी स्टाइल का
फ्रेज़र से ख़रीदा था, मगर कुछ बेसुरी आवाजें करता है
के उसकी रीड्स सारी हिल गयी हैं,
सुरों के ऊपर दूसरे सुर चढ़ गए हैं

उसी मंज़िल पे एक पुश्तैनी बैठक थी
जहाँ पुरखों की तसवीरें लटकती थी
मैं सीधा करता रहता था, हवा फिर टेढा कर जाती
बहू को मूछों वाले सारे पुरखे क्लीशे लगते थे
मेरे बच्चों ने आखिर उनको कीलों से उतारा,
पुराने न्यूज़ पेपर में उन्हें महफूज़ कर के रख दिया था
मेरा भांजा ले जाता है फिल्मो में
कभी सेट पर लगाता है, किराया मिलता है उनसे

मेरी मंज़िल पे मेरे सामने
मेहमानखाना है, मेरे पोते कभी
अमरीका से आये तो रुकते हैं
अलग साइज़ में आते हैं वो जितनी बार आते हैं,
ख़ुदा जाने वही आते हैं या
हर बार कोई दूसरा आता है

वो एक कमरा जो पीछे की तरफ बंद है,
जहाँ बत्ती नहीं जलती,
वहाँ एक रोज़री रखी है, वो उससे महकता है,
वहां वो दाई रहती थी कि जिसने
तीनों बच्चों को बड़ा करने में
अपनी उम्र दे दी थी, मरी तो मैंने
दफनाया नहीं, महफूज़ करके रख दिया उसको.

और उसके बाद एक दो सीढिया हैं,
नीचे तहखाने में जाती हैं,
जहाँ ख़ामोशी रोशन है, सुकून सोया हुआ है,
बस इतनी सी पहलू में जगह रख कर,
के जब मैं सीढियों से नीचे आऊँ तो
उसी के पहलू में बाज़ू पे सर रख कर सो जाऊँ

मकान की ऊपरी मंज़िल पर अब कोई नहीं रहता...

- गुलज़ार


Share/Bookmark

Tuesday, February 11, 2014

स्वप्न आणि परिस्थिती

आजकाल कोरडे-कोरडे दिसतात ओठ तुझे
कधीकाळी त्यांनीच ऐकवली होती
स्वप्नं मुलायम...
परिस्थितीवर कधीपासून बोलू लागलीस?
आणि का?
ती स्वप्नंच हवीहवीशी वाटत होती
ही परिस्थिती नेहमीच नकोशी...
पण स्वप्नं बदलता येतात, परिस्थिती नाही!
तूच म्हणालीस.. कोरड्या ओठांनी.
पण लक्षात ठेव -
तुझे ओठ परत मुलायम व्हावेत
हे माझं स्वप्न आहे,
आणि माझी स्वप्नं अपूर्ण राहत नाहीत
ही परिस्थिती!


Share/Bookmark

Sunday, February 9, 2014

कुणासाठी?

विश्वासाची दोरी, चेष्टेत तोडलेली
पुन्हा जोडलेली, पण 'गाठ' मारलेली

प्रेमाची लक्तरं, शपथा-वचनांची
फाटली नाहीत अगदी, पण रंग विटलेली

ग्लास संपला तरी, बाटली भरलेली
दारु काढणार कशी, रक्तात भिनलेली?

शब्दांचीही संगत, मधेच सुटलेली
अजून एक कहाणी, अर्धीच उरलेली

नको वाटते आता, दादही ठरलेली
कुणासाठी मग ही, कविता रचलेली?

- अक्षर्मन


Share/Bookmark

खरा झोल

"सत्य कल्पनेहून रंजक असते"
(या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक असून प्रत्यक्ष जीवनातील व्यक्ती वा प्रसंगांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

