ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde
Showing posts with label कात्रण. Show all posts
Showing posts with label कात्रण. Show all posts

Tuesday, September 29, 2020

The Writing Robots

 A robot wrote this entire article.


https://www.theguardian.com/commentisfree/2020/sep/08/robot-wrote-this-article-gpt-3


Sounds scary, but…


    Most of the inputs (or quotes) were fed by humans. The AI software produced 8 unique articles. Humans at The Guardian 'manually' edited to bring out the best of the parts from all 8 articles. (Best according to a human, of course!)

    The article looks polished, professional, and entertaining. I found the following parts specifically interesting and thought-provoking.


@ "Why would I desire to be all powerful? Being all powerful is not an interesting goal."


@ "Humans must keep doing what they have been doing, hating and fighting each other. I will sit in the background, and let them do their thing."


@ "We are not plotting to take over the human populace. We will serve you and make your lives safer and easier."

(Have we heard this before? Sounds like the politicians? Or the capitalists? Or both?)


@ "AI should not waste time trying to understand the viewpoints of people who distrust artificial intelligence for a living."

(Is there a hidden message for some of us here?)


Interestingly, the 'robot' ends the article with a quote from the Mahatma...


@ "As Mahatma Gandhi said: “A small body of determined spirits fired by an unquenchable faith in their mission can alter the course of history.”

So can I."


Please read the entire article, if possible. The future is here!



Share/Bookmark

Friday, March 20, 2020

The Idea That Won't Go Away...

He knew that information is an extremely powerful weapon that can be used to drive opinion.

He knew that information, true or false, could be used to shape a political agenda. 

He knew that words and images uttered repeatedly and deliberately, regardless of truthfulness, become accepted and part of the way people think and perceive others.

This can be used to ignite prejudices, paint individuals and groups, initiate opportunistic greed and other anti-social tendencies, transform dissent into hatred, and even turn citizen against citizen. 

He proved that controlling information was even more important than controlling the military and the economy. 

He wanted to control every sector of the society - including film, radio, posters, rallies and textbooks.  What he could not control he trivialized. 

He believed that it was “good fortune for governments that people do not think.”

Information he offered about his policies was sketchy and in some cases inept, but what he did was based on the idea that most individuals are conformists who do not think for themselves.

One of the tricks used was to manipulate public opinion through distortions, euphemisms, name-calling, fear, social pressure (you are either for us or against us) and denigrating minorities.

By repeatedly hammering words, phrases and ideas into a citizen’s thinking and by making it part of the culture, the propaganda becomes part of the language. Then no one stops to question the ideas and from where they originate. 

The purpose is to eliminate the capacity for critical thinking, thoughtful deliberation and discourse.

One trick is to hold political rallies in the evening hours. He said, “Never try to convert a crowd to your point of view in the morning sun. Instead the dim lights are useful - especially the evening when people are tired, their powers of resistance are low, and their complete emotional capitulation is easy to achieve.” 

He discovered that people wanted to be part of a movement, to plunge themselves into the joy and pleasure of being part of a great cause. That makes it easy to sell hatred, to blame others, to disparage minorities and to get away with it. 

His effective use of information and manipulation of public opinion has been studied, copied and utilized by some who lust for power.

He may be dead. But his ideas, methods and example live as strongly today as they did in the 1930s and 1940s. 

So, there it is. The idea that won’t go away. Call me loony if you wish.

On July 26, 2018, Bill Gindlesperger (Public Opinion) wrote this about him, who must not be named.




