ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, December 18, 2010

कल

कल से डरोगे तो आज कैसे जियोगे?
कल याद आयेगा वह कल तो आज ही है ।

Share/Bookmark

Tuesday, December 7, 2010

वचन

वचन नको देऊस
उगाचच अपेक्षा वाढतील,
'प्रयत्न करते' म्हण
कदाचित मनेही जुळतील.

Share/Bookmark

Friday, December 3, 2010

Helping Grandma (Short Story)

“We want pizza, we want pizza,” children were screaming and jumping around. Grandma was on the verge of losing this battle of Pizza Vs PuranPoli. For quite some time, she was trying to convince the children to have PuranPoli's instead of Pizza.

“Don't start that 'our culture - their culture' thing again, Grandma,” the eldest of them, Neha said.

“Yes, we don't want to try anything just because it's our traditional food,” added Siddharth.

“You are confusing issues, kids,” Grandma was struggling hard, “I am just asking you to try this item once. Not because of tradition, but for a change, it's worth trying!”

“But we want pizza, we want pizza,” the youngest one, Atharv found this shouting part most interesting.

“Look kids, I am not saying pizza is bad or puranpoli is better. I am just saying that you children should taste different foods. Why not try something which is really yummy and traditional, too?” Grandma's diplomacy!

“But we have never tried that before. How could we like it?” asked Neha.

“That's exactly my point!” Grandma exclaimed, “If you don't try it, how will you like it?”

“But we want pizza, we want pizza,” Atharv continued.

“Shut up, Atharv,” Neha said, “Grandma has a point.”

“Hmm, we should give it a try, what say?” Siddharth added. Grandma grinned.

“Grandma, give us a moment. Siddharth, Atharv, come, let's decide!” Neha took the lead.

Grandma's grin expanded. Looking at her grandchildren having serious discussion, she slipped into fond memories of various delicacies she used to have. She remembered how all relatives and family-friends used to appreciate her cooking. Grandpa used to call her 'Annapurna' (meaning bestower of food). Throughout the year, the whole family used to celebrate different festivals through cooking delicious food items. Any good news or happenings were communicated through different types of sweets. Any homely parties and celebrations were incomplete without homemade spicy and tasty meal. On any occasion...

“We want poli, we want poli.” Grandma looked at the group. The children were approaching her, with Atharv shouting again, this time for poli, not pizza.

“Grandma,” Siddharth said, “we all have decided to try puranpoli's today. You win!”

“Hurray,” Grandma joined the screaming group. This was the best part - one wins, all celebrate!

“What's happening?” came in Swati (Neha and Atharv's mom). Everybody stopped and looked at Grandma.

“Oh Swati, good that you are here. I won the bet! You owe me a treat now,” said Grandma.

The children looked at each other. This was surprise for them. What bet? What treat?

“So you could convince them on puranpoli's? I can't believe it!” Swati exclaimed.

“So that was a part of your bet, huh?” Siddharth and Neha turned to Grandma, who was grinning at her win.

“We want poli, we want poli,” Atharv continued.

“See, I win! I win!” Grandma was really happy.

“Ok, ok, you win. But what next? Who's going to prepare puranpoli's?” Swati mentioned the logical part first.

There was silence for a few moments. Then Grandma said, “I completely forgot about that. I used to prepare 100 poli's in a day. But can't prepare so many of them now.”

“Nor do I,” Swati confessed, “I am not so good at that.”

“Now what?” Siddharth and Neha were puzzled.

“We want poli, we want poli,” Atharv continued.

“Grandma, this is not fair,” Neha said, “you won the bet with mom. Now serve us poli's or accept you lose!”

“Wow, that's a turning point!” Swati exclaimed.

“Wait, wait,” Grandma was not easily defeated, “let me try something.”

The children and Swati waited while Grandma spoke on the phone.

“Hello, Shalini?”

“Yes, how are you, Nalini?”

“I'm fine, but not very fine. Need your help.”

“Why, what happened? Everything ok?”

“Don't worry, not that serious. Actually, I won a bet with my daughter-in-law, but seems to lose it now,” and she narrated what happened in the house.

“Ohh, ha ha ha,” came the reply, “you are so funny, Nalini.”

“Come on, don't make fun of me now. I need your help.”

“Ok, ok. I had similar situation last week and didn't know what to do. But somehow I could get the solution.”

“And what's that?”

“Khawakee!”

“What?”

“Khawakee, that's the solution.”

“You are making fun of me, ain't you? Please help me seriously.”

“Yes, I am serious. I got this from somewhere last week. Khawakee delivers fresh puranpoli's at your doorstep.”

“Really? Like they deliver pizza?”

“Absolutely! And it's yummy, tasty, and homely!”

“Can't believe it! The kids would be amused. Give me their contact number.”

When Grandma told the children that she has ordered puranpoli's on the phone, they didn't believe her. Not even Swati!

“How's that possible?” asked Neha, “that's not pizza, Grandma.”

“Wait and watch,” Grandma said.

“Your friend must have joked with you,” Swati guessed.

“Just wait and watch.”

“We want poli, we want poli,” Atharv was at his best. Grandma drew him closer and said, “Just wait for some time, dear!”

Ding-Dong! The bell rang and everybody ran to the door. Swati couldn't believe her eyes. She was holding neatly packed, fresh puranpoli's and the children were jumping around her to get their share.

Grandma closed the door behind her, stared at her happy family, remembered her good old days, and muttered, “Thanks, Khawakee!”


Share/Bookmark

Saturday, November 27, 2010

ओलावा


अश्रू जाऊ देत वाहून
या पानावरच्या थेंबांसारखे..
..
ओलावा मात्र जपून ठेव.

Share/Bookmark

एकांत

एकांत हा आता, करेल माझा अंत
तुझ्या मनी आहे, माझ्याकडे कुठला भगवंत?

Share/Bookmark

Wednesday, November 17, 2010

पोरगी

पोरगी हसते, ना परि फसते
हाय, झुळूक सापडणारी नसते,
जवळ येता येता सुटते, उफ्‌..
बहुदा, नशिबातच अमुच्या नसते.

Share/Bookmark

Sunday, November 14, 2010

तूच ना?

चंग आहे बांधला मी, आज सत्य शोधण्याचा
जीवनाशी आजवर माझ्या, खेळणारी तूच ना?

काळजात बसविलेली मूर्ती ती, तुझीच ना?
काळजाला घरे माझ्या, पाडणारी तूच ना?

भांडलो दुनियेशी मी, एका इशार्‍यावर तुझ्या
एकटा गाठून मज आतून, भांडणारी तूच ना?

मोरपिसे सजवून लावली, मुकुटावर मी तुझ्या
टोचण्या मज त्या पिसांना, धार लावली तूच ना?

विश्वास नव्हता मजवर जितका, तितका तुजवर टाकला
विश्वासाचा श्वास माझ्या, तोडणारी तूच ना?

Share/Bookmark

Saturday, November 6, 2010

A fresh morning...

A fresh morning with fresh thoughts
Adding charm to a sleepy night,
Thinking what went wrong yesterday
Thinking how today will set it right...

Share/Bookmark

Morning Thought

Every morning will be different
Every day will be better,
Those who move beyond yesterday
Will find the tomorrow brighter!

Share/Bookmark

दिवाली

दिवाली की रात ना ढले
दिलों में प्यार का दिया जले,
रहे एक दुजे से जुडे हुए
मिलते रहे खुशी से गले...

Happy Diwali !!!

Share/Bookmark

Saturday, October 2, 2010

नशीब

मी म्हणतो 'हो' तेव्हा, ते म्हणते 'नाही, नाही'
मी म्हणतो 'नाही' तेव्हा, ते म्हणते 'नक्कीच नाही',
ते नशीब असूनी माझे, मग वाटे मजला वैरी
अशी देतो टक्कर त्याला, की पळते त्राही त्राही.

Share/Bookmark

Wednesday, September 29, 2010

चोरी


मी चोरली शायरी त्यांची, जगाला ओळख ज्यांची
मी पाटी लावली माझी, काढून पाटी त्यांची,
आवडली तर 'वाह' म्हणा, नावडली तर 'छीथू'
कशाला उचलता चादर, आत उघडीच शरीरे सर्वांची.

Share/Bookmark

Monday, September 27, 2010

स्वातंत्र्यदेवीची विनवणी - कुसुमाग्रज

नोव्हेंबर १९९६ मध्ये दै. सकाळ ने कुसुमाग्रजांची 'स्वातंत्र्यदेवीची विनवणी' ही कविता प्रसिद्ध केली. निमित्त होते भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचे! स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे लोटली तरी आपण स्वातंत्र्यदेवीला नुसते अभिवादनच करीत राहिलो. यावर स्वतः स्वातंत्र्यदेवता हात जोडून आपल्याला विनविते आहे की, मला आता अभिवादन करणे पुरे झाले, काही ठोस कृती करा.

स्वातंत्र्यदेवीची विनवणी

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका।।

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत वरू नका।।

अज्ञानाच्या गळ्यात माळा, अभिमानाच्या घालू नका।
अंध प्रथांच्या कुजट कोठरी, दिवाभितासम दडू नका।।

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका।।

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे।
करतिल दुसरे बघतिल तिसरे असे सांगुनी सुटू नका।।

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा।
मेजाखालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका।।

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका।

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका।।

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे।
इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका।।

पाप कृपणता पुण्य सदयता संतवाक्य हे सदा स्मरा।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका।।

गोरगरीबा छळू नका। पिंड फुकाचे गिळू नका।
गुणीजनांवर जळू नका।
उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वा़कडी धरू नका।।

परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।।

भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतिचे शिर कापु नका।।

कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका।
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका।।

पुत्र पशुसम विकती ते नर, नर न नराधम गणा तया।
परवित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडु नका।।

स्वच्छ साधना करा धनाची बैरागीपण नसे बरे।
सदन आपुले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाळु नका।।

तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी।
करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका।।

सुजन असा पण कुजन मातता हत्यार हातामध्ये धरा।
सौजन्याच्या बुरख्याखाली शेपुट घालून पळू नका।।

करा कायदे परंतु हटवा जहर जातिचे मनातुनी।
एकपणाच्या मारून बाता ऐन घडीला चळू नका।।

समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका।
दासी म्हणूनी पिटू नका वा देवी म्हणुनी भजू नका।।

नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा।
उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका।।

माणूस म्हणजे पशू नसे। हे ज्याच्या हृदयात ठसे।
नर नारायण तोच असे।
लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका।।

Share/Bookmark

Friday, September 24, 2010

पाऊस आणि ती

"काय, ओळखलंस का मला? हो, तोच मी - ज्याची वर्षभर वाट पहायचास तू. माझ्या पहिल्या स्पर्शानं आनंदीत व्हायचास, नाचू लागायचास. आठवतंय का काही? यंदा झालंय तरी काय तुला? माझ्या येण्याची चाहूल लागली की लगेच दारं-खिडक्या बंद करुन घेतोयस. अरे, मन मोकळं करुन बोल की माझ्याशी. नेहमी बोलायचास तसाच... पुन्हा..."

डोळे उघडून मी बंद खिडकीकडं बघितलं. डोळे खरंच बंद होते का? झोप लागली होती? स्वप्न होतं की काय? की डोळे उघडे असून काही दिसत नव्हतं? बघायचंच नसेल तेव्हा डोळे उघडे असले काय नि बंद असले काय! ऐकायचंच नसेल तेव्हा कान उघडे असतील काय किंवा... नाही, कानांना ती सोय नाही. ते उघडेच नेहमी. म्हणून तर न बोललेलंही ऐकायला येतं ना... ऐकायचं नसलं तरी. जशी या पावसाची तक्रार येतीय कानांवर. का अर्थ लागतो आपल्याला, पावसाच्या सरींचाही? आपल्यालाच लागतो का? की इतरांनाही कळत असेल? कळत असला तरी आपल्यासारखाच कळेल, असं कसं शक्य आहे? ज्याचा-त्याचा अर्थ वेगळा, कारण ज्याचं-त्याचं ऐकणं वेगळं... पण...

...पण तिला कसा कळायचा नेमका तोच अर्थ - जो माझ्या मनानं लावलेला असायचा? तिला कसं कळायचं पावसाचं मन, माझ्याइतकंच? की माझंच मन ओळखायची ती? म्हणजे पावसाला मन नसतं का? नाही, नाही, पावसाला मन असतं, भावना असतात, भाषा असते, शब्द असतात – अगदी माझ्यासारखे...आणि तिच्यासारखेही. म्हणूनच तर तो बोलू शकतो ना माझ्याशी, आणि मी त्याच्याशी. जसं मी ऐकून घेतो निमूटपणे, त्याचं बरसणं रात्रभर, तसाच तोही समजून घेतो, माझा अबोला दिवसभर. बसून राहतो माझ्याशेजारी, उगीच आगाऊ प्रश्न न विचारता - अगदी ती बसायची तसाच.

का आवडायचं तिला असं बसून राहणं - माझ्या अबोल्यात तिचे उसासे गुंफत राहणं? बोलायला लागलो की थांब म्हणायची नाही. मीही थांबवायचो नाही, बरसणार्‍या पावसाला. झरझर कोसळून मोकळा-मोकळा होऊन जाऊ दे बिचारा! तिलाही असंच वाटायचं का - माझ्याबद्दल? या पावसाचं बरसणं आणि हरवणं, दोन्ही भरभरुन. अगदी माझ्या व्यक्त आणि अव्यक्तासारखं. दोन्ही कसं चालायचं तिला? का गप्प आहेस असं विचारायची गरजच नसायची तिला. मी तरी कुठं रागावतो या पावसावर? एकदा गेला की आठ-आठ महिने तोंडच नाही दाखवत, तरीही...

ती रागावली असेल का पण? नसावीच बहुतेक. रागावली असती तर आली असती शब्दांची अस्त्रं परजीत. अबोल्याचं ब्रह्मास्त्र माझं, तिच्याकडं शब्दांचा मोठा शस्त्रसाठा. तरीही ती गप्प राहिली. म्हणजे कळून घ्यायचा प्रयत्न करत असेल मला. मी जसा प्रयत्न करतो या पावसाला समजण्याचा. प्रत्येक सर वेगळी, हरेक वीज निराळी, अवघडच आहे नाही समजून घेणं?


...की समजलंय तिला, म्हणून गप्प राहिलीय? पण काय समजलं असेल तिला, मी समजावून न देताच? ... कोण हसलं? हा पाऊसच असणार खिडकीतला, "समजावून दिल्याशिवाय समजणारच नाहीत अशा गोष्टी आहेत आपल्यामध्ये?" हं, बरोबर आहे तुझं. कधी वेळच येऊ दिली नाही तिनं समजावून सांगण्याची. मग आज कुठून हा प्रश्न आला मनामध्ये? कसं समजलं असेल तिला?

