ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, June 5, 2021

Learning Loss due to Covid

 

Suggestions to avoid learning loss in Primary Education



  • Conduct a survey of out-of-school and dropout children (along with 6 year old children to be enrolled in the 1st standard) with the help of Anganwadi workers, Aadhaar data, birth records with the local administration, etc. Ensure all children are covered for education in the next academic year, irrespective of reopening of schools.

 

  • Ensure delivery of textbooks to all children across the state within the month of June. Get help from the Indian Post or private logistics partners.

 

  • Distribute workbooks to students across the state and ensure periodic distribution and collection of completed workbooks so that the teachers will have written records of learning assessment of the children, which can further be used for annual evaluation.

 

  • The District Institute of Education Training (DIET) Pune has launched a Learning Loss Recovery Programme (LLRP). Ensure quick and effective implementation of this programme across the state.

 

  • The LLRP provides guidelines for the teachers and parents to continue education of the children in case the schools do not reopen or partially reopen in the next academic year. The programme suggests involving educated parents and community youth as volunteers to support the parents in educating their children. Local NGOs can be involved in training and coordinating with the volunteers for conducting educational activities for the children in the communities. However, the government should seriously think of paying these volunteers instead of expecting charity at community level.

 

  • Check the option of setting up Satellite Centres in the communities, where 10 to 15 students can gather to use internet connection, computers, tablets, books, and other teaching learning material for online and offline education. These Satellite Centres can be connected to the nearby Government schools. The teachers can periodically visit these centres for guidance and evaluation. Community volunteers and/or facilitators among the parents can conduct a few activities here according to the schedule prepared and declared by the school.

 

  • We have used BALA - Building As a Learning Aid concept to enhance the learning process of the child. Can we develop a similar concept CALA - Community As a Learning Aid, where public properties, walls, temples, parks, buses, etc. can be used for the purpose of learning?

 

  • Ensure implementation of the mid-day meal programme for all the children irrespective of reopening of the schools in the next academic year.



Submitted by: Mandar Shinde

Convener, Action for the Rights of the Child (ARC) Pune

Mobile: 9822401246

Email: shindemandar@yahoo.com

Website: https://childrightspune.blogspot.com

Date: 04/06/2021











Share/Bookmark

Thursday, June 3, 2021

Campaign Against Child Labour - Sakal News

काम नको, शिक्षण हवे! बालमजुरीतून बाहेर पडलेल्या मुलांनी व्यक्त केली भावना
सकाळ वृत्तसेवा | Jun 3, 2021

लहान मुलांना घरी सुरक्षित वातावरण मिळणे गरजेचे आहे. कुटुंबासाठी पैसे कमावण्याची वेळ त्यांच्यावर येवू नये. बालमजुरीची व्याख्या तसेच धोकादायक आणि अ-धोकादायक व्यवसायाबद्दल अधिक स्पष्टता आणावी. यापुढे आम्हाला श्रम नको, शिक्षण हवे आहे, अशी आस बालमजुरीतून बाहेर पडलेल्या मुलांनी व्यक्त केली.

जागतिक बालमजुरी विरोधी दिनाच्या निमित्ताने बालमजुरी विरोधी अभियानाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे राज्यस्तरीय ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असणाऱ्या मुलांनी या परिसंवादामध्ये सहभागी होऊन आपल्या समस्या मांडल्या. तसेच बालमजुरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. सहभागी मुला-मुलींपैकी बहुतेकजण यापूर्वी किंवा सध्या शेती, वीटभट्टी, भाजी विक्री, घरकाम, तसेच कचरावेचक अशा कामांमध्ये गुंतलेले होते किंवा आहेत.

राज्यभरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पालक आणि मुलांनी या परिसंवादामध्ये सहभाग घेतला. बालमजुरी विरोधी अभियानाच्या राज्य संयोजक एलिशिया तौरो यांनी अशा परिसंवादाच्या माध्यमातून मुलांना आपली मते आणि मागण्या मांडण्याची संधी देण्याची गरज व्यक्त केली. मंदार शिंदे यांनी सहभागी मुलांच्या सत्राचे सूत्रसंचालन केले. तर आरोकिया मेरी यांनी मुलांच्या तसेच बालमजुरी विरोधी अभियानाच्या मागण्यांची यादी सादर केली. पूर्व राज्य संयोजक मनीष श्रॉफ यांनी आभार प्रदर्शन केले.

