ऐसी अक्षरे
Friday, March 2, 2012
Wednesday, February 15, 2012
Saturday, February 11, 2012
दादा कोंडकेंची कविता...
दादा कोंडकेंचं 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्य हिट चालू होतं. करंट टॉपिकवर दादा खुमासदार टिप्पणी करून हशा घेत. बतावणीमध्ये एक मयताचा सीन होता. दादा त्या सीनच्या वेळी वसंत सबनिसांना विचारत, 'मयतीला कुणाकुणाला बोलवायचं?' वसंतराव प्रेक्षागारात उपस्थित असलेल्या नामवंताचं नाव घेत. त्यावर दादा फर्मास कॉमेंट करत. एका प्रयोगाला पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात प्रख्यात नाटककार, कवी, 'वाहतो ही दुर्वांची जुडी' नाटकाचे लेखक बाळ कोल्हटकर हजर होते. सीन सुरू झाला.
दादाः मयतीला कुणाला बोलवायचं?
सबनीसः बाळ कोल्हटकरांना बोलवूया.
दादाः नको, नको, मुडदा राहिला बाजूला आणि उगाच 'डी' वर 'डी' च्या फुटकळ कवितेच्या उड्या पडतील मयतावर. नको.
यावर सबनीस रागावले. त्यांना 'दुर्वांची जुडी' नाटक खूप आवडायचं. बाळ कोल्हटकरांबद्दल खूप आदर होता. ते दादांना म्हणाले, कोल्हटकरांच्या 'जुडी'ची टिंगल करताय. एक तरी 'डी' वर 'डी' ची फुटकळ का होईना कविता तुम्हाला आत्ता म्हणता येईल का?
सगळ्यांना वाटलं की दादांची बोलती बंद होणार, पण कसचं काय? त्यांनी प्रेक्षकांत बसलेल्या बाळ कोल्हटकरांकडे बघत 'ऑन द स्पॉट' कविता सुरू केली -
सुंदर पोहे पातळ पातळ
खमंग तुकडे खोबरे पुष्कळ
शेंग, चुरमुरे अन् डाळ
या सर्वांनी, विविध चवींनी
असा बनविला चविष्ट चिवडा
पडते त्यावर 'उडी'
बांधतो ही चिवड्याची 'पुडी'
यावर प्रचंड हशा उसळला...
बाळ कोल्हटकरांनी प्रेक्षागारातून दादांना वंदन करुन, त्यांच्या उत्स्फूर्ततेला दाद दिली.
- सुधीर गाडगीळ
'आठवणी लेखणी अन् वाणीच्या' (ग्राहकहित दिवाळी २०११)