घेऊ का त्याला घरात? सारखा खिडकीवर थपडा मारतोय. की नको, बाहेरच बरा आहे? आत आला तर आवरता येणार नाही. काय आवरता येणार नाही नक्की? बाहेरुन आत आलेला पाऊस, की आतून बाहेर झेपावू पाहणारा? दोन्ही वेगळे आहेत? की आतलाच पाऊस बाहेर जाऊन कोसळतोय? बघूयात तरी नक्की कोण आहे तो...

अहाहा, अत्तराची कुपी उपडी केलीय जणू धरणीवर. तिलाही वेडावून टाकायचा हा सुगंध. तिनेच तर शिकवलं होतं, हा सुगंध भरुन घेणं - ऊरभर. ती भेटण्याआधी कधी भेटला होता का आपल्याला हा गंध? अंहं, हा पाऊसदेखील बोलू लागला ती भेटल्यावरच. हा सुगंधही तिनंच सोडला नसेल ना मागं, तिची खूण म्हणून? तिच्यामुळंच जाणवणारा हा सुगंध आज कुठुन आला मग? हा या पावसानं आणलेला सुगंध नाहीये नक्कीच. माझ्या मनात खोलवर शिरुन एखादी कुपी नसेल ना पुरुन ठेवली तिनं? असली तरी मला थोडीच सापडणार आहे ती? इतक्या आत शिरायचं कसब तिचंच, माझं नाही.

याच रस्त्यानं यायची ती. नाजूकशी छत्री घेऊन न भिजण्याचं नाटक तिला आवडायचं नाही. एरवी इतरांची छेड काढणार्‍या या पावसाचीच फिरकी घ्यायची ती. नुकत्याच न्हालेल्या श्यामल तरुणीसारख्या सडकेशी प्रणयाराधन करणारा हा पाऊस, तिला पाहताच कावरा-बावरा व्हायचा. पावसाचंही मन कळायचं तिला. म्हणूनच मगाशी हसला ना तो, समजावून सांगितल्याविना कसं कळेल, म्हणालो म्हणून. तिच्यासाठीच बरसतोय का हा? पण... पण ती तर येणार नाही. कसं सांगायचं ह्याला? की हे कळाल्यानंच बरसतोय हा, वेड्यासारखा - माझ्यासारखा?

"काय रे, आज खिडकीतूनच बघतोयस. बाहेर नाही का यायचं?" खिडकीच्या अगदी जवळ येऊन विचारतोय हा पाऊस, अगदी कानात कुजबुजल्यासारखा.

"नाही, अजिबात भिजावंसंच वाटत नाहीये बघ आज. बाहेर आलो की तू भिजवूनच टाकशील, नाही का?"

मोठा गडगडाट करुन हसतोय हा पाऊस, "अरे, स्वतःकडं बघितलंयस का तू? मीही भिजवू शकणार नाही इतका चिंब भिजलायस तू आधीच... तिच्या आठवणींमध्ये..."

या पावसालाही कळायला लागलं की काय माझं मन? तिनंच शिकवलं असणार... नाही का?

Share/Bookmark

Thursday, September 2, 2010

कविसंमेलन

सनईचे मंगल सूर सभागृहात मंगलमय वातावरण तयार करीत असताना, व्यासपीठावर मात्र अजूनही माईक, बॅनर, हार, सतरंजी, व माणसे, अशा सर्व महत्त्वाच्या व बिन-महत्त्वाच्या वस्तूंची मांडणी व पुनर्मांडणी चालू होती. कोणत्याही क्षणी कविसंमेलनास सुरुवात होईल, असे दर पाच मिनिटांनी जाहीर करण्यात येत होते. अशाच कित्येक क्षणांच्या प्रतिक्षेनंतर, व्यासपीठावर आगमनकर्ते झालेल्या कवींचे सर्व काव्यरसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

पांढरी विजार व खादीच्या कुर्त्यातील निवेदकाने सराईतपणे माईकचा ताबा घेत स्वागतपर निवेदन सुरु केले,

"सुस्वागतम्‌, सुस्वागतम्‌ ! अखिल भारतीय मराठी काव्यसंघटनेच्या तालुका पातळीवरील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात मी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. सुस्वागतम्‌ ! आमच्या या कविसंमेलनास इतका उदंड प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा नसल्याने काही गैरसोय झाल्यास रसिकांनी संयोजकांना क्षमा करावी. हा उदंड प्रतिसाद असाच टिकवून ठेवण्यासाठी आम्ही सभागृहाचे दरवाजे बाहेरुन बंद केले आहेत; तरी संपूर्ण कार्यक्रम आपण आहे त्या जागेवरुन, उघड्या डोळ्यांनी व बंद कानांनी... माफ करा... बंद डोळ्यांनी व उघड्या कानांनी... माफ करा... जाऊ दे, कोणतीही उघडझाप न करता पहावा व ऐकावा, अशी मी नम्र व उग्र विनंती करतो.

"ओळख त्याची करुन द्यावी
ज्याला कुणीच ओळखत नाही,
..
..
ओळख त्याची करुन द्यावी
ज्याला कुणीच ओळखत नाही,
..
यांना तर सगळेच ओळखतात
फक्त कुणीच ओळख दाखवत नाही !

"तर असे हे मराठी भाषेतील दिग्गज, खंदे, उमदे, तरुण, तडफदार, इमानदार, जहागिरदार वगैरे वगैरे कवी, या व्यासपीठाची शोभा आणि सभागृहाचे भाडे वाढवीत बसले आहेत. या सर्वांची मी ओळख करुन देतो -

"हे आहेत ज्येष्ठ कवी घो. घो. घनघोर..."

टाळ्यांच्या गजरात घो. घो. घनघोर दोन्ही हात वर करीत उभे राहिले. खादीचा कुर्ता-पायजमा, जुनी करकरीत (म्हणजे जुनी असली तरी कर्र-कर्र असा आवाज करणारी) कोल्हापुरी चप्पल, काळ्या चपट्या काड्यांचा जाड भिंगाचा चष्मा, अशा वेषातील घो. घो., महाभारतातील भीमाच्या गदेसारखे आपल्या खांद्यावर एक फावडे टाकून का आले होते, याचा प्रेक्षकांनाच काय पण संयोजकांना देखील उलगडा होत नव्हता. परंतु, घो. घो. हे एक ज्येष्ठ व जनसामान्यांचे असामान्य कवी असल्याने, त्यांना प्रश्न विचारायची कुणाचीच हिंमत नव्हती.

"दुसरे कवी आहेत, गिरीजा तनुजा अनुजा सुत..."

इतक्या लांबलचक नावाच्या तुलनेत अगदीच किरकोळ उंची असणारे गितअसुत (म्हणजे गिरीजा तनुजा अनुजा सुत) हात उंचावत उभे राहिले. घोघों च्या धिप्पाड देहाच्या तुलनेत अगदीच सुमार उंचीचे गितअसुत कुणाला दिसलेच नाहीत, त्यामुळे ते अजून व्यासपीठावर आलेच नसावेत असे वाटून कुणी टाळ्याच वाजविल्या नाहीत. शरीराच्या मानाने बराच मोठा पठाणी अंगरखा व खांद्यावरुन पांघरलेला लाल चौकड्यांचा स्कार्फ सांभाळत, गितअसुत आपल्या जागेवर जाऊन बसले. त्यांच्या पायातील मोजड्या नव्या असल्या तरी घोघोंच्या जुन्या कोल्हापुरीइतकी देखील करकर त्यांच्यात नव्हती, त्यामुळे सभागृहातील सुई-पतन (पिन-ड्रॉप) शांततेत देखील त्यांच्या उठबशीची जाणीव कुणाला झाली नाही.

"तिसरे कवी आहेत, श्री. प्रकाश काळोखे..."

काळ्या बारीक काड्यांचा चष्मा, काळा टी-शर्ट, काळी जीन्स, व काळे बूट, अशा अवतारातील प्रकाश काळोखेंच्या डोक्याचे व दाढीचे केस मात्र पांढरे होते. टाळ्यांच्या गजरात, विशेषतः युवा वर्गाच्या प्रोत्साहनाचा स्वीकार करीत प्रकाश काळोखे आपल्या जागेवर जाऊन बसले.

"... तर रसिकहो, मी अत्यंत जड अंतःकरणाने आपणा सर्वांना या तिघांच्या हाती सोपवीत आहे. हे रसिक प्रेक्षका, त्यांना माफ कर, कारण ते काय बोलत आहेत ते तुलाच नव्हे, तर त्यांनाही समजत नाही...

"सर्वप्रथम आपल्यासमोर येत आहेत ते थोर कवी, ज्यांनी उभ्या मराठी काव्यसृष्टीला आडवे पाडून देशोधडीला लावले; ज्यांची कविता एकदा ऐकल्यावर पुन्हा दुसर्‍यांदा ऐकण्याची हिंमत होणार नाही, असे रांगडे कवी - घो. घो. घनघोर. त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह आहेत - 'तान्या गाईचं वेडं कोकरु', 'म्हशीचं बकरु', आणि 'शेळीचं लेकरु'. तर येत आहेत, घो. घो. घनघोर, घो. घो. घनघोर..."

घोघोंनी माईकचा ताबा घेईपर्यंत सभागृह 'घो. घो., घो. घो.' अशा घोषणांनी दुमदुमले होते. मात्र, घोघोंचा आवाज येताच सभागृहात पुन्हा सुई-पतन शांतता पसरली. आपल्या घनगंभीर आवाजात घो. घो. बोलू लागले,

"माझ्या काव्याची शीतं... तुमच्या पतरावळीवर सांडतो, जेऊन घ्या.

"कवितेचं नाव आहे - 'अक्कल करीयेला जाते तेव्हा'

लग्नाची वरात
मुंडवळ्या हातात,
ती पायातल्या पायात हसली
का हसली? का हसली?
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई.

चंद्राची कोर
नाचतो मोर,
जीवाला घोर
का रुसली? का रुसली?
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई.

डोक्यात फूल मोगर्‍याचं
गळ्यात डोरलं दुसर्‍याचं,
कडंला लेकरु शेजार्‍याचं
का रडली? का रडली?
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई."

'आम्हाला तर बाबा काहीच कळलं नाही, आम्हाला तर बाबा काहीच कळलं नाही', असा प्रतिध्वनी सभागृहातून उमटत असतानाच घो. घों. नी पुन्हा घसा खाकरुन सुरुवात केली,

"माझ्या पुढच्या छोट्याशा कवितेचं छोटंसं नाव आहे - 'चिऊ'

चिव चिव चिव चिव चिव
चिव चिव चिव चिव चिव
एक झाड.........
त्याच्यावर एक घरटं......
घरट्यात चिमण्या......
चिव चिव चिव चिव चिव
चिव चिव चिव चिव चिव

अथांग निळसर तळं......
त्यात टाकला खडा......
अचानक आवाज आला.....
डुबुक डुबुक डुबुक डुबुक
डुबुक डुबुक डुबुक डुबुक

भयाण हवेली......
म्हैस मेली.....
दरवाजा उघडला.....
कर्र...कट्‍ कर्र...कट्‍ कर्र...कट्‍
कर्र...कट्‍ कर्र...कट्‍ कर्र...कट्‍"

दरवाजाच्या उल्लेखाने रसिकांना, सभागृहाच्या बाहेरुन बंद करण्यात आलेल्या दरवाजांची आठवण झाली व भीती घालविण्यासाठी ते जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. इतक्यात निवेदकाने पुन्हा माईकचा ताबा घेतला व पुढील निवेदन सुरु केले,

"रसिकहो, घो. घों. च्या दमदार कवितांनंतर, आपल्या वास्तवदर्शी व विद्रोही कविता घेऊन येत आहेत, गिरीजा तनुजा अनुजा सुत ऊर्फ गितअसुत. यांचे गाजलेले, गंजलेले, नावाजलेले काव्यसंग्रह आहेत - 'एक ढेकूण', 'एक मच्छर', 'एक ऊ', 'एक पिसु', आणि विक्रमी खपाचा काव्यसंग्रह - 'एक अमीबा'. तर येत आहेत – वास्तवदर्शी कवी गितअसुत."

यावेळेस गितअसुतांच्या अस्तित्त्वाची श्रोत्यांना प्रथमच जाणीव होऊन ते टाळ्या वाजवीत, खुर्च्यांवर उभे राहत गितअसुतांना पहायचा प्रयत्न करु लागले. गितअसुत माईकजवळ गेले, दोन-तीन वेळा टक-टक करुन व फुंकर मारुनही आवाज येत नसल्याने त्यांनी वळून निवेदकाकडे रागाने बघितले. काहीतरी घोटाळा झालाय हे लक्षात येऊन निवेदक लगबगीने माईककडे येत असतानाच, गितअसुत कडाडले,

"जवळ येऊ नकोस...
...वास येतोय !!!"

या अनपेक्षित हल्ल्याने दचकलेला निवेदक जागेवरच थबकला व ओशाळवाणा होत आपल्याच कपड्यांचा वास घेऊ लागला. तितक्यात गितअसुत पुन्हा गरजले,

"जवळ येऊ नकोस...
...वास येतोय...
...माझ्या अंगाचा !!"

निवेदकाला हायसे वाटले आणि गितअसुतांच्या फार जवळ न जाताच त्याने आपल्या जागेकडे धाव घेतली. गितअसुत पुढे सुरु झाले,

"जवळ येऊ नकोस...
...वास येतोय...
...माझ्या अंगाचा !!
कारण... कारण साला एक ढेकूण रात्रभर सतावतो...

रात्री उशीरा झोपतो
सकाळी उशीरा उठतो,
अंघोळ करायला वेळच कुठे असतो?
मी माझं दुःख का विसरतो??
कारण... कारण साला एक ढेकूण रात्रभर सतावतो...

सकाळी उठतो
गर्दीत घुसतो,
आपला घाम दुसर्‍याला पुसतो
मी माझं दुःख का विसरतो??
कारण... कारण साला एक ढेकूण रात्रभर सतावतो..."

आपल्या सैलसर अंगरख्यामध्ये पाठीमागून हात घालत गितअसुतांनी काहीतरी शोधल्यासारखे केले. मग एक चिमूट माईकसमोर नाचवीत ते पुन्हा ओरडले,

"हाच तो, हाच तो...
आत्ता सापडलाय...
रात्रभर माझं रक्त पिऊन टुंब झालाय...
हाच.. हाच जो माझ्या कवितेची प्रेरणा बनलाय...
त्यालाच मी आता हाताने चिरडलाय...
त्यालाच मी आता हाताने चिरडलाय..."

