ऐसी अक्षरे
Saturday, October 6, 2018
Tuesday, October 2, 2018
पाणी कसं अस्तं...
पाणी कसं अस्तं
- दिनकर मनवर
(दृश्य नसलेल्या दृश्यात)
पाणी हा शब्द(दृश्य नसलेल्या दृश्यात)
मला कसाही उच्चारण्याची मुभा नाहीये
मी ऐकू शकत नाही पाण्याचा आवाज
की चालून जाऊ शकत नाही पाण्याच्या पायरीवरून
पाणी कसं अस्तं आकाशासारखं निळंशार
किंवा अंगठा छाटल्यावर उडालेल्या
रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर
पाणी कसं अस्तं स्वच्छ पातळ की निर्मळ ?
काळं असावं पाणी कदाचित
पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं
किंवा आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं
किंवा पाणी हिरवं नसेल कशावरून ?
(पाणी कसं अस्तं हे मला अजूनही कळू दिलेलं नाहीये)
जे तुंबवून ठेवलेलं अस्तं तळ्यात ते पाणी अस्तं ?
पोह-यानं पाणी उपसून घेतलं तर विहिरीतलं पाणी विटतं ?
पाणी धारदार वाहतं झुळझुळतं मंजुळ गाणं गातं ते पाणी अस्तं ?
गढूळ, सडकं, दूषित, शेवाळलेलं, गटारीतलं, मोरीतलं
या पाण्यावरचे निर्बंध अजूनही उठविले गेले नाहीत काय ?
पाणी ढगातून बरसतं तेच फक्त पाणी अस्तं ?
नि दंगली घडवतं ते पाणी नस्तं ?
पाणी पावसातून गळतं जमिनीवर
बर्फ वितळल्यावर पसरतं पठारांवर
नदीला पूर आल्यावर वेढून घेतं गावं
धरण फुटल्यावर पांगापांग करतं माणसांची
ते पण पाणी पाणीच अस्तं ?
पाणी स्पृश्य अस्तं की अस्पृश्य ?
पाणी अगोदर जन्माला आलं की ब्रह्म ?
पाणी ब्राह्मण अस्तं की क्षत्रिय की वैश्य
पाणी शूद्र अस्तं की अतिशूद्र
पाणी निव्वळ पाणीच असू शकत नाही का
या वर्तमानात ?
आणि पाणी वरचं खालचं झालं केव्हापास्नं
की कुणाच्या हात लावण्यानं ते कसं काय बाटतं ?
पाणी नदीतलं, नाल्यातलं, ओढ्यातलं, विहिरीतलं
पाणी तळ्यातलं, धरणातलं, सरोवरातलं, समुद्रातलं
पाणी ढगातलं, माठातलं, पेल्यातलं, डोळ्यांतलं
हे पाणी कुणाच्या मालकीचं अस्तं ?
पाणी नारळात येतं
छातीच्या बरगड्यात साचतं
फुफ्फुसातून पू होऊन स्रवतं
पोटात पाण्याचा गोळा होऊन राहतं
ईश्वराचा कोणता देवदूत हे पाणी न चुकता सोडत अस्तो ?
पाणी पारा अस्तं की कापूर ?
जे चिमटीत पकडता येत नाही
नि घरंगळून जात राहतं सारखं
किंवा कापरासारखं जळून जातं झर्कऽऽन
पाणी हा शब्द फक्त एकदाच मला उच्चारू द्या
निव्वळ पाण्यासारखाच
पाणी कसं अस्तं...
अंधार...
अंधार...
(लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६)
====०====
थंड होत चाललेल्या कॉफीच्या कपात
साखरेची तिसरी पुडी फोडून ओतताना
मी पुन्हा हसलो…
तू पुन्हा विचारलंस, ‘का हसलास ?’
कसं सांगू तुला ? आणि काय सांगू ?
एअर कन्डीशन्ड कॉफी शॉपच्या
काचेच्या भिंती आणि दारातून
जाणवत होतं भगभगतं ऊन.
मी क्षणभर पाहिलं बाहेर अन्
गपकन् घेतले डोळे मिटून.
