राजा असे राणी असे, अन् असे गुलाम कुणी
कागदांवर राज्य करीती, लाल कुणी काळे कुणी,
मज नसे भ्रम हा, एक्का मोठा की राजा मोठा
पान असेन मी हुकुमाचे, भले म्हणा दुर्री-तिर्री कुणी.

A blog by Mandar Shinde 9822401246
राजा असे राणी असे, अन् असे गुलाम कुणी
कागदांवर राज्य करीती, लाल कुणी काळे कुणी,
मज नसे भ्रम हा, एक्का मोठा की राजा मोठा
पान असेन मी हुकुमाचे, भले म्हणा दुर्री-तिर्री कुणी.
पान असेन मी हुकुमाचे...
"...जेव्हा एखादी समस्या खूप प्रयत्न करुनही सुटत नाही तेव्हा प्रयत्नांची दिशा बदलावी लागते. प्रॉब्लेम तोच असेल तर सोल्युशन बदलावं लागतं.
मला आमच्या पॅरीसच्या एका रेस्टॉरंटच्या मालकानं सांगितलेला किस्सा आठवला...
पीक सीझनमधे दिवसाला पस्तीस बसेसना तो लंच देतो. पस्तीस बसेस म्हणजे पंधराशे लोक. रेस्टॉरंटची कपॅसिटी विचारली तर म्हणाला अडीचशे. म्हणजे सहा बॅचेस तर कमीत कमी. सहा बॅचेस म्हणजे सहा तास.
जोक म्हणून मी विचारलं, "सकाळपासून संध्याकाळपर्यंत लंच सर्व्ह करता की काय?"
तर म्हणाला, "ह्यापाठी एक स्टोरी आहे."
"आम्ही भारतातून आलो, इथं रेस्टॉरंट सुरु केलं, हळू हळू जम बसला, रेस्टॉरंट मोठं करीत गेलो. जागा वाढली पण जास्त लोकांना केटर करता येईन. प्रत्येक येणारा ग्रुप किमान एक ते सव्वा तास घ्यायचा जेवायला. जेमतेम सातशे पर्यटक जेवून जायचे. भारतीय पर्यटकांची संख्या वाढत होती, बिझनेस समोर दिसत होता, पण प्रत्येक ग्रुप जेवायचा कालावधी काही कमी होत नव्हता. आम्ही माणसं वाढवली, सेकंड सर्व्हींग फास्ट केलं, पण काहीही उपयोग नव्हता.
"प्रत्येक ग्रुप अर्ध्या तासात जेवणं हा रिझल्ट आम्हाला हवा होता. आणि येणा-या प्रत्येक पर्यटकालाही ते हवं होतं, कारण स्थलदर्शन पूर्ण करायचं होतं.
"काय काय करता येईल ह्याची चर्चा सुरु असताना आम्हाला समस्येचं मूळ मिळालं, रूट कॉज. पर्यटकांचं जेवण अर्ध्या तासात होत होतं, त्यांना वेळ लागत होता तो टॉयलेटसाठी. कारण एवढ्या सर्वांसाठी तिथं चारच टॉयलेट्स होती आणि त्या रांगेत लोकांचा वेळ जात होता. टॉयलेट्स वाढवल्या तर प्रत्येक बॅच अर्ध्या तासात, फार फार तर चाळीस मिनिटात बाहेर पडू शकेल हे 'युरेका!' सोल्युशन आम्हाला मिळालं. आणि आम्ही चार-पाच नव्हे तर तब्बल वीस टॉयलेट्स बनवल्या. समस्येचं मूळच उखडून टाकलं मुळापासून. आता आम्ही सीझनमधे पंधराशेहून अधिक पर्यटकांना आपलं स्वादिष्ट भारतीय भोजन देऊ शकतोय."
तेवढ्याच जागेत, तेवढ्याच कर्मचा-यांमधे आमच्या ह्या मित्रानं त्याचा बिझनेस डबल केला."
- वीणा पाटील, वीणा वर्ल्ड (लोकमत मंथन, १८ डिसेंबर २०१६)
प्रॉब्लेम तोच, सोल्युशन वेगळं
See how happy children are
For no specific reason.
Why do adults always need
A reason to smile then?
Why can't everyone be happy
And smiling like the children?
They have their own worries,
Their own stresses and challenges.
But they do not crib and blame
Like adults always do.
They just get over the situation
With no false pride and
Without being stubborn.
Does growing up mean
Losing ability to accept facts
And still remain happy?
If yes, I would pray for children
Not to grow up and
Lose their innocence.
And I would pray for adults
To grow down a little
And dwell there forever...
- Mandar 9822401246
Innocence, thy name is childhood!
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २४ नोव्हेंबर २०१६ रोजी राज्यसभेत केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद. #निश्चलनीकरण #Demonetisation (- मंदार शिंदे ९८२२४०१२४६)
“रु.५०० व रु.१००० किंमतीच्या चलनी नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर उद्भवलेल्या काही समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी मी आज उभा आहे.