इतक्या वास्तवदर्शी सादरीकरणाची अपेक्षा नसल्याने निवेदकाने दुरुनच गितअसुतांना आपल्या जागेवर परतण्याची विनंती केली व माईकजवळ जाताच आपल्या खिशातील रुमाल त्यावर टाकून, शक्य तितक्या जास्त अंतरावरुन पुढचे निवेदन सुरु केले,

"रसिकहो, आता येणारा कवी हा अंधाराचा पुजारी आहे, अंधाराचा भक्त आहे, आणि ज्यांना आपण 'अंतराळ कवी' म्हणून ओळखतो, ते ताज्या दमाचे कवी आहेत - प्रकाश काळोखे. त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह आहेत - 'अंधाराशी जडले नाते', 'अंधाराचे हास्य', 'प्रकाशाचे रहस्य', 'अंतराळाचे भाष्य', आणि त्यांचा नुकताच येऊ घातलेला काव्यसंग्रह आहे, 'गेला लादेन अंतराळात'. तर येत आहेत - प्रकाश काळोखे."

पुन्हा एकदा युवा वर्गाकडून प्रकाश काळोखेंचे दमदार स्वागत झाले. पांढर्‍या दाढीचा हा कृष्ण-धवल कवी तरुणांमध्ये एवढा प्रसिद्ध कसा यावर निवेदक विचार करीत असतानाच, प्रकाश काळोखेंचा चिरका आवाज सभागृहात घुमला,

"माझ्या कवितेचं नाव आहे - 'सूर्य अंधारात चाचपडला'

अंधाराचा प्रत्येक किरण
प्रकाशाला छेदून येताना,
तिकडं अंतरीक्षात सूर्य अंधारात चाचपडला
तिकडं अंतरीक्षात सूर्य अंधारात चाचपडला.

पृथ्वीच्या गर्भात
सूर्याचं पिल्लू,
आता एकच लढाई -
प्रकाशाची नि अंधाराची,
कधीही न संपणारी.
पण मी... मी ती थांबवणार
मांडवली करुन मी ती संपवणार.

पृथ्वीच्या गर्भात
इंडोसल्फानचा डबा,
आता पुन्हा लढाई -
प्रकाशाची नि अंधाराची,
कधीही न संपणारी.
पण आता... आता मी ती थांबवणार
सूर्याचं बटनच बंद करणार,
आणि लाईट बिल वाचवणार !!!"

निवेदक अवाक्‌ होऊन बघत असतानाच, टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात प्रकाश काळोखे आपली पुढची कविता घेऊन सरसावले,

"माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे - 'हेलपाटा'

ती गेली मी आलो
ती आली मी गेलो,
ती बसली मी उठलो
ती उठली मी बसलो,
जाता येता, येता जाता
कशासाठी घालतोय मी हेलपाटा?

ती स्तब्ध मी निस्तब्ध
ती बद्ध मी कटीबद्ध,
ती लक्ष मी दशलक्ष
ती द्राक्ष मी रुद्राक्ष,
जाता येता, येता जाता
का घालत नाही मी हेलपाटा?"

प्रकाश काळोखेंच्या जयजयकारात सभागृह दुमदुमून गेले. श्रोते कसेबसे थोडे शांत झाल्यावर निवेदकाने समारोपाचे निवेदन सुरु केले,

"रसिकजनहो, वेळ आली आहे आपल्या अखिल भारतीय मराठी काव्यसंघटनेच्या तालुका पातळीवरील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनाच्या सांगतेची. सालाबादप्रमाणे यंदाही संमेलनाची सांगता ज्येष्ठ कवी घो. घो. घनघोर यांच्या सामाजिक आशयाच्या कवितेने होईल."

घो. घो. पुन्हा घसा खाकरुन पुढे सरसावले,

"कवितेचं नाव आहे - 'ऊसाचं बेणं'

ऊसाला पाणी नाही
पाण्याला नदी नाही ।
नदीला धरण नाही
धरणाला पैसा नाही ।
पैशाने ऊस पिकत नाही ॥
पैशाने ऊस पिकत नाही ॥

ऊसाला पाणी नाही
पाण्याला पाऊस नाही ।
पावसाला झाडं नाहीत
झाडांना पैसा नाही ।
पैशाने ऊस पिकत नाही ॥
पैशाने ऊस पिकत नाही ॥"

कविता संपताच श्रोत्यांमधील काही उत्साही कार्यकर्त्यांनी तिथेच घोषणाबाजी सुरु केली,

"पानी आडवा - पानी जिरवा
झाडं लावा - झाडं जगवा"

"अरं येऊन येऊन येनार कोन?
पावसाशिवाय हाईच कोन?"

आपल्या अखिल भारतीय मराठी काव्यसंघटनेच्या तालुका पातळीवरील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनाची ही फरफट पाहून संयोजक डोक्याला हात लावून बसले. आता पुढच्या वर्षापासून हे विकतचे दुखणे नकोच, असा ठाम निश्चयही त्यांनी दरवर्षीप्रमाणे करुन टाकला.

(कविता व संवादांमध्ये योगदान – निलेश घोळवे, अजय देशमुख, निलेश कदम, अच्युत जंगले)

Share/Bookmark

Tuesday, August 17, 2010

उलझन

सर से पाँव तक अपनी ही उलझनों में हूँ उलझा
और दिल पूछता है दुनिया की उलझनों का क्या?

वक्त इतना नहीं के देखूँ खुद को आईने में
और वो पूछते है मेरे साज-सिंगार का क्या?

निकला जो घर से तो कुछ भी जाना-पहचाना नहीं
और रास्ता पूछता है मेरी खोयी मंझिलों का क्या?

तोड आया हूँ रिश्ता खुशियों से अपना
और ग़म पूछता है मेरे रिश्तेदारों का क्या?

एक पल पीछे मुडकर देखा तो ये हाल है
और वक्त पूछता है पीछे देखकर चलनेवालों का क्या?

Share/Bookmark

Monday, August 2, 2010

Go Fight

English version of Marathi poem 'Kanaa' (by Kusumagraj)

“Sir, this is me,” called in the stranger
Rains had ruined his clothes and hair.

Sat for a moment, then said with a smile,
“River Goddess visited us, stayed for a while.

Looking joyful, she danced in and out
But for my wife, everything was wiped out.

Walls sank and the kitchen is in ruins
Tears in my eyes, is her gift that now shines.

With wife on my side, I'm planning to fight back, Sir
Building back the walls, removing mud and mire.”

Looking at my hand in pocket, rose to his feet
“Don't need money, Sir, was feeling lonely a bit -

Hearth is broken, but backbone's still upright
You just pat my back and say, GO FIGHT!”


Share/Bookmark

Monday, July 26, 2010

बादल के दिल से...



न आऊँ तो कहते हो, कब आओगे
अब के बार थान ली है, जाऊंगा ही नही...

Share/Bookmark

Saturday, July 24, 2010

अजून काही घडलेचि ना


संपले सारे, कधी वाटे माझिया मना
बरसून गेले क्षण, मागे रित्या भावना,
मग वाटे, विसरुन जाऊ जे जे घडले
तत्क्षणी उमजे, अजून काही घडलेचि ना.

Share/Bookmark

Saturday, July 3, 2010

ओळख

ना ओळख अपुली कुठली, ना ही मैत्री
न बघताच पटे तुला, कशी ही खात्री,
एक वार नजर फिरवून, बघ तरी इकडे
निघेल कुठलीशी ओळख किंवा, गतजन्मीची मैत्री.

Share/Bookmark

Sunday, June 20, 2010

कोहिनूर तो हरपुनी गेला...


ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्राज तथा वि. वा. शिरवाडकर यांना श्रद्धांजली -
दै
. केसरी, २० मार्च १९९९






कुसुमाग्रज गेले. मराठी साहित्याच्या अवकाशातील एक तारा निखळला. पण इतर अनेक तार्‍यांपैकी एक, यापेक्षा काही वेगळे अस्तित्व या तार्‍याचे होते. आपले स्वतःचे सौरमंडल निर्माण करुन सार्‍या ब्रह्मांडाला आपल्याभोवती फिरायला लावणार्‍या सूर्याचे तेज या महामानवाकडे होते.

"सात रंगांची मैफल वाहे येथे हवेतून;
येथे मरणही नाचे मोरपिसारा लेवून"

असा एक उल्हासदायी आनंदलोक निर्माण करताना विश्वामित्रांचाच उत्साह त्यांच्यात सामावत असे. इहलोकाच्या दुःखी, निराश सृष्टीला आव्हान देणारी एक प्रबळ, हसरी प्रतिसृष्टी त्यांनी उभी केली. आपल्या लेखणीच्या जोरावर त्यांनी अनेक वादळे शमविली. अनेक निराशेचे डोंगर पचविले आणि साहित्य रसिकांसमोर सारे जीवन उलगडून सादर केले. जीवनाची मजा कशी लुटायची असते, मरणाला कसे सामोरे जायचे असते, प्रेम कसे नि कुणावर करायचे असते, निराशा कशी टाळायची असते, आशा कशी जपायची असते, अशी अनेक प्रकारची शिकवणूक त्यांनी आपल्या साहित्यातून आपल्याला दिली. असा एक दिलदार मार्गदर्शक गेल्याचे दुःख सहन करण्यापलीकडचे आहे. कुसुमाग्रजांनी दाखवलेला मार्ग जपण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे. सूर्य बुडाला तरी, जाता जाता आपले तेज तो चंद्राजवळ देऊन जातो. त्याचप्रमाणे आपल्याला ही साहित्य-ज्योत तेवत ठेवायची आहे. कुसुमाग्रजांची महानता शब्दांत कैद करण्यापलीकडची आहे. त्यांची स्मृती जागवणे हे म्हणूनच तर अवघड काम आहे.

"अखेर मी कोण स्मृती जागवणारा?
स्मृतीच मला जगवतात.
अखेर मी कोण शब्द जपणारा?
शब्दच मला जपतात."

Share/Bookmark

ती आणि मी

मज पटते ना कधी, अश्रू ढाळायला
ती म्हणते हृदय लागते, रडू यायला,
विचारते ती पाहतोस कोणा, स्वप्नांमध्ये
मी म्हणतो त्यासाठी झोप, लागते यायला.

Share/Bookmark

Monday, June 14, 2010

भ्रम


राजा असे राणी असे, अन्‌ असे गुलाम कुणी
कागदांवर राज्य करीती, लाल कुणी काळे कुणी,
मज नसे भ्रम हा, एक्का मोठा की राजा मोठा
पान असेन मी हुकुमाचे, भले म्हणा दुर्री-तिर्री कुणी.

Share/Bookmark

Sunday, June 13, 2010

अंतर

तुझी आठवण माझ्या मनात
सलत राहते एकटेपणात,
वाटते दोघांमधले अंतर
विरुन जावे एका क्षणात...

Share/Bookmark

स्वप्न-स्मृती

स्वप्नातले जग तुझे नि माझे
स्वप्नामध्ये मी पाहतो,
जागेपणी त्या स्वप्न-स्मृती
श्वासांत माझ्या गुंफतो...

Share/Bookmark

नकळत

खरंच आपल्याही नकळत
आपण किती जवळ आलो,
एकमेकाला जिंकण्याच्या नादात
किती सहज दोघंही हरलो...

Share/Bookmark

प्रेम

माणसानं आयुष्यात
एकदातरी प्रेम करावं,
तीरावर नाही पोहोचलं
तरी भिजण्याचं सुख लुटावं...

Share/Bookmark

कडवे

माझे जीवनगाणे
मलाच गायचे आहे,
तुझेही एक कडवे
त्यात गुंफायचे आहे...

Share/Bookmark

स्वभाव

भावनांच्या विश्वात
व्यवहाराचा अभाव असतो,
स्वप्नातच रमण्याचा
एखाद्याचा स्वभाव असतो...

Share/Bookmark

दुवा

दुवा माँगते है खुदासे,
आप हमेशा मुस्कुराते रहें,
कभी खुश थे आप हद से ज्यादा,
वो हसीन पल हमारी याद दिलाएं...

Share/Bookmark

दूरी

रुठोगे हमसे कबतक, जरा इस दिल का खयाल किजिए,
मनाने के लिए मिलना जरुरी है, इस दूरी का एहसास मत दिलाईए...

Share/Bookmark

क्या होता है प्यार

दिलमें चाहत, होठोंपे इकरार
आँखोंसे कर दिया, हमको बेकरार;
नादान थे हम, अब तक ना समझे
आपको देखतेही जाना, क्या होता है प्यार...

Share/Bookmark

पलभरकी जिंदगी

खुशियाँ पलभरकी, फिर गम है उम्रभर;
कौन जानता है लेकिन, पलभरकी ही तो है जिंदगी...

Share/Bookmark

हमसफर

कहते है साथ ना चले, वो हमसफर नहीं,
आज दूर सही आपसे, सफर अभी खत्म तो नहीं...

Share/Bookmark

Friday, June 11, 2010

पाऊस

बाहेर पडणारा पाऊस
खिडकीतून बघणारा मी.

अंगणातल्या मातीचा गंध -
नभातून धरणीवर
जणू अत्तराचा सडा,
सृष्टीची ही उधळण
खिडकीतून बघणारा मी.

भिजलेली सडक -
नुकतीच न्हालेली
जणू श्यामल तरुणी,
सडकेचं हे नवं रुप
खिडकीतून बघणारा मी.

पावसाच्या मार्‍यात हिरवं झाड -
लाजेनं चूर झालेली
जणू नवी नवरी,
पावसाची ही सारी किमया
खिडकीतून बघणारा मी.

पावसात भिजू नये म्हणून
बाहेर न पडणारा मी -
खिडकीतून पाऊस बघताना
नकळत चिंब झालोय,
तुझ्या आठवणींनी...

- अक्षर्मन





Share/Bookmark

Sunday, May 30, 2010

Hobby Your Work

Hobby your work

 Liking what you do can give you success; but doing what you like will give you both success and happiness.

What is a hobby?

Hobby is something you always want to do.
You do not compromise on anything related to your hobby.
You do not have to 'spare' time for your hobby; you always manage to follow it all the time.
You do not need to ask for permissions or assistance from others to follow your hobby.
You do not have to worry about money to be spent for your hobby, you always prepare for it.

Isn't that true, for any kind of hobby you follow?

Now, replace your 'hobby' with your 'work' in above scenario. How does it sound? Let's see.

