ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, December 7, 2011

सोबती

वाट आहे एकट्याची समजून मी चाललो,
एकेक करीत सोबती मिळत मला गेला.

Share/Bookmark

Monday, December 5, 2011

षंढ नजरा अन्‌ मृत मुठी

षंढ नजरा अन्‌ मृत मुठी घेऊन
जगत असतो आपण
मर्दानगीच्या गप्पा मारत...
तेव्हा रस्त्यावर एखादी
आरक्षण-वंचित अबला
किंवा चार भिंतींआड एखादी
'आरक्षित' सौभाग्यवती
भोगत असते शिक्षा
पुरुषांच्या दुनियेत,
पुरुष नसण्याची..
आसूड ओढत स्वतःच
चारित्र्याची झूल पांघरुन
नागड्या देहावर..
कारण, दोन्ही आवश्यक
तिच्या अस्तित्वासाठी -
चारित्र्याची झूलही
अन्‌ नागडा देहही...
हजारो वर्षांपासून यशस्वी
पुरुषांची जमात,
पटवून तिला देण्यात
की तूच, तू स्वतःच
ओढतेस आसूड स्वतःवर.
आम्ही आमच्या हातांनी
काहीच करत नाही..
करुही शकत नाही..
कारण, नजरा आमच्या षंढ
अन्‌ मृत आमच्या मुठी!


Share/Bookmark

Saturday, November 19, 2011

Learning, Fear, and Fun

When do children (want to) learn?

- It’s only when they are free from fear and feel it entertaining!

Ever noticed how kids pick up the latest movie songs with however complex lyrics? Even kids reported of low memory skills (in school) are found to be chanting movie songs or punch-lines from TV commercials. How does this happen? One, nobody tells them to remember this, hence no exam, no fear. Two, it’s entertaining, isn’t it?

What does this mean?

- This means every child is equipped with basic memory, imagination, and presentation skills. The application varies. Some might apply them academically, some artistically, some some other way. But the skills are always there. What they need from an education system is honing of these skills, learning how to apply them in life.

Does our education system do this to our kids?

- Well, that’s a question every parent, teacher, educationalist, and activist should ask him/herself.

What can a child learn?

- Anything. Literally! Anything that doesn’t frighten and does entertain. Let it be study, sport, art, even spirituality. Remember - memory, imagination, and presentation skills are there. Just remove the fear and add fun.

What about discipline?

- Yes, discipline is important. But not in a frightening way. Can there be discipline without fear? Yes! Make it entertaining. Whatever you expect the child to follow, should have a factor of fun - in the method or in the result. Discipline through fear will be thrown away once the child is (mentally/physically) strong enough to protest. Discipline through fun will sustain. And help.

Is there any scientific base to this?

- Yes, International Oraganisation for Research in Child Handling (IORICH) has conducted hundreds of experiments and surveys to prove that ‘Removal of fear’ and ‘Addition of fun’ can increase any child’s learning capacity by at least ten times. It has also proved that knowledge acquired through fear gets removed along with removal of fear. On other hand, learning through fun is repeated and strengthened every time the fun thing repeats.

Well, sorry… that was a lie!

No, not about fear and fun. Just about IORICH. Yes, there isn’t anything like IORICH. Just wanted to add an ‘International’ and ‘Research’ touch to convince. It works, right?

Okay, forget IORICH. Try it yourself. ‘Removal of fear’ and ‘Addition of fun’. Whatever you find yourself, is the best and most authentic result. Not the one that’s published in ‘International’ journals of ‘research’. After all, each child is unique. How can we apply international rules to something that is unique? We can’t, right?

So, next time before you say that your kid is not learning, ask yourself - Is what it’s learning, free from fear and full of fun? And remember, this fear and fun is from the kid’s point of view, not yours!

Children can learn anything. If you still doubt it, recall your school days, what you wanted to learn, how much you wanted to know, how far you could imagine, how big you dreamt! It’s fun, isn’t it?


- Mandar Shinde
Source: http://mangoacademy.blogspot.com/2011/11/learning-fear-and-fun.html

Share/Bookmark

Wednesday, November 16, 2011

कविता, भावना, आणि भाषा

ही कथा पीडीएफ फॉरमॅट मध्ये आहे. खालील लिंकवर क्लिक करुन ही फाइल बघता किंवा डाउनलोड करता येईल.

https://docs.google.com/open?id=0B0qXfefI0YzUOGRkMGY0ODktYWUxOS00NDU0LWEwMTgtNGEyLinkYTc0ZWJlODMw

Share/Bookmark

Tuesday, November 15, 2011

क्या तेरा है क्या मेरा है

क्या तेरा है क्या मेरा है
इक दिन ये सब खोना है।
ना तेरा है ना मेरा है
तो खोने पर क्यों रोना है?

Share/Bookmark

फिरती शाळा

झोपडी तिथे बालवाडी।
मूल तिथे शाळा।
चाकांवरती पुस्तकमेळा।
आली आली दारी शाळा॥

शिक्षणाचा हक्क प्रत्येक मुलाला आपल्या घटनेनं दिला आहे. शिक्षणाच्या सोयीसाठी शहरांतल्या वॉर्डांपासून अतिदुर्गम खेड्यांपर्यंत सर्वत्र शाळा व शिक्षक उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारी यंत्रणा सतत प्रयत्नशील आहेच. तरीही सर्व मुलं व त्यांच्या पालकांपर्यंत शिक्षणविषयक योजनांचा संपूर्ण लाभ आजही पोहोचलेला दिसत नाही. कधी आर्थिक अडचणींमुळं, कधी सामाजिक परिस्थितीमुळं, तर कधी कौटुंबिक वा वैयक्तिक कारणांमुळं, समाजाच्या विशिष्ट स्तरातल्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावं लागतं. या प्रत्येक मुलापर्यंत पोहोचून त्याच्या समस्यांचं निराकरण करणं, व त्याला शिकण्यासाठी प्रवृत्त करणं, हे प्रत्यक्ष शिकवण्याइतकंच अवघड पण महत्त्वाचं कार्य आहे. मुंबई व पुण्यासारख्या महानगरांत तर शिक्षणाचे असंख्य पर्याय पूर्वीपासून उपलब्ध आहेत. तरीही आपल्या आजूबाजूला शिक्षणापासून दूर राहिलेला मोठा वर्ग दिसतो. ह्या वर्गातली मुलं कुठल्याही कारणामुळं शाळेपर्यंत पोहोचू शकत नसतील तर आपण शाळाच मुलांच्या दारात घेऊन जावी या विचारानं 'डोअर स्टेप स्कूल' या संस्थेची स्थापना १९८८ साली मुंबईत झाली.

मुख्यतः ३ ते १४ वयोगटातल्या मुलांसाठी 'डोअर स्टेप स्कूल' विविध उपक्रम राबवते. पुणे आणि मुंबई या दोन शहरात संस्था कार्यरत असून, ५०,००० हून जास्त मुलांपर्यंत नियमितपणे पोहोचते आहे. मूळ शिक्षण प्रवाहापासून निरनिराळ्या कारणांमुळं दूर राहणार्यार मुलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम संस्था चालवते. यामध्ये, बालवाडी, अभ्यासवर्ग, साक्षरतावर्ग, वाचनवर्ग, आणि वस्ती वाचनालयं, तसंच मुलांना शाळेत नेण्या-आणण्याची सोय, फिरती शाळा अशा सुविधा आहेत. मुलांच्या प्रत्यक्ष समस्यांचा अभ्यास करत, जसजशी गरज भासेल तसतसे उपक्रम संस्था हाती घेत आली आहे. मुलं आणि शाळा यांच्यातलं अंतर मिटवण्याच्या ध्यासातून संस्थेनं काही नाविण्यपूर्ण कल्पनाही अंमलात आणल्या आहेत. त्यातील दोन मुख्य कल्पना म्हणजे, (१) शाळांमधून चालणारे वाचनवर्ग, आणि (२) फिरती शाळा किंवा स्कूल ऑन व्हील्स.

