ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, September 21, 2014

प्रदेशाचा आणि व्यक्तीचा परस्परांवर परिणाम

"शरद पवार हे बारामतीचे. त्या भागाच्या औद्योगिक विकासाला पवारांचा हातभार लागला, पण स्वतःची म्हणूनही गती होती. कविवर्य मोरोपंत बारामतीचे. महाराष्ट्रातील पाटपाण्याची पहिली योजना म्हणजे नीरा कालवा योजना. तिची सुरुवात १८८५ मधे झाली. म्हणजे देशात काँग्रेसची चळवळ सुरु झाली, पुण्यात फर्ग्युसन कॉलेज सुरु झाले, त्यावर्षीच बारामतीचे लोक बागायती शेती करायला लागले. सहकारी साखर कारखान्याचा लल्लूभाई सामळदास यांचा पहिला प्रयोग बारामतीतच झाला. त्याच फसलेल्या कारखान्याच्या जागी सध्याचा माळेगाव कारखाना उभा आहे. प्रवरानगरचा कारखाना उभा करण्यासाठी झालेल्या बैठकीला गोविंदराव जिजाबा पवार हजर होते. काकडे, जाचक, शेंबेकर, दाते, पवार या मंडळींनी बारामतीत बागायत आणि साखर कारखानदारी वाढविली. त्या वातावरणात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी राजकारण सुरु केले. बारामतीच्या जिरायती भागात त्यांनी फूड फॉर वर्क योजनेअंतर्गत पंचवीस वर्षांपूर्वी शंभर पाझर तलाव करून घेतले. आता तिथे मोठमोठे उद्योग उभे राहात आहेत."

- वरुणराज भिडे ('सत्याग्रही विचारधारा' जुलै १९९३च्या अंकातून)


Share/Bookmark

No comments:

Post a Comment