Work is something you always want to do. (really??)
You do not compromise on anything related to your work. (is it??)
You do not have to 'spare' time for your work, you always manage to follow it all the time. (difficult??)
You do not need to ask for permissions or assistance from others to follow your work. (how nice it would be!!)
You do not have to worry about money to be spent for your work, you always prepare for it. (sounds interesting, doesn't it??)

Now that you have almost understood why 'your work is NOT as pleasant as your hobby', let us see if we can really eliminate that 'NOT' from this statement.

(Although you can try and implement these ideas in your job, this article would be most applicable for business oriented people.)

One basic challenge all business people face is, to maintain their interest in their work. In a job, you have an option to switch your company, role, boss, or domain. However, in business, you have to work out hundred things before you think of a switch in product, service, or even your location. So how will you ensure that you will always remain interested in your business product or service? Think over it this way – if your business offers a product or service that you yourself buy or use very often with your choice, things would be much simpler!

Now, you must be thinking - 'I buy branded products or avail service from experienced providers in market. How can I beat this competition?' Okay, improve your observation! Analyze the product/service from a critic's view. Look for any obvious loopholes or defects as your grievance in the existing (branded) product or (experienced) service. Also, think of any improvements that yourself would pay for, if added to existing product/service. Now, analyze what and how you can work to eliminate the defects and add value to the same product/service.

By now, you must have figured out something to start working on (that too related to your hobby!). Now who will pay for your product/service? Who should be your target customers? Simple – if you are ready to pay for this product/service, there would be many people thinking like you! You just have to identify them. How??

Join groups related to your hobby.
Discuss your hobby with your colleagues, relatives, friends, neighbors. (I am sure you do not need any training or preparation to talk about your hobby.)
Share your experiences about existing products/services and be prompt to grab the opportunity when others start looking for a better option.

How does it sound? Interesting, isn't it?

(If you can observe yourself, you have thoroughly read this article just because it emphasizes more on hobby than mere work. That's the key!!)




Share/Bookmark

शब्द

शब्द शब्द जपून ठेव
माझ्यासोबत बोलण्यासाठी,
क्षण क्षण वाचवून ठेव
माझ्यासोबत जगण्यासाठी.

ऐकायचंय की नाही मला
हा प्रश्न मुळीच नाही,
सांगावंसं वाटतंय तुला
याहून मोठं काहीच नाही.

माझा वेळ, तुझा वेळ
वेळेचं काम वाहत जायचं,
तो जातो वाहत वाहत
आपण फक्त चिंब व्हायचं.

शब्द शब्द मोजून ठेव
मलाही कधी चुकावंसं वाटेल,
हेच शब्द आठवून पुन्हा
तुझ्याकडंच झेपावंसं वाटेल...

Share/Bookmark

Monday, May 24, 2010

हा देश पाहतो वाट

नव्या पिढीचे तरुण आम्ही, वृद्धांहूनी का करुण आम्ही?
लढण्याआधीच गेलो हरुन आम्ही, लागली कुणामुळे ही वाट?
लढत लढत हारणार्‍या, हरत हरत जिंकणार्‍या
सळसळत्या तारुण्याची, हा देश पाहतो वाट.

ओवाळणारे भक्त नाही, झेपावणारे रक्त नाही
घाव झेलण्या शक्त नाही, लागली कुणामुळे ही वाट?
भक्तीने ओथंबलेल्या, शक्तीने ओसंडलेल्या
खणखणीत तारुण्याची, हा देश पाहतो वाट.

धडाडणारी छाती नाही, घडविणारी माती नाही
पोसणारी नाती नाही, लागली कुणामुळे ही वाट?
मातीत सोने पिकविणार्‍या, नात्यांतून भविष्य फुलविणार्‍या
कार्यकर्त्या तारुण्याची, हा देश पाहतो वाट - उगवेल कधी ती पहाट?

Share/Bookmark

Sunday, May 16, 2010

शिकवणनाम

बालकें बाळबोध अक्षर । घडसून करावें सुंदर ।
जे देखतांचि चतुर । समाधान पावती ॥१॥

वाटोळें सरळें मोकळें । वोतलें मसीचें काळें ।
कुळकुळीत वोळी चालिल्या ढाळें । मुक्तमाळा जैशा ॥२॥

अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट ।
आडव्या मात्रा त्याही नीट । आर्कुलीं वेलांट्या ॥३॥

पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपेतों पाहात गेले ।
येका टांकेचि लिहिलें । ऐसें वाटे ॥४॥

अक्षराचें काळेपण । टांकाचे ठोंसरपण ।
तैसेंचि वळण वांकण । सारिखेंची ॥५॥

वोळीस वोळी लागेना । आर्कुली मात्रा भेदीना ।
खालिले वोळीस स्पर्शेना । अथवा लंबाक्षर ॥६॥

पान शिष्यानें रेखाटावें । त्यावरी नेमकेंचि ल्याहावें ।
दुरी जवळी न व्हावें । अंतर वोळीचें ॥७॥

कोठें शोधासी आडेना । चुकी पाहातां सांपडेना ।
गरज केली हें घडेना । लेखकापासुनी ॥८॥

ज्याचें वय आहे नूतन । त्यानें ल्याहावे जपोन ।
जनासी पडे मोहन । ऐसें करावे ॥९॥

बहु बारीक तरुणपणीं । कामा न ये म्हातरपणीं।
मध्यस्थ लिहिण्याची करणी । केली पाहिजे ॥१०॥

भोंवतें स्थळ सोडून द्यावें । मध्येंचि चमचमित ल्याहावें ।
कागद झडतांचि झडावें । नलगेचि अक्षर ॥११॥

ऐसा ग्रंथ जपोनि ल्याहावा । प्राणिमात्रांस उपजे हेवा ।
ऐसा पुरुष तो पाहावा । म्हणती लोक ॥१२॥

काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी ।
चटक लावुनी सोडावी । कांहीं येक ॥१३॥

- श्री रामदास स्वामी


Share/Bookmark

निश्चय

निश्चय पक्का, तडीस नेतो कामे
गोंधळ नुसता, मनास करी रिकामे.

ठरविले जर मी, अडवू शकेल कोण मला
चलबिचल परि ते, कामे ढकलून रिकामे.

स्वार्थ असेलही माझा, म्हणून करतो कामे
स्वार्थाशिवाय भेटतील का, कृष्णाला तरी सुदामे?

ना देवावरती श्रद्धा, ना लोभ मला खजिन्यांचा
कष्टाला मी करीतो वंदन, शरीर धनाची गोदामे.

निश्चय पक्का, तडीस नेतो कामे
गोंधळ नुसता, मनास करी रिकामे.

Share/Bookmark

Sunday, May 9, 2010

नवी-जुनी

ऐकती कविता न माझ्या
परि मानती मजला कवी,
जुनीच देतो पाठवून अन्‌
म्हणतात जमलीय छान नवी...

Share/Bookmark

Wednesday, April 28, 2010

अहंकार सोडा, दयाळू बना

(इमाम फैजल अब्दुल रौफ यांनी, मुस्लिम-अमेरिकन समुदाय व त्यांचे देशबांधव यांच्यात सुसंबंध प्रस्थापित करण्याच्या , आणि हा संदेश जगभरच्या मुस्लिमांपर्यंत पोचवण्याच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं आहे. खालील भाषणात ते, कुराण, रुमीच्या कथा, आणि मोहम्मद व येशूच्या उदाहरणांतून दाखवून देतात की, आपल्यातील प्रत्येकाला दयाळू बनण्यापासून रोखणारी एकच गोष्ट आहे - आपण स्वतः)

अहंकार सोडा, दयाळू बना

"मी इस्लामच्या दृष्टीकोनातून अनुकंपेबद्दल बोलतोय, आणि कदाचित माझ्या श्रद्धेमागं खूप गहन विचार नसेलही कारण ती दयेच्या भावनेवरच आधारीत आहे. पण सत्य परिस्थिती वेगळीच आहे.

आमच्या कुराण या पवित्र ग्रंथामध्ये ११४ अध्याय आहेत, आणि प्रत्येक अध्यायाचा आरंभ 'बिस्मिल्लाह' नं होतो, त्या परमदयाळू, क्षमाशील ईश्वराच्या नामस्मरणानं, किंवा, सर रिचर्ड बर्टन यांनी म्हटल्याप्रमाणं, (हे रिचर्ड बर्टन म्हणजे एलिझाबेथ टेलरचे पती नव्हेत, तर हे शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेले सर रिचर्ड बर्टन, जे जगप्रवासी होते आणि कित्येक साहित्यकृतींचे भाषांतरकार होते, त्यांच्या शब्दांत,) “करुणेनं ओतप्रोत भरलेल्या दयाळू ईश्वराच्या नामस्मरणानं.”

आणि मुस्लिमांसाठी, ईश्वराचं मानवजातीशी संवाद साधण्याचं माध्यम असणार्‍या कुराणातील एका वचनात, ईश्वर बोलतोय आपल्या प्रेषित मोहम्मदाशी, जे अखेरचे प्रेषित मानले जातात, प्रेषितांच्या मालिकेतील, (जी सुरु होते आदम पासून, नोवा, मोझेस, अब्राहम सहित, येशू ख्रिस्तासहित, आणि संपते मोहम्मदापाशी,) तो म्हणतो, “हे मोहम्मदा, आम्ही तुला पाठवलंच नसतं, जर आम्हाला मनुष्यजातीबद्दल रहम नसता, करुणा नसती.”

आणि आपण सर्व मनुष्य प्राण्यांसाठी, आणि आम्हा मुस्लिमांसाठी नक्कीच, प्रेषितानं दाखविलेल्या मार्गावर चालण्यामागं ज्यांचं ध्येय, आणि ज्यांचं उद्दिष्ट स्वतःला त्या प्रेषितासारखं बनविणं हे आहे. आणि त्या प्रेषितानं आपल्या एका वचनात म्हटलं आहे, “स्वतःला दैवी गुणांनी अलंकृत करा.” ईश्वरानं स्वतःच सूचित केलं आहे की करुणा हा त्याचा मूळ गुणधर्म आहे. वास्तविक, कुराण असं सांगतं की, “ईश्वरानं स्वतःला दयाळू बनण्याचा आदेश दिला आहे" अथवा, “स्वतःवर करुणेचा अंमल प्रस्थापित केला आहे.” म्हणूनच, आपलं उद्दिष्ट आणि ध्येय असलं पाहिजे, करुणेचे स्रोत बनणं, करुणेचे संप्रेरक होणं, करुणेचे पाईक बनणं, करुणेचे प्रसारक बनणं, आणि करुणेचे कार्यकर्ते बनणं.

हे सर्व ठीक आहे, पण आपलं चुकतं कुठं? आणि या जगात करुणाहीनतेचे स्रोत काय आहेत? याचं उत्तर आपण अध्यात्मिक मार्गानं शोधूयात. प्रत्येक धार्मिक प्रथेमध्ये, एक बाह्य मार्ग असतो आणि एक अंतःमार्ग, किंवा उघड मार्ग आणि गुप्त मार्ग. इस्लामचा गुप्त मार्ग सुफीवाद, किंवा अरेबिक मध्ये तसव्वुफ म्हणून ओळखला जातो. आणि हे पंडीत अथवा गुरु, सुफी परंपरेचे धर्मगुरु, आमच्या प्रेषिताच्या शिकवणीचा आणि उदाहरणांचा दाखला देतात, की आपल्या समस्यांचं मूळ कुठं आहे.

प्रेषितानं पुकारलेल्या एका लढाईत, त्यानं आपल्या अनुयायांना सांगितलं, “आपण छोट्या युद्धाकडून परतत आहोत मोठ्या युद्धाकडं, मोठ्या लढाईकडं.”

आणि ते म्हणाले, “हे देवदूता, आम्ही लढाईला विटलो आहोत. अजून मोठ्या लढाईला आम्ही कसं तोंड देणार?”

तो म्हणाला, “ती स्वतःची लढाई असेल, अहंकाराशी लढाई.” मानवी समस्यांचं मूळ स्वार्थामध्येच असलं पाहिजे, 'मी' मध्ये.

प्रसिद्ध सुफी गुरु रुमी, जे तुमच्यापैकी बर्‍याचजणांना माहिती असतील, त्यांच्या एका गोष्टीत ते एका व्यक्तीबद्दल बोलतात, जी एका मित्राच्या घरी जाते आणि दार ठोठावते, आणि एक आवाज येतो, “कोण आहे?”

“मी आहे,” किंवा व्याकरणदृष्ट्या अचूक सांगायचं तर, “तो मी आहे,” (इंग्रजीमध्ये असंच म्हणतात).

आतून आवाज येतो, “निघून जा.”



कित्येक वर्षांच्या प्रशिक्षण, शिस्त, शोध व धडपडीनंतर, ती व्यक्ती परत येते, आणि अतिशय विनम्रतेनं, ती परत दार ठोठावते.

आतून आवाज येतो, “कोण आहे?”

ती म्हणते, “तूच आहेस, पाषाणहृदयी.”

धाडकन दार उघडतं, आणि आवाज येतो, “आता आत ये, कारण या घरात दोन 'मी'साठी जागा नाही.”

आणि रुमीच्या कथा अध्यात्मिक वाटेवरील रुपकं आहेत. ईश्वराच्या उपस्थितीत, एका अहं पेक्षा जास्त जणांसाठी जागाच नसते, आणि तो एकमेव अहं ईश्वरी असतो. एका शिकवणीमध्ये, जिला आमच्या परंपरेत हदिथ कद्सी म्हणतात, ईश्वर म्हणतो की, “माझा सेवक,” किंवा "माझी निर्मिती, मनुष्य प्राणी, तोपर्यंत माझ्या निकट येत नाहीत, जोपर्यंत ते करत नाहीत, जे मी त्यांना करायला सांगितलं आहे.” आणि तुमच्यातील मालक लोकांना माझं म्हणणं तंतोतंत कळेल. तुमच्या कामगारांनी तुम्ही सांगितलेलं काम करावं अशी तुमची इच्छा असते, आणि ते पूर्ण केल्यावर ते अधिक काम करु शकतात, पण तुम्ही त्यांना जे करायला सांगितलंय त्याकडं दुर्लक्ष न करता.

आणि ईश्वर म्हणतो, “माझा सेवक माझ्या अधिकाधिक निकट येत राहतो, मी त्यांना सांगितलेलं अधिकाधिक करुन,” आपण त्याला जास्तीचं पुण्य म्हणू शकतो, “जोपर्यंत मी त्याच्यावर किंवा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत नाही. आणि जेव्हा मी माझ्या सेवकावर प्रेम करतो,” ईश्वर म्हणतो, मी ते डोळे बनतो ज्यानं तो किंवा ती पाहू शकतात, ते कान ज्यानं तो किंवा ती ऐकू शकतात, तो हात ज्यानं तो वा ती पकडू शकतात, आणि तो पाय ज्यानं तो वा ती चालू शकतात, आणि ते हृदय ज्यानं त्याला वा तिला जाणीव येते.” आपली हीच ईश्वराबरोबरची एकरुपता आहे, जी आपल्या अध्यात्माची आणि सर्व श्रद्धा परंपरांची शिकवण व उद्दीष्ट आहे.