कामगार वस्ती वा झोपडपट्टी भागांमध्ये मुलांसाठी नियमित स्वरुपात वर्ग भरवता यावेत, मुलांना अभ्यासासाठी पुरेशी जागा मिळावी, यासाठी 'डोअर स्टेप स्कूल' तात्पुरत्या वर्गखोल्या उभारण्यासाठी प्रयत्नशील असते. परंतु, पुष्कळदा जिथं मुलं हमखास सापडतात, तिथं आजूबाजूला वर्ग घेण्यासारखी जागा नसते. उदाहरणार्थ - रस्त्यात सिग्नलजवळ दिसणारी मुलं, रेल्वे स्टेशन, किंवा क्रॉफर्ड मार्केट सारख्या बाजारांजवळ फिरणारी मुलं इत्यादी. अशा मुलांना शिकवायचं असेल तर प्रथम बसायची सोय कुठं करायची असा प्रश्न उभा राहतो. ही अडचण दूर करण्यासाठी संस्थेनं 'फिरत्या मुलांसाठी फिरती शाळा' ही संकल्पना प्रत्यक्षात आणली.



ही 'फिरती शाळा' किंवा 'स्कूल ऑन व्हील्स' म्हणजे वर्गखोली प्रमाणे सोय असलेली बस. जिथं मुलं असतील तिथं ही बस नेऊन, मुलांचा वर्ग बसमध्येच घ्यायचा ही कल्पना. एकावेळी २० ते २५ मुलांना सहज बसून शिकता येईल अशी बसची अंतर्गत रचना. मुलांना बसण्यासाठी जागेचा मोठा प्रश्न 'स्कूल ऑन व्हील्स'नं सोडवला. त्यामुळं अधिकाधिक मुलांपर्यंत संस्थेचे उपक्रम नेणं शक्य झालं आहे. या बसचा उपयोग वर्ग म्हणून तर होतोच, शिवाय मुलांना म्युझियम, झू, बँका, दवाखाने, अशा ठिकाणच्या शैक्षणिक सहलीसाठीही होतो. तसंच शाळेच्या वेळेत मुलांची ने-आण करण्यासाठीही या बस वापरता येतात.

अशा तर्‍हेची पहिली 'फिरती शाळा' १९९८ मध्ये सुरु झाली. आज पुणे व मुंबई मिळून एकूण सहा फिरत्या शाळा 'डोअर स्टेप स्कूल'मार्फत चालवल्या जातात. आजवर या दोन शहरांतील असंख्य मुलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे व घेत आहेत. अशाच एका नव्या 'स्कूल ऑन व्हील्स'चं उद्घा्टन झालं २२ सप्टेंबर २०११ रोजी, 'डोअर स्टेप स्कूल'च्या कोथरुड कार्यालयाजवळ. आता पुण्यातल्या आणखी काही ‘फिरत्या’ मुलांना ही ‘फिरती शाळा’ शिक्षणाच्या वाटेवर नक्कीच घेऊन जाईल.

'डोअर स्टेप स्कूल'बद्दल अधिक माहितीसाठी संपर्क - श्रीमती रजनी परांजपे (९३७१००७८४४). संस्थेची वेबसाईट आहे - www.doorstepschool.org

(पूर्वप्रसिद्धीः दै. सकाळ व महाराष्ट्र टाइम्स, पुणे)

Share/Bookmark

Sunday, November 13, 2011

कत्ल करना तो...

कत्ल करना तो कोई हुस्नवालों से सीखे,
तलवार न चले खून न निकले
जान निकल जाए हँसते हँसते।

Share/Bookmark

Saturday, November 12, 2011

Don't think too much!

'Don't think too much,'
You tell me.
But how much is too much?
Who knows?
To decide how much,
Have to think again.
That would be too much,
For sure!

But somebody has to think.
Even though everybody does,
Somebody has to think more,
A little more!
Think ahead of what others think.
Think beyond self.
Think beyond thoughts.
Will you?
I will, for sure!
Don’t know what’ll come out.
Not sure what’ll change,
If something changes at all…
But I’ll do my bit -
I’ll think!

You do your bit -
Just don’t tell me,
‘Don’t think too much!’

Share/Bookmark

Friday, November 11, 2011

Dream...

What happens when,
In your sleep,
Inside your dream,
You feel it’s enough
And you want to get out,
But you can not?
You just can not!
Because you can not wake up
Inside a dream,
Where you’re awake.
And looking around at things
That you never expected
To be there
At that time
At that place
In that way!

True, you can not wake up
Whatever may come…
But yes, you can
Sleep again
Inside your dream
And dream a new dream
With your own rules!
You can
At least try…

Share/Bookmark

Monday, November 7, 2011

खोटारड्यांच्या वस्तीत ह्या...

सांगायचे आहे मला ते सत्य मी झाकतो आहे
खोटारड्यांच्या वस्तीत ह्या चुपचाप मी राहतो आहे

दिसत असले जरी मला हे उजेडातले पाप आहे
डोळे मिटून माझ्यापुरती दिवसाला रात्र मानतो आहे

उत्तरे नसलेल्या प्रश्नांची अगणित इथे पैदास आहे
अन्‌ उत्तरे मिळतील ज्यांची प्रश्न असे मी टाळतो आहे

तर्कबुद्धी भ्रमविणारी दुनिया जणू मयसभाच आहे
आंधळ्यांच्या राज्यात दिवे का उगा मी लावतो आहे

माणसाच्या मुखवट्यामागे श्वापदेच फिरती इथे
देव कुठुनी भेटायचा इथे माणसाचीच वानवा आहे

Share/Bookmark
सोसल्या जगण्याच्या वाटेवर रोज नव्या व्यथा
ऐकल्याही अन् तितक्याच फसव्या सुखाच्या कथा

