आचार्य रजनीश एक कथा सांगायचेः कुत्र्यांच्या जगातील एक गणमान्य कुत्रा एकदा दिल्ली पदयात्रेवर निघाला. त्यांच्या शिष्यांनी समारोहपूर्वक कलकत्त्याहून त्यांना निरोप दिला. मजल-दरमजल करत तीन महिन्यांनी महाराज दिल्लीला पोहोचणार, असा कार्यक्रम आखला होता. दिल्लीतील अनुयायांनी जंगी स्वागत करण्यासाठी स्वागत समिती देखील बनवली होती. तीन महिन्यांनी कुत्रा महाराज दिल्लीला पोहोचणार म्हणून वर्गणी गोळा करायला लागले. आणि अचानक दहाव्याच दिवशी महाराज दिल्लीत येऊन थडकले.
"महाराज आपण किती महान! तीन महिन्यांचा प्रवास दहा दिवसांत पूर्ण केला. कुत्ता महाराजकी जय!" अनुयायांनी जयघोष केला.
"महाराज, आपण हा चमत्कार कसा साधला? आणि आपल्या अंगावर एवढ्या जखमा कशा?"
"मी दहा दिवसांत स्वतःच्या मर्जीने नाही रे पोहोचलो! कलकत्त्याहून निघालो. पहिल्या पडावाच्या गावी पोहोचलो. थकलो होतो. आराम करावा, काही खावं म्हणून मोठ्या आशेने गावात शिरलो, तर त्या गावातले कुत्रे भुंकत माझ्या मागे लागले. त्यांच्या भीतीने पळत सुटलो. निदान पुढील गावात तरी विसावा मिळेल म्हणून आशेने पोहोचलो, तर तिथले कुत्रे अजून क्रूर व भयानक निघाले. लचकेच तोडायला अंगावर आले. माझ्या जलद प्रवासाचं हे रहस्य आहे. अरे, कलकत्त्याहून दिल्लीपर्यंत कोठल्याच मुक्कामावर मला उसंत घेऊ दिली नाही हो!" धापा टाकत थकले भागलेले जखमी कुत्रा महाराज रडकुंडीला येत बोलले.
अशा धावण्यालाच आजच्या युगात स्पर्धा, व दिल्लीला पोहोचण्याला यश म्हणतात.
(डॉ. अभय बंग यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' या पुस्तकातून)
"महाराज आपण किती महान! तीन महिन्यांचा प्रवास दहा दिवसांत पूर्ण केला. कुत्ता महाराजकी जय!" अनुयायांनी जयघोष केला.
"महाराज, आपण हा चमत्कार कसा साधला? आणि आपल्या अंगावर एवढ्या जखमा कशा?"
"मी दहा दिवसांत स्वतःच्या मर्जीने नाही रे पोहोचलो! कलकत्त्याहून निघालो. पहिल्या पडावाच्या गावी पोहोचलो. थकलो होतो. आराम करावा, काही खावं म्हणून मोठ्या आशेने गावात शिरलो, तर त्या गावातले कुत्रे भुंकत माझ्या मागे लागले. त्यांच्या भीतीने पळत सुटलो. निदान पुढील गावात तरी विसावा मिळेल म्हणून आशेने पोहोचलो, तर तिथले कुत्रे अजून क्रूर व भयानक निघाले. लचकेच तोडायला अंगावर आले. माझ्या जलद प्रवासाचं हे रहस्य आहे. अरे, कलकत्त्याहून दिल्लीपर्यंत कोठल्याच मुक्कामावर मला उसंत घेऊ दिली नाही हो!" धापा टाकत थकले भागलेले जखमी कुत्रा महाराज रडकुंडीला येत बोलले.
अशा धावण्यालाच आजच्या युगात स्पर्धा, व दिल्लीला पोहोचण्याला यश म्हणतात.
(डॉ. अभय बंग यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' या पुस्तकातून)

No comments:
Post a Comment