तू निघालीस चटकन् उठून
तुझी गर्द निळी-जांभळी ओढणी सांभाळीत.
मी थांबवायच्या आत तू गेली होतीस
उन्हाच्या झळांच्या पायर्या करून
भगभगत्या सूर्यप्रकाशाच्या दिशेनं.
डोळ्यांना खुपणारा तो सूर्यप्रकाश सहन करीत
मी बघत राहिलो तुझी लगबग.
वर वर, अगदी ढगात, सूर्याच्या जवळ
तू जात राहिलीस तुझी ठाम पावलं टाकीत.
एकदाच मागं वळून पाहिलंस माझ्याकडं,
एक क्षणभरच थांबलीस, हसलीस…
आणि मग उलगडत गेलीस
तुझी ती गर्द निळी-जांभळी ओढणी,
आणि अंथरलीस त्या भगभगत्या आकाशावर.
तुझ्या केसांमधल्या त्रिकोणी-चौकोनी क्लिप्सनी
डकवून टाकलास तो निळा-जांभळा पडदा.
मी सुखावल्या डोळ्यांनी बघत राहिलो
एका रुक्ष दिवसाची मनोहर रात्र होताना.
परत येण्याआधी तू पुन्हा एकदा
हात फिरवलास त्या पडद्यावर,
आणि मी माझ्या या डोळ्यांनी पाहिली
त्या त्रिकोणी-चौकोनी चांदण्यांची थरथर.
तू येऊन बसलीस समोरच्या खुर्चीत,
जणू काही घडलंच नाही अशा थाटात.
मी मात्र बघत राहिलो आकाशात
लुकलुकणार्या तुझ्या टिकलीच्या चंद्राकडे…
पुडीतली साखर कपात ओतताना
मी पुन्हा हसलो…
तू पुन्हा विचारलंस, ‘का हसलास ?’
कसं सांगू तुला ? आणि काय सांगू ?
शेवटी तूच म्हणालीस मोकळ्या केसांतून हात फिरवीत,
‘आज अंधार फार लवकर झाला, नाही का?’
(लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६)
====०====
थंड होत चाललेल्या कॉफीच्या कपात
साखरेची तिसरी पुडी फोडून ओतताना
मी पुन्हा हसलो…
तू पुन्हा विचारलंस, ‘का हसलास ?’
कसं सांगू तुला ? आणि काय सांगू ?
एअर कन्डीशन्ड कॉफी शॉपच्या
काचेच्या भिंती आणि दारातून
जाणवत होतं भगभगतं ऊन.
मी क्षणभर पाहिलं बाहेर अन्
गपकन् घेतले डोळे मिटून.
तू निघालीस चटकन् उठून
तुझी गर्द निळी-जांभळी ओढणी सांभाळीत.
मी थांबवायच्या आत तू गेली होतीस
उन्हाच्या झळांच्या पायर्या करून
भगभगत्या सूर्यप्रकाशाच्या दिशेनं.
डोळ्यांना खुपणारा तो सूर्यप्रकाश सहन करीत
मी बघत राहिलो तुझी लगबग.
वर वर, अगदी ढगात, सूर्याच्या जवळ
तू जात राहिलीस तुझी ठाम पावलं टाकीत.
एकदाच मागं वळून पाहिलंस माझ्याकडं,
एक क्षणभरच थांबलीस, हसलीस…
आणि मग उलगडत गेलीस
तुझी ती गर्द निळी-जांभळी ओढणी,
आणि अंथरलीस त्या भगभगत्या आकाशावर.
तुझ्या केसांमधल्या त्रिकोणी-चौकोनी क्लिप्सनी
डकवून टाकलास तो निळा-जांभळा पडदा.
मी सुखावल्या डोळ्यांनी बघत राहिलो
एका रुक्ष दिवसाची मनोहर रात्र होताना.
परत येण्याआधी तू पुन्हा एकदा
हात फिरवलास त्या पडद्यावर,
आणि मी माझ्या या डोळ्यांनी पाहिली
त्या त्रिकोणी-चौकोनी चांदण्यांची थरथर.