"नमस्कार दादा!"
"अरे! या या आबा, तुमचीच वाट बघत होतो..."
"काय येवढं अर्जांट काम काढलंय आमच्याकडं?"
"बोलू हो कामाचं, जरा बसा तरी. चहा घेताय?"
"नको, तोंडात तंबाखूय..."
"असू द्या, असू द्या. काम जरा अर्जंट होतं म्हणूनच बोलवलं तुम्हाला."
"बोला, काय झोल झाला आता?"
"तसा काय नविन नाई, जुनाच झोलंय. ते टोलचं प्रकरण नाय का..."
"त्यात मी काही करू शकत नै दादा. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं, 'माज'ला आवरा. विरोध करणं, मोर्चे काढणं, विधानसभेत दंगा करणं, हे परवडलं. पण डायरेक्ट तुडवातुडवीची भाषा?"
"असू दे आबा, तरुण रक्तंय, माज करणारच. नायतर ह्या पब्लिकनं करायचं काय? आमचे काका म्हंतात तसं 'सहकार' करायचा? का आपले बाबा म्हंतात तसा 'सहभाग' वाढवायचा? येवढं कळत अस्तं तर महाराष्ट्र कुठल्या कुठं गेला अस्ता..."
"कळतंय मला तुम्ही काय म्हंताय ते. पण मग कसला झोल झालाय ते तरी सांगा."
"अहो त्या 'माज'ला जाहीर सभा घ्यायचीय पुण्यात."
"हं, आलंय माझ्या कानावर. आपल्या सरकारच्या टोलचं पोल खोलणाराय म्हंतोय."
"हां, तेच! तर त्याच सभेसाठी जागा मिळंना आबा त्याला पुण्यात."
"काय म्हंताय दादा? ह्यांच्या सेनेला जागा नाकारली? आणि मुळात ह्यांनी 'परवानगी' मागितली? आश्चर्यच म्हणायचं..."
"चेष्टा पुरे, आबा. त्या जागेचं तेवढं बघा लवकर..."
"कोण? मी? चेष्टा मी करतोय का तुम्ही?"
"आबा, उगाच अंगावर झुरळ पडल्यासारखं झटकून टाकू नका. ही सभा आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे ते तुम्हालाही ठाऊकाय..."
"हो तर. 'आपलं' सरकार 'आपल्या' पीडब्ल्यूडीला हाताशी धरून टोलच्या रुपानं जनतेची लूट कशी करतंय, तेच सांगायला सभाय ना ही?"
"हो, पण तेवढंच तिचं महत्त्व नाही आबा. टोलचा मुद्दा खरंच एवढा मोठा आहे का? आणि सत्तेत आपण असलो काय नि दुसरं कुणी असलं काय, टोल तर लावाय लागणारच ना? का हे सत्तेत आल्यावर स्वतःच्या खिशातनं पैशे घालून रस्ते बांधणारेत?"
"त्यासाठी तरी पैसे कमवाय लागतात की दादा."
"मग आपल्याकडनं घेतलेले कुठं..."
"हां, जरा संभाळून शब्द वापरा दादा. मागच्या वेळी असंच कायतर बोलून गेला सहज म्हणून आणि..."
"आहे लक्षात आमच्या. बरं ते जाऊ दे, त्या पुण्यातल्या सभेचं तेवढं घ्या की मनावर."
"हां, पण झालंय काय नक्की?"
"एस. पी. कॉलेजवर सभा होणार म्हणून बॅनर लावलेत गावभर..."
"एस. पी.? पण त्यांनी तर राजकीय पक्षांना ग्राऊंड द्यायचं बंद केलंय ना?"
"तेच तर! ह्यांनी कुणी विचारलंच नै कॉलेजवाल्यांना. डायरेक्ट बोर्डच लावले, आणि पोलिस परवान्याच्या वेळी ते नाही म्हंटले की... हां, तुम्हाला हसू येतंय आता; पण त्यांचा चेहरा कसा झाला असंल विचार करा की जरा."
"बरं मग आपण काय करायचं ह्यात? ह्यांची एखादी शिक्षण संस्था, एखादा साखर कारखाना, गेला बाजार एखाद्या पतसंस्थेचं पटांगण तरी..."
"काय आबा तुम्ही? कुणाबद्दल बोलताय हे? अहो सेनेनं युद्ध करायचं का संस्था चालवायच्या? काय पण तुमचं..."
"बरं बरं, मी काय करायचंय ते तरी सांगा. त्या डेक्कनच्या नदीपात्रात काय सर्कस-बिर्कस चालूय का? नसेल तर तिकडंच घ्या म्हणावं सभा."
"तसं नाही आबा. गावभर बॅनर लागलेत, एस.पी. कॉलेजवर सभाय म्हणून. आता कॉलेजनं नाही म्हटल्यावर ठिकाण बदलायचं म्हंजे अपमान नाही का? असा अपमान गिळून माज कसा करणार तुम्हीच सांगा."
"बरोबराय तुमचं दादा. मग काय करायचं म्हंता?"
"जरा एस.पी.वाल्यांकडं बघता का?"
"अरंरंरं, काय हे दादा. अहो शिक्षण क्षेत्रातली पापभीरु माणसं ती. त्यांना कशाला ह्यात ओढताय? त्यापेक्षा 'माज'ला समजवा की. म्हणावं, एस.पी. चुकून छापलं बॅनरवर; सभा तर एस.एस.पी.एम.एस. ला होणारे..."
"वा वा आबा! काय शक्कल लढवलीत. मानलं तुम्हाला. पण तसलं काही होणार नाही. एस.पी.लाच सभा होईल. तुम्ही बघा कसं जमवायचं ते."
"बरं, बघतो. पाठवतो डिपार्टमेंटच्याच कुणाला तरी. उगाच आपलं नाव आलं तर वेगळीच बोंब व्हायची..."
"हां... हे बी खरंच की. माझ्या नव्हतं डोक्यात आलं, पण आबा..."
"आता काय दादा?"
"ही आयडीया चांगलीय की!"
"कुठली? डिपार्टमेंटचाच माणूस पाठवायची?"
"नाही. ते तर तुम्ही कराच. पण जरा मिडीयात लीकेज करा की ह्याचं."
"काय म्हंताय काय?"
"तुम्ही ऐकताय तेच. जरा हवा होऊ दे की सभेच्या तोंडावर. 'सरकार'च्याच मदतीनं 'सरकारविरोधी' सभा! म्हंजे कसंय, पब्लिकला बी जरा विचार करु दे - आम्हीच कसं ह्यांना खांद्यावर घेतो आणि मग हे माजात आमच्याच कानात..."
"बास बास, दादा. कळलं. होऊन जाऊदे तुम्ही म्हंताय तसं... येतो आम्ही."