Share/Bookmark

मगर अब नहीं

जागा करते थे इंतजार में मगर अब नहीं,
क्या करें अब सपने ज्यादा वफादार लगते हैं।

Share/Bookmark

Saturday, November 5, 2011

"अपने बारे में" - जावेद अख़्तर

...मुझे कॉलेज में डिबेट बोलने का शौक हो गया है। पिछले तीन बरस से भोपाल रोटरी क्लब की डिबेट का इनाम जीत रहा हूँ। इंटर कॉलेज डिबेट की बहुत सी ट्राफियाँ मैंने जीती हैं। विक्रम यूनिवर्सिटी की तरफ़ से दिल्ली यूथ फ़ेस्टिवल में भी हिस्सा लिया है। कॉलेज में दो पार्टियाँ हैं और एलेक्शन में दोनों पार्टियाँ मुझे अपनी तरफ़ से बोलने को कहती हैं... मुझे एलेक्शन से नहीं, सिर्फ़ बोलने से मतलब है इसलिए मैं दोनों की तरफ़ से तक़रीर कर देता हूँ।
--------------------
...अब मैं मुश्ताक सिंह के साथ हूँ। मुश्ताक सिंह नौकरी करता है और पढ़ता है। वो कॉलेज की उर्दू एसोसिएशन का सद्र है। मैं बहुत अच्छी उर्दू जानता हूँ। वो मुझसे भी बेहतर जानता है। मुझे अनगिनत शेर याद हैं। उसे मुझसे ज़्यादा याद हैं। मैं अपने घर वालों से अलग हूँ। उसके घर वाले हैं ही नहीं।... देखिए हर काम में वो मुझसे बेहतर है।
--------------------
...मैं बंबई सेंट्रल स्टेशन पर उतरा हूँ। अब इस अदालत में मेरी ज़िंदगी का फ़ैसला होना है। बंबई आने के छह दिन बाद बाप का घर छोड़ना पड़ता है। जेब में सत्‍ताईस नए पैसे हैं। मैं ख़ुश हूँ कि ज़िंदगी में कभी अट्ठाईस नए पैसे भी जेब में आ गए तो मैं फ़ायदे में रहूँगा और दुनिया घाटे में।
--------------------
...मैं बांदरा में जिस दोस्त के साथ एक कमरे में आकर रहा हूँ वो पेशावर जुआरी है। वो और उसके दो साथी जुए में पत्ते लगाना जानते हैं। मुझे भी सिखा देते हैं। कुछ दिनों उनके साथ ताश के पत्तों पर गुज़ारा होता है। फिर वो लोग बंबई से चले जाते हैं और मैं फिर वहीं का वहीं - अब अगले महीने इस कमरे का किराया कौन देगा। एक मशहूर और कामयाब रायटर मुझे बुलाके ऑफ़र देते हैं कि अगर मैं उनके डॉयलॉग लिख दिया करूँ (जिन पर ज़ाहिर है मेरा नहीं उनका ही नाम जाएगा) तो वो मुझे छह सौ रुपये महीना देंगे। सोचता हूँ ये छह सौ रुपये इस वक़्त मेरे लिए छह करोड़ के बराबर हैं, ये नौकरी कर लूँ, फिर सोचता हूँ कि नौकरी कर ली तो कभी छोड़ने की हिम्मत नहीं होगी, ज़िंदगी-भर यही करता रह जाऊँगा, फिर सोचता हूँ अगले महीने का किराया देना है, फिर सोचता हूँ देखा जाएगा। तीन दिन सोचने के बाद इनकार कर देता हूँ। दिन, हफ़्ते, महीने, साल गुज़रते हैं। बंबई में पाँच बरस होने को आए, रोटी एक चाँद है हालात बादल, चाँद कभी दिखाई देता है, कभी छुप जाता है। ये पाँच बरस मुझ पर बहुत भारी थे मगर मेरा सर नहीं झुका सके। मैं नाउम्मीद नहीं हूँ। मुझे यक़ीन है, पूरा यक़ीन है, कुछ होगा, कुछ ज़रूर होगा, मैं यूँ ही मर जाने के लिए नहीं पैदा हुआ हूँ।
--------------------
..."मैं जिस दुनिया में रहता हूँ वो उस दुनिया की औरत है" - ये पंक्ति अगर बरसों पहले 'मज़ाज़' ने किसी के लिए न लिखी होती तो मैं शबाना के लिए लिखता।
--------------------
- जावेद अख़्तर

Share/Bookmark

झूठा

चले गए वो प्यार को हमारे झूठा ठहराकर,
मनाने आते तो बता देते ये रुठना झूठमूठ का था।

Share/Bookmark

Friday, October 28, 2011

आग

खुशाल लावू दे आग दुनिया स्वप्नांना माझ्या
हसतो मी ही वितळून जातील बेड्या हातातल्या

Share/Bookmark

कभी फुरसत में...

कभी फुरसत में हम मिले तो सही,
ग़म बाँटे या खुशी और बात है।

Share/Bookmark

Friday, October 21, 2011

खुश

औरों की मुस्कुराहट देख हम खुश रहते हैं,
आईना देख खुद पे हँसने से यहीं अच्छा।

Share/Bookmark

जिंदगी

तू कर ले चाहे जितने सितम ऐ जिंदगी,
हमने कब परवाह की थी जो आज करेंगे।

Share/Bookmark

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!

कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून,
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे?

दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून झडून,
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे...

अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी,
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे...

- आरती प्रभू

Share/Bookmark

Wednesday, October 5, 2011

माणूस

माणूस माणसाला माणसासारखं
मानतच नाही,
ज्याच्यासाठी, ज्यानं केले नियम,
त्यातलं कुणीच नियम पाळत नाही.
माणसानंच संपवायची
माणसाची जात,
याला नियतीचा सूड म्हणावं की
माणसाची औकात?

Share/Bookmark

Sunday, September 18, 2011

बदल

मी बदललंय,  तुम्हीही बदलू शकता
विस्कटलेली घडी तुम्हीही बसवू शकता

होत नाही, मिळत नाही यावर रडूही शकता
मी करेन, मी मिळवेन,  असंही म्हणू शकता

हात दोन्ही जोडून दयाही मागू शकता
हाताला हात जोडून फौज उभारु शकता

कसं बदलेल सारं नुसतं बघत बसू शकता
स्वतःला बदलून बघा जग बदलेल बघता-बघता

मी बदललंय,  तुम्हीही बदलू शकता





Share/Bookmark

Saturday, September 17, 2011

करके घायल हमें...

करके घायल हमें जो चल दिये हमसे दूर,
लब्जों में कैद कर लिये हमनें नखरे उनके!

Share/Bookmark

Sunday, September 11, 2011

।।बाप्पा मोरया।।

तू बुध्दीची देवता, तुझा जयजयकार आम्ही करता,
तू प्रसन्न होशी आशीष दिधशी, मोरया रे बाप्पा मोरया।।

लेकरं तुझी ही जनता, कुठं जाती तू बुध्दी वाटता?
तुझ्या नावानं मांडती बाजार पैशांचा, मोरया रे बाप्पा मोरया।।

तुझा उत्सव भक्तिभावाचा, ज्याच्या-त्याच्या आवडी-निवडीचा।
का धमक्या देऊन खंडण्या उकळती, मोरया रे बाप्पा मोरया।।

आकार मोठा तुझ्या कानांचा, ऐकशी तू धावा दीन-दुबळ्यांचा।
कान फाटेस्तोवर का मग आरत्या घोकती, मोरया रे बाप्पा मोरया।।

तू होतास रे स्वामी विश्वाचा, आता संसार तुझा रस्त्यावरचा।
तुझी धिंडही काढती पाण्यात बुडवती, मोरया रे बाप्पा मोरया।।

आता दाखव हिसका अंकुशाचा, भरलाय घडा मानवाच्या पापांचा।
त्यांची मस्ती जिरव जे तुला-मला छळती, मोरया रे बाप्पा मोरया।।

Share/Bookmark

Thursday, September 8, 2011

एकदा तरी

स्वप्न एकदा तरी पडायला हवे
प्रेम एकदा तरी करायला हवे

ते मुकाम, तेच मार्ग, तीच मंझिले
वाट एकदा तरी चुकायला हवे

जगायचे जुनेच की मरायचे नवे
लक्ष्य एकदा तरी ठरायला हवे

चौकटीत वागणे त्रिकोण तोलुनी
ढोंग एकदा तरी जमायला हवे

दिसे तसे नसे असे निभायचे कसे
स्पष्ट एकदा तरी कळायला हवे

दगे छुपे कितीक, कुठे दुश्मनी छुपी
समोर एकदा तरी लढायला हवे

भरभरून पुण्य मोजले पदोपदी
माप एकदा तरी भरायला हवे

- उषाकुमारी

Share/Bookmark

शायरी

नुसतेच ना दुनियेत तुमच्या
आलो अम्ही, गेलो अम्ही
भगवन्‌ तुझ्या दुनियेस काही
देऊनी गेलो अम्ही.
शायरी अर्पून गेलो
माझे जणू सर्वस्व ती
दुनिया तुला विसरेल भगवन्‌
ना अम्हा विसरेल ती.

- भाऊसाहेब पाटणकर

Share/Bookmark

लाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे

लाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?
मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे, हरती जिथे शहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे?
हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे!
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

जाता समोरुनी तू, उगवे टपोर तारा
देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्यांचे सुचते सुरेल गाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

गीत - मंगेश पाडगावकर
स्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर
संगीत - श्रीनिवास खळे

Share/Bookmark

Sunday, August 28, 2011

Ganpati Bappa Moraya (Short Story)

"नारायण, नारायण" असा जप करत नारदमुनी गजाननाकडं आले. दोन हातात दोन छोटे ब्रश आणि सोंडेत एक मोठा ब्रश. एक सुंदर निसर्गचित्र रंगवण्यात दंग होते श्रीगणेश. पृथ्वीतलावर सातत्यानं ये-जा करणार्‍या मोजक्या देवांपैकी श्रीगणेश एक. आपण जाऊ तिथला परिसर सुंदर बनवायचा त्यांचा आग्रह. हिरव्या-पिवळ्या रंगांची मुक्त उधळण केली होती त्या चित्रात. आता हे चित्र पूर्ण झालं की पृथ्वीवरच्या नक्की कुठल्या भागात बसवलं जाईल, या विचारात नारदमुनी गढून गेले. इतक्यात गणेशाचं त्यांच्याकडं लक्ष गेलं.