“काळ्या पैशाचा बिमोड करण्यासाठी, नकली नोटांची वाढ थांबवण्यासाठी, तसेच दहशतवाद्यांच्या आर्थिक उलाढालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हाच मार्ग असल्याचा दावा पंतप्रधान करतायत. या उद्दीष्टांशी मी असहमत नाही. परंतु मला नक्कीच हे दाखवून द्यायचंय की निश्चलनीकरणाची प्रक्रिया राबवताना भयंकर चुका घडल्या आहेत ज्याबद्दल आज एकंदर देशभरात कुणाचंही दुमत असणार नाही. या उपायामुळं थोड्या कालावधीसाठी नुकसान अथवा दुष्परिणाम होतील परंतु दूरच्या भविष्यकाळात देशासाठी त्याचे फायदेच असणार आहेत, असं जे म्हणतायत त्यांनाही जॉन केन्स (१९१५ ते १९४५ दरम्यान कार्यरत असणारे ब्रिटीश अर्थतज्ञ) यांनी एकदा जे म्हटलं होतं त्याची आठवण करुन दिली पाहिजे, “दूरच्या भविष्यकाळात आपण सगळे मेलेले असू.”
“आणि म्हणूनच, पंतप्रधानांनी एका रात्रीत देशावर लादलेल्या या परिस्थितीचा त्रास भोगणा-या सामान्य जनतेच्या तक्रारींची दखल घेणं महत्त्वाचं आहे. आणि मी हे अतिशय जबाबदारीनं बोलतोय, की याचा अंतिम परिणाम काय असेल ते आपल्याला ठाऊक नाही. आपण ५० दिवस वाट पहायला हवी असं पंतप्रधान म्हणाले आहेत. बरं, ५० दिवस हा थोडाच कालावधी आहे. पण समाजातील गरीब आणि वंचित गटातील लोकांसाठी ५० दिवसांचा छळदेखील भयंकर परिस्थिती ओढवणारा असेल. आणि त्यामुळंच जवळपास ६० ते ६५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, कदाचित ही संख्या आणखीही जास्त असेल. आणि जे काही करण्यात आलंय त्यामुळं आपल्या जनतेचा चलनव्यवस्थेवरचा व बँकेच्या यंत्रणेवरचा विश्वास डळमळीत व नाहीसा होऊ शकेल.
“लोकांनी बँकांमधे आपले पैसे जमा केलेत परंतु त्यांना स्वतःचेच पैसे काढून घेण्याची परवानगी नाही असं कोणत्याही देशात घडत असल्याचं पंतप्रधानांना वाटत असेल, तर त्यांच्याकडून त्या देशाचं नाव जाणून घ्यायला मला आवडेल. या देशातल्या जनतेच्या भल्याच्या नावाखाली जे काही करण्यात आलंय त्याचा निषेध करण्यासाठी हा एकच मुद्दादेखील पुरेसा आहे, असं मला वाटतं.
“आणि महोदय, मला पुढं हेही दाखवून द्यायचं आहे, की ज्या पद्धतीनं ही योजना राबवण्यात आलीय त्यामुळं आपल्या देशातल्या कृषिसंबंधी वाढीचं नुकसान होईल, लघु उद्योगांचं नुकसान होईल, अर्थव्यवस्थेच्या अनौपचारिक क्षेत्रातल्या सर्व लोकांचं नुकसान होईल, असं मला वाटतं. आणि माझा स्वतःचा अंदाज असा आहे, की जे काही करण्यात आलंय त्याच्या परिणामस्वरुप देशाचं राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजे जीडीपी, साधारण २ टक्क्यांनी घसरेल. हा (परिणामांचा) अंदाज कमीत कमी आहे, जास्तीत जास्त नाही. त्यामुळं, सर्वसामान्यांना झालेला त्रास टाळून ही योजना कशी राबवता येईल याबद्दल काही विधायक उपाय पंतप्रधानांनी सुचवले पाहिजेत, असं मला वाटतं.
“लोकांनी पैसे काढण्याच्या परिस्थितींमधे, नियमांमधे बँक यंत्रणेनं दररोज बदल घडवणं बरोबर नाही. यामुळं पंतप्रधानांचं कार्यालय, अर्थमंत्र्यांचं कार्यालय, आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्याबद्दल अतिशय खराब मत तयार होतंय. भारतीय रिझर्व्ह बँकेला अशा प्रकारच्या टीकेला तोंड द्यावं लागतंय याचं मला अतिशय दुःख वाटतंय, परंतु ही टीका माझ्या मते पूर्णपणे समर्थनीय आहे.
“त्यामुळं मी यापेक्षा जास्त काहीही बोलू इच्छित नाही. बहुसंख्येनं त्रास सहन करणा-या लोकांना दिलासा देणारे वास्तवदर्शी, ठोस उपाय शोधण्यासाठी मी पंतप्रधानांना आग्रहाची विनंती करतो. शेवटी, आपली ९० टक्के जनता अनौपचारिक क्षेत्रात काम करताहे, आपले कृषिक्षेत्रातले ५५ टक्के कामगार हा त्रास सहन करताहेत. ग्रामीण भागातल्या मोठ्या लोकसंख्येला सेवा पुरवणारी सहकारी बँक यंत्रणा बंद पडली असून कॅश हाताळण्याची तिला मनाई करण्यात आलीय. तर, एकंदरीत या उपायांनी माझी खात्री पटलीय की ही योजना राबवण्याची पद्धत म्हणजे व्यवस्थापनाचे भयंकर अपयश आहे, आणि खरं तर ही आम जनतेची पद्धतशीर लूट आहे, हा कायदेशीर दरोड्याचा प्रकार आहे.