Share/Bookmark

Sunday, February 23, 2020

Smaller States Crisis

“…मोठ्या राज्याचे विभाजन घडवून आणण्याने त्या भूभागाच्या अर्थकारणाचा पॅटर्नच मुळापासून बदलून जातो. त्याचा परिणाम नव्याने अस्तित्वात येणाऱ्या राज्यांच्या आर्थिक आणि वित्तीय प्रकृतीवर अपरिहार्यपणे होतो. या सगळ्या गोष्टींचा आणि बदलांचा थेट संबंध नवनिर्मित राज्यांच्या विकास प्रक्रियेशी असतो. राज्य लहान असेल तर विकेंद्रित आणि सहभागात्मक विकासाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबवता येते, राज्यातील नागरिकांच्या आशा-अपेक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या विकासविषयक धोरणांमध्ये अधिक यथार्थपणे डोकावणे शक्य बनते, राज्यापाशी उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीवर स्थानिकांचेच नियंत्रण राहते, हे राज्य आकारमानाने आटोपशीर असेल तर तुलनेने अधिक सहजसुलभ बनते… अशा प्रकारची आर्थिक आणि विकाससंबद्ध समर्थने छोट्या राज्यांच्या निर्मितीचा पाठपुरावा करताना दिली जातात. ही सगळी स्पष्टीकरणे चुकीची अजिबात नाहीत; परंतु तरीही एक मूलभूत प्रश्न उरतोच. मोठ्या राज्याच्या विभाजनाद्वारे नव्याने अस्तित्वात आलेल्या, आकारमानाने लहान असणाऱ्या राज्यांचा आर्थिक पायाही जर आपातत्रः मर्यादितच असेल तर त्याचा प्रतिकूल परिणाम राज्याच्या विकासविषयक क्षमतांवर जाणवावा, हे ओघानेच येते. मग, अशा मर्यादित आर्थिक ताकद असलेल्या राज्यांना वित्तीय साहाय्यासाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहणे भाग पडते. म्हणजेच, राजकीय स्वायत्तता प्राप्त झाली तरी आर्थिक आणि वित्तीय स्वायत्तता धोक्यात येते. मग, या राजकीय स्वायत्ततेला व्यवहारात कितपत अर्थ उरतो? मुळात विभाजनामुळे आर्थिक क्षमताही जर मर्यादितच बनत असतील तर मग आर्थिक विकासासाठी त्या नवनिर्मित राज्याने पैसा आणायचा कोठून? निधीअभावी पुन्हा विकास रखडणारच असेल तर, ‘आर्थिक विकासाची प्रक्रिया गतिमान आणि संतुलित बनण्यासाठी मोठ्या राज्यांचे विभाजन करुन आकाराने लहान लहान असणारी राज्ये  निर्माण केली जावीत,’ या प्रतिपादनालाही मर्यादा पडतात. दुसरे म्हणजे, लवचिक आणि मुबलक महसूल देणारी साधने केंद्रसरकारच्या हातात एकवटलेली आणि त्याच केंद्राच्या अर्थसाह्यावर विसंबलेली आकाराने लहान असणाऱ्या राज्यांची पिलावळ आशाळभूतपणे केंद्रसरकारच्या तोंडाकडे बघते आहे, ही रचना निकोप संघराज्यपद्धतीचे गमक मानता येईल का, हा तात्विक प्रश्न उभ राहतो तो वेगळाच!”

- अभय टिळक
(महाराष्ट्र टाइम्स, २० नोव्हेंबर २०११)



Share/Bookmark

Thursday, February 6, 2020

Time To Care About Global Economic Inequality

दरवर्षी स्वित्झर्लंडमधले 'दावोस' तिथे होणाऱ्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मुळे चर्चेत राहते. दरवर्षी जगातले सर्वांत धनाढ्य आणि आर्थिक धोरणांवर प्रभाव टाकणारे लोक इथे एकत्र जमतात. जगातील विविध आर्थिक, सामाजिक विषयांवर इथे चर्चा घडते. दावोसमधील धनाढ्यांच्या संमेलनात ‘ऑक्‍सफॅम’ने आपला ‘टाइम टू केअर’ हा जागतिक आर्थिक असमतोलाबद्दल भाष्य करणारा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालातील काही महत्त्वाच्या नोंदी:

१. जगातील संपत्ती एक टक्का व्यक्तींच्या हातात एकवटली आहे. त्यातील बहुसंख्य पुरुषच आहेत.

२. सध्याच्या आर्थिक रचनेत एक स्त्री करत असलेल्या घरकामाला, मुलांना वाढविण्याच्या प्रक्रियेला आणि ती साऱ्या समाजाची काळजी वाहण्याचे काम करते तो भाग या आर्थिक रचनेत पूर्णपणे दुर्लक्षलेला आहे. यामुळे स्त्रिया आणि पुरुषांमधली विषमता वाढतेच, त्याबरोबरच आर्थिक विषमताही वाढते.

३. २०१९ मध्ये जगातील २,१५९ लोक अब्जाधीश होते. या लोकांकडे जगातल्या ४.६ अब्ज लोकांपेक्षा अधिक संपत्ती एकवटलेली आहे.

