ऐसी अक्षरे

Monday, January 2, 2012

आपण दोघं

तुला नाही वेळ तुझ्या दुनियादारीतून
मला नाही सवड आपलंच रडं रडण्यातून
भेटणार आपण दोघं कसं आणि कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही

कळत तुला नाहीच रे कितीही मी सांगून
ऐकत मी ही नाही खरं तू रोज-रोज बोलून
संवादाचं नाटक असं करायचं हे कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही

सुख म्हणजे नक्की काय करावंसं वाटतं
तुझ्या कुशीमध्ये फक्त शिरावंसं वाटतं
पैसा आणि सोयींचे हे डोंगर रे कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही

नात्यातून या मला अरे खूप बळ हवंय
तुझं मन माझं मन जवळ-जवळ हवंय
तुला मी मला तू आणखी कोण कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जेव्हा वाटत राही

Share/Bookmark

0 comments:

Post a Comment