“महोदय, या ठिकाणी मी माझं बोलणं थांबवतोय. या बाजूचे लोक काय करतायत आणि त्या बाजूचे लोक काय करतायत यातल्या चुका शोधणं हा माझा हेतु नाही. परंतु, देशातल्या जनतेची या त्रासातून सुटका करण्यासाठी वास्तवदर्शी, ठोस मार्ग व उपाय शोधून काढण्यास या वेळेचा आपल्याला उपयोग होईल हे पंतप्रधान लक्षात घेतील अशी मी मनापासून आशा करतो.
“धन्यवाद.”
निश्चलनीकरणावर डॉ. मनमोहन सिंग यांचे विचार
We travelled 200 kms yesterday for a programme. Had enough CNG and petrol for the travel. Had good food at a roadside Dhaba - snacks and tea @Rs.75/- for two. (Only cash transaction in the day!) Had lunch at a small restaurant which accepted card payment. Offered lift to two other guests of the programme, so that they need not spend cash on travel. Had CNG and petrol refilled today, again on card. (For your information, Deshmukh Petrol Pump on Satara Road and CNG Station on Sinhgad Road are accepting card payments. I don't know why all pumps are not doing that!) Planning for a trip to D-Mart in the evening for necessary groceries. Also paid phone and electricity bills online. Purchased few books online from BookGanga dot com. I have not visited any ATM/bank since 8th of November. Managing with whatever currency notes I have - 100/50/20/10. I do not want my old currency notes replaced. I will deposit and withdraw when banks get less crowded. I support PM Modi's decision to curb #BlackMoney. Let's go #cashless... It doesn't look too difficult, if we really want to follow. We earn honest money. Let it be accounted. Let all the money in this country be accounted! I hope you agree with me on this...
Let it be accounted!
रात्री राहिला दरवाजा उघडा
घरात शिरला मोठ्ठा किडा
किड्याचे पंख मोठ्ठे-मोठ्ठे
पंखांवर होते चट्टे-पट्टे
किड्याला होत्या लांब-लांब मिशा
बाळाला वाटली खूप-खूप मज्जा
किड्याने केली फडफड सुरु
बाळ पळू लागले तुरु तुरु
किड्याने मारला जमिनीवर सूर
बाळ म्हणाले, मी पण शूर!
बाळाने घेतला हातात झाडू
म्हणाले, किड्याला बाहेर काढू
बाळाने फिरवला झाडू गरगर
किड्याने घातला गोंधळ घरभर
किड्याने धरली खिडकी
बाळाला भरली धडकी
घराबाहेर जातो का घरामधे येतो?
जातो का येतो, येतो का जातो?
जाऊ दे त्याला जाईल जिकडे
बाळाने केले दुर्लक्ष तिकडे
किड्याला दिले बाबांवर सोडून
बाळ झोपी गेले पांघरुण घेऊन...
- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
बाळ आणि किडा
आयुष्याची कणीक मळतो...
सगळा काळा पैसा पाचशे-हजारच्या नोटांची थप्पी लावून लपवून ठेवलेला नसतो, हे मला माहित्येय. कॅशमधल्या काळ्या पैशाहून सोनं, जमीन वगैरे रुपात जास्त संपत्ती साठवलेली आहे, हेही मान्य. तरीसुद्धा, 'बेहिशेबी' कॅशवाल्यांना बसणारा फटका जबरदस्त आहे याबद्दल शंका नाही. पाचशे-हजाराच्या नोटा अचानक रद्द करण्याचा निर्णय इमोशनल आहे, पण हरकत नाही. आपण अशी 'कॅश' कमवू / खर्चू शकत नाही याचं इतके दिवस ज्यांना वाईट वाटत आलं असेल तेच काल सुखानं झोपले असतील. जय हो!
काळा पैसा - गोरा पैसा
पास-नापास
टीव्ही आणि आपण
पैसा फेको...
Journeys To Scale by Innovators and NGOs
सिंहाचे दात मोजणारी जात, वगैरे वगैरे
'मराठा क्रांती मोर्चा'च्या निमित्तानं...
संवाद पिढ्या-पिढ्यांचा
अतरंगी यारी
चाँदनीयाँ
Speed or Focus?
"अरे आव्वाज कुणाचा???"
Plan
गौडबंगालचं रहस्य
शालाबाह्य मुलांचा प्रश्न - तिथंही आणि इथंही!
"बच्चा लोग, बजाओ ताली..."
कन्हैया आणि गोपी
जात - आर्थिक की बिगरआर्थिक?
राजकारण नको?
कन्हैया कुमार - एक नवी आशा
Powered By
Versatile Corporate Solutions
या ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार