ऐसी अक्षरे
Sunday, August 28, 2011
Ganpati Bappa Moraya (Short Story)
"नारायण, नारायण" असा जप करत नारदमुनी गजाननाकडं आले. दोन हातात दोन छोटे ब्रश आणि सोंडेत एक मोठा ब्रश. एक सुंदर निसर्गचित्र रंगवण्यात दंग होते श्रीगणेश. पृथ्वीतलावर सातत्यानं ये-जा करणार्या मोजक्या देवांपैकी श्रीगणेश एक. आपण जाऊ तिथला परिसर सुंदर बनवायचा त्यांचा आग्रह. हिरव्या-पिवळ्या रंगांची मुक्त उधळण केली होती त्या चित्रात. आता हे चित्र पूर्ण झालं की पृथ्वीवरच्या नक्की कुठल्या भागात बसवलं जाईल, या विचारात नारदमुनी गढून गेले. इतक्यात गणेशाचं त्यांच्याकडं लक्ष गेलं.
"प्रणाम मुनीवर, कसं काय येणं केलंत?" सगळे ब्रश बाजूला ठेवत गणेशानं नारदमुनींना विचारलं.
"नारायण, नारायण," भानावर येत नारदमुनी म्हणाले, "गणेशदेवा, तुझे भक्तगण तुझ्या स्वागताच्या जय्यत तयारीला लागलेले पाहून, तुला चार गोष्टी सांगायला आलोय."
"बोला मुनीवर, काही गडबड तर नाही ना?"
"गडबड म्हणजे...तसं नवीन काही नाही, पण..."
"पण? पण काय नारदमुनी?"
"पण हेच की तिकडच्या सगळ्या जुन्या समस्या अजूनही आहेत तशाच आहेत. नव्हे, उलट त्यांचं स्वरुप अधिकच गंभीर होत चाललंय..."
"परिस्थिती खूपच वाईट आहे का मुनीवर?"
"गणेशा, दर चतुर्थीला भक्तगण तुला साकडं घालतात, त्यांच्या समस्या सोडवायचं. शिवाय वर्षभर तुझ्या मंदीरांमधून नवस, आरत्या, महापूजा, अभिषेक, हे सारं सुरु असतंच. झालंच तर, वर्षातून एकदा तू स्वतः जाऊन तिकडं राहून येतोस काही दिवस. तरीही लोकांच्या समस्यांना काही अंत दिसत नाही बघ."
"कुठल्या समस्यांबद्दल बोलताय तुम्ही?" गणेशानं अदबीनं विचारलं.
"कुठल्या कुठल्या समस्या सांगू गजानना?
- महागाईनं जनसामान्यांचं कंबरडं मोडलंय;
- जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत;
- भ्रष्टाचारानं अर्थव्यवस्था मोडकळीला आलीय;
- दहशतवादानं माणसा-माणसातल्या विश्वासाचा बळी घेतलाय;
- देशाच्या..."
"थांबा थांबा मुनीवर," गजाननानं नारदमुनींना थांबवत म्हटलं, "अहो या सगळ्या समस्या माणसानंच निर्माण केल्यात की नाही?"
"हो, मग?"
"अहो मग या सगळ्या समस्यांवरचे उपाय माणसाकडंच असायला पाहिजेत की नाही?"
"हो, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण..."
"मग कसला पण घेऊन बसलात मुनीवर? ते सगळे उपाय स्वतःच्या घरी ठेऊन माणसं माझ्याकडं येतात, फक्त समस्या घेऊन. मग उपास-तापास, नवस-सायास, होम-हवन, मंत्र-अभिषेक हे सगळं करत बसतात. आता तुम्हीच सांगा, त्यांनी निर्माण केलेल्या समस्यांवर मी कसा काय उपाय काढणार बरं?"
"हं, तेही बरोबरच आहे म्हणा. पण तरी या समस्यांवर काही तरी केलं पाहिजेच ना? म्हणजे, दहशतवादावर, महागाईवर, भ्रष्टाचारावर..."
"बास बास बास... अहो काय नारदमुनी, माणसांमध्ये फिरुन तुम्हीपण माणसांसारखं कुरकुरायला लागलात की हो. त्या माणसांच्या समस्या-बिमस्या सोडा माणसांवर. त्यांनी स्वतः शोधलेले उपायच त्यांना कायमचं तारु शकतील. तुम्ही आम्ही भरवलेला घास पचायचा नाही त्यांना. त्यापेक्षा मी तुम्हाला मोदक भरवतो, तो खा आणि संतुष्ट मनानं नारायणाचा जप करा," एवढं बोलून श्रीगणेशानं आतल्या बाजूला आवाज दिला, "मोदक घेतलेत का बनवायला? नारदमुनींना द्या जरा गरम-गरम..."