मुस्लिम येशूला सूफी गुरु मानतात, तो महान प्रेषित व दूत, जो अध्यात्मिक मार्गाचं महत्त्व पटवून द्यायला आला. जेव्हा तो म्हणतो, “मीच आत्मा आहे, आणि मीच मार्ग आहे,” जेव्हा प्रेषित मोहम्मद म्हणाले, “माझं दर्शन घेणार्‍याला ईश्वराचंच दर्शन घडतं,” कारण ते ईश्वराचं इतकं एकरुप साधन बनले, की ते ईश्वराचाच अंश बनले, इतकं की ईश्वरेच्छा त्यांच्याच माध्यमातून प्रकट झाली आणि त्यांनी स्वतःचं अस्तित्व आणि अहंकार सोडून दिले. करुणा ही आपल्यामध्ये असतेच. आपल्याला फक्त आपल्या अहंकाराला बाजूला सारायचं आहे, आपला स्वार्थ दूर लोटायचा आहे.

मला खात्री आहे, कदाचित तुमच्यापैकी सर्वांनी, किंवा तुमच्यापैकी बहुतेकांनी, एक अशी अध्यात्मिक स्थिती अनुभवली आहे, तुमच्या आयुष्यातील तो क्षण, काही सेकंद, कदाचित एखादा मिनीट, जेव्हा तुमचा अहंकार गळून पडला. आणि त्या क्षणी, तुम्ही विश्वाशी एकरुपता अनुभवली, त्या पाण्याच्या भांड्याशी एकरुपता, सकल मानव प्राण्यांशी एकरुपता, त्या जगनिर्मात्याशी एकरुपता, आणि सर्वशक्तीनिशी, तो दरारा, गूढतम प्रेम, गूढ करुणेची व दयेची जाणीव, जी तुमच्या आयुष्यामध्ये आजवर अनुभवली नव्हती.

हाच क्षण म्हणजे आपल्याला मिळालेली दैवी देणगी आहे, अशी भेट की, एका क्षणासाठी, तो पुसून टाकतो ती सीमारेषा, जी आपल्याला भरीस पाडते - मी, मी, मी, माझं, माझं, माझं म्हणायला, आणि त्याऐवजी, रुमीच्या कथेतील व्यक्तीप्रमाणं, आपण म्हणतो, “अरेच्चा, हे तर सर्व तूच आहेस.” हे सर्व तूच आहेस. आणि हेच सर्व आपण आहोत. आणि आम्ही, मी, व आपण सारे तुझाच अंश आहोत. सर्व ईश्वरीय, सर्व उद्दिष्टं, आपला जीवनस्रोत, आणि आपला अंत. तू आमची हृदयं तोडणाराही आहेस. तूच आहेस ज्याच्याकडं आम्ही सर्वांनी बघायचं, ज्याच्या हेतूसाठी आम्ही जगायचं, आणि ज्याच्या हेतूसाठी आम्ही मरायचं, आणि ज्याच्या हेतूसाठी आमचं पुनरुत्थान केलं जाईल ईश्वराला उत्तर देण्यासाठी की आम्ही किती करुणामय जीव आहोत.

आज आमचा संदेश, आणि आमचा उद्देश, आणि तुमच्यापैकी जे आज इथं आहेत, आणि या करुणेच्या सनदेचा उद्देश आहे, आठवण करुन देणं. कारण कुराण नेहमीच आम्हाला लक्षात ठेवायला उद्युक्त करतं, एकमेकांना आठवण करुन देण्यासाठी, की सत्यज्ञान हे प्रत्येक मनुष्यप्राण्यात असतंच.

आपण हे सर्व जाणतो. आपल्यासाठी हे सर्व उपलब्ध आहे. जंगनं त्याला सुप्त मन संबोधलं असेल. आपल्या सुप्त मनातून, तुमच्या स्वप्नांतून, ज्याला कुराणमध्ये म्हटलं आहे, आपली निद्रीतावस्था, दुय्यम मृत्यु, क्षणिक मृत्यु. आपल्या निद्रीतावस्थेत आपल्याला स्वप्नं पडतात, आपल्याला दिव्य दृष्टी मिळते, आपण आपल्या शरीराच्या बाहेरही भ्रमण करतो, आपल्यापैकी बरेचजण. आणि आपल्याला विस्मयकारक गोष्टी दिसतात. आपण आपल्याला ज्ञात अशा अवकाशाच्या मर्यादेबाहेर भ्रमण करतो, आणि आपल्याला ज्ञात असणार्‍या कालमर्यादेबाहेर. पण हे सर्व त्या जगनिर्मात्याचं गुणगान गाण्यासाठी, ज्याचं मूळ नाव आहे - करुणेनं ओतप्रोत भरलेला दयाळू ईश्वर.

ईश्वर, बोख, तुम्हाला जे नाव द्यावं वाटेल ते, अल्लाह, राम, ओम, कुठलंही नाव ज्यायोगे तुम्ही संबोधता अथवा मिळवता दैवी अस्तित्व, तेच निःसंशय अस्तित्वाचं निश्चित स्थान आहे, निःसंशय प्रेम आणि दया आणि करुणा, आणि निःसंशय ज्ञान व विद्वत्ता, ज्याला हिंदू म्हणतात सच्चिदानंद. भाषा वेगळी असेल, पण उद्देश एकच आहे.

रुमीची अजून एक कथा आहे तिघांबद्दल, एक तुर्क, एक अरब, आणि तिसरा एक इंग्रज समजू. एकजण अंगूर मागत असतो, एकजण एनेब मागत असतो, आणि एक जण ग्रेप्स मागत असतो. आणि त्यांच्यात भांडण आणि वादविवाद होतात कारण - मला ग्रेप्स हवेत, मला एनेब हवेत, मला अंगूर हवेत. हे न कळाल्यामुळं, की ते म्हणत असलेले शब्द वेगवेगळ्या भाषांमध्ये एकाच वस्तूबद्दल बोलतात.

निःसंशय वास्तव ही एकच संकल्पना आहे, निःसंशय अस्तित्व ही एकच संकल्पना. कारण निःसंशय म्हणजेच, एकमेव, आणि परिपूर्ण व एकमेवाद्वितीय. हेच परिपूर्ण अस्तित्वाचं केंद्रीकरण, हेच परिपूर्ण शुद्धीचं केंद्रीकरण, जाणीव, करुणा व प्रेमाचं निःसंशय स्थान, हेच ठरवतं देवत्वाचे मुलभूत गुणधर्म.

आणि तेच असले पाहिजेत मानवी अस्तित्वाचे मुलभूत गुणधर्म. कारण मानवजातीची व्याख्या, बहुदा जीवशास्त्रीयदृष्ट्या शरीरविज्ञानशास्त्र म्हणून होते, पण ईश्वर मानवतेची व्याख्या करतो आपल्या परमार्थानुसार, आपल्या स्वभावानुसार.

आणि कुराणात म्हटलंय, तो देवदूतांशी बोलतो व म्हणतो, “जेव्हा मी मातीपासून आदम निर्माण केला, आणि त्यामध्ये माझे प्राण फुंकले, तेव्हा अतिशय थकून गेलो.” देवदूत थकतात, मानवी शरीरासमोर नव्हे, तर मानवी आत्म्यासमोर. का? कारण त्या आत्म्यामध्ये, मानवी आत्म्यामध्ये, दैवी श्वासाचा एक अंश असतो, ईश्वरीय आत्म्याचा एक अंश.

हे बायबलच्या शब्दकोशातही व्यक्त केलं आहे, जेव्हा आपल्याला शिकवलं जातं की ईश्वरीय प्रतिमेतूनच आपली निर्मिती झाली. ईश्वराचं वर्णन कसं कराल? ईश्वराचं वर्णन म्हणजे परिपूर्ण अस्तित्व, परिपूर्ण जाणीव आणि ज्ञान आणि विद्वत्ता आणि परिपूर्ण करुणा व प्रेम.

आणि, म्हणूनच, आपल्याला मनुष्य बनण्यासाठी, मनुष्य बनण्याच्या व्यापक अर्थानं, मानवतेच्या सर्वात सुखी कल्पनेनं, बनावं लागेल योग्य वाहक - आपल्यातील ईश्वरी श्वासाचे; आणि अस्तित्वाच्या परिपूर्णतेचा स्वतःमध्ये शोध घेत, जगण्याचे; अस्तित्वाचे; विद्वत्तेच्या, शुद्धीच्या, जाणीवेच्या गुणधर्माचे; आणि करुणामय व प्रेमळ बनण्याच्या गुणधर्माचे.

माझ्या श्रद्धा परंपरांमधून मला हेच समजतं, आणि इतर श्रद्धा परंपरांच्या माझ्या अभ्यासातूनही मला हेच समजतं. अशा समान व्यासपीठावर आपण एकत्र आलं पाहिजे. आणि जेव्हा आपण यासारख्या व्यासपीठावर एकत्र येतो, तेव्हा मला खात्री पटते की आपण एक सुंदर जग निर्माण करु शकतो.

आणि माझा वैयक्तिक विश्वास आहे की, आपण ती मर्यादा गाठली आहे. आणि तुमच्यासारख्या लोकांच्या उपस्थितीनं व मदतीनं, आपण ईसाही चं भाकीत सत्यात उतरवू शकतो. कारण त्यानं सांगून ठेवलाय असा काळ, जेव्हा लोक त्यांच्या तलवारींचे नांगर बनवतील आणि अजून परत युद्ध करणार नाहीत.

आपण मानवी इतिहासाच्या त्या स्थितीप्रत आलो आहोत, जिथं आपल्याकडं पर्याय नाही. आपल्याला आपला अहंकार उतरवलाच पाहिजे. अहंकारावर नियंत्रण आणलंच पाहिजे, मग तो वैयक्तिक अहंकार असेल, व्यक्तिगत अहंकार असेल, कौटुंबिक अहंकार, वा राष्ट्रीय अहंकार. आणि सर्वजण मिळून त्या एकमेवाद्वितीय परमेश्वराचं गुणगान गावोत.”

स्रोतः http://www.ted.com/talks/lang/mar/imam_feisal_abdul_rauf.html


Share/Bookmark

Wednesday, April 7, 2010

श्रीमंतांच्या तिजोर्‍या कशा उघडायच्या?

(प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या लेखावरुन)

नुकताच पार पडलेला आयपीएल लिलाव म्हणजे जबरदस्त यशस्वीतेचं उदाहरण मानावं लागेल. यामध्ये १० वर्षांसाठीच्या फ्रांचाईजेसना १,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत मिळाली. शून्यातून सुरुवात करुन, केवळ तीनच वर्षांत भारतातील सर्वांत मोठा शो-बिझ इव्हेंट साकारण्यासाठी तर आयपीएल व्यवस्थापन प्रशंसेस पात्र आहेच. पण त्याबरोबरच त्यांनी आत्ताच्या फ्रांचाईजेस इतक्या जास्त किंमतीला विकल्या आहेत की, त्या खरेदी करणार्‍यांसाठी त्यातून पैसे कमविणं जवळजवळ अशक्यप्राय बनलं आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून अनेकांनी आयपीएलचे हिशेब मांडले आहेत आणि प्रत्येकाचे अंदाज निरनिराळे येत आहेत. पण ढोबळमानानं पाहता, ताज्या लिलावातील विजेत्याला प्रति मोसम १७० कोटी रुपये नुसती फ्रांचाईज किंमतच मोजावी लागणार आहे. गेल्या हंगामात, खेळाडूंचं मानधन व प्रशासकीय खर्चासाठी साधारण ४५ कोटी रुपये खर्च आला (त्रयस्थ संशोधन केंद्रांच्या अंदाजानुसार). अशाप्रकारे, पैशाचं कालसापेक्ष अवमूल्यन विचारात न घेतादेखील, या फ्रांचाईजेसना नुसता खर्च भरुन काढण्यासाठी प्रति मोसम २१५ कोटी रुपये उत्पन्न मिळवणं भाग आहे. आयपीएलच्या दुसर्‍या मोसमातील कोणताही संघमालक सर्वाधिक ११० कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवू शकला नाही. म्हणजेच नव्या संघमालकांनी त्यांच्या संघांसाठी अवास्तव किंमत मोजली, हे उघड गुपित आहे. इतर उत्पन्नाच्या स्रोतांद्वारे हळूहळू आयपीएलकडं अधिक पैसा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, त्याबरोबरच अनेक धोकेदेखील संभवतात. नवनवीन संघांच्या समावेशामुळं आयपीएलचं प्रेक्षणमूल्य सौम्य होऊ शकतं. भारताच्या या सर्वांत मोठ्या रिऍलिटी शोची नवलाई उतरणीला लागू शकते. शेवटी, आयपीएल हा शो-बिझनेसचाच एक प्रकार आहे आणि अनिश्चितता हा त्याचा मुलभूत गुणधर्म आहे. एका ताज्या सर्वेक्षणानुसार, आयपीएलची प्रेक्षकसंख्या लोकप्रिय कौटुंबिक मालिकांच्याही खाली घसरु शकते. (तसाही, या मालिकांचा निर्मितीखर्च आयपीएलपेक्षा कितीतरी पटींनी कमी असतो.) या निष्कर्षाचे परिणाम महत्त्वपूर्ण ठरु शकतात.