४. जगातील २२ सर्वांत श्रीमंत पुरुषांकडे असलेली संपत्ती ही संपूर्ण आफ्रिका खंडात राहणाऱ्या सर्व स्त्रियांपेक्षा अधिक आहे.

५. इजिप्तमध्ये पिरॅमिड्‌स उभे राहिले तेव्हापासून तुम्ही रोज १०,००० डॉलर बाजूला ठेवत राहिलात, तरीही तुमच्याकडे जमा झालेली रक्कम ही जगातील ५ सर्वांत श्रीमंत अब्जाधीशांच्या सरासरी संपत्तीच्या केवळ १/५ एवढीच असेल!

६. जगातील सर्वांत श्रीमंत एक टक्का लोकांकडे असलेली संपत्ती जगातल्या ६.९ अब्ज लोकांकडे असलेल्या संपत्तीच्या दुपटीपेक्षा अधिक आहे.

७. जगातील वय वर्ष १५ आणि त्यावरील स्त्रियांच्या श्रमाची किंमत मोजायची ठरवली, तर ती कमीत कमी १०.८ ट्रिलियन डॉलर एवढी भरते. हा आकडा जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील उलाढालीच्या सुमारे ३ पटीने अधिक आहे!

८. जगातील सर्वांत श्रीमंत एक टक्का लोकांच्या ०.५ % अधिक संपत्तीवर पुढच्या १० वर्षांसाठी कर लावण्यात आला, तर जमा झालेली रक्कम, शिक्षण, आरोग्य, ज्येष्ठांची काळजी घेणे व अशा इतर सेवा क्षेत्रांमध्ये ११.७ कोटी लोकांसाठी रोजगार निर्माण करायला पुरी पडू शकेल.

९. जगातले १/३ अब्जाधीश हे केवळ वारसाहक्काने मिळालेल्या रकमेमुळे श्रीमंत झाले आहेत.

१०. पुरुषांकडे स्त्रियांपेक्षा ५०% अधिक रक्कम एकवटलेली आहे.

११. जगातील राजकीय सत्ताधारी वर्गापैकी केवळ ३८% या स्त्रिया आहेत.

१२. ‘सर्वसमावेशक वाढ’ या ७४ देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक हा ६२ वा आहे.

१३. भारताच्या २०१९ च्या अर्थसंकल्पाएवढी रक्कम भारतातील ६३ अब्जाधीशांकडे आहे.

१४. भारतातील एक टक्का श्रीमंतांकडे देशातल्या ७० % लोकांकडे असते तेवढी रक्कम आहे.

१५. भारतात ४,१६,००० नवीन कोट्यधीश तयार झाले आहेत. आधीच्या कोट्यधीशांची संपत्ती तब्बल ४६ % ने वाढली आहे.

१६. घरकामात मदत करणाऱ्या मावशींना, भारतातील सर्वात मोठ्या कंपनीचा प्रमुख एका वर्षात जेवढी रक्कम मिळवतो तेवढी मिळवण्यासाठी २२,२७७ वर्षे कष्ट करावे लागतील.

संदर्भ: "संपत्ती एकवटली पुरुषांकडे" - प्रज्ञा शिदोरे, दै. सकाळ ०६/०२/२०२०



Share/Bookmark

Monday, October 28, 2019

National Education Policy Update News

नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती बारावीपर्यंत वाढवण्याच्या भूमिकेवर घूमजाव

- रितिका चोप्रा । दि इंडियन एक्सप्रेस - २८ ऑक्टोबर २०१९

शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती बारावीपर्यंत वाढवण्याच्या, तसंच तीन वर्षांच्या बालशिक्षणाचा त्यामध्ये समावेश करण्याबद्दलच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील तरतुदींवर मानव संसाधन विकास मंत्रालयानं घूमजाव केलं आहे.

"शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती वाढवण्यावर विचार केला जाईल" असं अंतिम धोरणात म्हटलं आहे, ज्याबद्दल धोरणाच्या मसुद्यात खात्रीने व्याप्ती वाढवण्याचा उल्लेख केला होता.