तू येऊन बसलीस समोरच्या खुर्चीत,
जणू काही घडलंच नाही अशा थाटात.
मी मात्र बघत राहिलो आकाशात
लुकलुकणार्या तुझ्या टिकलीच्या चंद्राकडे…
पुडीतली साखर कपात ओतताना
मी पुन्हा हसलो…
तू पुन्हा विचारलंस, ‘का हसलास ?’
कसं सांगू तुला ? आणि काय सांगू ?
शेवटी तूच म्हणालीस मोकळ्या केसांतून हात फिरवीत,
‘आज अंधार फार लवकर झाला, नाही का?’
- अक्षर्मन
अंधार...
Saturday, September 29, 2018
प्रेमाचा गुलकंद
प्रेमाचा गुलकंद
- कवी केशवकुमार
-बागेतुनि वा बाजारातुनि कुठुनि तरी ‘त्या’ने
गुलाबपुष्पे आणुनि द्यावित ‘तिज’ला नियमाने !
कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते ?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते !
गुलाब कसले ? प्रेमपत्रिका लालगुलाबी त्या !
लाल अक्षरे जणु लिहिलेल्या पाठपोट नुसत्या !
प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने !
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणति नवतरणे !
कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा !
परि न सोडला तिने आपुला कधिही मुग्धपणा !
या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल !
तोहि कशाला प्रगट करी मग मनातले बोल !
अशा त-हेने मास लोटले पुरेपूर सात,
खंड न पडला कधी याच्या नाजुक रतिबात !
अखेर थकला ! ढळली त्याची प्रेमतपश्चर्या,
रंग दिसेना खुलावयाचा तिची शांत चर्या !
धडा मनाचा करुनि शेवटी म्हणे तिला, “देवी !
(दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी.)
“बांधित आलो पूजा मी तुज आजवरी रोज !
तरि न उमगशी अजुनि कसे तू भक्ताचे काज ?
गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग तरी सुंदरी, फुकट का ते सगळे गेले ?”
तोच ओरडुनि त्यास म्हणे ती, “आळ वृथा हा की !
एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी !”
असे बोलुनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउनि ये बाहेरी कसलीशी बरणी !
म्हणे, “पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद,
आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद !
कशास डोळे असे फिरविता का आली भोंड ?
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड !”
क्षणैक दिसले तारांगण त्या, -परी शांत झाला !
तसाच बरणी आणि घेउनी खांद्यावरि आला !!
“प्रेमापायी भरला” बोले, “भुर्दंड न थोडा !
प्रेमलाभ नच ! गुलकंद तरी कशास हा दवडा ?”
याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला,
हृदय थांबुनी कधीच नातरि तो असता ‘खपला’ !
तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेमनिराशेने
‘प्रेमाचा गुलकंद’ तयांनी चाटुनि हा बघणे !
प्रेमाचा गुलकंद
Labels:
आचार्य अत्रे,
झेंडुची फुले,
मराठी,
विनोद,
संग्रह
Tuesday, September 25, 2018
त्रास मजला फार झाला... (हजल)
हजल
(मंदार शिंदे ९८२२४०१२४६)
त्रास मजला फार झाला, कालच्या ट्रॅफीकचा
हात माझा गियर झाला, पाय झाला ब्रेकचा
भंग करण्या तपश्चर्या, येती न आता अप्सरा
जन्म झाला त्याचसाठी, पादणार्या बुलेटचा
पाळुनी वन-वे नि सिग्नल, पोहोचलो दारी तिच्या
पावती फाडूनी तोवर, जिंकला बाहेरचा
ती म्हणाली दे मला, तोहफा तू मोठा कीमती
आणला मी कॅन पंपा-वरुन मग पेट्रोलचा
उत्सवाच्या मांडवांतून, पार्कींगला जागा नसे
म्हणुनी उंदरावरुनी येतो, गणपती तो पेणचा
मुंबईवर प्रेम करतो, तरीही ना सोडी पुणे
ओळखावे त्यास आहे, त्रास लोकल ट्रेनचा
ती म्हणाली, बाळ बिल्डर होणार नक्की आमुचा
नाद आत्ता त्यास खोट्या, डंपर आणि क्रेनचा
त्रास मजला फार झाला, कालच्या ट्रॅफीकचा
हात माझा गियर झाला, पाय झाला ब्रेकचा
- अक्षर्मन
त्रास मजला फार झाला... (हजल)
Saturday, September 22, 2018
अमर आणि समर
चला गोष्ट सांगूया...