आणि मग....
.................
....मग काय, आम्ही घेतले की हो मोदक बनवायला! आणि बनवतोच आहोत - खूप खूप, भरपूर. तुम्हालाही खायचे असतील तर जरुर सांगा आम्हाला. त्याचं काय आहे, श्रीगणेशानं आम्हाला सांगितलंय,
"हे जग खूप सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवायचं आपण!"
ते चित्रसुद्धा आता पूर्ण होत आलंय. श्रावण-सरींनी सजवलेल्या आजूबाजूच्या हिरव्यागार निसर्गचित्राचा खरा चित्रकार येतोय आपली भूक शमवायला. तो गणाधिपती गजानन भुकेला आहे भक्तीचा, भावाचा, प्रेमाचा... आणि स्वादिष्ट मोदकांचाही!
लागायचं मग तयारीला? आम्ही तर केव्हाचे तयार होऊन बसलोय वाट बघत... विघ्नहर्त्या गणरायाची आणि तुमची. कधी येताय मोदक खायला?
"उंदीर म्हणाला बाप्पांना
दर्शन देऊया भक्तांना,
मोदक-लाडू खाऊया
गणपती बाप्पा मोरया!"
Wednesday, August 3, 2011
दिल तोड़ दिया
कुछ तो दुनिया कि इनायात ने दिल तोड़ दिया
और कुछ तल्ख़ी-ए-हालात ने दिल तोड़ दिया
हम तो समझे थे के बरसात में बरसेगी शराब
आयी बरसात तो बरसात ने दिल तोड़ दिया
- सुदर्शन फ़ाकिर
(इनायात = एहसान; तल्ख़ी = कटुता)

और कुछ तल्ख़ी-ए-हालात ने दिल तोड़ दिया
हम तो समझे थे के बरसात में बरसेगी शराब
आयी बरसात तो बरसात ने दिल तोड़ दिया
- सुदर्शन फ़ाकिर
(इनायात = एहसान; तल्ख़ी = कटुता)
दिल तोड़ दिया
Monday, August 1, 2011
कायमचे धडधडणारे मन...
Saturday, July 30, 2011
Monday, July 25, 2011
साहिर आणि जादू
('नया ज्ञानोदय' या हिंदी मासिकासाठी गुलजार, 'मेरे अपने' नावाचा स्तंभ लिहितात. जानेवारी २०११ च्या अंकात त्यांनी साहिर लुधियानवी आणि जावेद अख्तर यांच्या आठवणी लिहिल्या होत्या. त्या लेखाचा मी केलेला मराठी अनुवाद - मंदार शिंदे 9822401246)
साहिर आणि जादू
ही साहिरच्या अंत्ययात्रेपूर्वीची गोष्ट आहे.
मी गोष्ट 'जादू'ची सांगतोय, पण संदर्भ साहिर लुधियानवींचा आहे.
जादू आणि साहिरचं नातं मोठं विचित्र होतं. जादू हे जावेद अख्तरचं टोपणनाव. एकदम शायराना अंदाज... आख्खं खानदानच असं. बाप जाँ निसार अख्तर. मामा मजाज आणि आता सासरे कैफी आझमी.
बापाबद्दल आदर कधीच नव्हता त्याला. कसलातरी राग होता. नाराजी होती त्याच्या नसानसांत. आपल्या बापाविरुद्ध. आई जिवंत असताना कसाबसा सहन करायचा. पण ती गेल्यावर, छोट्या-छोट्या गोष्टींवर घर सोडून बाहेर पडायचा आणि सरळ साहिरच्या घरी जाऊन पोहोचायचा. त्याचं तोंड बघूनच साहिरना समजून जायचं की परत बापाशी भांडून आलाय. पण ते अजिबात त्यावर बोलत नसत. त्यांना ठाऊक होतं पहिलं तर जादू भडकून उठेल आणि मग रडायला लागेल. दोन्ही परिस्थितींत त्याला सांभाळणं कठीण होतं.
थोडी उसंत घेऊन ते म्हणत, “जादू, चल ये, नाष्टा करुन घे.”
आणि मग नाष्टा करता-करता जादू स्वतःच भडभडून बोलायला लागायचा आणि तो बिघडलेला दिवस त्यांच्याकडंच घालवायचा. पण कधी-कधी काय व्हायचं, साहिर त्याला सावध करायचे, “अख्तर येतोय. दुपारच्या जेवणाला.”
जादू मान वर करुन पहायचा, इथंही चैन नाही. त्याला वाटलं तर तो साहिरसमोरच बोलला असता, “हा बाप, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी. का?”