परिसंवादात मांडलेले मुद्दे...

  • दारूची दुकाने बंद करावीत, जेणेकरून मुलांना घरी सुरक्षित वातावरण मिळू शकेल
  • कुटुंबासाठी पैसे कमावण्याची वेळ मुलांवर येऊ नये
  • बालमजुरीची व्याख्या तसेच धोकादायक आणि अ-धोकादायक व्यवसायाबद्दल अधिक स्पष्टता आणावी
  • आई-वडील कामासाठी घरापासून दूर असताना मुलांना वस्तीत संगोपन केंद्र आणि पाळणाघरांची व्यवस्था करावी
  • कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना आर्थिक साहाय्य आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात
  • तसे झाल्यास मुलांना काम करण्याऐवजी शिक्षण सुरू ठेवता येईल
  • स्थानिक पातळीवरील सर्व बाल हक्क यंत्रणा कार्यान्वित कराव्यात
  • शिक्षणाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करावी

(Click on image to read)


https://www.esakal.com/pune/no-work-want-education-emotions-expressed-by-children-out-of-child-labor



Share/Bookmark

Monday, May 31, 2021

Campaign Against Child Labour - Lokmat News

दारूची दुकाने बंद करा; जेणेकरून मुलांना घरी सुरक्षित वातावरण मिळेल
लोकमत न्यूज नेटवर्क | May 31, 2021

दारूची दुकाने बंद करावीत, जेणेकरून मुलांना घरी सुरक्षित वातावरण मिळू शकेल आणि कुटुंबासाठी पैसे कमावण्याची गरज पडणार नाही. बालमजुरीची व्याख्या तसेच धोकादायक आणि अ-धोकादायक व्यवसायांबद्दल अधिक स्पष्टता आणावी. या संकल्पनांमधील अस्पष्टतेमुळे मुलांच्या शोषणास वाव मिळतो. शिक्षणाच्या महत्त्वाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी; विशेषत: पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे, अशा विविध मागण्या शेती, वीटभट्टी, भाजीविक्री, घरकाम, तसेच कचरावेचक अशा कामांमध्ये गुंतलेल्या मुलांनी मांडल्या.

जागतिक बालमजुरी विरोधी दिनाच्या निमित्ताने बालमजुरीविरोधी अभियानाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे शुक्रवारी (दि. २८) राज्यस्तरीय आॅनलाईन परिसंवाद झाला. गाव/वस्ती आणि शाळा पातळीवरील बालपंचायत इत्यादी कार्यान्वित कराव्यात. आई-वडील कामासाठी घरापासून दूर असताना मुलांना सुरक्षित वातावरण देणाऱ्या वस्तीपातळीवरील सेंटर्स आणि पाळणाघरांची व्यवस्था करावी. अशी सेंटर्स मुलांना आॅनलाइ‌न शिक्षणासाठी देखील उपयोगी पडू शकतील. कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना आर्थिक साहाय्य आणि उपजीविकेच्या जास्त संधी उपलब्ध करून द्याव्यात, ज्यामुळे मुलांना काम करण्याऐवजी आपले शिक्षण सुरू ठेवता येईल, अशा मागण्यांमधून बालमजुरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून मुलांनी अपेक्षा व्यक्त केल्या.

बालमजुरी विरोधी अभियानाच्या राज्य संयोजक एलिशिया तौरो यांनी अशा परिसंवादाच्या माध्यमातून मुलांना आपली मते आणि मागण्या मांडण्याची संधी देण्याची गरज व्यक्त केली. मंदार शिंदे यांनी सहभागी मुलांच्या सत्राचे सूत्रसंचालन केले, तर आरोकिया मेरी यांनी मुलांच्या तसेच बालमजुरी विरोधी अभियानाच्या मागण्यांची यादी सादर केली. पूर्व राज्य संयोजक मनीष श्रॉफ यांनी आभार मानले. या राज्यस्तरीय परिसंवादांमध्ये सादर करण्यात आलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने १० जून रोजी एका राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन बालमजुरी विरोधी अभियानातर्फे करण्यात येणार आहे.