Share/Bookmark

Monday, February 3, 2014

एका कवेत चंद्र...

एका कवेत चंद्र अन्‌ दुसरीत भाकर होती
जिंदगीची गोष्ट माझ्या, भलतीच कातर होती

तो चंद्र दाखवी स्वप्ने, भलतीच भलतीसलती
मग चंद्रावर पांघरली, मी भाकरीची चादर होती

झोपेला गाई अंगाई, मी असाच निद्रानाशी
स्वप्नांच्या दुनियेलाही, मारली मी ठोकर होती

त्या चांदण्यांच्या गप्पा, अन्‌ पौर्णिमेची स्वप्ने
या फाटक्या संसाराला, आशेची झालर होती

एका कवेत चंद्र अन्‌ दुसरीत भाकर होती
जिंदगीची गोष्ट माझ्या, भलतीच कातर होती


Share/Bookmark

Monday, January 20, 2014

New Marathi film - TimePass

New Marathi film - TimePass. Not worth for even time-pass!! You want to show love-story? Ok. You want to show college life masti? Ok. You want to show rebellious youth? Ok. But why do you have to glorify eve-teasing and verbal abusing? Why do you have to justify insulting and disobeying your hardworking and caring parents? Why are your jokes targeted at a particular caste (Brahmins, to be specific)? Personally, I couldn't bear this nonsense and left the theater in disgust! (That doesn't happen with me often. I've even watched the entire length of 'Chandni Chowk to China', which was the worst movie by Akshay Kumar - according to himself!!) To add to the 'glory' of this movie 'TimePass', there were several young boys seated around us, whistling and shouting abuses and slogans on every other dialogue of the actors. Most of these boys were drunk and were losing their balance inside the theater. Mind you, I'm talking about 'the' E-Square (Pune-Shivajinagar), where you are not allowed to enter with a Pepsi bottle since it is an 'outside' beverage...but you can pass through all security checks and procedures even if you're heavily drunk! (Good places to be visited by good people in good company are becoming extinct scaringly faster than expectation!!)


