ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, August 17, 2010

उलझन

सर से पाँव तक अपनी ही उलझनों में हूँ उलझा
और दिल पूछता है दुनिया की उलझनों का क्या?

वक्त इतना नहीं के देखूँ खुद को आईने में
और वो पूछते है मेरे साज-सिंगार का क्या?

निकला जो घर से तो कुछ भी जाना-पहचाना नहीं
और रास्ता पूछता है मेरी खोयी मंझिलों का क्या?

तोड आया हूँ रिश्ता खुशियों से अपना
और ग़म पूछता है मेरे रिश्तेदारों का क्या?

एक पल पीछे मुडकर देखा तो ये हाल है
और वक्त पूछता है पीछे देखकर चलनेवालों का क्या?

Share/Bookmark

Monday, August 2, 2010

Go Fight

English version of Marathi poem 'Kanaa' (by Kusumagraj)

“Sir, this is me,” called in the stranger
Rains had ruined his clothes and hair.

Sat for a moment, then said with a smile,
“River Goddess visited us, stayed for a while.

Looking joyful, she danced in and out
But for my wife, everything was wiped out.

Walls sank and the kitchen is in ruins
Tears in my eyes, is her gift that now shines.

With wife on my side, I'm planning to fight back, Sir
Building back the walls, removing mud and mire.”

Looking at my hand in pocket, rose to his feet
“Don't need money, Sir, was feeling lonely a bit -

Hearth is broken, but backbone's still upright
You just pat my back and say, GO FIGHT!”


Share/Bookmark

Monday, July 26, 2010

बादल के दिल से...



न आऊँ तो कहते हो, कब आओगे
अब के बार थान ली है, जाऊंगा ही नही...

Share/Bookmark

Saturday, July 24, 2010

अजून काही घडलेचि ना


संपले सारे, कधी वाटे माझिया मना
बरसून गेले क्षण, मागे रित्या भावना,
मग वाटे, विसरुन जाऊ जे जे घडले
तत्क्षणी उमजे, अजून काही घडलेचि ना.

Share/Bookmark

Saturday, July 3, 2010

ओळख

ना ओळख अपुली कुठली, ना ही मैत्री
न बघताच पटे तुला, कशी ही खात्री,
एक वार नजर फिरवून, बघ तरी इकडे
निघेल कुठलीशी ओळख किंवा, गतजन्मीची मैत्री.

Share/Bookmark

Sunday, June 20, 2010

कोहिनूर तो हरपुनी गेला...


ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्राज तथा वि. वा. शिरवाडकर यांना श्रद्धांजली -
दै
. केसरी, २० मार्च १९९९






कुसुमाग्रज गेले. मराठी साहित्याच्या अवकाशातील एक तारा निखळला. पण इतर अनेक तार्‍यांपैकी एक, यापेक्षा काही वेगळे अस्तित्व या तार्‍याचे होते. आपले स्वतःचे सौरमंडल निर्माण करुन सार्‍या ब्रह्मांडाला आपल्याभोवती फिरायला लावणार्‍या सूर्याचे तेज या महामानवाकडे होते.

"सात रंगांची मैफल वाहे येथे हवेतून;
येथे मरणही नाचे मोरपिसारा लेवून"

असा एक उल्हासदायी आनंदलोक निर्माण करताना विश्वामित्रांचाच उत्साह त्यांच्यात सामावत असे. इहलोकाच्या दुःखी, निराश सृष्टीला आव्हान देणारी एक प्रबळ, हसरी प्रतिसृष्टी त्यांनी उभी केली. आपल्या लेखणीच्या जोरावर त्यांनी अनेक वादळे शमविली. अनेक निराशेचे डोंगर पचविले आणि साहित्य रसिकांसमोर सारे जीवन उलगडून सादर केले. जीवनाची मजा कशी लुटायची असते, मरणाला कसे सामोरे जायचे असते, प्रेम कसे नि कुणावर करायचे असते, निराशा कशी टाळायची असते, आशा कशी जपायची असते, अशी अनेक प्रकारची शिकवणूक त्यांनी आपल्या साहित्यातून आपल्याला दिली. असा एक दिलदार मार्गदर्शक गेल्याचे दुःख सहन करण्यापलीकडचे आहे. कुसुमाग्रजांनी दाखवलेला मार्ग जपण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे. सूर्य बुडाला तरी, जाता जाता आपले तेज तो चंद्राजवळ देऊन जातो. त्याचप्रमाणे आपल्याला ही साहित्य-ज्योत तेवत ठेवायची आहे. कुसुमाग्रजांची महानता शब्दांत कैद करण्यापलीकडची आहे. त्यांची स्मृती जागवणे हे म्हणूनच तर अवघड काम आहे.

"अखेर मी कोण स्मृती जागवणारा?
स्मृतीच मला जगवतात.
अखेर मी कोण शब्द जपणारा?
शब्दच मला जपतात."

Share/Bookmark

ती आणि मी

मज पटते ना कधी, अश्रू ढाळायला
ती म्हणते हृदय लागते, रडू यायला,
विचारते ती पाहतोस कोणा, स्वप्नांमध्ये
मी म्हणतो त्यासाठी झोप, लागते यायला.

Share/Bookmark