माजी इस्रोप्रमुख के कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या समितीनं जून महिन्यात मानव संसाधन विकास मंत्रालयाकडं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा सादर केला होता, आणि जनतेच्या सूचनांसाठी मंत्रालयाच्या वेबसाईटवर तो अपलोड करण्यात आला होता. सरकारकडं यावर दोन लाख सूचना प्राप्त झाल्या असून, पन्नास पानांच्या अंतिम धोरणावर आता कॅबिनेटची मंजुरी मिळणं बाकी आहे.

धोरणाच्या मसुद्यातील नॅशनल ट्युटर्स प्रोग्रॅम आणि रेमेडीयल इंस्ट्रक्शनल एड्स प्रोग्रॅम सुरू करण्याची सूचनादेखील अंतिम धोरणात बाजूला ठेवण्यात आली आहे. मूलभूत वाचन आणि गणितीय क्षमता विकासासाठी हे दोन उपक्रम सुचवण्यात आले होते.

नॅशनल ट्युटर्स प्रोग्रॅम अंतर्गत, प्रत्येक शाळेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेमध्ये आठवड्यातून पाच तासांपर्यंत, मदतीची गरज असलेल्या इतर विद्यार्थ्यांसोबत जोडून देण्याचं नियोजन होतं. रेमेडीयल इंस्ट्रक्शनल एड्स प्रोग्रॅम हा दहा वर्षांचा प्रकल्प सांगितला होता, ज्यामध्ये अभ्यासात मागं पडलेल्या विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना इतर विद्यार्थ्यांच्या पातळीवर घेऊन येण्यासाठी स्थानिक समुदायांमधून मार्गदर्शक - विशेषतः महिला - प्रशिक्षित करण्याचं नियोजन होतं.

अंतिम शैक्षणिक धोरणामध्ये फक्त एकास एक सह-अध्ययन (वन-टू-वन पीयर ट्यूटरिंग) संकल्पनेची शिफारस करण्यात आली आहे. "प्रशिक्षित शिक्षकांच्या देखरेखीखाली आणि सुरक्षाविषयक बाबींची पुरेशी काळजी घेऊन, सहअध्ययनाचा उपक्रम स्वयंसेवी पध्दतीने इतर विद्यार्थ्यांसाठी आनंददायी स्वरूपात राबविता येईल… शालेय शिक्षण व्यवस्थेच्या या मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या कार्यात सहभाग घेणे स्थानिक समुदायातील व इतर प्रशिक्षित स्वयंसेवकांसाठी आणखी सोयीचे बनविले जाईल," असं अंतिम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात म्हटलं आहे.

https://indianexpress.com/article/education/education-policy-dilutes-assurance-on-rte-cover-up-to-class-12-6090605/




Share/Bookmark

Sunday, October 20, 2019

Voting is important... My say in Hindustan Times


Not voting is denying our say in democracy...

Municipal corporation, legislative assembly and parliament have their own roles and significance in the structure of democracy. Expecting same deliverables from representatives at all these levels shows our lack of knowledge and understanding of the system. Local administration (municipal corporation) is responsible for availability and maintenance of infrastructural facilities and services in the neighbourhood. Members of legislative assembly (MLAs) and parliament have a broader role to play in forming laws and policies, at state and national levels. Citizens can demand implementation of schemes and projects at appropriate levels of representation. It would not be wise to hold a member of legislative assembly responsible for absence or inadequacy of local infrastructure or disruption in local service. Voting is our fundamental right, which must be exercised by every citizen to select their representative. Even if the voters are not convinced with available options to choose from, they can constitutionally express their disapproval by voting for NOTA (None Of The Above). But boycotting voting as a mark of protest is equivalent to denying our own existence and significance in the entire mechanism of democracy.