Share/Bookmark

Sunday, January 19, 2014

कसाबच्या बिर्याणीची गोष्ट

काल एका समारंभात बोलताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेला खुलासा -

आर्थर रोड तुरुंगात अजमल कसाबची केस कडेकोट बंदोबस्तात सुरु होती. दिवस राखी पौर्णिमेचा होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, 'सव्वीस अकरा'चा आरोपी कसाबपासून पाच फुटांवर बसले होते. निकमांच्या डाव्या मनगटावर राखी बांधलेली होती, तिच्याकडं बोट दाखवून कसाबनं खुणेनंच विचारलं, हे काय आहे? निकमांनी त्याला राखी म्हणजे काय, बहीण-भावाच्या नात्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. न्यायाधीश अजून आले नव्हते, पण कसाबच्या केसचं 'लाइव्ह रिपोर्टींग' करण्यासाठी झाडून सगळ्या देशी-विदेशी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उज्ज्वल निकम कसाबशी बोलत असतानाच न्यायाधीश आले. त्यांनी निकमांना 'काय चाललंय?' असं विचारलं. त्यावर, कसाब राखीबद्दल विचारत होता म्हणून त्याला माहिती देत होतो, असं निकमांनी सांगितलं. त्यांच्या बोलण्यात बहिणीचा उल्लेख आला तेव्हा कसाबची मान शरमेनं खाली गेली, असं एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं पाहिलं (म्हणे)! त्याबरोबर काही अतिउत्साही प्रतिनिधी बाहेर उभ्या असलेल्या ओबी व्हॅन्सना ही 'ब्रेकींग न्यूज' द्यायला पळाले. झालं, सगळ्या न्यूज चॅनल्सवर ही न्यूज फुटली, तज्ज्ञांचे पॅनल्स चर्चेला बसले... 'बहिणीच्या आठवणीनं कसाबच्या डोळ्यांत पाणी!', 'कसाब खरंच गुन्हेगार की फक्त बळीचा बकरा?', 'कसाबमधे जिवंत आहे माणुसकी', 'कोवळ्या वयात चुकलेला कसाबसुद्धा एक सामान्य माणूस', वगैरे वगैरे. दुपारी साधारण दीडच्या सुमारास फुटलेल्या या बातमीनं संध्याकाळपर्यंत सगळी चॅनल्स, संपूर्ण मीडिया व्यापून टाकलं.

संध्याकाळी पाच वाजता केसचं कामकाज संपवून निघालेल्या उज्ज्वल निकमांना त्यांच्या 'इंटेलिजन्स ऑफीसर'चा मेसेज मिळाला - 'सर, बाहेरचं वातावरण इमोशनली चार्ज केलं गेलंय, कसाबला भरपूर सिंपथी मिळवून दिली जातीय!' आता बाहेर पडल्यावर सगळ्या वाहिन्यांचे कॅमेरे आणि माइक आपल्यावर रोखले जाणार याची कल्पना असल्याने काय बोलायचं याचा विचार करत उज्ज्वल निकम बाहेर आले. अपेक्षेप्रमाणे सर्व प्रतिनिधी त्यांच्यावर तुटून पडले - 'कसाब खरंच रडला का? कसाब काय म्हणाला? कसाबला बहीण आहे का? वगैरे वगैरे.' उज्ज्वल निकमांनी फक्त एकच वाक्य उच्चारलं, 'कसाबनं आज मटण बिर्याणी मागितली.' बस्स!

न्यूज चॅनेल्सवर ताबडतोब दुसरी ब्रेकींग न्यूज - 'कसाब निर्दयी अतिरेकी, निरपराध लोकांची हत्त्या करून वर बिर्याणी मागितली!' पुन्हा तज्ज्ञांचे पॅनल्स चर्चेला बसले, 'किती निर्दयी माणसं तयार केलीत पाकिस्ताननं, अशा दहशतवाद्यांना फाशीच दिली पाहिजे, वगैरे वगैरे.' आता 'कसाबनं मटण बिर्याणी मागितली' एवढ्यावर न थांबता, मीडियातल्या काही क्रिएटीव्ह लोकांनी नवीनच बातमी बनवली, 'सरकार कसाबला रोज बिर्याणी खाऊ घालतंय!!' आणि मग सुरु सरकारला (टु बी स्पेसिफिक, कॉंग्रेसला आणि आर. आर. आबांना) झोडपणं... 'कसाबला बिर्याणी खायला घालणारं सरकार' असा प्रचार... आणि अशाच अनेक सुरस आणि चमत्कारिक गोष्टी!

अलीकडेच एका चॅनेलवर 'सव्वीस अकरा' संबंधित कार्यक्रमात उज्ज्वल निकम आणि आर. आर. पाटील दोघेही सहभागी होते. त्यावेळी सर्वप्रथम निकमांनी या 'बिर्याणी प्रकरणा'चा जाहीर खुलासा केला, तेव्हा आर. आर. आबा म्हणाले, 'आत्ता मला कळालं कसाबच्या बिर्याणीमागं कुणाचा हात होता!'