"प्रणाम मुनीवर, कसं काय येणं केलंत?" सगळे ब्रश बाजूला ठेवत गणेशानं नारदमुनींना विचारलं.

"नारायण, नारायण," भानावर येत नारदमुनी म्हणाले, "गणेशदेवा, तुझे भक्तगण तुझ्या स्वागताच्या जय्यत तयारीला लागलेले पाहून, तुला चार गोष्टी सांगायला आलोय."

"बोला मुनीवर, काही गडबड तर नाही ना?"

"गडबड म्हणजे...तसं नवीन काही नाही, पण..."

"पण? पण काय नारदमुनी?"

"पण हेच की तिकडच्या सगळ्या जुन्या समस्या अजूनही आहेत तशाच आहेत. नव्हे, उलट त्यांचं स्वरुप अधिकच गंभीर होत चाललंय..."

"परिस्थिती खूपच वाईट आहे का मुनीवर?"

"गणेशा, दर चतुर्थीला भक्तगण तुला साकडं घालतात, त्यांच्या समस्या सोडवायचं. शिवाय वर्षभर तुझ्या मंदीरांमधून नवस, आरत्या, महापूजा, अभिषेक, हे सारं सुरु असतंच. झालंच तर, वर्षातून एकदा तू स्वतः जाऊन तिकडं राहून येतोस काही दिवस. तरीही लोकांच्या समस्यांना काही अंत दिसत नाही बघ."

"कुठल्या समस्यांबद्दल बोलताय तुम्ही?" गणेशानं अदबीनं विचारलं.

"कुठल्या कुठल्या समस्या सांगू गजानना?
- महागाईनं जनसामान्यांचं कंबरडं मोडलंय;
- जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत;
- भ्रष्टाचारानं अर्थव्यवस्था मोडकळीला आलीय;
- दहशतवादानं माणसा-माणसातल्या विश्वासाचा बळी घेतलाय;
- देशाच्या..."

"थांबा थांबा मुनीवर," गजाननानं नारदमुनींना थांबवत म्हटलं, "अहो या सगळ्या समस्या माणसानंच निर्माण केल्यात की नाही?"

"हो, मग?"

"अहो मग या सगळ्या समस्यांवरचे उपाय माणसाकडंच असायला पाहिजेत की नाही?"

"हो, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण..."

"मग कसला पण घेऊन बसलात मुनीवर? ते सगळे उपाय स्वतःच्या घरी ठेऊन माणसं माझ्याकडं येतात, फक्त समस्या घेऊन. मग उपास-तापास, नवस-सायास, होम-हवन, मंत्र-अभिषेक हे सगळं करत बसतात. आता तुम्हीच सांगा, त्यांनी निर्माण केलेल्या समस्यांवर मी कसा काय उपाय काढणार बरं?"

"हं, तेही बरोबरच आहे म्हणा. पण तरी या समस्यांवर काही तरी केलं पाहिजेच ना? म्हणजे, दहशतवादावर, महागाईवर, भ्रष्टाचारावर..."

"बास बास बास... अहो काय नारदमुनी, माणसांमध्ये फिरुन तुम्हीपण माणसांसारखं कुरकुरायला लागलात की हो. त्या माणसांच्या समस्या-बिमस्या सोडा माणसांवर. त्यांनी स्वतः शोधलेले उपायच त्यांना कायमचं तारु शकतील. तुम्ही आम्ही भरवलेला घास पचायचा नाही त्यांना. त्यापेक्षा मी तुम्हाला मोदक भरवतो, तो खा आणि संतुष्ट मनानं नारायणाचा जप करा," एवढं बोलून श्रीगणेशानं आतल्या बाजूला आवाज दिला, "मोदक घेतलेत का बनवायला? नारदमुनींना द्या जरा गरम-गरम..."

आणि मग....

.................

....मग काय, आम्ही घेतले की हो मोदक बनवायला! आणि बनवतोच आहोत - खूप खूप, भरपूर. तुम्हालाही खायचे असतील तर जरुर सांगा आम्हाला. त्याचं काय आहे, श्रीगणेशानं आम्हाला सांगितलंय,

"हे जग खूप सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवायचं आपण!"

ते चित्रसुद्धा आता पूर्ण होत आलंय. श्रावण-सरींनी सजवलेल्या आजूबाजूच्या हिरव्यागार निसर्गचित्राचा खरा चित्रकार येतोय आपली भूक शमवायला. तो गणाधिपती गजानन भुकेला आहे भक्तीचा, भावाचा, प्रेमाचा... आणि स्वादिष्ट मोदकांचाही!

लागायचं मग तयारीला? आम्ही तर केव्हाचे तयार होऊन बसलोय वाट बघत... विघ्नहर्त्या गणरायाची आणि तुमची. कधी येताय मोदक खायला?

"उंदीर म्हणाला बाप्पांना
दर्शन देऊया भक्तांना,
मोदक-लाडू खाऊया
गणपती बाप्पा मोरया!"


Share/Bookmark

Wednesday, August 3, 2011

दिल तोड़ दिया

कुछ तो दुनिया कि इनायात ने दिल तोड़ दिया
और कुछ तल्ख़ी-ए-हालात ने दिल तोड़ दिया
हम तो समझे थे के बरसात में बरसेगी शराब
आयी बरसात तो बरसात ने दिल तोड़ दिया

- सुदर्शन फ़ाकिर
(इनायात = एहसान; तल्ख़ी = कटुता)

Share/Bookmark

Monday, August 1, 2011

कायमचे धडधडणारे मन...

कायमचे धडधडणारे मन शांत करावे क्षणभर कोणी
जहरामधले जहरीलेपण कमी करावे क्षणभर कोणी
एक एक एकटेपणाच्या लाटा मजवर करती हल्ला
चंद्रकिनारी चंद्रकमानी मधून यावे क्षणभर कोणी

- उषाकुमारी

Share/Bookmark

दुवायें

वो पूछते हैं, हजारों दुवाओं से क्या हुआ हासिल?
अरे, हासिल तो तुम हो, ना खोने के वास्ते हैं दुवायें...

Share/Bookmark

Saturday, July 30, 2011

आरसा

चढवितोस आठी अपुल्या कपाळी
पाहूनी आरशात जेव्हा तू स्वतःला,
बसविलाच नाही आरसा म्हणूनी
देतो धन्यवाद तेव्हा मी स्वतःला.

Share/Bookmark

Monday, July 25, 2011

इन्साफ

इन्साफ़ क्या माँगते हो तुम उस ख़ुदा से,
जो खुद इन्सान की बनाई कहानीयों में उलझ गया...