🙂😌☺😊😀😃😄😁
अमर आणि समर
(लेखकः मंदार शिंदे 9822401246)
एका देशामध्ये दोन राज्यं होती, गुहागर आणि मीठागर त्यांची नावं होती. गुहागरात होत्या मोठ्या-मोठ्या गुहा. आणि मीठागरात होत्या बरण्याच बरण्या. गुहागरचा राजा होता अमर. मीठागरचा राजा होता समर.
पुढची गोष्ट वाचा अमेझॉन किंडलवर -
जेशूची गोष्ट व इतर: Stories in Verse
(Marathi Edition) by Mandar Shinde
✒✒✒🙏🙏🙏
अमर आणि समर
Labels:
कथा,
बालसाहित्य,
मराठी,
विनोद
Thursday, September 20, 2018
गद्य आणि पद्य
गद्य आणि पद्याचा विचार करताना मला पडलेले काही प्रश्नः
प्रिंटींगची सोय निर्माण होण्यापूर्वीचं सर्व साहित्य पद्य स्वरुपातच का आहे? त्यावेळी लोकांनी गद्य साहित्यनिर्मिती केलीच नसेल का?
शेकडो अभंग रचणार्या तुकोबांनी आयुष्यात एकही लघुनिबंध किंवा कथा रचली नसेल का?
हजारो ओव्या रचणार्या माऊलींना एखादा ललित लेख लिहावासा नसेल का वाटला?
हजारो श्लोक रचणार्या समर्थांनी एखादं गद्य 'मॅनेजमेंट मॅन्युअल'/मार्गदर्शक पुस्तिका का नसेल लिहिली?
शेकडो दोहे रचणार्या कबीराला एखादं 'सेल्फ-हेल्प बुक' लिहावंसं का नसेल वाटलं?
रामायण, महाभारत, भगवद्गीता ही महाकाव्यं का आहेत, महाकादंबर्या का नाहीत?
पारंपारिक भजन, कीर्तन, आरत्या, भारुड, ओव्या, हे सगळं पद्य स्वरुपातच का आहे? पारंपारिक गद्याची उदाहरणं कोणती?
मला असं वाटतं की, प्रिंटींगची सोय नसताना मौखिक स्वरुपातच साहित्य साठवणं व हस्तांतरित करणं भाग होतं. लयबद्धता, यमकं, वृत्तबद्धता, गेयता, मोजक्या नि नेमक्या शब्दांचा वापर या गुणधर्मांमुळंच पद्य साहित्य मुखोद्गत होऊन टिकून राहिलं असावं. याउलट, गद्य साहित्य मात्र काळाच्या ओघात नाहीसं झालं असावं.
प्रिंटींगची सोय झाल्यानंतर गद्य साहित्य वरचेवर संदर्भासाठी किंवा पुनर्वाचनासाठी उपलब्ध होऊ लागलं, त्यामुळं तिथून पुढं ते टिकून राहिलं असावं.
पण आजही लहान मुलांचं शिक्षण बडबडगीतं, गाणी किंवा पद्यरुप गोष्टींपासून सुरु होतं. मूल स्वतः वाचू व समजू लागलं की गद्य धडे सुरु होतात. यामागंही वरील कारणंच असावीत असं वाटतं.
कथा, कादंबरी, कविता अशा साहित्यप्रकारांची सरसकट तुलना करता येणार नाही, हे मान्यच. तरीही, आकलन, स्मरण, पुनर्निर्माण या मुद्यांवर पद्य नक्कीच गद्यापेक्षा जास्त सोयीस्कर आणि परिणामकारक ठरतं, हे नक्की!
तुम्हाला काय वाटतं?
- मंदार शिंदे 9822401246
गद्य आणि पद्य
Subscribe to:
Comments (Atom)