(ही गोष्ट इथं सांगण्याचा उद्देश 'मीडिया पब्लिकला कसं आणि काय बनवतंय आणि पब्लिक कसं बनतंय, ते कळावं' इतकाच!)


Share/Bookmark

Wednesday, December 11, 2013

अण्णा का पैगाम, पुराने साथी केजरीवाल के नाम...

तेरी पार्टी में ना रखेंगे कदम, 'आप' के बाप
तेरे सपोर्ट में कुछ कहेंगे ना हम, आज के बाद
तेरी पार्टी में...

मेरा आंदोलन...
मेरा 'आंदोलन' समझ लेना इक जरीया था
तुझको आखिर मिल ही गया जो तेरा 'सपना' था
हम को 'दिल्ली' में ना बुलाना सनम, आज के बाद

फिर से आएंगी...
फिर से आएंगी खबरें मेरे 'अनशन' की
तुम तो मिटींग में रहोगे अपने कॅबिनेट की
ज्यूस भी हम खुद ही पी लेंगे सनम, आज के बाद
तेरे सपोर्ट में कुछ कहेंगे ना हम, आज के बाद


Share/Bookmark

Sunday, December 8, 2013

राईट टू रिजेक्ट

दिल्ली विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 'राईट टू रिजेक्ट' वापरण्यात आला. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन - इव्हीएम-वरच्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यावेसे वाटत नसेल तर 'नन ऑफ द अबोव्ह - नोटा'चा पर्याय उपलब्ध होता. मतदारांना एकही उमेदवार पसंत न पडणं हे सर्व पक्षांचं आणि एकूणच सिस्टीमचं अपयश म्हणावं लागेल, पण... दिल्लीत एकूण मतदार होते एक कोटी पंधरा लाख, त्यापैकी अठ्ठ्याहत्तर लाख बासष्ठ हजार म्हणजे अडुसष्ठ टक्के प्रत्यक्ष मतदान झालं. आणि त्यापैकी 'नोटा' अर्थात 'एकही उमेदवार पसंत नाही' अशी फक्त पंचेचाळीस हजार सहाशे म्हणजे 0.58% मतं होती! मत द्यावंसं वाटेल असा एक तरी उमेदवार उपलब्ध असणं, ही खरंच खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे, नाही का?


Share/Bookmark

Saturday, November 30, 2013

गाणं

लग्नाचा सीझन. शहरातली सगळी कार्यालयं माणसांनी भरलेली. रस्त्यांच्या दोन्ही बाजू पार्क केलेल्या गाड्यांनी भरलेल्या. एकामागून एक अशा सलग दोन-दोन तीन-तीन वराती. वरातीत नाचणारे उत्साही स्त्री-पुरुष, मुलं, काही ठिकाणी घोडेही! कामाच्या वेळी ट्रॅफीकमधे अडकल्यामुळं हॉर्न वाजवून वरातीच्या बॅन्डला साथ देणारं 'पब्लिक'. अशाच एका कार्यालयातून बाहेर येणारी एक मोठ्ठी वरात - सगळ्यात पुढं फटाक्यांचा धूर काढणारी तरुणाई, त्यामागं सुप्रसिद्ध 'ब्रास बॅन्ड', बॅन्डच्या तालावर नाचणारे प्रतिष्ठित मध्यमवयीन पुरुष, पुरुषांच्या खांद्याला खांदा आणि कंबरेला कंबर लावून नाचणार्‍या घरंदाज महिला, त्यामागं (नऊवारी, झब्बा, पगडी, वगैरे) पारंपारीक वेषात चार-पाच घोड्यांवर बसलेली किशोरवयीन मुलं-मुली, इथपर्यंत 'ब्रास बॅन्ड'चा आवाज पोचत नसेल की काय म्हणून डॉल्बीची सरकणारी भिंत, आणि त्यातून निघणार्‍या किंचाळ्यांच्या तालावर बेफाट थिरकणारी ज्ञानेश्वर-मुक्ताईपासून चांगदेवांपर्यंतच्या वयाची बेभान माणसं... अबबब! केवढा हा डामडौल, केवढी प्रतिष्ठा, केवढा खर्च, केवढा मोठेपणा! सहज म्हणून 'ब्रास बॅन्ड'वर वाजणारं गाणं ऐकण्याचा प्रयत्‍न केला आणि त्या बॅन्डवाल्याचं मनापासून कौतुक वाटलं. काय चपखल गाणं निवडलं होतं - "भोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दरशन छोटे...!"