Share/Bookmark

साहिर आणि जादू

('नया ज्ञानोदय' या हिंदी मासिकासाठी गुलजार, 'मेरे अपने' नावाचा स्तंभ लिहितात. जानेवारी २०११ च्या अंकात त्यांनी साहिर लुधियानवी आणि जावेद अख्तर यांच्या आठवणी लिहिल्या होत्या. त्या लेखाचा मी केलेला मराठी अनुवाद - मंदार शिंदे 9822401246)
साहिर आणि जादू

ही साहिरच्या अंत्ययात्रेपूर्वीची गोष्ट आहे.
मी गोष्ट 'जादू'ची सांगतोय, पण संदर्भ साहिर लुधियानवींचा आहे.
जादू आणि साहिरचं नातं मोठं विचित्र होतं. जादू हे जावेद अख्तरचं टोपणनाव. एकदम शायराना अंदाज... आख्खं खानदानच असं. बाप जाँ निसार अख्तर. मामा मजाज आणि आता सासरे कैफी आझमी.
बापाबद्दल आदर कधीच नव्हता त्याला. कसलातरी राग होता. नाराजी होती त्याच्या नसानसांत. आपल्या बापाविरुद्ध. आई जिवंत असताना कसाबसा सहन करायचा. पण ती गेल्यावर, छोट्या-छोट्या गोष्टींवर घर सोडून बाहेर पडायचा आणि सरळ साहिरच्या घरी जाऊन पोहोचायचा. त्याचं तोंड बघूनच साहिरना समजून जायचं की परत बापाशी भांडून आलाय. पण ते अजिबात त्यावर बोलत नसत. त्यांना ठाऊक होतं पहिलं तर जादू भडकून उठेल आणि मग रडायला लागेल. दोन्ही परिस्थितींत त्याला सांभाळणं कठीण होतं.
थोडी उसंत घेऊन ते म्हणत, “जादू, चल ये, नाष्टा करुन घे.”
आणि मग नाष्टा करता-करता जादू स्वतःच भडभडून बोलायला लागायचा आणि तो बिघडलेला दिवस त्यांच्याकडंच घालवायचा. पण कधी-कधी काय व्हायचं, साहिर त्याला सावध करायचे, “अख्तर येतोय. दुपारच्या जेवणाला.”
जादू मान वर करुन पहायचा, इथंही चैन नाही. त्याला वाटलं तर तो साहिरसमोरच बोलला असता, “हा बाप, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी. का?”
जादू मुलगा होता जाँ निसार अख्तर चा, पण स्वभावानं आपल्या मामावर, मजाज वर गेला होता. अतिशय भावूक आणि भयंकर तापट... साहिरनी त्याला मुलासारखं पोसलं आणि मित्रासारखं सांभाळलं. साहिर म्हणत, “जादू, 'ऐरोज'ला मस्त पिक्चर लागलाय यार. काय बरं नाव... जा जाऊन बघून ये...”
आणि अशा प्रकारे ते बाप-लेकाचं समोरासमोर येणं टाळत. मोठं विलक्षण नातं होतं, साहिर आणि जादूचं.
एकदा तो साहिरच्या घरातूनही निघून गेला.
तुम्हीच जास्त डोक्यावर चढवून ठेवलंय माझ्या बापाला.”
साहिरना हसू आलं. त्यावर जादू म्हणाला, “माझा बाप पण असाच हसतो माझ्यावर. मला नकोय कुणीच. ना तो ना तुम्ही.” आणि भांडून घरातून निघून गेला.
काही दिवस गायब झाला. अतिशय स्वाभिमानी. कुठं झोपायचा, कुठं खायचा, कुणास ठाऊक.
माल साहेबांच्या, कमाल अमरोहींच्या प्रॉडक्शन मॅनेजरशी दोस्ती होती. संध्याकाळ त्याच्यासोबतच घालावायचा आणि रात्री तिथंच स्टुडिओ मध्ये, प्रॉडक्शन स्टोअर मध्ये झोपून जायचा. अशा स्टोअरमध्ये जिथं सगळ्या प्रकारचं प्रॉडक्शनचं सामान पण भरुन ठेवलेलं होतं. मीना कुमारीच्या दोन फिल्म फेअर अवॉर्डच्या ट्रॉफी पण पडल्या होत्या तिथं. हा पठ्ठ्या आरशासमोर उभा राहून स्वतःला ट्रॉफी सादर करायचा, मग ती ट्रॉफी स्वतःच स्वीकारायचा, मग उपस्थितांच्या वतीनं टाळ्या पण वाजवायचा, आणि मग कमरेत झुकून लोकांना अभिवादनही करायचा. जादूनं एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की जवळपास रोज, झोपण्यापूर्वी तो अशी रिहर्सल करायचा. बरेच दिवस काढले त्यानं स्टुडिओमध्ये.
त्यानंतर जेव्हा साहिरच्या घरी दिसला तेव्हा चेहरा उतरला होता, तोंड सुकलं होतं. साहिरनी प्रेमानं बोलावलं पण जादूचा राग अजून गेला नव्हता.
फक्त आंघोळीसाठी तुमचं बाथरुम आणि साबण वापरायचाय. तुमची काही हरकत नसेल तर.”
जरुर.” साहिरनी परवानगी दिली आणि म्हटलं, “काहीतरी खाऊन घे.”
खाईन कुठंतरी. तुमच्याकडं खायचं नाहीये मला.”
आंघोळ करुन आला तर साहिर, ड्रेसिंग टेबलवर शंभरची नोट समोर ठेऊन, उगाचच आपल्या केसांतून कंगवा फिरवत बसले होते. खरं तर, मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत होते, जावेदला कसं म्हणावं शंभर रुपये ठेव म्हणून. जावेदच्या स्वाभिमानी बाण्याची भीतीही वाटे आणि आदरही. अखेर घाबरत-घाबरत बोलून टाकलं.
जादू, हे शंभर रुपये ठेव. मी घेईन तुझ्याकडून.”
शंभर रुपये त्या जमान्यात खूप मोठी रक्कम होती. शंभरची नोट मोडायची तर लोक बँकेत जात, किंवा पेट्रोल पंपावर.
जादूनं नोट अशी घेतली की जणू साहिरवर उपकारच करतोय,
ठेवून घेतोय. परत करेन. पगार होईल तेव्हा.”
जावेद, शंकर मुखर्जींकडं असिस्टंट म्हणून लागला होता जिथं त्याची ओळख सलीम खानशी झाली. खूप कमावलं त्यानंतर त्यानं. दारु प्यायचा मामासारखी आणि पिऊन बापावर राग काढायचा, साहिर स्टाइलनं. पण ते शंभर रुपये त्यानं कधी परत नाही दिले. हजारो कमावले, मग लाखोही आले, पण नेहमी हेच म्हणायचा साहिरना,
तुमचे शंभर रुपये तर मी गडप केले.”
आणि साहिर पण नेहमी म्हणत, “ते तर मी तुझ्याकडून वसूल करेनच बेट्या...!”
ही छेड-छाड, साहिर आणि जादू मध्ये अखेरपर्यंत चालू रहिली, आणि दोस्ती अखंड कायम राहिली.
साहिरचा खूप मोठा मित्रपरिवार तर नव्हता, पण ते माणसांत रमायचे, आणि संध्याकाळची पिऊन झाली की कित्येकांची ऐशी-तैशी करुन टाकायचे. जेव्हा कृष्णचंद्रवाल्या घरी होते, तेव्हा त्यांचे जुने स्नेही ओम प्रकाश अश्क बरीच वर्षं त्यांच्यासोबत राहिले. एकदा माझ्यादेखतच अश्क साहेब म्हणाले होते पंजाबीतून,
साहिर, दारु पिल्यावर तू शिवीगाळ का करायला लागतोस?”
साहिरनी पंजाबीतच उत्तर दिलं होतं, “दारु सोबत चकना पण पाहिजे ना यार.”
साहिरच्या मित्रमंडळीमध्ये एक डॉक्टर कपूर पण होते, जे स्वतः हृदयरोगी होते, पण साहिरचे डॉक्टर. साहिर म्हणत असत, “कपूर, मी तुला बघायला येऊ, की स्वतःला दाखवायला येऊ!”
त्या संध्याकाळी... त्या अखेरच्या संध्याकाळीही असंच झालं. दरम्यानच्या काळात, साहिरनी स्वतःचं घर बांधलं होतं. 'परछाइयाँ'. डॉ. कपूर वर्सोव्याच्या एका बंगल्यात जाऊन राहिले होते. जादू एक प्रचंड यशस्वी रायटर बनला होता. त्या संध्याकाळी साहिर, डॉ. कपूरना बघायला गेले होते. निरोप आला होता की त्यांची तब्येत ठीक नाही. हार्ट स्पेशलिस्ट डॉ. सेठ त्यांना बघायला येणार होते. बहुतेक रामानंद सागर पण होते तिथं. किंवा नंतर आले असतील. साहिरनी कपूरांच्या करमणुकीसाठी पत्ते मागवले आणि त्यांच्याच बिछान्यात बसून खेळू लागले. पत्ते वाटता-वाटता अचानक डॉ. कपूरनी पाहिलं, साहिरचा चेहरा आखडत चाललाय. बहुदा कळ दाबायचा प्रयत्न करत होते ते. कपूरनी आवाज दिला, 'साहिर'!
आणि त्याबरोबर साहिर, त्या बिछान्यात लवंडले. डॉ. सेठ येऊन पोहोचले. खूप प्रयत्न केला हृदय पूर्ववत करण्याचा. पण साहिर निवर्तले होते. डॉ. कपूरांना घाबरं-घुबरं झालेलं पाहून रामानंद सागर, त्यांना ताबडतोब तिथून हलवून आपल्या घरी घेऊन गेले.
साहिरचा ड्रायव्हर अन्वर धावत आला. त्यानं प्रेत ताब्यात घेतलं. यश चोप्रा त्यांच्या अगदी जवळ रहायचे. त्यांच्याकडं निरोप पाठवला तर ते श्रीनगरला गेले होते. त्यानंतर जादूला कळवलं. ड्रायव्हर नव्हता तर ते टॅक्सी घेऊन पोहोचले. आणि त्या टॅक्सीतून जादू, साहिरना त्यांच्या घरी घेऊन आले, परछाइयाँ मध्ये. अन्वर आणि टॅक्सीवाल्याच्या मदतीनं त्यांना वर घेऊन गेले. फर्स्ट फ्लोअर वर, जिथं ते रहायचे.
जादूनं जणू मौनव्रत घेतलं होतं. पण घरी पोहोचताच तो ज्या पद्धतीनं त्यांच्या गळ्यात पडून रडला, आयुष्यात कधी असा रडला नव्हता. रात्रीचा एक वाजला असेल. कुठं जायचं? कुणाला बोलवायचं? काही नाही केलं जादूनं. एकटा बसून राहिला त्यांच्या शेजारी. शेजार-पाजारचे लोक पोहोचले होते. एक शेजारी म्हणाला, थोड्या वेळात प्रेत आखडू लागेल. दोन्ही हात छातीवर घेऊन बांधून टाका. नंतर अवघड होऊन बसेल.
जादू अखंड रडत होता आणि लोक जे काही सांगतील ते सगळं करत राहिला.
मग सकाळ होता-होता लोकांना फोन करणं सुरु केलं. बातमी पसरत गेली तसतसे लोक जमा होऊ लागले. बसायला सतरंज्या काढा. इथल्या खुर्च्या हलवा. तिकडचा दरवाजा उघडा. लहान मुलासारखे, जादूचे अश्रू वाहतच होते आणि तो ही सगळी कामं करत होता.
अंत्ययात्रेच्या तयारीसाठी खाली आला तर पाहिलं की टॅक्सीवाला तिथंच उभा आहे.
ऊफ्‍! सांगितलं का नाहीस? किती पैसे झाले तुझे?”
तो कुणी पापभीरु मनुष्य होता. ताबडतोब हात जोडले.
मी साहेब... नाही पैशांसाठी नाही थांबलो. हे असं झाल्यावर कुठं जाणार होतो रात्री?”
जादूनं खिशातून पाकीट काढलं.
टॅक्सीवाला पुन्हा म्हणाला,
नाही साहेब, राहू द्या साहेब.”
जादू जवळजवळ ओरडून म्हणाला, “हे घे, ठेव हे शंभर रुपये. मेल्यावर पण वसूल केले आपले पैसे.”
आणि धाय मोकलून रडू लागला.
ही साहिरच्या अंत्ययात्रेपूर्वीची गोष्ट आहे.
~~0~~


