जगात कुणाचंच कुणावाचून काहीच अडत नाही. आपण केलं नाही म्हणून काहीही घडायचं रहात नाही. आपल्यावाचूनच जग चालणार असेल, तर आजूबाजूला घडणा-या घटनांमधे भाग का नाही घ्यायचा? या सर्व घटनांमध्ये भाग घेऊन जगाची आणि जगण्याची मजा लुटायची संधी प्रत्येकाला असते. ही संधी ओळखून भाग घेणारा स्वतः आनंद मिळवतो आणि इतरांनाही देतो. ही संधी न ओळखणारा किंवा ओळखूनही बाहेर राहणारा स्वतःच कोरडा राहतो. त्याच्याशिवाय काही घडायचं रहात नाहीच. या जगण्याच्या जत्रेत येऊन, हाताची घडी घालून गंभीर चेह-यानं कोप-यात उभं राहण्यात काय मजा? आलोच आहोत जत्रेत तर, फुगे फोडू, पाळण्यात बसू, आइस्क्रीम खाऊ, पिपाण्या वाजवू, खेळणी घेऊ, सगळं करु... नाहीतर जत्रेत यायचंच कशाला?
- मंदार शिंदे ९८२२४०१२४६

No comments:
Post a Comment