स्लो डाऊन, जिंदगी!
फक्त गाडीचा स्पीड कमी केल्यामुळं ९०% अपघात टाळता येणार असतील, तर १०० फुटात १० स्पीडब्रेकर बसवले पाहिजेत, असं आता वाटायला लागलंय.
स्पीडब्रेकर चुकीच्या पद्धतीनं बांधले तर ते दुरुस्त करता येतील, पण स्पीडब्रेकर नसतीलच तर सुरक्षित गाडी चालवायची जबाबदारी लोक स्वतः घेत नाहीत असा अनुभव आहे.
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, वाहने सावकाश चालवा, वाहने चालवताना मोबाईलचा वापर टाळा, वगैरे पाट्या आपल्याला फालतू वाटतात. आपण सिग्नल पाळत नाही. चौकात गाड्या उलट्या घालतो. नो एन्ट्रीचा बोर्ड आपल्याला अपमानास्पद वाटतो. ट्रॅफिक पोलिसाशी आपण वाद घालतो किंवा त्यालाच खिशात घालतो. फक्त स्पीडब्रेकर ही अशी गोष्ट आहे जी टाळता येत नाही. त्यावरुन जाताना स्पीड कमी करायलाच लागतो.
विनाकारण भरधाव गाडी चालवणाऱ्यांमुळं निष्पाप लोकांचा जीव जाताना बघून या निष्कर्षापर्यंत आलेलो आहे. स्पीडब्रेकरचा राग-राग करणाऱ्यांच्या भावना समजू शकतो, माझं मतसुद्धा काही वर्षांपूर्वीपर्यंत स्पीडब्रेकरविरोधीच होतं. पण आपल्या लोकांची वृत्ती लक्षात घेता, स्पीडब्रेकरला पर्याय नाही... 🛑🚗💨 🙏🙏
#SlowDownZindagi
![Share/Bookmark](http://static.addtoany.com/buttons/share_save_171_16.png)
No comments:
Post a Comment