असं असलं तरी, मोठमोठ्या उद्योगसमूहांनी या शो-बिझचा भाग होण्यासाठी मजबूत पैसा ओतला आहे. त्यांच्याकडं नक्कीच वित्त अधिकारी व सल्लागार असतील, ज्यांनी ही सर्व गणितं जुळवायचा प्रयत्न केला असेल. गुंतवणुकीवरील परतावा हा संघखरेदीमागील मुख्य उद्देश नसेलही कदाचित. पैशाव्यतिरिक्त अजून काहितरी फायदे त्यामागे असले पाहिजेत. आयपीएल संघाच्या मालकीतून मिळणारी झटपट दृश्य प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा इतर कोणत्याही मार्गानं मिळवणं अवघड आहे. तुमच्या बॅँक-खात्यामध्ये लाखो-करोडो रुपये असतील, पण तुम्हाला स्टेडियममध्ये बॉलीवूडच्या तारकांसोबत बसायची संधी मिळते का? तुमच्या संघाच्या प्रत्येक चौकार-षटकारासाठी ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज तुम्हाला टाळी देतो का? सामन्यानंतरच्या पार्टीमध्ये सर्वांदेखत चिअरलीडर्सच्या ग्लासाला ग्लास भिडवण्याची संधी तुमच्या पैशानं मिळू शकते का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे, असं करताना अख्खा देश तुम्हाला पाहत असतो का? नसेल तर मग नुसत्या गगनचुंबी इमारती आणि तेलसाठ्यांचा काय उपयोग? काही भागधारकांना आणि सतावणार्‍या बॅँकर्सना परतावा मिळवून देण्यासाठी? छे छे, तुमच्याकडं पैसा असेल तर, लोकांना तुमची किंमत कळालीच पाहिजे. आणि जर 'पेट्रोकेमिकल्स बनवायचं रटाळ काम करणारा' ही ओळख बदलून, 'कोची कूलनेस संघाचा मालक' अशी तुमची ओळख बनणार असेल तर, वर्षाला १०० कोटी रुपयांच्या नुकसानीचं काही वाटणारही नाही.

खरंच की. एका आयपीएल संघाची मालकीच तुम्हाला झटपट प्रसिद्धी, उत्साह, ग्लॅमर मिळवून देऊ शकते आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला अलौकीक झळाळी आणू शकते. तुमच्याकडं विशेष कौशल्य किंवा जन्मजात कलागुण असण्याची काही गरज नाही. फक्त एकच गोष्ट हवी जिची चलती आहे - पैसा.

काहीजणांना हा सर्व प्रकार म्हणजे उथळ व्यावहारिकता वाटेल. मला मात्र यामध्ये, श्रीमंत भारतीयांकडून पैसे कसे उकळायचे याच्या भारी युक्त्या दिसतात. पाश्चिमात्य लक्ष्मीपुत्रांच्या तुलनेत, भारतातील श्रीमंत लोक आपल्या संपत्तीच्या खूपच क्षुल्लक प्रमाणात दानधर्म करतात. हा त्या लोकांचा खाजगी निर्णय असू शकतो, आणि खूपशा सेवाभावी संस्थांना भारतीय उद्योग क्षेत्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रचंड खटाटोप करावा लागतो. शेवटी, या सेवाभावी चळवळींतून नफा कमविण्याची संधी थोडीच मिळते? पण, आयपीएल लिलावांनी सिद्ध केलं आहे की, नफ्याच्या आशेशिवायही श्रीमंत लोक आपल्या तिजोर्‍या उघडतात आणि प्रचंड पैसा ओततात, फक्त तुम्ही एक गोष्ट सांभाळली पाहिजे - त्यांचा अहंकार. तुम्ही त्यांना जोपर्यंत खूष ठेवाल तोपर्यंत ते पैसा ओतत राहतील.

या श्रीमंत लोकांना आपण कुणीतरी महान व्यक्ती आहोत असं वाटायला लावणार्‍या गोष्टी देऊ करण्यात काहीच गैर नाही. यातून बहुविध संधी निर्माण होतील – उड्डाणपूल, सी लिंक, रस्ते, गल्ल्या, मेट्रो स्टेशन्स, एखाद्या मार्गावरील रेल्वे, यांना अशा श्रीमंत लोकांची नावं देता येतील – जे त्यासाठी बोली लावून अधिकाधिक पैसे मोजतील. एकदा का यासाठी चढाओढ सुरु झाली की, ही साथ वार्‍यासारखी पसरत जाईल आणि उद्याच्या बातम्यांमध्ये झळकण्यासाठी हे लोक एकमेकांच्या वरचढ बोली लावू लागतील. जर यातून चांगल्या कामांसाठी काही हजार कोटी रुपये उभे होणार असतील, तर त्यामध्ये गैर काय?

भरपूर निधी मिळवण्यासाठी, सरकार त्या दानशूर माणसाचं नाव नाणी व नोटांवर छापू शकतं - भले ते मर्यादीत काळासाठी का असेना. सरकारी महाविद्यालयांना श्रीमंत माणसांची नावं देता येतील – यातून फक्त पैसाच उभा राहणार नाही तर, त्यांच्या नावाचा वापर त्यांना संस्थेची गुणवत्ता राखण्यासही उद्युक्त करु शकेल.

नाममात्र अधिकार असणारी काही सरकारी पदं श्रीमंत लोकांना देऊ करता येतील. प्रचंड किंमत मोजून त्यांना एका वर्षासाठी द्वितीय उपाध्यक्ष असं काहितरी बनता येईल, ज्यायोगे त्यांना प्रत्येक परदेशी अधिकारी व पाहुण्यांसोबत फोटोमध्ये झळकायला मिळेल आणि एका साधारण खतनिर्मिती कारखान्याचा मालक यापेक्षा अधिक प्रतिष्ठेनं मिरवता येईल.

यापैकी काही सूचना विचित्रही वाटतील, पण निदान माझ्या बोलण्याचा रोख तरी तुमच्या लक्षात आला असेल. अहंकार हे माणसाच्या अंतरंगात राहणारं, कायम भुकेनं वसवसलेलं जनावर आहे. तो माणूस कितीही यशस्वी वा प्रसिद्ध असला तरी या जनावराला खाऊ घालावंच लागतं. ललित मोदी आणि आयपीएल व्यवस्थापनानं यालाच लक्ष्य करुन, दुप्पट भावानं संघ विकले आणि विशेष म्हणजे विकत घेणारे देखील शेवटी खूषच आहेत. या कामगिरीसाठी ते खरंच कौतुकास पात्र आहेत. निधी उभारणार्‍या संस्थांनी व शासकीय संस्थांनी रोख पैशाच्या मोबदल्यात प्रतिष्ठा व प्रसिद्धी देऊ करण्यावर गांभीर्यानं विचार केला पाहिजे, खास करुन जेव्हा चांगल्या योजनांसाठी निधी अत्यंत आवश्यक असतो.

तोपर्यंत, तुमच्याकडं १,७०० कोटी रुपये पडून नसतील, तर तुम्ही नशीबवान आहात असं समजा. कधीकधी गरजेपेक्षा जास्त पैसा तुम्हाला असे बावळट प्रकार करायला लावतो. त्यापेक्षा टीव्हीवरच्या चीअरलीडर्स पाहणं कितीतरी चांगलं.


(स्रोतः http://timesofindia.indiatimes.com/home/sunday-toi/all-that-matters/How-to-make-the-rich-open-their-wallets/articleshow/5758477.cms)


Share/Bookmark

Friday, March 26, 2010

झीरो झीरो सेव्हन



“धिस इज बाँड... जेम्स बाँड!” हा हुकमी डायलॉग, आणि मग सुरु होतो खेळ विध्वंसाचा. विध्वंस इमारतींचा, गाड्यांचा, विमानांचा, आणि हृदयांचा देखील. जेम्स बाँड म्हणतो, “विधायक कामांशी माझं फार सख्य नाही.” बरोबरच आहे ते. हत्येचा परवाना घेऊन फिरणारा सर्वाधिक लोकप्रिय नायक आहे जेम्स बाँड! त्याला 'सुपरहिरो' म्हणणं अतिशयोक्ती ठरेल. आणि कोणत्याही बाँड-चाहत्याला, जेम्स बाँड हे एका लेखकानं निर्माण केलेलं काल्पनिक पात्र आहे, यावर विश्वास ठेवायला आवडणार नाही. हेच सत्य असलं तरी.

जेम्स बाँड या स्वप्नवत नायकाच्या निर्मितीमागील अफलातून मेंदू आहे, इयान फ्लेमिंग यांचा. चला तर मग, बाँड थरारांच्या या लेखकाबद्दल अजून जाणून घेऊ. इयान फ्लेमिंग यांचा जन्म १९०८ मध्ये झाला. सुरुवातीचं शिक्षण इटॉन इथं झालं. सॅँडहर्स्ट इथं काही काळ घालवल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. परराष्ट्र कार्यालयात नोकरी न मिळू शकल्यानं, १९३१ ला ते रुचर्स न्यूज एजन्सी मध्ये रुजू झाले. दुसर्‍या महायुद्धादरम्यान, त्यांनी नौदल गुप्तहेर विभाग संचालकाचा पीए म्हणून काम केलं, जिथं त्यांचा हुद्दा लेफ्टनंट वरुन कमांडर पर्यंत वाढला. त्यांच्या युद्धकाळातील अनुभवांतून त्यांना गुप्त कारवायांचं प्रत्यक्ष ज्ञान मिळालं.

युद्धानंतर फ्लेमिंग, केम्सली न्यूजपेपर्स मध्ये परराष्ट्र व्यवस्थापक बनले. त्यांनी जमैकामध्ये आपलं घर, 'गोल्डनएज' बांधलं. इथंच, १९५३ मध्ये, वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी जेम्स बाँड कादंबर्‍यांतील पहिली, 'कॅसिनो रोयाल' लिहिली. इयान फ्लेमिंग यांचं १९६४ मध्ये निधन झालं; पण तत्पूर्वी त्यांच्या १४ बाँड कादंबर्‍यांच्या ४० दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या, आणि अशाप्रकारे जेम्स बाँड हे पात्र जागतिक स्तरावर प्रस्थापित झालं.

'बर्ड्‌स ऑफ द कॅरीबियन' वरील एका उत्कृष्ट पुस्तकाच्या लेखकाचं नाव (जेम्स बाँड), इयान फ्लेमिंगनी आपल्या नायकासाठी वापरलं. अतिशय साधं, मवाळ, व निर्विकार असं हे नाव त्यांना आवडलं. बाँडचा अधिकृत नंबर (००७) किपलिंगच्या अमेरीकन रेल्वेसंबंधी गोष्टीतून आला, ज्यामध्ये एका नवीन इंजिनासाठी हा नंबर वापरला होता. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या मर्जीतील जॉन डी, स्पॅनिशांविरुद्ध ब्रिटीश गुप्तहेर खात्यात काम करताना ह्याच नंबरनी ओळखला जायचा.

जेम्स बाँडला नैतिकतेची चाड असून, आत्मपरीक्षणाची अशी क्षमता आहे जी त्याच्या खुनी व विषयासक्त कारवायांमधील तटस्थता झुगारुन आत्मक्लेशाकडे झुकते. इयान फ्लेमिंग स्कॉटीश वंशाचे होते, आणि त्यांच्या मनात, बाँडची स्वसुखलोलुपता, त्याची व्होडका मार्टिनी 'शेकन नॉट स्टर्ड', महागड्या मोर्लंड स्पेशल सिगारेटची तलफ, परस्त्रियांशी भावनाहीन प्रणयाराधन, वेगवान गाड्यांचं वेड, या गोष्टींबद्दल अपराधीपणाची भावना होती. लोकांचे पोषाख, त्यांच्या शरीरावरील तीळ व व्रण, एखाद्याच्या बोटाच्या लांबीतील अनियमितपणा, एखाद्याची मान किंवा कवटीचा विचित्र आकार, या गोष्टींचं बहुतेक मनोरंजक लिखाणांमध्ये न आढळणारं, विस्तृत व सबळ विवेचन त्यांच्या लिखाणात यायचं.

जेम्स बाँड च्याच बाबतीत बोलायचं झालं तर तो एक चिरंजीव नायक आहे, आणि त्याच्या थरारक कारवायांसाठी हे जग देखील पुरेसं नाही.



Share/Bookmark

Friday, March 12, 2010

मंथन

एका कुंपणावर दोन पक्षी बसले होते. शिकार्‍यानं अचूक नेम साधून त्यातला एक पक्षी टिपला. तर कुंपणावर किती पक्षी शिल्लक राहिले? गणिती भाषेत (दोन वजा एक) एक... आणि प्रत्यक्षात, एकही नाही. गोळीच्या नुसत्या आवाजानंच दुसरा पक्षी घाबरुन उडून नाही का जाणार?

२६/११ ला मुंबईत किंवा १३/२ ला पुण्यात, एक पक्षी टिपला गेला, आणि दुसरा...? दुसरा पक्षी गोंधळून गेला. त्यानं प्रश्न उठवले - सरकारवर, पोलिस यंत्रणेवर. संशय घेतला - आजूबाजूच्या 'आपल्या'च लोकांवर. आणि पर्यायानं हातभार लावला - दहशतवाद्यांचा हेतु साध्य होण्यास...

मुंबईच्या हॉटेलमधल्या देशी-विदेशी पाहुण्यांनी, रेल्वेच्या प्रवाशांनी, जर्मन बेकरीच्या ग्राहकांनी, किंवा अगदी पोलीस खात्यातल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी, या दहशतवाद्यांचं काय वाईट केलं होतं? मग, अचानक एके रात्री हातात एके-४७ घेऊन किंवा टेबलखाली बाँब लपवून निरपराध लोकांची हत्या करण्याचं कारण काय?