Share/Bookmark

Friday, July 22, 2011

दिल-जले...




हमें बेदिल कहनेवाले जरा इतना बता दे जाते-जाते..

तेरी राहों में रोशनी के लिये जिसे जलाया, वो क्या था?

Share/Bookmark

Tuesday, July 19, 2011

तो ज़िंदा हो तुम...

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो
तो ज़िंदा हो तुम
नज़र में ख़्वाबों की बिजलीयाँ लेके चल रहे हो
तो ज़िंदा हो तुम
हवा के झोंकों के जैसे आझाद रहना सीखो
तुम एक दरीया के जैसे लेहरों में बेहना सीखो
हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें
हर एक पल इक नया समाँ देखे यह निगाहें
जो अपनी आँखों में हैरानियाँ लेके चल रहे हो
तो ज़िंदा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो
तो ज़िंदा हो तुम

- जावेद अख़्तर
(ज़िंदगी ना मिलेगी दोबारा)

Share/Bookmark

अपने होने पर मुझको यकीं आ गया...

पिघले नीलम सा बेहता यह समा,
नीली नीली सी खामोशियाँ,
ना कहीं है ज़मीं ना कहीं है आसमाँ,
सरसराती हुई टेहनियाँ पत्तियाँ,
कह रही है बस एक तुम हो यहाँ,
बस मैं हूँ, मेरी साँसें हैं और मेरी धडकनें,
ऐसी गेहराइयाँ, ऐसी तनहाइयाँ, और मैं... सिर्फ मैं.
अपने होने पर मुझको यकीं आ गया.

- जावेद अख़्तर
(ज़िंदगी ना मिलेगी दोबारा)

Share/Bookmark

दिल आखिर तू क्यूँ रोता है...

जब जब दर्द का बादल छाया
जब घूम के साया लेहराया
जब आँसू पलकों तक आया
जब यह तनहा दिल घबराया
हमने दिल को यह समझाया
दिल आखिर तू क्यूँ रोता है
दुनिया में यूँही होता है
यह जो गेहरे सन्नाटे हैं
वक्त ने सबको ही बाँटे हैं
थोडा ग़म है सबका किस्सा
थोडी धूप है सबका हिस्सा
आँख तेरी बेकार ही नम़ है
हर पल एक नया मौसम है
क्यूँ तू ऐसे पल खोता है
दिल आखिर तू क्यूँ रोता है

- जावेद अख़्तर
(ज़िंदगी ना मिलेगी दोबारा)

Share/Bookmark

Sunday, July 17, 2011

बूँदे बारीश की...

पलकों पे सजाये फिरते थे, वो चार बूँदे बारीश की,
कोई पूछे तो शरमा के कहते, दो मेरी है और दो उनकी...

Share/Bookmark

Friday, July 15, 2011

जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...

आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...

दुःखाला आधार नको का? तेहि कधीतरी येते
दोस्त होऊनी हातच माझा अपुल्या हाती घेते,
जो जो येईल त्याचे स्वागत, दार न कधीही बंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...

झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे
साधा कोरा कागदही कधी चंद्र होऊनी हासे,
सर्वत्रच तो बघतो धुंदी, डोळे ज्याचे धुंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...

कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळूवार
हात होतसे वाद्य : सुरांचे पाझरती झंकार,
प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...