Share/Bookmark

Sunday, August 18, 2013

A better thing to do...

Praising someone without any reason is a better thing to do than cursing someone without any reason.


Share/Bookmark

Saturday, August 10, 2013

The Complete Entertainer

Shah Rukh Khan is a family entertainer. His movies appeal to audience of any age, any state, any social status. You do not need higher IQ to enjoy his movies. Watch his Chennai Express for a complete entertainment package. Easy to understand jokes, funny characters, dialogues written considering the 'common man', and most important - no vulgar/double-meaning jokes, no steamy scenes, no skin-show. Yes, there is on-screen violence, but definitely much less than that in video/internet games kids play and cartoons they watch. A movie, after a long time, that can be watched with your entire family. (Even Bhag Milkha Bhag doesn't qualify as a family entertainer, since you cannot answer kids' questions like, why muslims killed sikhs during partition, what Milkha did with his Australian girlfriend, and why winning against Pakistan is sooooo important...) Dear Shah Rukh, you care for what a 'common man' wants from a movie, and you dare to offer that in your movies despite all the competition and criticism... that makes you the King of Bollywood!


Share/Bookmark

Thursday, August 8, 2013

नाती

काहीतरी फायदा करून देणारी नाती टिकवली जातातच... आर्थिक फायदा करून देणारी तर नक्कीच!

Share/Bookmark

Sunday, August 4, 2013

निश्चित

एक विचार
एक कृती
यश निश्चित.

अनेक विचार
शून्य कृती
गोंधळ निश्चित.

अनेक विचार
अनेक कृती
निश्चित फळ अज्ञात,
पण फळ निश्चित.

(कृपया यावर फार विचार करु नये,
निश्चित गोंधळ निर्माण होऊ शकतो!)


Share/Bookmark

Friday, August 2, 2013

रहस्य

हजारो वर्षांपासून या जगात अब्जावधी माणसं जन्माला येत आहेत आणि मरुनही जात आहेत. पण आजही एका नव्या जीवाच्या येण्याची उत्सुकता आणि कौतुक कायम आहे. हेच तर या जगाच्या टिकून राहण्यामागचं खरं रहस्य आहे.


Share/Bookmark

Thursday, August 1, 2013

स्वयंभू

माणूस कितीही स्वयंभू, स्व-कर्तृत्ववान असला तरी, कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम, मदत, विश्वास, साथ देणारी माणसं सोबत असल्याशिवाय फार मोठं कर्तृत्व गाजवू शकत नाही.


Share/Bookmark

Friday, July 12, 2013

झोपलेल्या नशीबाची गोष्ट

...सिंधुकाठी एक गरीब कोळी राहत होता. घरात चूहेसुद्धा यायचे नाहीत इतकं वाईट चाललेलं. ना बायकोला दागिना ना पोरांना कपडा. रोज रात्री मतलई वारे सुटले की जमिनीवरच उघड्यानागड्या चिल्ल्यापिल्ल्यांच्या अंगावर आपलं नेसूचं धोतर पांघरून नुसत्या लंगोटीवर नदीकाठच्या तराफ्यावर बसायचं, बांबू खुपसत नदी नेईल तितकं आत जायचं. भोवर्‍यांमध्ये टोपली बुडवून बुडवून जे आत येईल ते - मासे, खेकडे, सुंगटे, शिंपले, कालवे मडक्यात टाकायचे, वारा पडला की पहाटे परत बांबू खुपसत खुपसत उघडं घरी. उघडीनागडी पोरं बापाला पाहताच दुडूदुडू पळत किनार्‍यावर येऊन मडक्यातले नुस्ते घेऊन परत पळत पळत जाऊन आईला ताजं ताजं तेच रांधायला लावायचे. कारण घरात दुसरं काहीच दिवसभर नसायचं. बायको मिळालेल्यातलाच थोडासा वाटा वाण्याला देऊन भात, मीठ, मसाला, तेल रोज लागेल तेवढं आणायची. इकडे चुलीवर स्वैंपाक होईपर्यंत कोळी चिलीम फुंकत ताटं मांडून रांगेनं समोर बसलेल्या पिल्लांकडे अपूर्व मायेनं पाहत बसायचा. मग तोही जेवून झोपी जायचा. असं रोज. अर्धं आयुष्य हेच चाललं. हेच कष्ट, हाच विरंगुळा, हीच करमणूक. निजसुख, आनंद. मग एकदा झोपेत स्वप्‍नात आपलं झोपलेलं नशीबच त्याला अचानक दिसलं. वा रे वा. काय डाराडूर झोपलं आहे. या अल्ला, हे इथे असं झोपलेलं असल्यानंच माझ्या घरात धनसंपदा येत नाही. कधी घरात इतरांकडे असतात तशा वस्तू येतील? निदान घर तरी इतरांसारखं कधी ह्या जागेत होईल? या अल्ला, मला मार्ग दाखव. असा खूप कल्ला केल्यावर मग अल्लानं त्याला असा सल्ला दिला की, त्याला झोपू दे, उठवू नकोस. ते एकदा उठलं, की पुन्हा झोपत नाही. तुला ते चालेल का? बघ, तुझा तू ठरव आणि कर तुला वाटेल तसं.