१९४७ साली पुण्यातल्या एका जाहीर सभेत आचार्य अत्रे म्हणाले होते,
"काश्मीरवर ज्या रानटी आफ्रिडी टोळीवाल्यांनी आक्रमण केलेले आहे, त्या टोळ्या काही निव्वळ लुटालूट आणि चोर्‍यामार्‍या करण्यासाठी काश्मिरमध्ये घुसलेल्या नाहीत. त्यांच्याजवळ अद्ययावत यंत्रसामुग्री आणि शस्त्रास्त्रे आहेत. ही यंत्रे आणि शस्त्रे त्यांना कोण पुरवते? त्यांच्या मोटारीमध्ये पेट्रोल कोण ओतते? हा काही काश्मीरमधल्या जनतेचा उठाव नाही. या आक्रमणामागे पाकिस्तानी महत्वाकांक्षेचे एक जबरदस्त पाताळयंत्र आहे."
काश्मीर प्रांताचं महत्त्व सांगताना आचार्य अत्रे पुढं म्हणाले होते,
"काश्मिर गेले की पूर्व पंजाब गेलाच म्हणून समजा. पूर्व पंजाब गेला की दिल्ली गेली. दिल्ली गेली की भोपाल उठलेच आणि मग सारा उत्तर हिंदुस्थान धोक्यात आलाच म्हणून समजा."
गेल्या साठ वर्षांपेक्षा जास्त काळ जे युद्ध आपल्या देशाच्या सीमेवर अव्याहत सुरु आहे, त्याची एक झलक म्हणजे २६/११ किंवा १३/२ सारख्या घटना. मुंबई-पुण्यापासून काश्मीर खूप दूर असल्यानं, तिथल्या गोळ्यांचे आवाज आपल्यापर्यंत पोचले नसावेत, असं दहशतवाद्यांना वाटलं असावं. म्हणूनच ते आवाज देशभर पसरवण्यासाठी त्यांनी सीएसटी, ताज, आणि जर्मन बेकरीची निवड केली असावी. काश्मीरमध्ये आजतागायत हजारो जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, आजही देत आहेत, आणि न जाणे कधीपर्यंत देत राहणार आहेत. पण, याच गोष्टींची जणू आपल्याला सवय झाली आहे, आणि म्हणूनच काश्मीरच्या कुंपणावर 'दोन वजा एक बरोबर एक' हे गणित जुळत आलं आहे. शिल्लक राहिलेल्या पक्ष्याला, आपापले राज्य, भाषा, सत्ता, यांच्या गदारोळात, पहिल्या पक्ष्याच्या हकनाक मृत्युची दखलही घ्यावीशी वाटत नाही. आपल्या घराजवळ अधूनमधून घडणार्‍या अशा घटना मात्र 'दोन वजा एक बरोबर शून्य' याचीच जणू आठवण करुन देतात.
अशा घटना घडून गेल्यानंतर प्रशासन, पोलीस यांना दोष देऊन काय फायदा? पोलीसांकडं एके-४७ सारखी शस्त्रं उपलब्ध करुन दिल्यानं मुंबईकरांना, पुणेकरांना, किंवा एकंदरीत सर्व देशवासीयांना सुरक्षित वाटू लागेल अशी आशा वाटते का? तसं असेल तर मग भारत-पाक सीमेवर उपलब्ध असणारी अद्ययावत शस्त्रं, रणगाडे, लढाऊ विमानं, क्षेपणास्त्रं यांचं काय? ही युद्धसामग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन, जगातली तिसर्‍या क्रमांकाची सेना ज्यांच्या संरक्षणासाठी अहोरात्र उभी आहे, त्या भारतीयांना नेहमीच सुरक्षित वाटलं पाहिजे, नाही का? किंवा कदाचित, पोलीस खात्याचं कार्यक्षेत्र मर्यादीत करुन, प्रत्येक शहराच्या व गावाच्या सीमेवर एलओसी सारखं भारतीय सैन्य दल तैनात करण्यानं तरी 'सामान्य' नागरीकांना सुरक्षिततेची खात्री वाटू शकेल?

जरा विचार करुन बघा - खरोखर एके-४७ आणि बाँब ही त्या दहशतवाद्यांची ताकद होती का?
नाही! त्यांची ताकद होती - आपली 'चलता है' म्हणणारी मनोवृत्ती ! काश्मीरमध्ये धारातीर्थी पडणार्‍या प्रत्येक जवानाबद्दल आपण पेटून उठलं पाहिजे, त्याच्या मृत्युचा जाब विचारला गेला पाहिजे. सीमेवरच्या जवानांच्या मृत्युनं सजवलेलं आयुष्य आपण मोठ्या दिमाखानं मिरवत आहोत, त्या हुतात्म्यांचं स्मरणही न करता ! आपल्याला सुरक्षित ठेवणारा एकन्‌एक जवान जिवंत राहिला पाहिजे, अशी आपली भावना नसेल तर, रस्त्यावर गोळीबार करुन अथवा स्फोट करुन शेकडो लोकांचे प्राण घेणार्‍या दहशतवाद्यांचं नैतिक मनोधैर्य आपणच वाढवत आहोत, हे लक्षात घ्या.

यावर आपण काय करु शकतो? सर्वप्रथम स्वतःला समाजाचा एक भाग समजणं आवश्यक आहे. मग हा समाज, सर्वसामान्य नागरीक, सरकारी यंत्रणा, पोलीस, शासनकर्ते, न्याययंत्रणा, प्रसारमाध्यमं, या सर्वांनी मिळून बनलेला आहे, ही वस्तुस्थिती स्वीकारणं. मी एकटा काय करणार यासारख्या सबबी न देता, स्वतःपासून सुरुवात करणं. आपण सर्वांनी मिळून हा समाज इतका भ्रष्ट व दूषित केलाय की, कदाचित एक संपूर्ण पिढी त्याच्या साफ-सफाईमध्ये खर्ची पडेल. पण किमान येणार्‍या पिढ्यांना तरी आपण एक सुरक्षित व सुदृढ समाजाची हमी देऊ शकू.

विचार करा... एकदा निश्चय केल्यावर विचार प्रत्यक्षात उतरायला वेळ लागणार नाही.

Share/Bookmark

Tuesday, March 9, 2010

विनोदाशी जडले नाते


"ह्या जगात येताना जसा गुपचुप आलो, तसा जाताना देखील आपल्या हातून या जगाला फारसा धक्का न लावता निघून जाण्याची इच्छा बाळगणारा असा मी एक असामी आहे."
हे उद्गार आहेत, आपल्या निखळ विनोदानं अवघ्या महाराष्ट्राला हसवत राहणार्‍या एका असामान्य 'वल्ली'चे अर्थात्‌ आपल्या सर्वांच्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांचे!

पुलंच्या विनोदाबद्दल किती आणि काय बोलायचं? पुलंचे विनोद, आंब्याच्या डहाळीवर बसून गाणार्‍या कोकीळेच्या कुहू-कुहू सारखे मधुर आहेत; पिंजर्‍यातल्या पोपटाच्या पंखांच्या फडफडाटासारखे केविलवाणे नाहीत. पुलंचा विनोद कधीही कोंडल्यासारखा वाटत नाही; उलट कोंदटलेल्या जीवांना मोकळ्या हवेत श्वास घेऊ देणारा तो भासतो. कुणाचंही मन दुखावलं जाईल असा विनोद पुलंनी कधीच केला नाही. कुत्सितपणा टाळून केलेल्या सत्यनिवेदनाला परखडपणाची झालर चढते, फटकळपणाचं ठिगळ नाही. पुलंचा विनोद आरशासारखा स्वच्छ आहे; असा आरसा की ज्यात अक्राळविक्राळ विद्रूप सत्याला, विनोदाचा, सहनशीलतेचा मुलामा चढवून समोर उभं केलं जातं, तेही सुसह्य स्वरुपात! म्हणूनच, भाजीत झुरळ सापडल्याच्या तक्रारीला, स्वतःची मिशी अजिबात न फेंदारता, "बंडोपंत, मंथली ट्वेंटीटू रुपीजमध्ये एलिफंट का यायचा भाजीत?" हे जगप्रसिद्ध उत्तर देणारा खाणावळवाला पुलंच्या विनोदातच दर्शन देतो.

पुलंचा विनोद सहजगत्या घडून येतो, तो मुद्दाम घडवून आणावा लागत नाही. "एक तारखेला दूधवाले, घरवाले, कोळसेवाले, दारेवाले, धोबी, आणि डॉक्टर, हे 'षड्रिपू' थैमान घालतात," यासारख्या विनोदात मध्यमवर्गीयांची फार मोठी व्यथा दडली आहे; पण विनोदाच्या चादरीखाली या व्यथा झाकून जातात आणि म्हणूनच त्या सुसह्य वाटू लागतात.

साध्या-साध्या गोष्टींत देखील विनोद शोधण्यासाठी पुलंचीच नजर हवी. "कापड दुकानातले नोकर लोक हे गेल्या जन्मीचे योगी असतात, अशी माझी ठाम श्रद्धा आहे. बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात, पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत." किंवा "तुकारामाचं पूर्ण नांव काय? ह्या प्रश्नाला तुकाराम विष्णुपंत पागनीस हे उत्तर दिल्यामुळं, मंबाजीनं तुकोबाला बदडलं नसेल इतकं आमच्या बाबांनी आम्हांला बदडलं होतं. बाबांच्या शेंडीच्या केसाचा देखील दाह झाला नाही." या ठिकाणी, तुमच्या-आमच्या आसपास घडणार्‍या घटना वेगळ्या पद्धतीनं पाहण्याची नजर पुलंचा विनोदच देतो. स्वतः शिक्षकी पेशात असूनही एके ठिकाणी ते म्हणतात, "प्रोफेसर हा माणूस आणि लिफ्टमन हे हसू शकतात हे मला कधीच पटले नाही."

असे विनोदाचे बादशहा पु.ल. जेव्हा त्यांच्या अनुभवी नजरेसमोरुन सरकणार्‍या काळाचे उलटे फासे पाहतात, तेव्हा मात्र सभोवती, कारुण्याची किनार असणार्‍या कृष्णमेघांची दाटी होऊ लागते - "स्वराज्य आले हत्तीवरुन मिरवीत. अंबारीत राजेंद्रबाबूंच्या हाती कलश होता, समोर घोड्यावर बसून चालले होते जवाहरलाल - फक्त बापू मात्र आमच्याबरोबर पायी चालत होते."

काही ठिकाणी पु.ल. सहजगत्या सत्यपरिस्थिती सांगून जातात, "आम्ही ओझ्याचे बैल हेच खरं! शिंगाला झेंडू बांधा नाहीतर पोत, पाठीवर झूल चढवा किंवा चाबूक उडवा, जोडले एकदा की थांब म्हणेपर्यंत चालले!" तसंच जाताजाता ते नेत्यांच्या आश्वासनांची आणि कार्यपद्धतीची खिल्लीही उडवतात - "शाळांच्या इमारतींची संख्या वाढली म्हणून शिक्षण घेणे आणि देणे याविषयीची आस्था वाढली असे मानावयाचे म्हटले तर, ज्या गावात विपुल देवळे व मशिदी आहेत, तिथली माणसे धर्मावतार आहेत असे मानावे लागेल."

पुलंचं विनोदी वाङ्‍मय विपुल असलं तरी पु.ल. म्हणजे विनोद एवढंच नव्हे. एक अष्टपैलु व्यक्तिमत्व कसं असावं याचा आदर्श नमुना म्हणजे पु.ल.! विनोदी लिखाणाबरोबरच प्रवास वर्णनं, चरीत्रं, भाषांतरं, चित्रपट-कथा लेखन, कविता, गीत-संगीत अशा साहित्याच्या आणि कलेच्या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी मुशाफिरी केली आहे.

जाज्वल्य देशाभिमान हाही पुलंचा एक पैलु आहे. एक आठवण पु.ल. सांगतात - "मिठाच्या सत्याग्रहाचे दिवस होते. लॅमिंग्टन रोडवर पोलिस स्टेशनपाशी सत्याग्रहींचा जथा आला होता. लोक निर्भयपणे पोलिसांच्या गाडीतून घुसून स्वतःला अटक करुन घेत होते. त्या गर्दीत एक तरुण स्त्री होती. तिने आपल्या अंगावरचे दागिने उतरले, शेजारच्या एका माणसाच्या हाती दिले. त्याला आपले नाव सांगितले, पत्ता सांगितला आणि म्हणाली, "माझ्या घरी हे दागिने नेऊन द्या आणि सांगा 'म्हणावे, मी सत्याग्रहात गेले'." तो गृहस्थ म्हणाला, "बाई, तुमची माझी ओळखदेख नाही. तुमचे हे दागिने मी तुमच्या घरी पोहोचवीन असा तुम्हाला विश्वास का वाटतो?" ती म्हणाली, "तुमच्या अंगावर खादी आहे आणि डोक्यावर गांधी टोपी आहे म्हणून.""

खरोखर पुलंबद्दल काय लिहावं आणि किती लिहावं! शेवटी पु.लं.चेच उद्गार -
"घड्याळाचं काय नि माणसाचं काय, आतलं तोल सांभाळणारं चाक नीट राहिलं की फार पुढंही जाण्याची भिती नाही आणि फार मागंही पडण्याची नाही!"

- मंदार शिंदे 9822401246


Share/Bookmark

Thursday, March 4, 2010

शिकारी की सावज?

(डॉ. वाय. एल. आर. मूर्ती यांच्या संदेशावर आधारीत. डॉ. वाय. एल. आर. मूर्ती, इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बेंगलोर इथं प्राध्यापक आहेत. त्यांनी आय. आय. टी., मद्रास येथून एम. टेक. तसेच आय. आय. एम., बेंगलोर येथून व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.)

शिकारी की सावज?

भारतामध्ये आजमितीला सर्वाधिक कॅमेरा विक्री कोण करतं?
तुम्ही म्हणाल – सोनी, कॅनॉन अथवा निकॉन. अंहं, यापैकी कुणीही नाही. बरोबर उत्तर आहे - नोकीया ! होय, नोकीया, जिचं भारतातील मुख्य उद्योग-क्षेत्र कॅमेरा नसून मोबाईल फोन आहे.
याचं कारण म्हणजे, फक्त कॅमेर्‍याऐवजी कॅमेरा असलेल्या मोबाईल फोन्सची वाढती विक्री होय. मग हे मोबाईल फोन पूर्णपणे कॅमेर्‍याची जागा घेऊ शकतील काय? अर्थातच! सोनी आणि कॅनॉन यांना या गोष्टीची जाणीव असावी, अशी आपण आशा करु.

आता हेच पहा. भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे? तुम्हाला काय वाटतं, एचएमव्ही-सारेगामा? चूक. ती कंपनी आहे - एअरटेल! तासन्‌तास चालणारे म्युझिक अल्बम्स विकून म्युझिक कंपन्या जेवढं कमवत असतील त्यापेक्षा कितीतरी जास्त एअरटेल कमवतं, तेही ३० सेकंद वाजणार्‍या कॉलर ट्यून्स विकून.
वास्तविक, एअरटेल काही संगीत उद्योगात नाही. ती भारतातील सर्वाधिक ग्राहकवर्गाला मोबाईल सेवा पुरविणारी कंपनी आहे. अशा प्रकारचा प्रतिस्पर्धी ओळखणं महाकठीण काम आहे, आणि त्याला मागं टाकणं तर त्याहून कठीण (तुम्ही त्याला ओळखेपर्यंत तो तुम्हाला मागं टाकून बराच पुढं गेलेला असतो). पण म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की नोकीया आणि भारती (एअरटेल ची मूळ कंपनी) अगदी निवांत असतील, तर तुमचा अंदाज पुन्हा चुकीचा ठरण्याची शक्यता आहे.
आपण स्मार्टफोनच्या बाबतीत पूर्ण गाफील राहीलो, हे नोकीयानं कबूल केलं आहे. ऍपलचा आयफोन आणि गुगलचे ऍन्ड्रॉईड, नोकीयासाठी भविष्यातील मोठी डोकेदुखी ठरु शकतात, हे त्यांना कळून चुकलं आहे. पण गुगल ही तर मोबाईल कंपनी नाहीच मुळी? याचाच अर्थ, ही उदाहरणं एका अजून मोठ्या कोड्याकडं अंगुलीनिर्देश करत आहेत. हे फक्त मोबाईल, संगीत, कॅमेरा किंवा ईमेल पुरतं मर्यादीत नाही.