दादाः मयतीला कुणाला बोलवायचं?
सबनीसः बाळ कोल्हटकरांना बोलवूया.
दादाः नको, नको, मुडदा राहिला बाजूला आणि उगाच 'डी' वर 'डी' च्या फुटकळ कवितेच्या उड्या पडतील मयतावर. नको.
यावर सबनीस रागावले. त्यांना 'दुर्वांची जुडी' नाटक खूप आवडायचं. बाळ कोल्हटकरांबद्दल खूप आदर होता. ते दादांना म्हणाले, कोल्हटकरांच्या 'जुडी'ची टिंगल करताय. एक तरी 'डी' वर 'डी' ची फुटकळ का होईना कविता तुम्हाला आत्ता म्हणता येईल का?
सगळ्यांना वाटलं की दादांची बोलती बंद होणार, पण कसचं काय? त्यांनी प्रेक्षकांत बसलेल्या बाळ कोल्हटकरांकडे बघत 'ऑन द स्पॉट' कविता सुरू केली -
सुंदर पोहे पातळ पातळ
खमंग तुकडे खोबरे पुष्कळ
शेंग, चुरमुरे अन् डाळ
या सर्वांनी, विविध चवींनी
असा बनविला चविष्ट चिवडा
पडते त्यावर 'उडी'
बांधतो ही चिवड्याची 'पुडी'
यावर प्रचंड हशा उसळला...
बाळ कोल्हटकरांनी प्रेक्षागारातून दादांना वंदन करुन, त्यांच्या उत्स्फूर्ततेला दाद दिली.
- सुधीर गाडगीळ
'आठवणी लेखणी अन् वाणीच्या' (ग्राहकहित दिवाळी २०११)
दादा कोंडकेंची कविता...
Friday, January 13, 2012
सहावं वरीस शाळेचं...
शहाणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण मोक्याचं
सहावं वरीस शाळेचं गं सहावं वरीस शाळेचं
मिळाला मोका शिकण्याचा, अ आ इ ई वाचण्याचा
पाठीवरती दप्तर घेतलं आणि चालणं ठेक्याचं
सहावं वरीस शाळेचं...
बाराखडी मी शिकली गं, मला गणितं सुटली गं
पाटीवरती सांडु लागलं टपोरं अक्षर मोत्याचं
सहावं वरीस शाळेचं...
ओढ लागली शिकण्याची, शाळेमधल्या गमतीची
आज मला हे गुपित कळलं माणूस मोठ्ठा बनण्याचं
सहावं वरीस शाळेचं...
http://everychildcounts-pune.blogspot.com/2012/01/blog-post_13.html

सहावं वरीस शाळेचं गं सहावं वरीस शाळेचं
मिळाला मोका शिकण्याचा, अ आ इ ई वाचण्याचा
पाठीवरती दप्तर घेतलं आणि चालणं ठेक्याचं
सहावं वरीस शाळेचं...
बाराखडी मी शिकली गं, मला गणितं सुटली गं
पाटीवरती सांडु लागलं टपोरं अक्षर मोत्याचं
सहावं वरीस शाळेचं...
ओढ लागली शिकण्याची, शाळेमधल्या गमतीची
आज मला हे गुपित कळलं माणूस मोठ्ठा बनण्याचं
सहावं वरीस शाळेचं...
http://everychildcounts-pune.blogspot.com/2012/01/blog-post_13.html
सहावं वरीस शाळेचं...
Monday, January 2, 2012
आपण दोघे
तुला नाही वेळ तुझ्या दुनियादारीतून
मला नाही सवड आपलंच रडं रडण्यातून
भेटणार आपण दोघे कसं आणि कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही
कळत तुला नाहीच रे कितीही मी सांगून
ऐकत मीही नाही खरं तू रोज-रोज बोलून
संवादाचं नाटक असं करायचं हे कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही
सुख म्हणजे नक्की काय करावंसं वाटतं
तुझ्या कुशीमध्ये फक्त शिरावंसं वाटतं
पैसा आणि सोयींचे हे डोंगर रे कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही
नात्यातून या मला अरे खूप बळ हवंय
तुझं मन माझं मन जवळ-जवळ हवंय
तुला मी मला तू आणखी कोण कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जेव्हा वाटत राही

मला नाही सवड आपलंच रडं रडण्यातून
भेटणार आपण दोघे कसं आणि कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही
कळत तुला नाहीच रे कितीही मी सांगून
ऐकत मीही नाही खरं तू रोज-रोज बोलून
संवादाचं नाटक असं करायचं हे कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही
सुख म्हणजे नक्की काय करावंसं वाटतं
तुझ्या कुशीमध्ये फक्त शिरावंसं वाटतं
पैसा आणि सोयींचे हे डोंगर रे कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जर वाटत नाही
नात्यातून या मला अरे खूप बळ हवंय
तुझं मन माझं मन जवळ-जवळ हवंय
तुला मी मला तू आणखी कोण कशासाठी
दोघांनाही मनापासून प्रेम जेव्हा वाटत राही
०२ जानेवारी २०१२
आपण दोघे
Subscribe to:
Posts (Atom)