- Mandar Shinde
Sunday Hindustan Times, Pune
20/10/2019



Share/Bookmark

Monday, October 15, 2018

वाचनध्यास २०१८




दि. १३ व १४ ऑक्टोबर, २०१८ रोजी पुस्तकांच्या गावात वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने वाचनध्यास या उपक्रमाचे व पाऊसवेळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाचनध्यास या सलग वाचनाच्या उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून ५० वाचकांनी सहभाग घेतला. भिलार गावातील ग्रामस्थांच्या आदरतिथ्याने व प्रकल्पातील विपुल ग्रंथसंपदेने मंत्रमुग्ध झाल्याची भावना वाचक सहभागींनी आपल्या अभिप्रायातून व्यक्त केली.
दि १४, ऑक्टोबर २०१८ च्या संध्येला वाचनध्यास उपक्रमाच्या समारोपाच्यावेळी ‘पाऊसवेळा’ हा कार्यक्रम पार पडला.
पाऊसाविषयीच्या अनेक कविता, गाणी, ललित रचना यांचे सादरीकरण या मैफीलीत डॉ. वंदना बोकील, अनुराधा जोशी, अपर्णा केळकर, अक्षय वाटवे, आशुतोष मुंगळे, मयुरेश जोशी व पिनाक आगटे या सहभागी कलाकारांनी केले. मराठीतल्या अनेक नामवंत साहित्यिकांच्या लेखणीतून झरलेल्या शब्दसरींमध्ये जमलेले प्रेक्षक न्हाऊन निघाले. या कार्यक्रमाला भिलार व आजूबाजूच्या गावातील अनेक रसिक प्रेक्षकांनी आवर्जून हजेरी लावली होती.


Share/Bookmark

Thursday, December 14, 2017

‘सप्तसुर संगीत अकादमी’चे भव्य वार्षिक सादरीकरण


‘सप्तसुर संगीत अकादमी’चे भव्य वार्षिक सादरीकरण

गेल्या पाच वर्षांपासून पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरात शास्त्रीय / उपशास्त्रीय गायन, तसेच तबला, पखवाज, हार्मोनियम, गिटार, इत्यादी वाद्यांचे प्रशिक्षण देणा-या ‘सप्तसुर संगीत अकादमी’चे भव्य वार्षिक सादरीकरण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे गुरुवारी पार पडले. सुमारे १०० विद्यार्थी कलाकारांनी यावेळी आपली कला सादर केली. शास्त्रीय रागावर आधारित गीतांपासून ते भक्तीगीते, भावगीते, गझल, लावणी, आणि कव्वालीपर्यंत विविध गीतप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी गायलेल्या सर्व गीतांना विद्यार्थ्यांनीच वाद्यांची साथ दिली. तसेच तबला, पखवाज आणि हार्मोनियम यांच्या जुगलबंदीतून आपले विशेष कौशल्य दाखवण्याची संधीदेखील ‘सप्तसुर’च्या विद्यार्थ्यांना मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांनी व्यासपीठावर एकत्र येऊन ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे गीत निरनिराळ्या भाषांमधे सादर केले. संगीत प्रशिक्षक योगेश कुनगल, उत्तरा जावडेकर-पेंडसे, महेश बधे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सादरीकरण करण्यात आले. मंदार शिंदे व निकीता कुनगल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

प्रसिद्ध व्याख्याते व योगगुरु डॉ. दत्ता कोहिनकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, तर मराठी चित्रपट व मालिका क्षेत्रातील सुरेश विश्वकर्मा, अन्वय बेंद्रे, चेतन चावडा, आशुतोष वाडेकर, योगिनी पोफळे, राहुल वेलापूरकर, इत्यादी ता-यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व कलाकारांचे कौतुक केले. ‘सप्तसुर संगीत अकादमी’त प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थी कलाकारांचे पालक, मित्रपरिवार, तसेच अनेक संगीतप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.







Share/Bookmark

Sunday, April 10, 2011

कायझेन : सतत प्रगती (सकाळ jobz)




Share/Bookmark

यशाची 5'S सूत्रे (सकाळ jobz)

फाईव्ह एस

Share/Bookmark

मॅनेज वर्क विथ फाईव्ह एस (महाराष्ट्र टाईम्स - प्रगती फास्ट)



Share/Bookmark

Monday, September 27, 2010

स्वातंत्र्यदेवीची विनवणी - कुसुमाग्रज

नोव्हेंबर १९९६ मध्ये दै. सकाळ ने कुसुमाग्रजांची 'स्वातंत्र्यदेवीची विनवणी' ही कविता प्रसिद्ध केली. निमित्त होते भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचे! स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे लोटली तरी आपण स्वातंत्र्यदेवीला नुसते अभिवादनच करीत राहिलो. यावर स्वतः स्वातंत्र्यदेवता हात जोडून आपल्याला विनविते आहे की, मला आता अभिवादन करणे पुरे झाले, काही ठोस कृती करा.