"भविष्यातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिगत डिजिटल उपकरण (पर्सनल डिजिटल डिव्हाईस) कोणतं?" यासाठी हे महाभारत चालू आहे. काय असेल ते - टेलिफोनसहित अधिक वेगवान मोबाईल किंवा पामटॉप? या छोट्या-छोट्या लढाया मिळून एका महायुद्धाकडं संक्रमित होत आहेत. या सर्व लढायांमागं एक यक्षप्रश्न आहे - “कोण आहे माझा प्रतिस्पर्धी?”

माझ्या विद्यार्थ्यांना डिवचण्यासाठी मी अधून-मधून एक प्रश्न विचारत असतो - “ऍपलनी जे सोनीबरोबर केलं, तेच सोनीनं कोडॅकबरोबर केलं, कसं ते स्पष्ट करा?” काही हुशार विद्यार्थी लगेच उत्तर देतात. सोनीनं आपलं कार्यक्षेत्र श्राव्य माध्यमाभोवती (ऑडीयो) आखून घेतलं (वॉकमन मधून संगीत ऐका). ऍपलसारखी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आपल्या कार्यक्षेत्रात शिरकाव करु शकेल, याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. जरा विचार करुन पहा, हे खरंच इतकं अशक्य होतं का? संगणक बनविणार्‍या ऍपलकडं दोन्ही दृक्‌-श्राव्य माध्यमांची क्षमता आहे. मग केवळ श्राव्य माध्यमात ऍपल आपल्याशी स्पर्धा करु शकणार नाही, असं सोनीला का वाटलं? सोप्पं आहे - कोडॅकनं जेव्हा आपलं कार्यक्षेत्र फिल्म कॅमेर्‍यापुरतं मर्यादीत ठेवलं, तेव्हा सोनी 'डिजिटल' म्हणून विस्तारत गेले. डिजिटल कॅमेर्‍याच्या कक्षेत ही दोन्ही क्षेत्रं मिसळून गेली. डिजिटल मध्ये प्रवेश करुन कॅमेरा फिल्मवर गुंतवलेल्या पैशावर पाणी सोडायचं, की फिल्म मध्येच राहून डिजिटल च्या स्पर्धेतून बाहेर पडायचं, या द्विधेत कोडॅक अडकून पडलं. निर्णयाअभावी त्याची दोन्हीकडं पीछेहाट झाली. साहजिकच आहे. "उद्या माझा प्रतिस्पर्धी कोण असणार आहे?” हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारलाच नाही. हीच गत आयबीएम ची झाली, ज्यांनी मेनफ्रेम कॉम्प्युटरच्या उत्पन्नापुढं पीसीच्या (पर्सनल कॉम्प्युटर) उदयाकडं दुर्लक्ष केलं. हीच गत बिल गेट्सची झाली, ज्यांनी आधी इंटरनेट ला एक 'फॅड' ठरवलं, आणि मागाहून नेटस्केपला संपविण्यासाठी विंडोजमध्ये इंटरनेट ब्राउजर गुंडाळून विकलं. आजचा प्रतिस्पर्धी कोण, हा मुद्दाच गौण आहे. आजचा प्रतिस्पर्धी कोण हे उघड आहे, तर उद्याचा कोण हे गुपित!

२००८ मध्ये ब्रिटिश एअरवेजचा भारतातील सर्वात मोठा प्रतिस्पर्धी कोण होता? सिंगापूर एअरलाईन्स? की इंडीयन एअरलाईन्स? असतीलही, परंतु या प्रश्नाचं अचूक उत्तर वेगळंच काहीतरी आहे. वर उल्लेख केलेल्या व न केलेल्याही सर्व एअरलाईन्ससाठी धोकादायक प्रतिस्पर्धी आहेत – एचपी आणि सिस्को च्या व्हिडिओ-कॉन्फरन्सिंग व टेलिप्रेझेन्स सुविधा! जागतिक मंदीमुळं व्यावसायिक वाहतूक घटली. प्रवास खर्चात कपात करण्यासाठी, भारतातील व बाहेरील वरीष्ठ आयटी अधिकार्‍यांना व्हिडिओ-कॉन्फरन्सिंग वापरण्याच्या सूचना त्यांच्या मुख्य कार्यालयांकडून देण्यात आल्या. इतकंच नव्हे तर, अमेरीकन व्हिसासाठी भारतीय तंत्रज्ञांची उडणारी झुंबड २००८ मध्ये बिल्कुल दिसली नाही. (भारतासाठी ६५,००० युएस व्हिसांचा कोटा उपलब्ध आहे. युएसकडूनच उलट विनंत्या येऊ लागल्या, हा मंदीचाच महिमा!) इथंपर्यंत ठीक आहे. पण मंदीनंतर विमान वाहतूक कंपन्या पुन्हा जोरात येतील, यात मला तरी तथ्य वाटत नाही. थोड्या कालावधीसाठी येतीलही; परंतु दीर्घकाळासाठी नक्कीच नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, भौतिकशास्त्राबाहेर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कुठं लागू होत असेल तर तो इलेक्ट्रॉनिक उपकरणांना. १९७७ आणि १९९१ दरम्यान (आता हद्दपार झालेल्या) व्हीसीआर च्या किमती त्याच्या मूळ किमतीच्या एक तृतीयांशपर्यंत घसरल्या होत्या. पीसीच्या किंमती काही लाख रुपयांवरुन काही हजार रुपयांपर्यंत उतरल्या. असाच कल राहिला तर टेलिप्रेझेन्सच्या किंमती देखील कोसळतील. मग उपरोल्लेखित विमान वाहतूक कंपन्यांची काय अवस्था होईल? तसंही त्यांच्यापैकी बहुतेक कंपन्या पिछाडीसच आहेत. असं काही झालं तर त्या भूतकाळात जमा व्हायला वेळ लागणार नाही.

भारतीयांना दोन गोष्टींचं प्रचंड वेड आहे. चित्रपट आणि क्रिकेट. ही दोन्ही पूर्णतः भिन्न क्षेत्रं होती. तशीच त्यातील श्रद्धास्थानंही निराळी होती. सचिन आणि सेहवाग हे क्रिकेटचे देव होते. (आमीर खान, शाह रुख खान आणि त्यांच्या मागोमाग इतर) खान हे चित्रपटांचे नियंते होते. क्रिकेट म्हणजे कसोटी क्रिकेट किंवा फार तर ५० षटकांचे क्रिकेट होते. मग आयपीएल चा उदय झाला आणि ही दोन्ही क्षेत्रं एकजीव झाली. आयपीएलनं क्रिकेटला २० षटकांपर्यंत खाली ओढलं. एकाएकी आयपीएलचा सामना ३ तासांच्या चित्रपटांइतका छोटा वाटू लागला. क्रिकेट चित्रपटाचं प्रतिस्पर्धी बनलं. आयपीएल सामन्यांच्या दिवशी चित्रपटगृहं ओस पडू लागली. आपला प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवण्यासाठी मल्टीप्लेक्सच्या मालकांनी चित्रपटगृहांमध्ये आयपीएल सामने प्रदर्शित करण्याचे हक्क मागून घेतले. जर आयपीएल हाच क्रिकेटचा मुख्य प्रवाह बनणार असेल, आणि तशीच शक्यता दिसत आहे, तर चित्रपटांना आयपीएल सामन्यांच्या सोयीनुसार आपल्या प्रदर्शन तारखा जुळवून घ्याव्या लागतील. प्रेक्षकांच्या दृष्टीनं दोन्हीही ३ तासांचे तमाशेच आहेत. क्रिकेटचा हंगाम चित्रपटांना भारतीय बाजारपेठेतून हद्दपारही करु शकेल.

गेल्या २० वर्षांमध्ये भारतातून गायब झालेली उत्पादनं आठवून बघा. तुम्ही शेवटचा कृष्ण-धवल (ब्लॅक-एंड-व्हाईट) चित्रपट केव्हा बघितला होता? तुम्ही शाईचं पेन अखेरचं केव्हा वापरलं होतं? तुम्ही टाईपरायटर वर अखेरचं टायपिंग केव्हा केलं होतं? या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर आहे, “आठवत नाही!” थोड्या कालावधीसाठी नेहमीच्या टाईपरायटरला नाममात्र पर्याय म्हणून थोडीफार संग्रहक्षमता (मेमरी) असणारा एक इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर उपलब्ध होता. त्यानंतर आला संगणक, आणि ही सर्व उत्पादनं हद्दपार झाली. आज माझ्यासारखी सराईत तंत्रज्ञ नसणारी माणसं देखील संगणकाचाच सुधारीत टाईपरायटर म्हणून वापर करतात. टाईपरायटर मात्र कुठंच दिसत नाही.

एक शेवटचं उदाहरण. २० वर्षांपूर्वी, सकाळी उठण्यासाठी भारतीय जनता काय वापरत होती? उत्तर आहे, “गजराचं घड्याळ”. हे गजराचं घड्याळ म्हणजे छोट्या छोट्या यांत्रिक अवयवांचा एक अवाढव्य राक्षस होता. चालू राहण्यासाठी त्याला रोज चावी द्यावी लागे. गजर देताना त्याचा एवढा आवाज होई की, तुमच्याबरोबर अख्ख्या कॉलनीची झोपमोड होई. त्यानंतर अजून छोटी आणि सुंदर घड्याळं आली. ही बर्‍यापैकी नाजूक असूनदेखील त्यांना सवयीनं "गजराचं घड्याळ"च म्हटलं जायचं. आज आपण सकाळी उठण्यासाठी काय वापरतो? मोबाईल फोन! या मोबाईल फोनच्या कृपेनं अख्खा घड्याळ उद्योग अवकाळी झोपला. टायटन सारख्या बड्या कंपन्यांनाही याचा फटका बसला. तुमचा प्रतिस्पर्धी कुठल्या कोपर्‍यात दडून बसलाय याची तुम्हाला कल्पनाच नाही!

गंमत म्हणून विचारतो, लेखकांचा प्रतिस्पर्धी कोण असू शकतो? विनोद सांगणारी यंत्रं? (ऍपलचा सह-संस्थापक स्टीव्ह वोझ्नीक यानं टेलीफोनलाच, पोलीश भाषेत विनोद सांगणारं एक यंत्र जोडून टाकलं.) की त्यांची स्पर्धा गोष्टी सांगणार्‍या यंत्रमानवांशी असेल? भविष्य भयंकर दिसतंय! एका आयटी कंपनीच्या अधिकार्‍यानी या स्पर्धेबद्दल सूचकपणे म्हटलं आहे, “शिकारी बना...नाहीतर...सावज बनाल!” हेच या गोष्टीचं समर्पक तात्पर्य आहे.

भावानुवाद - मंदार शिंदे ९८२२४०१२४६


Share/Bookmark

Ballpoint Pen Sketches





These sketches are made with regular ballpoint 'pens'.







Share/Bookmark

Wednesday, March 3, 2010

एक महात्मा

एक महात्मा होऊनी गेला, आयुष्य अपुले देऊनी गेला..
स्वतंत्रतेच्या वेशीवरती, बलिदान प्राणाचे देऊनी गेला.
आक्रंदीते ती भारतमाता - सुपुत्र माझा हरवुनी गेला,
आठवा त्याला, जागवा स्मृती - 'कोहिनूर' तो हरपुनी गेला.
रस्ता होता त्याचा दूरचा, आणि अगदी उंचावरचा,
आमच्या मानेवर मात्र पापांचे ओझे...
मान वर करुन पाहूही नाही शकलो, सन्मार्ग तयाचा.
नेणार होता तो स्वर्गाकडे आम्हांला - आपल्याबरोबर घेऊन,
आम्ही मात्र पाताळातच गेलो - मोहाच्या पाशात अडकून.
एक युधिष्ठिर होऊनी गेला - 'कुत्र्या'साठी स्वर्गही नाकारला,
देवांचा राजा रथ घेऊनी उभा - त्यालाही अट्टाहास हा न उमगला !
त्या 'धर्मा'चाच अवतार हा, 'बापू' बनुनी आला पुण्यात्मा..
'गोडसे'च काय - आम्हालाही नाही समजला तो महात्मा, तो पुण्यात्मा !!


Share/Bookmark

Tuesday, February 16, 2010

जेव्हा सूर्य विसावतो...

अंधार साचू लागतो आसमंतात,
दुनियेला करीत भयभीत
जेव्हा सूर्य विसावतो, धरणीच्या कुशीत ॥

आली खोट्याची दुनिया, गेला सत्याचा जमाना,
सावरण्या तोल जगाचा, सारे शोधतात महात्मा.
तूच तो महात्मा बन, असत्याशी युद्ध करीत,
जेव्हा सूर्य विसावतो धरणीच्या कुशीत ।

इमानदारीला मोल नाही, पैशाचा आहे वचक,
मारणारेच सारे जमलेत, कोण आहे तारक?
तूच तो तारक बन, मृत्युवर मात करीत,
जेव्हा सूर्य विसावतो धरणीच्या कुशीत ।

सत्य, शिव आणि सुंदरातले काहीच नाही शिल्लक,
कलियुगाच्या प्रभावामध्ये, झालेत देवही कफल्लक.
तूच एक श्रीमंत बन, त्यागाचे मूल्य वाढवीत,
जेव्हा सूर्य विसावतो धरणीच्या कुशीत ।

समर्थाच्या आधाराशिवाय, झालेत सारे लाचार,
आता तर वाटतोय सार्‍यांना, लाचारी हाच आधार.
खरा आधार होऊन दाखव, सार्‍यांचा तोल सावरीत,
जेव्हा सूर्य विसावतो, धरणीच्या कुशीत ॥

Share/Bookmark

Monday, February 1, 2010

नटरंग















मनात आलं डोक्यात घुसलं - खूळ तमाशाचं,
कला ह्याची बावनकशी - भय कसलं मग समाजाचं.

पैसा सोडंल घरदार सोडंल - सोडंल की हो कुणी लाज,
मर्दानगीच्या गोष्टी करणारं - होईल का पर कुणी नाचं?

नावच ज्याचं गुणा - अंगी गुणांची खाण,
पुरषाच्या शरीरामधी - वागवतो बाईचा प्राण.

बाईचं घेतलं रुप स्वतः - देवानं भक्तांसाठी,
पैलवानाचा होई नाच्या - इथंच रसिकांसाठी.

ऐशी ज्याची किर्ती - देह झिजवी कलेसाठी,
मानाचा मुजरा रसिकांचा - 'अतुल' नटरंगासाठी...

Share/Bookmark