- कवी मंगेश पाडगांवकर





Share/Bookmark

Thursday, July 7, 2011

लेबर शॉर्टेज अर्थात कामगार टंचाई

(३ जुलै २०११ च्या ‘संडे टाइम्स ऑफ इंडिया’ मधील स्वामीनाथन अय्यर यांच्या लेखावर आधारित)

- २००४-०५ मधे ४२ टक्के असणारं वर्कर पार्टिसिपेशन (म्हणजे कामगारांचं एकूण लोकसंख्येशी असणारं प्रमाण) २००९-१० मध्ये ३९.२ टक्क्यांपर्यंत घसरलं. म्हणजेच, शंभर लोकांपैकी ४२ लोक काम करत होते, ते आता ३९ वर आले.
- देशाचा विकास ‘जॉबलेस ग्रोथ’ म्हणजे रोजगाराच्या संधी न वाढताच होतोय, अशी काही लोकांची तक्रार आहे.
- सरकारी अधिकार्‍यांचं म्हणणं आहे की बेरोजगारीचं प्रमाण २.३ टक्क्यांवरुन २ टक्क्यांवर आलंय. म्हणजेच ०.३ टक्के अधिक रोजगार निर्माण झालेत.
- वस्तुस्थिती अशी आहे की, काम करायची इच्छा असणार्‍या लोकांचीच संख्या कमी होत चाललीय.
कमतरता नोकर्‍यांची नसून कर्मचार्‍यांची आहे, विशेषतः महिला कर्मचार्‍यांची.
- वेगवान विकासामुळं रोजगाराच्या संधीही खूप वाढल्यात. पण सर्वत्र लेबर शॉर्टेज अर्थात कामगार टंचाई आहेच.
- रोजगाराविना विकास = अतिरिक्त कामगार = कमी मजुरी.
पण, कामगारांविना विकास = वाढती मजुरी.
म्हणजे काय?
जर आपल्या विकासामुळं रोजगाराच्या संधी वाढल्या नाहीत असं मानलं तर, भरपूर कामगार बेरोजगार दिसले असते. म्हणजेच, कामगारांचा मागणीपेक्षा जास्त पुरवठा झाल्यानं (डिमांड-सप्लाय रिलेशन), कमी मजुरीत जास्त कामगार उपलब्ध व्हायला हवेत.
प्रत्यक्षात, मजुरीचे दर वेगानं वाढलेले दिसून येतात. डिमांड-सप्लाय रिलेशननुसार, विकासाच्या वाढत्या वेगाबरोबर वाढत जाणार्‍या कामगारांच्या मागणीइतका पुरवठा होत नसल्यानं मजुरीचे दर वाढत चाललेत.
म्हणजेच, रोजगाराच्या संधी वाढतायत, पण कामगार उपलब्ध होत नाहीत. यापैकी मोठी घट आहे महिला कामगारांच्या संख्येत. कशामुळं?
- तरुण वर्गातल्या स्त्रिया नोकरीकडून उच्च शिक्षणाकडं वळतायत.
काम करण्याचं वय सर्वसाधारणपणे १५ ते ६० वर्षे मानलं जातं.
उच्च शिक्षण घेणार्‍यांचं प्रमाण वाढल्यानं १५ ते २५ वर्षांच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय. यामुळं आपल्या ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’लाही धक्का बसतोय.
- कुटुंबाचं उत्पन्न आणि मुलींचं शिक्षण यांत सुधारणा होऊ लागली की, सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली बायकांना घरी बसवायचं प्रमाण वाढतं.
- गेल्या काही वर्षांत महिला कर्मचार्‍यांची संख्या जवळपास साडे तीन कोटींनी कमी झालीय. कशामुळं?
- गरीब निरक्षर लोकसंख्येत ‘वर्कर पार्टिसिपेशन’ जास्त आढळतं.
कारण? कामाशिवाय बसून राहणं त्यांना परवडतच नाही. त्यामुळं कुटुंबातील स्त्री-पुरुष दोघंही काम करतात.
- उत्पन्न वाढू लागलं की वर्क पार्टिसिपेशन कमी होऊ लागतं, विशेषतः स्त्रियांचं.
- कुटुंबामध्ये एकापेक्षा दोघांचं उत्पन्न येणं कधीही चांगलं. दोघंही कमावते असणं जास्त फायदेशीर.
पण समाजामध्ये, खास करुन मध्यमवर्गीयांमध्ये, ज्या घरातल्या स्त्रिया नोकरी करत नाहीत (किंवा करावी लागत नाही), त्या कुटुंबांना जास्त प्रतिष्ठा मिळते. त्यांचं सोशल स्टेटस चांगलं आहे असं म्हटलं जातं.
- गरजेपेक्षा जास्त उत्पन्न मिळू लागलं की, बायकांनी नोकरी करायची गरज नाही असं ठरवून त्यांना घरी बसवलं जातं. थोडक्यात, स्त्रियांनी नोकरी करुन जे जास्तीचे (पोटेन्शियल) पैसे मिळाले असते, त्याच्या बदल्यात सोशल स्टेटस, सामाजिक प्रतिष्ठा विकत घेतली जाते.
- आणखी एक मुद्दा म्हणजे, अशिक्षित स्त्रिया कुठल्याही कामाला तयार असतात.
याउलट, सुशिक्षित स्त्रियांची अपेक्षा असते स्टेटसनुसार चांगला जॉब मिळण्याची. असे सिलेक्टीव्ह जॉब सर्वत्र उपलब्ध असतीलच असं नाही.
- एकंदरीत, कामगार टंचाई, विशेषतः स्त्री कामगार टंचाईवर मात करण्यासाठी गरज आहे सामाजिक दृष्टीकोन बदलण्याची. चेंज इन सोशल अॅटीट्यूड!
- स्त्रीचं करीयर - पुरुषाचं करीयर, किंवा नोकरीची व उत्पन्नाची ‘गरज’ यांतला स्त्री-पुरुष भेदभाव कमी झाल्यास, आणि
स्त्रियांच्या दृष्टीनं कामाच्या ठिकाणांची सुधारणा केल्यास,
लेबर शॉर्टेज किंवा कामगार टंचाई निश्चितच कमी होऊ शकेल.



Share/Bookmark

Wednesday, July 6, 2011

शब्द

जे मनात माझ्या होते,
शब्दांतून व्यक्त ते झाले,
तू मनात या शिरताना,
ते शब्दही परके झाले...

Share/Bookmark

तरिही वसंत फुलतो

<-- Sudheer Moghe -->
प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो,
तरिही वसंत फुलतो, तरिही वसंत फुलतो

जे वाटती अतूट, जाती तुटून धागे,
आधार जो ठरावा, त्यालाच कीड लागे,
ऋतु कोवळा अखेरी तळत्या उन्हात जळतो,
तरिही वसंत फुलतो, तरिही वसंत फुलतो

<-- Mandar Shinde -->
भासे जरि उदास, आयुष्य हे सुंदर असते,
नजरे-नजरे मधले, हे फसवे अंतर असते,
आयुष्या वीटलो म्हणुनी, मृत्यु का सखा भासतो,
तरिही वसंत फुलतो, तरिही वसंत फुलतो

Share/Bookmark

Monday, June 20, 2011

प्रवास

आठवतो मला सखे तुझा सहवास
धुंद करणारा तुझ्या आठवांचा भास,
सोबती तू येता मग मला असे वाटे
संपू नये कधी असा देखणा प्रवास...

तुझ्याच कुशीत होई मन शांत माझे
तुझ्याच श्वासात हरवती श्वास माझे,
थांबू नये कधी श्वासांची चढाओढ
संपू नये कधी असा देखणा प्रवास...

तुझ्याच डोळ्यांना ठावे माझे सारे भाव
माझ्या आसवांना ठावे फक्त तुझा गाव,
तुझ्या-माझ्या डोळ्यांत हा चाले लपंडाव
संपू नये कधी असा देखणा प्रवास...

घेऊन गेलीस सखे पाखरांची गाणी
माझ्याकडे काय, फक्त तुझ्या आठवणी,
रचतो त्या आठवांची गाणी आता खास
संपू नये कधी असा देखणा प्रवास...

- अक्षर्मन
९८२२४०१२४६


Share/Bookmark

यूँ लगता है...

यूँ लगता है तुम, मेरे ही आस-पास हो
यूँ लगता है यह, अब आखरी पडाव हो,
यूँ लगता है अब, सच सारे सपने हो, जब-
पलमें छुप जाती हो, पलमें दिख जाती हो...

Share/Bookmark

Wednesday, June 15, 2011

कृष्णावतार

माझ्यासाठीही कधी कृष्ण अवतरला होता,
स्वार्थी दुनियेच्या गोंगाटात -
मधुर पाव्याचा सूर बरसला होता...

माझ्यासाठीही कधी कृष्ण अवतरला होता,
एकटेपणाच्या शापाला माझ्या -
रास-लीलेचा उःशाप मिळाला होता...

माझ्यासाठीही कधी कृष्ण अवतरला होता,
मोक्षाची याचना करता करता -
जगण्यातला आनंद अनुभवला होता...