(Click on image to read)


https://www.lokmat.com/pune/close-liquor-stores-so-children-have-safe-environment-home-a684



Share/Bookmark

Sunday, April 25, 2021

Education in Corona Times

 

(Click on the image to read)

शैक्षणिक नियोजन
- मंदार शिंदे
(महाराष्ट्र टाइम्स, २५ एप्रिल २०२१)

यंदाही शाळा वेळेवर, म्हणजे १५ जूनला, सुरू होणार नाहीत असे गृहीत धरून आत्ताच नियोजन करावे लागेल. त्या दृष्टीने खालील मुद्द्यांवर विचार, चर्चा, आणि कृती व्हावी.

(१) पुढील इयत्तांची पटनोंदणी कशी करावी याचे नियोजन करावे लागेल. पुढे आलेल्या मुलांची नावे शाळेकडे आहेतच; परंतु शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात सापडलेली मुले, करोना काळात पालकांसोबत स्थलांतर होऊन गेलेली किंवा आलेली मुले, वयानुरुप पहिल्या इयत्तेमध्ये प्रवेश घेणारी मुले, यांना विचारात घेऊन पटनोंदणीचे नियोजन करावे. त्यासाठी शाळेतील शिक्षकांनी गृहभेटी कराव्यात का? शक्य असेल तिथे, पालकांशी फोनवरून संपर्क साधता येईल का? मुलांची माहिती मिळवण्यासाठी शासनाच्या इतर विभागांची मदत घेता येईल का? उदाहरणार्थ, जन्म-मृत्यू नोंदी, अंगणवाडी, रेशनिंग आणि आधार डेटा, इत्यादी. या पर्यायांची चाचपणी व्हावी.

(२) चालू शैक्षणिक वर्षात राज्य मंडळाने आणि शिक्षकांनी पाठ्यपुस्तके मुलांपर्यंत पोहोचवली. मुलांना शाळेत येणे शक्य नसेल अशा ठिकाणी ती घरपोच केली. आता पाठ्यपुस्तके मुलांपर्यंत कशी पोहोचवता येतील? यावेळी पूर्वनियोजन आणि इतर शासकीय विभाग (उदाहरणार्थ, पोस्ट खाते) यांच्या माध्यमातून जलद आणि खात्रीशीर वितरण करता येईल का?

(३) पुढील वर्षी मुले प्रत्यक्ष शाळेत येण्याचे प्रमाण कमी राहील, असे गृहीत धरून, पालक आणि/किंवा गाव-वस्ती पातळीवर शिक्षण सहायक किंवा स्वयंसेवक यांची निवड व सक्षमीकरण असा कार्यक्रम राबवता येईल का? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात 'पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान' यासंबंधी वस्ती पातळीवरील साक्षर स्वयंसेवकांचा सहभाग घ्यायचे सुचवले आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये शिक्षकांसाठी सूचना असतात तशा पालक/स्वयंसेवक यांच्यासाठी सूचना (सुलभकाच्या भूमिकेतून) समाविष्ट करता येतील का? स्वयंसेवकांकडून विना-मोबदला कामाची अपेक्षा करण्याऐवजी, वस्तीमधील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना अर्धवेळ रोजगाराची संधी देता येईल का?

(४) वस्तीपातळीवर आठ-दहा-पंधरा मुले एकत्र येऊन काही कृती करू शकतील अशी उपकेंद्रे (सॅटेलाईट सेंटर) सुरू करता येतील का? अशा ठिकाणी इंटरनेट कनेक्शन, कॉम्प्युटर, स्क्रीन, पुस्तके, अशी काही साधने शाळेमार्फत उपलब्ध झाल्यास ऑनलाईन शिक्षणाची व्याप्ती व परिणाम वाढेल. अशा उपकेंद्रांवर शिक्षकांनी ठराविक दिवशी काही उपक्रम राबवावेत, मूल्यमापन करावे. इतर दिवशी सुलभक (फॅसिलिटेटर) यांच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवता येईल. विशेषतः वस्तीमधील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक/स्वयंसेवक यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाची सोय अशा सॅटेलाईट सेंटरवर करता येईल.