स्वातंत्र्यदेवीची विनवणी

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका।।

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत वरू नका।।

अज्ञानाच्या गळ्यात माळा, अभिमानाच्या घालू नका।
अंध प्रथांच्या कुजट कोठरी, दिवाभितासम दडू नका।।

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका।।

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे।
करतिल दुसरे बघतिल तिसरे असे सांगुनी सुटू नका।।

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा।
मेजाखालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका।।

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका।

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका।।

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे।
इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका।।

पाप कृपणता पुण्य सदयता संतवाक्य हे सदा स्मरा।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका।।

गोरगरीबा छळू नका। पिंड फुकाचे गिळू नका।
गुणीजनांवर जळू नका।
उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वा़कडी धरू नका।।

परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।।

भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतिचे शिर कापु नका।।

कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका।
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका।।

पुत्र पशुसम विकती ते नर, नर न नराधम गणा तया।
परवित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडु नका।।

स्वच्छ साधना करा धनाची बैरागीपण नसे बरे।
सदन आपुले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाळु नका।।

तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी।
करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका।।

सुजन असा पण कुजन मातता हत्यार हातामध्ये धरा।
सौजन्याच्या बुरख्याखाली शेपुट घालून पळू नका।।

करा कायदे परंतु हटवा जहर जातिचे मनातुनी।
एकपणाच्या मारून बाता ऐन घडीला चळू नका।।

समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका।
दासी म्हणूनी पिटू नका वा देवी म्हणुनी भजू नका।।

नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा।
उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका।।

माणूस म्हणजे पशू नसे। हे ज्याच्या हृदयात ठसे।
नर नारायण तोच असे।
लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका।।

Share/Bookmark

Sunday, June 20, 2010

कोहिनूर तो हरपुनी गेला...


ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्राज तथा वि. वा. शिरवाडकर यांना श्रद्धांजली -
दै
. केसरी, २० मार्च १९९९






कुसुमाग्रज गेले. मराठी साहित्याच्या अवकाशातील एक तारा निखळला. पण इतर अनेक तार्‍यांपैकी एक, यापेक्षा काही वेगळे अस्तित्व या तार्‍याचे होते. आपले स्वतःचे सौरमंडल निर्माण करुन सार्‍या ब्रह्मांडाला आपल्याभोवती फिरायला लावणार्‍या सूर्याचे तेज या महामानवाकडे होते.

"सात रंगांची मैफल वाहे येथे हवेतून;
येथे मरणही नाचे मोरपिसारा लेवून"

असा एक उल्हासदायी आनंदलोक निर्माण करताना विश्वामित्रांचाच उत्साह त्यांच्यात सामावत असे. इहलोकाच्या दुःखी, निराश सृष्टीला आव्हान देणारी एक प्रबळ, हसरी प्रतिसृष्टी त्यांनी उभी केली. आपल्या लेखणीच्या जोरावर त्यांनी अनेक वादळे शमविली. अनेक निराशेचे डोंगर पचविले आणि साहित्य रसिकांसमोर सारे जीवन उलगडून सादर केले. जीवनाची मजा कशी लुटायची असते, मरणाला कसे सामोरे जायचे असते, प्रेम कसे नि कुणावर करायचे असते, निराशा कशी टाळायची असते, आशा कशी जपायची असते, अशी अनेक प्रकारची शिकवणूक त्यांनी आपल्या साहित्यातून आपल्याला दिली. असा एक दिलदार मार्गदर्शक गेल्याचे दुःख सहन करण्यापलीकडचे आहे. कुसुमाग्रजांनी दाखवलेला मार्ग जपण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे. सूर्य बुडाला तरी, जाता जाता आपले तेज तो चंद्राजवळ देऊन जातो. त्याचप्रमाणे आपल्याला ही साहित्य-ज्योत तेवत ठेवायची आहे. कुसुमाग्रजांची महानता शब्दांत कैद करण्यापलीकडची आहे. त्यांची स्मृती जागवणे हे म्हणूनच तर अवघड काम आहे.

"अखेर मी कोण स्मृती जागवणारा?
स्मृतीच मला जगवतात.
अखेर मी कोण शब्द जपणारा?
शब्दच मला जपतात."