माझ्यासाठीही कधी कृष्ण अवतरला होता...

Share/Bookmark

Friday, May 20, 2011

चूक

चुकतात अंदाज अन्‌ चुकतात निर्णय काही
चुकलेल्या निर्णयांवर अडणारा मी पण नाही,
वाट एखादी चुकण्यात दोष कुणाचा नाही, पण
चुकलेल्याच वाटेवर चालून मिळणार किनारा नाही

Share/Bookmark

Sunday, May 1, 2011

की-होल्डर







Share/Bookmark

Saturday, April 23, 2011

कशी विसरशील मला?

कशी विसरशील मला?
कारण परत येणार आहे
येत राहणार आहे
दरवर्षी... पावसाळा !

Share/Bookmark

Tuesday, April 12, 2011

युस बहरचं जबरदस्त मोटरसायकल डिझाईन (Video)



युस बहर आणि फॉरेस्ट नॉर्थ सादर करीत आहेत - मिशन वन, एक सुरेख, शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटरसायकल. त्यांच्या निराळ्या (पण समान) बालपणाच्या स्लाईड्समधून दिसेल, एकत्रित काम करण्यातून जुळलेली त्यांची मैत्री - आणि त्यांनी पाहिलेलं समान स्वप्न.
(Click 'View subtitles' and select 'Marathi')

Share/Bookmark

Sunday, April 10, 2011

कायझेन : सतत प्रगती (सकाळ jobz)




Share/Bookmark

यशाची 5'S सूत्रे (सकाळ jobz)

फाईव्ह एस

Share/Bookmark

मॅनेज वर्क विथ फाईव्ह एस (महाराष्ट्र टाईम्स - प्रगती फास्ट)



Share/Bookmark

Saturday, April 9, 2011

भावना

माझी मला कळेना, कोणती खरी भावना
खोट्याच भावनांचा कल्लोळ हा सरेना
कल्लोळ भावनांचा, हुंदकाही आठवांचा
उरे माझ्या मनी मग, कोणताही भाव ना...

Share/Bookmark

Wednesday, March 16, 2011

परछाई

ढूँढते रहे उनकी आँखोंमें खुदको
और सोचते रहे बस एक ही बात
वो खुबसूरती जिसपे हुए हम फिदा
न जाने शायद हमारी ही परछाई थी

Share/Bookmark

Wednesday, March 2, 2011

'वाहवा' - कवी म. भा. चव्हाण



आधुनिक मराठी गझलचे प्रणेते, कवी म.भा.चव्हाण यांच्या 'वाहवा' या गझला, रुबाया आणि शेरोशायरीच्या संग्रहासाठी गझलसम्राट सुरेश भट यांनी लिहिलेली प्रस्तावना -

“श्री. म. भा. चव्हाण ह्यांचा हा पहिला गझलसंग्रह! ह्या संग्रहात त्यांच्या एकूण ५२ निवडक गझला आहेत. मी स्वतः या गझला निवडलेल्या आहेत आणि त्यात वेचक तेवढेच शेर राहू दिलेले आहेत. या संग्रहाच्या निमित्ताने 'गझल' हा एक सुंदर मराठी काव्यप्रकार महाराष्ट्रात लोकप्रिय होऊन रुजायला निश्चित मदतच होणार आहे.

तसा विचार केला तर श्री. म. भा. चव्हाण यांनी आजपर्यंत कविता, पोवाडा, लावणी, अभंगापासून वगापर्यंत सर्वच प्रकार हाताळलेले आहेत. पण माझे स्वतःचे असे मत आहे की, त्यातल्या त्यात त्यांना गझल व लावणी हे दोन काव्यप्रकार फार धार्जिणे आहेत. निखळ मराठी भाषा आणि मराठमोळा अभिव्यक्ती ही चव्हाणांच्या लिखाणाची अंगभूत वैशिष्ट्ये आहेत.

आज मराठी गझल हा नितांत सुंदर काव्यप्रकार महाराष्ट्रातील बहुजन समाजाने, सामान्य जनतेने उचलून धरलेला आहे. रसिक तर आधीपासूनच आहेत; पण उत्तम गझल लिहिणारेही निर्माण होत आहेत.

श्री. म. भा. चव्हाण या नव्या साहित्यिक वस्तुस्थितीचे जिवंत उदाहरण आहेत!

काव्य असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, जो अस्सल असेल तोच शेवटापर्यंत आणि शेवटानंतरही टिकतो; आणि उसने चन्द्रबल आणून काही काळापुरते 'पुढे' येणारे लोक फक्त मागेच जात नाहीत, तर काळाच्या गर्तेत खोल गाडले जातात. त्यांची नावनिशाणीही शिल्लक उरत नाही.

या गझलसंग्रहानंतरचा काळ म्हणजे श्री. म. भा. चव्हाण यांची खरी कसोटी आहे. मराठी माणसांना हा गझलसंग्रह आवडणार आहे, याची दखल घेतली जाईल हे मला ठाऊक आहे; पण हा तर प्रारंभ आहे. चव्हाणांनी याहून अधिक सुंदर लेखन सातत्याने केले पाहिजे आणि स्वतःचे व काळाचे भान ठेवले पाहिजे.

आज श्री. म. भा. चव्हाण यांचा हा गझलसंग्रह आपण वाचत आहात. उद्या फक्त चव्हाणच नव्हेत, तर त्यांच्या पाठोपाठ अनेक प्रतिभाशाली कवींचे गझलसंग्रह मराठी माणसांना वाचायला मिळणार आहेत. इतर काव्यप्रकारांबरोबरच मराठी गझलही महाराष्ट्रात फुलत जाणार आहे.

गझल लिहिणारे कवी इतर कोणत्याही काव्यप्रकाराला दूषणे देत नसतात. दुसर्‍याला नावे ठेवून स्वतःच्या निर्मितीचा अस्सलपणा आणि मोठेपणा शाबित करता येत नसतो. सर्वांनी आपापल्या परीने लिहावे आणि मराठी मायबोली समृद्ध करावी. मराठी काव्याचे आकाश सार्‍या काव्यप्रकारांसाठी आहे आणि याउपरही कुणाचा आक्षेप असेल, तर श्री. म. भा. चव्हाण उत्तर देतील -

केलेस तू खरेदी आकाश हे कधी?
माझा पतंग मीही उडवून पाहिला!

श्री. म. भा. चव्हाण ह्यांच्या ह्या गझलसंग्रहामुळे मराठी काव्यक्षेत्रात एक उल्लेखनीय भर पडणार आहे, हे निश्चित.”

- सुरेश भट




Share/Bookmark

Friday, January 14, 2011

ज्युलियन असांजः जगाला विकीलीक्सची गरज का आहे? (Video)



वादग्रस्त वेबसाईट 'विकीलीक्स' संवेदनशील अधिकृत कागदपत्रं आणि व्हिडीओ मिळवून प्रसिद्ध करते. संस्थापक ज्युलियन असांज, जे चौकशीसाठी अमेरिकी अधिकार्‍यांना हवे आहेत, ते बोलताहेत 'टेड'च्या ख्रिस अँडरसन सोबत, ही साईट कशी चालते, तिनं काय साध्य केलंय - आणि त्यांना स्फूर्ती कुठुन मिळते, यांबद्दल.
(Click 'View subtitles' and select 'Marathi')

Share/Bookmark

Tuesday, January 11, 2011

ज्युलिया स्वीनी यांचं "ते" संभाषण



जेव्हा ज्युलिया स्वीनींच्या ८ वर्षांच्या मुलीनं बेडकांच्या प्रजननाबद्दल शिकण्यास सुरुवात केली - आणि त्यानंतर हुशारीनं काही प्रश्न विचारले, तेव्हा सत्यकथनाचा कितीही प्रयत्न केला तरी ज्युलिया स्वीनींना शेवटी धडधडीत खोटं बोलावंच लागलं.
(Click 'View subtitles' and select 'Marathi')

Share/Bookmark