(५) चालू शैक्षणिक वर्षात काही शिक्षक आणि स्वयंसेवी संस्थांनी राबवलेला प्रत्यक्ष कार्यपत्रिकेचा (ऑफलाईन वर्कशीटचा) प्रयोग अभ्यासून सर्वत्र राबवता येईल का? वर्कशीटमुळे मुलांचे ऑनलाईन अवलंबन कमी होऊ शकेल, तसेच विद्यार्थ्यांकडून वर्षभर लेखी स्वरूपात साहित्य जमा होत गेल्याने मूल्यमापनासाठी शिक्षकांना मदत होईल. वर्कशीटचे वितरण, संकलन यासाठी आतापासून नियोजन करता येईल का? पोस्ट किंवा खाजगी कुरियर कंपन्या, अमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांचे जाळे वापरता येईल का?

(६) यंदा सगळे उपक्रम, मैदानी खेळ व कला विषयांकडे पुरेसे लक्ष देता आले नाही. पुढील वर्षामध्ये या गोष्टी कशा राबवणार याचे पर्यायी नियोजन करता येईल का? शाळा आणि शिक्षक यांच्याशिवाय शासकीय आणि सामाजिक घटकांचा वापर करून घेता येईल? स्थानिक उद्याने आणि खेळाची मैदाने, खाजगी क्रीडा प्रशिक्षण संस्था, यांच्याशी समन्वय साधून मुलांना सुरक्षित आणि नियमित सुविधा देता येतील का?

(७) मार्च २०२२ मध्येही दहावी-बारावीची सार्वत्रिक परीक्षा घेता येणार नाही असे गृहीत धरून नियोजन करता येईल का? यासाठी राज्य मंडळाकडून तिमाही मूल्यमापनाचे प्रश्नसंच देता येतील का? बोर्डाकडून हे प्रश्नसंच शाळांना नियमितपणे पाठवले, तर विद्यार्थी शाळेत जाऊन, सोशल डिस्टन्सिंग पाळून, तिमाही परीक्षा देऊ शकतील आणि शाळेतून एकत्रितपणे उत्तरपत्रिका बोर्डाकडे पाठवण्याची सोय करता येईल. अर्थात, यासाठी शाळा किंवा सॅटेलाईट सेंटरद्वारे पुरेसे मार्गदर्शन प्राप्त व्हायला हवे.

परीक्षा हवी की नको, सरसकट पुढील वर्गात प्रवेश द्यावा की नाही, या विषयावरील चर्चा आता थांबवून, पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन करावे. यात शिक्षणाच्या नवीन माध्यमांचा विचार प्रामुख्याने व्हावा. उदाहरणार्थ, 'बिल्डींग ऐज अ लर्निंग एड' या 'बाला' संकल्पनेच्या धर्तीवर 'कम्युनिटी ऐज अ लर्निंग एड' अशा ('काला'?) संकल्पनेवर काम करता येईल का? फक्त पाठ्यपुस्तकातूनच नव्हे, तर शाळेची इमारत, परिसर, वस्तू, यांच्या माध्यमातून मुले काहीतरी शिकू शकतील अशा प्रकारे शाळेच्या भिंती आणि परिसर रंगवण्यात आले, मजकूर नोंदवण्यात आला. आता मुले वस्तीमध्येच राहणार असतील तर, सार्वजनिक भिंती, शासकीय इमारती, मंदिरे, उद्याने, झाडे, बसेस, रिक्षा, अशा सर्व ठिकाणी मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने काही मजकूर/साहित्य उपलब्ध करता येईल का? घंटागाडी आणि प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रिक्षा, तसेच धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपक यंत्रणेचा मुलांच्या शिक्षणासाठी वापर करता येईल का?

वरील सर्व सूचना वैयक्तिक अनुभव आणि विचारातून मांडलेल्या आहेत. तज्ज्ञ, अनुभवी, आणि अधिकारी व्यक्तींनी योग्य तो बदल, चर्चा, कार्यवाही करावी. करोनावर नियंत्रण प्राप्त होऊन परिस्थिती पूर्ववत झाली तर चांगलेच आहे, पण तसे न झाल्यास, आणखी एक वर्ष (किंवा पुढील काही वर्षे) मुलांच्या शिक्षणाचा बळी जाऊ नये!

(लेखक पुण्यातील बालहक्क कृती समितीचे संयोजक आहेत.)