मग बायकोचा विचार घेऊन कोळीमहाशय स्वप्‍नात झोपलेलं नशीब जिकडे दिसलं होतं त्या अंदाजानं वाट काढत घराबाहेर पडले. सापडलं. एका मोडक्या तोडक्या खळ्यात पालापाचोळ्यावर झोपलेलं स्वप्‍नात पाहिलं होतं तसंच... संतापून त्याला लाथ घालून उठवत कोळी म्हणाला, माँके लौडे, ऊठ. मेरा ये हाल और तू सालोसाल सोया पडा अँ? ऊठ. त्यानंतर त्याचं नशीब त्याला तरातरा दूर, एका सतत गजबजलेल्या मोठ्या शहरात घेऊन गेलं. श्रीमंतीचा झगझगाट. कामधंदा काय तोटा? खाणं पिणं कपडे चंगळ. पण राहण्याची सोय कामधंद्याच्या पन्‍नास मैल दूर, वर खोप्यासारखी, कारण तिथपर्यंत ज्यांची नशीबं आधीच जागी झाली होती त्यांची घरंच घरं वर ७-७ मजली हसताहेत. रोज पहाटे अंधारात उठून कामावर जायचं, मिळेल ते खात काम करून रात्री घरी येताबरोबर जोडे काढण्याचीही सोय नसे, इतकी झोप. पुन्हा पहाटे तेच. हळूहळू तो तिथे श्रीमंत झाला. सगळ्या वस्तू खरेदी केल्या. बायको मुलं आली. पण त्यांना तो दिवसा कधीच घरी सापडायचा नाही. दिवसेंदिवस अनेक भानगडींमध्ये अडकून पडलेला तो घरी उशिरा परततांना नेहमी म्हणायचा, सालं हे नशीब पुन्हा झोपणार नाही का? ते सुखाचे दिवस पुन्हा येणारच नाहीत का?

यावर शेवटून अवलियासाहेब मोहमदराम म्हणायचे, एकदा लाथ मारलेलं नशीब पूर्ण सूड उगवूनच तुमच्याबरोबर कबरीत झोपी जाईल.

('हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ' - भालचंद्र नेमाडे)

Share/Bookmark

Friday, May 24, 2013

तुला भेटल्यावर...




ओळख पटली माझी मला, तुला भेटल्यावर
मी म्हणजे 'मी' नाही, कळले तुला भेटल्यावर

पाऊस-पाणी म्हटली गाणी, भिजलो अन् सुकलो
पाणी आभाळातील नव्हते, कळले सुकल्यावर

गुण आवडले - दोषही प्यारे, प्रीती जडताना
वाटे सगळे बदलावेसे, नाते ठरल्यावर

नशा नकोशी वाटू लागते, चढू लागताना
जरा घेऊनी झिंगू, वाटे पुन्हा उतरल्यावर

पैसा आला, घेऊन झाली गाडी अन्‌ माडी
जगायचे पण राहून गेले, कळले खपल्यावर

... मंदार
२४.०५.२०१३


Share/Bookmark

Thursday, May 23, 2013

भीती घालावी लागते...?