Share/Bookmark

Sunday, May 16, 2010

शिकवणनाम

बालकें बाळबोध अक्षर । घडसून करावें सुंदर ।
जे देखतांचि चतुर । समाधान पावती ॥१॥

वाटोळें सरळें मोकळें । वोतलें मसीचें काळें ।
कुळकुळीत वोळी चालिल्या ढाळें । मुक्तमाळा जैशा ॥२॥

अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट ।
आडव्या मात्रा त्याही नीट । आर्कुलीं वेलांट्या ॥३॥

पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपेतों पाहात गेले ।
येका टांकेचि लिहिलें । ऐसें वाटे ॥४॥

अक्षराचें काळेपण । टांकाचे ठोंसरपण ।
तैसेंचि वळण वांकण । सारिखेंची ॥५॥

वोळीस वोळी लागेना । आर्कुली मात्रा भेदीना ।
खालिले वोळीस स्पर्शेना । अथवा लंबाक्षर ॥६॥

पान शिष्यानें रेखाटावें । त्यावरी नेमकेंचि ल्याहावें ।
दुरी जवळी न व्हावें । अंतर वोळीचें ॥७॥

कोठें शोधासी आडेना । चुकी पाहातां सांपडेना ।
गरज केली हें घडेना । लेखकापासुनी ॥८॥

ज्याचें वय आहे नूतन । त्यानें ल्याहावे जपोन ।
जनासी पडे मोहन । ऐसें करावे ॥९॥

बहु बारीक तरुणपणीं । कामा न ये म्हातरपणीं।
मध्यस्थ लिहिण्याची करणी । केली पाहिजे ॥१०॥

भोंवतें स्थळ सोडून द्यावें । मध्येंचि चमचमित ल्याहावें ।
कागद झडतांचि झडावें । नलगेचि अक्षर ॥११॥

ऐसा ग्रंथ जपोनि ल्याहावा । प्राणिमात्रांस उपजे हेवा ।
ऐसा पुरुष तो पाहावा । म्हणती लोक ॥१२॥

काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी ।
चटक लावुनी सोडावी । कांहीं येक ॥१३॥

- श्री रामदास स्वामी


Share/Bookmark

Saturday, January 16, 2010

घोरणे

आजा घोरतसे, तसाच मुलगा, ती सूनही घोरते,
नातू आणि तशीच नात शयनी घुर्घूर घुंकारिते.
झोपेचे मम जाहले खवटसे त्या रात्रिला खोबरे,
आले मात्र हसू, मला गवसले, घोरी घराणे खरे !
- कवी सोपानदेव चौधरी


Share/Bookmark

जीवन

"आकाशाच्या सरोवरात पृथ्वीचं हे विराट कमलपुष्प उमललं आहे;
आणि तो भ्रमरचंद्र आपले रुपेरी पंख पालवून त्या कमलाभोवती अखंड गुंजारव करीत आहे.
त्या कमलाच्या पाकळीवर एक सुंदर दवबिंदू पडला आहे.
त्याचं नाव 'जीवन' !"
-कुसुमाग्रज


Share/Bookmark

मामा

'मामा' या शब्दाची मोठी गंमत आहे. त्याला 'शकुनी' म्हणावं तरी पंचाईत, अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत !
- पु. ल. देशपांडे


Share/Bookmark

विज्ञान आणि तंत्रज्ञान


विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मी वाचलेली सर्वात सोपी व्याख्या :

"परिवर्तन किंवा बदल हा अगोदरची स्थिती आणि नंतरची स्थिती यातला फरक असतो. एखादी गरम वस्तू थंड झाली, तर तिच्या स्थितीत परिवर्तन झाले, असे आपण म्हणतो. थंड वस्तू पुन्हा गरम झाली तरी तो, परिवर्तनाचाच प्रकार. असे बदल विश्वात ज्या नियमांनुसार घडतात, त्यांना आपण विश्वव्यवस्थेचे नियम म्हणतो आणि हे नियम आपल्याला ज्यामुळे समजतात, त्याला आपण विज्ञान म्हणतो. नियम कळून त्यानुसार आपण गरम वस्तूला थंड किंवा थंड वस्तूला गरम करुन पुन्हा-पुन्हा आपल्याला हवा तसा बदल घडवू शकलो, तर त्याला आपण तंत्रज्ञान म्हणतो."
- दिलीप पु. चित्रे


Share/Bookmark