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/parents-discussion-on-what-changes-are-expected-in-the-teaching-method-due-to-covid-19-situation/amp_articleshow/82241330.cms



Share/Bookmark

Wednesday, March 10, 2021

Story - Pink Elephant

 

गुलाबी हत्ती

(लेखक - मंदार शिंदे)


खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका दूरवरच्या देशात एक जंगल होतं. हिरवीगार झाडं, पाणी निळं-निळं; हवा होती स्वच्छ आणि आकाश होतं मोकळं. उंदीर आणि सशापासून वाघ-सिंहांपर्यंत खूप खूप प्राणीसुद्धा होते. माकडं होती, जिराफ होते, साप आणि अस्वल होते. आकाशामध्ये उंच उडणारे घार आणि गरूड होते. चिमणी होती, पोपट होते, पाण्यामध्ये बदक होते. पण या सगळ्यांपेक्षा वेगळे तिथं शेकडो भव्य हत्ती होते.


हत्तींचा जंगलात दरारा होता; जंगलाच्या सीमेवर त्यांचा पहारा होता. बाकीच्या प्राण्यांमध्ये मिसळत नव्हते; हत्ती स्वतःच्याच मस्तीत जगत होते. एक तर हत्तींचा आकार होता मोठा, त्यातून एकत्रच फिरायचा त्यांचा रिवाज देखील होता. भले-थोरले हत्ती जेव्हा धूळ उडवत फिरायचे, बाकीचे प्राणी झाडा-झुडपात हळूच लपून बसायचे. तसा त्यांनी मुद्दाम कुणाला त्रास नसेल दिला; पण बाकीचे म्हणायचे, उगाच कशाला हत्तींच्या नादाला लागा? चालता-चालता चुकून त्यांच्या पायाखाली यायचो, चेंदामेंदा होऊन आपण उगीचच मरून जायचो. त्यापेक्षा आपण आपले बाजूलाच बरे; झाडावरून, झुडपामधून बघत राहू सारे.


या जंगलातल्या हत्तींची एक खासियत होती. नेहमीच्या हत्तींपेक्षा त्यांची वेगळी ओळख होती. नेहमीचे हत्ती कसे काळे-करडे दिसतात; लठ्ठ आणि बेढब अंग सांभाळत फिरतात. या जंगलातले हत्ती मात्र फक्त काळे नव्हते; हत्ती आणि हत्तीणींचे दोन रंग होते. पुरुष हत्ती काळे-करडे होते दिसायला; पण हत्तीणींचा कळप होता गुलाबी रंगाचा. छोट्या-मोठ्या हत्तीणी गुलाबी रंगाच्या; रंगावर स्वतःच्या त्या खूपच खूष दिसायच्या. पुरुषांपेक्षा वेगळ्या आहोत आपण दिसायला; कित्ती कित्ती झटायच्या हा रंग टिकवायला.


जंगलाच्या मधोमध एक मोठ्ठं कुंपण होतं; हत्तीणींच्या कळपाचं तेवढंच जग होतं. पुरुष हत्ती जंगलभर हुंदडत फिरून यायचे; हत्तीणींचे कळप मात्र कुंपणामध्येच रहायचे. कुंपणाच्या आतमध्ये छोटी-छोटी झाडं होती; एक छोटं तळं आणि हत्तीणींची दाटी होती. पुरुष हत्ती खात फिरायचे गवत हिरवं-हिरवं; झाडावरून तोडून घ्यायचे रसरशीत फळं. हत्तीणींना असलं काही खायची बंदी होती; त्यांच्यासाठी कुंपणाच्या आत खायची सोय होती. गुलाबाची रोपं होती कुंपणाच्या आत पसरलेली; तळ्यामध्ये कमळंसुद्धा गुलाबीच उमललेली. गुलाबी फुलं खाऊनच त्यांचा रंग गुलाबी झाला होता; तोच रंग टिकवायला डाएट प्लॅन ठरला होता.


“कमी खा, जाड होशील!”


“गुलाबी खा, गुलाबी राहशील!”


“हत्तीसारखी चालू नको, पाय नीट टाक!”


“हत्तीण आहेस, हत्ती नाही, लक्षात ठेवून वाग!”


मोठ्या हत्तीणी लहान हत्तीणींना व्यवस्थित शिकवत होत्या; काय करायचं, काय नाही, सतत त्यांना ऐकवत होत्या. पुरुष हत्ती कुंपणाभोवती फेर धरून नाचायचे; जगभरचं शहाणपण हत्तीणींना शिकवायचे.


“हत्तीण कशी नाजूक हवी!”


“सुंदर आणि साजूक हवी!”