सोसायटीच्या पार्किंगमधून गाडी काढत होतो. एक पाच-सहा वर्षांचा मुलगा पार्किंगमधे, गाड्यांच्या मधून, गेटपर्यंत पळत-पळत चालला होता. मागून त्याची आजी ओरडत होती, "शुभम, थांब पळू नको, इकडं ये." शुभम काही ऐकत नव्हता. पळता-पळता माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मागून आजी ओरडली, "शुभम, थांब नाही तर ते दाढीवाले तुला घेऊन जातील..." शुभम थोडा घाबरला, पण तिथंच थांबून माझ्याकडं बघू लागला. मग आजी मला म्हणाल्या, "तुम्ही जरा भीती दाखवा हो त्याला. अजिबात ऐकत नाही माझं." मी एकदा आजीकडं बघितलं आणि मग शुभमकडं बघून हसलो. शुभम पण हसला. आजी पुन्हा म्हणाल्या, "शुभम, ते दाढीवाले रागावतील हं तुला." पण शुभमनं आता स्वतःचं मत बनवलं होतं. तो माझ्याकडं बघून गोड हसला आणि पुन्हा गाड्यांमधून पळू लागला. मी आजीबाईंना विचारलं, "का उगाच भीती घालता हो पोराला?" त्या म्हणाल्या, "काय करणार? माझं ऐकतच नाही तो. म्हणून अशी कुणाची तरी भीती घालावी लागते..." "अहो पण अशानं माझ्याबद्दल किंवा माझ्यासारखं दिसणार्‍यांबद्दल त्याच्या मनात कायमची भीती किंवा संशय निर्माण होईल ना!" "होऊ दे की मग. त्यानं माझं ऐकलं म्हणजे झालं. तुमच्याबद्दल काय मत होईल त्याचं मला काय..." असं म्हणून त्या शुभमच्या मागे पुन्हा ओरडत निघून गेल्या.

'आपलं' ऐकलं जावं यासाठी 'इतरां'बद्दल भीती दाखवण्याचं हे एकमेव उदाहरण नाही. वडीलधारी माणसं, समाजातले विचारवंत, आणि खास करुन मीडीया, असंच काहीतरी करताना दिसतात. सरकार युसलेस, राजकारण गलिच्छ, नेतेमंडळी गुंड, भांडवलदार पिळवणूक करणारे, श्रीमंत निर्दयी, गरीब विध्वंसक, वगैरे वगैरे... या सर्व 'इतरां'वर शिक्के मारले की सर्वसामान्य माणूस घाबरतो आणि त्यांच्यापासून लांब राहतो, त्यांच्यापासून स्वतःला 'वाचवण्याचा' प्रयत्न करतो. आणि अशा वेळी, ही भीती आणि संशय निर्माण करणार्‍यांवर त्याचा विश्वास बसू लागतो.

शुभमचं संरक्षण किंवा त्याचा विकास यापेक्षा त्यानं 'आपलं' ऐकणं त्याच्या आजीला महत्त्वाचं वाटलं. त्यासाठी विनाकारण एखाद्याबद्दल शुभमच्या मनात संशय आणि भीती निर्माण करण्यात तिला काही चुकीचं वाटलं नाही. स्वतःचं महत्त्व टिकवण्या किंवा वाढवण्यासाठी कळत-नकळत तुम्हीही असं काही करताय का? माणसा-माणसातली दरी वाढत चाललीय असं आपण म्हणतो खरं, पण आपणही ती दरी वाढवण्यात हातभार लावतोय का, याचा विचार केला पाहिजे...

Share/Bookmark

Sunday, May 19, 2013

इतिहास आणि नागरिकशास्त्र

जोपर्यंत आपल्या शाळांमधून 'इतिहास' शिकवला जातोय, तोपर्यंत आपलं 'नागरिकशास्त्र' सुधारण्याची काही शक्यता नाही. स्वातंत्र्यलढा, असहकार चळवळ, राज्यक्रांती, या गोष्टींपासून बरोब्बर उलटी आणि लोकशाहीला हानीकारक प्रेरणा घेतली जातीय...


Share/Bookmark

Thursday, May 16, 2013

पावसाचे थेंब चार...

तापलेल्या या जमिनीला
आणखी काय हवं यार?
थोडा थंड वारा आणि
पावसाचे थेंब चार...

ताप विसरून क्षणभर
जमीन होते थंडगार,
मातीचा जो वास येतो
घ्यावा वाटे वारंवार...

पाऊस येतो आडवा-तिडवा
भिजवून टाकतो घरदार,
टप्-टप् टप्-टप् थेंब साठून
छपरावरून पडते धार...

रस्त्यावरून माणसं, गाड्या
झेलत जातात पावसाचे वार,
सुटका केली उन्हापासून
म्हणून 'त्या'चे मानतात आभार...

- अक्षर्मन


Share/Bookmark