“कुंपणाच्या आत तुझं खरं जग आहे!”


“छान गुलाबी दिसण्यासाठीच तुझा जन्म आहे!”


पुरुष हत्ती सांगायचे मग जंगलातल्या गमती-जमती; प्राणी पक्षी फुलं झाडं केवढी अवती-भवती. पण बाहेर जावं वाटलं कधी एखाद्या हत्तीणीला; खूप वाईट आहे जग, सांगायचे सगळे तिला. बागडणाऱ्या काळ्या-करड्या हत्तींकडे बघत, हत्तीणी बिचाऱ्या दिवस काढायच्या गुलाबाची फुलं हुंगत. तीच फुलं खायच्या आणि कानांमागं खोचायच्या; त्याच फुलांच्या माळा करून गळ्यामध्ये घालायच्या. गुलाबी अंगावर गुलाबी फुलं दिसायची तशी शोभून; पण कंटाळा यायचा एकच रंग आयुष्यभर बघून. एकमेकींच्या रंगांची मग तुलना करत बसायच्या; माझाच रंग खरा गुलाबी, भांडणसुद्धा करायच्या. जिचा रंग कमी गुलाबी, तिला टोमणे मारायच्या; हिरवं गवत खाल्लं असशील म्हणून तिला चिडवायच्या.


अशीच एक छोटुशी हत्तीण होती मधु; गुबगुबीत गोंडस मधु पळायची दुडुदुडु. कुंपणाच्या आत बागडायची, तळ्यामध्ये डुंबायची; आईची नजर चोरून हळूच हिरवं गवत चरायची. आईच्या जीवाला घोर मोठ्ठा मधुमुळं लागला; जन्मापासून रंग तिचा काळाच होता राहिला. गुलाबी रंग आणायला आई कित्ती प्रयत्न करायची; ताजे टवटवीत गुलाब रोज वेचून-वेचून आणायची. मधुसाठी बनवायची ती गुलाब घालून गुलाबजाम; गुलकंद आणि गुलाब शेकचा रतीब सकाळ-संध्याकाळ. गुलाबाची बनवून पोळी मधुबाळाला चारायची; झोपताना पण गुलाबाचीच फुलं खाली अंथरायची. एवढं करून रंग मधुचा गुलाबी नाही झाला; गुलाबांचा फ्रॉकच मग आईनं शिवून घेतला. मधुच्या रंगाची कुंपणामध्ये चर्चा मोठी रंगली; खूप वर्षांनी वेगळी मुलगी कळपामध्ये दिसली.


लहानपणी मधुला याची गंमतच वाटायची; आपल्याबद्दल बोलतात सगळे भारीच गोष्ट वाटायची. पण हळूहळू कळू लागलं तिला खोचक बोलणं; सगळ्यांमधून बाजूला काढणं आणि सारखे टोमणे मारणं.


“काय तिचा रंग, काय तिचं अंग!”


“असली कसली हत्तीण, हत्तीसारखी दबंग?”


“शोभत नाही आपल्यात, काढा तिला बाहेर!”


“आमच्या मुली बिघडतील ना, बघून तिचे थेर!”


आई मधुची हताश व्हायची, ऐकून सगळा कल्ला; मधु मात्र वागत राहिली एकदम खुल्लमखुल्ला. गुलाबांचा फ्रॉक तिनं केव्हाच फाडून टाकला, गुलकंदाचा जारसुद्धा खळ्ळ फोडून टाकला. बोलणाऱ्यांनो बोलत रहा, मला फरक नाही पडत; तोंडावरच सुनावून ती मस्त चरत सुटायची गवत. माझा रंग माझं अंग मला आवडतं खूप; तुमच्या डोळ्यात खुपतंय तर डोळे मिटून घ्या निमूट.


आता मात्र हद्द झाली, सगळ्याजणी भडकल्या; त्या दिवशी गुलाबी नाही, लालच दिसू लागल्या. डोळ्यांमध्ये पेटली आग, कानांमधून निघाला धूर; मधुच्या आईला हुकूम केला, मुलीला कुठंतरी पाठवा दूर. आमच्या समोर नका ठेवू असलं कुरूप ध्यान; आमचा नाही निदान आमच्या रंगाचा ठेवा मान. आई बिचारी रडली आणि मधुला भरला दम; गुलाबी होऊन दाखव नाहीतर सोडून जा हे कुंपण.


आईची परवानगी मिळताच मधु खूप-खूप खूष झाली; गुलाबी पिंजरा तोडून एका मिनिटात धूम पळाली. सगळ्या जणी बघत राहिल्या जिकडं उडाली धूळ; नंतर गेल्या विसरून मधुचं जगावेगळं खूळ. गुलाबाची फुलं पुन्हा-पुन्हा तोडून खात राहिल्या; गुलकंदाच्या बरण्या पुन्हा भरून ठेवू लागल्या. अधून-मधून आईला आठवण मधुबाळाची यायची; पण असली उद्धट मुलगी नकोच, स्वतःची समजूत काढायची. मधुच्या मैत्रिणी विचारत होत्या आपल्या-आपल्या आयांना; कुठं गेली कशी गेली मधु, आम्हाला पण जाऊ द्या ना. गुलाबी हत्तीणी लाल डोळ्यांनी मुलींकडं बघायच्या; मुली बिचाऱ्या कान पाडून गुलाब चघळत बसायच्या.


थोड्याच दिवसांनी मैत्रिणींना पुन्हा दिसली मधु; कुंपणाच्या बाहेर हत्तींबरोबर खेळत होती हुतुतु. नदीवर गेली, डुंबून आली, लोळली मस्त मातीत; झाडावरची फळं तोडून खाल्ली सोंड हलवीत. कुंपणाच्या आतून बघू लागल्या तिच्या साऱ्या मैत्रिणी; आपल्यासारखीच असून मधु दिसते-वागते कशी. हत्तींबरोबर खेळणं-बोलणं आपल्याला कुठं शोभतं; मधु गेली कुंपणाबाहेर, तेच बरं होतं. आपण कशा खूष आहोत, एकमेकींशी बोलल्या; कुंपणामधल्या हत्तीणी त्या खोटं-खोटंच हसल्या.


पण रोज-रोज मधुला बघून मावळलं त्यांचं हसू; आपण कधी करणार मजा, विचार झाला सुरु. थोड्याच दिवसांत हळूच एक हत्तीण पळून गेली; कुंपणाबाहेर मधुसोबत खेळताना दिसू लागली. दुसरी गेली, तिसरी गेली, कळपात उडाली खळबळ; पुरुष हत्ती आणि हत्तीणी घाबरून गेल्या पुष्कळ. नाही धाक, नाही भीती, बंडच उभं राहिलं; हत्ती आणि हत्तीण यातलं अंतर संपू लागलं. बाहेर पडून खाल्लं गवत, खाल्ली फळं ताजी; बघता-बघता उतरू लागला रंग त्यांचा गुलाबी.


सगळेच खूष दिसू लागले, कसलंच नाही बंधन; कुठेही जा, काहीही खा, उरलं नाही कुंपण. हत्ती आणि हत्तीण आता सारखेच दिसायला लागले; एकमेकांशी मोकळे आणि समान वागायला लागले. वेगळेपणाचा हट्ट आणि गळून पडला तोरा; सगळ्या हत्तींचा रंग झाला पाटीसारखा कोरा. तेव्हापासून हत्तींमध्ये समानता झाली सुरु; या सगळ्याला निव्वळ आपली निमित्त झाली मधु!


(अदेला तुरीन, इटली यांच्या १९७६ साली प्रकाशित ‘कॅन्डी पिंक’ कथेवर आधारीत…)


- मंदार शिंदे

9822401246



Share/Bookmark

Wednesday, March 3, 2021

Special Drive for Education in Maharashtra

An Appeal to the parents, citizens, and social organizations…


The Government of Maharashtra has launched a special drive to bring all children up to 18 years of age in the main stream of education. For this, all the primary, secondary, higher secondary school teachers as well as Anganwadi workers are conducting a door-to-door survey to find out children not enrolled in or not attending any Anganwadi, Balwadi, or any kind of school.


If you spot any child between 3 and 18 years of age around you, who should be enrolled in or attending a school, or children living at the construction sites, or on footpaths, or children begging at traffic signals, or children of sugarcane workers and brick kiln workers, then please visit your nearby Corporation school or Zilla Parishad school and report about these children.


Remember, every child never enrolled in a school, or dropped out of school, or temporarily migrated, or left out of school due to recent Covid crisis should also be included in this survey. Efforts to bring these children back to school can be planned accordingly.


Also, a ward-level or village-level committee has been formed under this special drive. As a voluntary organization or as an educationist, you can get involved in the functioning of this committee working under the chairmanship of your local Corporator or Sarpanch.


Let’s come together and help every child get its right to education!



पालक, नागरिक, आणि स्वयंसेवी संस्थांना आवाहन…


१८ वर्षे वयापर्यंतच्या सर्व मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक विशेष मोहिम सुरु केली आहे. अंगणवाडी, बालवाडी, किंवा पहिली ते बारावीपर्यंत शाळेत जाऊ न शकणारी मुले शोधून त्यांना जवळच्या शाळेत दाखल करण्यासाठी ही मोहिम सुरु आहे. यासाठी सर्व शाळांमधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च-माध्यमिक शिक्षक, तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस घरोघरी जाऊन अशा शाळाबाह्य मुलांची माहिती गोळा करीत आहेत.


तुमच्या आजूबाजूला, तुमच्या बघण्यात जर अशी ३ ते १८ वर्षांची मुले असतील, किंवा बांधकाम साईटवर राहणारी, फुटपाथवर राहणारी, रस्त्यावर सिग्नलला भीक मागणारी, ऊसतोडणी किंवा वीटभट्टी मजुरांची मुले किंवा वस्ती तुम्हाला माहिती असतील तर जवळच्या महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्यांची माहिती जरूर कळवा.


लक्षात घ्या, कधीही शाळेत न गेलेली, शाळा अर्धवट सोडलेली, तात्पुरते स्थलांतर झालेली, एवढेच नव्हे तर कोविड परिस्थितीमुळे शाळेत जाऊ न शकलेली मुलेसुद्धा यामध्ये नोंदवली जाणे गरजेचे आहे. त्यानुसार या मुलांना शाळेत दाखल करून घ्यायचे नियोजन करता येईल.


याशिवाय, तुमच्या वॉर्ड अथवा गाव पातळीवर यासाठी स्थानिक नगरसेवक किंवा सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली असेल. त्यामध्ये स्वयंसेवी संस्था किंवा शिक्षणतज्ज्ञ या नात्याने तुम्ही सहभागी होऊ शकता.


शोध दारोदारी । प्रबोधनाची फेरी ।

एक मूल न राही । शाळाबाह्य ॥







Share/Bookmark

Sunday, February 14, 2021

Mahanirvan - The Dread Departure by Satish Alekar

जगावेगळे आख्यान... महानिर्वाण!

कीर्तन, गोंधळ, भजन, अभंग, आणि गाण्याच्या भेंड्या! हा काही टिपिकल नाटकाचा फॉरमॅट नव्हे. सुरुवात-मध्य-शेवट असे घटक असलेली, दोन अंकांमंधे सांगितलेली गोष्ट म्हणजे हे नाटक नव्हे.

पंचेचाळीस वर्षांपूर्वी बसवलेलं हे नाटक आजसुद्धा दिमाखात उभं आहे, नव्हे, नाचतं-झुलतं आहे, प्रेक्षकांना झुलवतं आहे, खुलवतं आहे. यातली पात्रं बोलता-बोलता गाऊ लागतात, गाता-गाता नाचू लागतात, नाचता-नाचता भांडू लागतात, भांडता-भांडता अचानक थांबतात आणि प्रेक्षकांसमोर अशी उत्तरं मांडून जातात ज्यांचे प्रश्न त्यांना नाटकादरम्यान आणि नाटकानंतर सुद्धा छळत राहतात.

गीत-संगीत-संवादांचा जुळून येतो सुरेख त्रिकोण आणि प्रत्येकजण शोधत राहतो 'डावीकडचा तिसरा' कोण?

नचिकेत देवस्थळी, सायली फाटक, सिद्धार्थ महाशब्दे, आणि 'नाटक कंपनी'च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि हे अफलातून नाटक जन्माला घालणाऱ्या सतीश आळेकरांना अभिवादन!

ज्यांनी हे नाटक पूर्वी बघितलेलं नसेल, एकदा बघून समजलेलं नसेल, किंवा पुन्हा-पुन्हा बघायची इच्छा असेल, त्या सगळ्यांनी स्वतःच्या निर्वाणापूर्वी नक्की बघा - 'महानिर्वाण'!

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६





Share/Bookmark