जादू मुलगा होता जाँ निसार अख्तर चा, पण स्वभावानं आपल्या मामावर, मजाज वर गेला होता. अतिशय भावूक आणि भयंकर तापट... साहिरनी त्याला मुलासारखं पोसलं आणि मित्रासारखं सांभाळलं. साहिर म्हणत, “जादू, 'ऐरोज'ला मस्त पिक्चर लागलाय यार. काय बरं नाव... जा जाऊन बघून ये...”
आणि अशा प्रकारे ते बाप-लेकाचं समोरासमोर येणं टाळत. मोठं विलक्षण नातं होतं, साहिर आणि जादूचं.
एकदा तो साहिरच्या घरातूनही निघून गेला.
“तुम्हीच जास्त डोक्यावर चढवून ठेवलंय माझ्या बापाला.”
साहिरना हसू आलं. त्यावर जादू म्हणाला, “माझा बाप पण असाच हसतो माझ्यावर. मला नकोय कुणीच. ना तो ना तुम्ही.” आणि भांडून घरातून निघून गेला.
काही दिवस गायब झाला. अतिशय स्वाभिमानी. कुठं झोपायचा, कुठं खायचा, कुणास ठाऊक.
कमाल साहेबांच्या, कमाल अमरोहींच्या प्रॉडक्शन मॅनेजरशी दोस्ती होती. संध्याकाळ त्याच्यासोबतच घालावायचा आणि रात्री तिथंच स्टुडिओ मध्ये, प्रॉडक्शन स्टोअर मध्ये झोपून जायचा. अशा स्टोअरमध्ये जिथं सगळ्या प्रकारचं प्रॉडक्शनचं सामान पण भरुन ठेवलेलं होतं. मीना कुमारीच्या दोन फिल्म फेअर अवॉर्डच्या ट्रॉफी पण पडल्या होत्या तिथं. हा पठ्ठ्या आरशासमोर उभा राहून स्वतःला ट्रॉफी सादर करायचा, मग ती ट्रॉफी स्वतःच स्वीकारायचा, मग उपस्थितांच्या वतीनं टाळ्या पण वाजवायचा, आणि मग कमरेत झुकून लोकांना अभिवादनही करायचा. जादूनं एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की जवळपास रोज, झोपण्यापूर्वी तो अशी रिहर्सल करायचा. बरेच दिवस काढले त्यानं स्टुडिओमध्ये.
त्यानंतर जेव्हा साहिरच्या घरी दिसला तेव्हा चेहरा उतरला होता, तोंड सुकलं होतं. साहिरनी प्रेमानं बोलावलं पण जादूचा राग अजून गेला नव्हता.
“फक्त आंघोळीसाठी तुमचं बाथरुम आणि साबण वापरायचाय. तुमची काही हरकत नसेल तर.”
“जरुर.” साहिरनी परवानगी दिली आणि म्हटलं, “काहीतरी खाऊन घे.”
“खाईन कुठंतरी. तुमच्याकडं खायचं नाहीये मला.”
आंघोळ करुन आला तर साहिर, ड्रेसिंग टेबलवर शंभरची नोट समोर ठेऊन, उगाचच आपल्या केसांतून कंगवा फिरवत बसले होते. खरं तर, मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत होते, जावेदला कसं म्हणावं शंभर रुपये ठेव म्हणून. जावेदच्या स्वाभिमानी बाण्याची भीतीही वाटे आणि आदरही. अखेर घाबरत-घाबरत बोलून टाकलं.
“जादू, हे शंभर रुपये ठेव. मी घेईन तुझ्याकडून.”
शंभर रुपये त्या जमान्यात खूप मोठी रक्कम होती. शंभरची नोट मोडायची तर लोक बँकेत जात, किंवा पेट्रोल पंपावर.
जादूनं नोट अशी घेतली की जणू साहिरवर उपकारच करतोय,
“ठेवून घेतोय. परत करेन. पगार होईल तेव्हा.”
जावेद, शंकर मुखर्जींकडं असिस्टंट म्हणून लागला होता जिथं त्याची ओळख सलीम खानशी झाली. खूप कमावलं त्यानंतर त्यानं. दारु प्यायचा मामासारखी आणि पिऊन बापावर राग काढायचा, साहिर स्टाइलनं. पण ते शंभर रुपये त्यानं कधी परत नाही दिले. हजारो कमावले, मग लाखोही आले, पण नेहमी हेच म्हणायचा साहिरना,
“तुमचे शंभर रुपये तर मी गडप केले.”
आणि साहिर पण नेहमी म्हणत, “ते तर मी तुझ्याकडून वसूल करेनच बेट्या...!”
ही छेड-छाड, साहिर आणि जादू मध्ये अखेरपर्यंत चालू रहिली, आणि दोस्ती अखंड कायम राहिली.
साहिरचा खूप मोठा मित्रपरिवार तर नव्हता, पण ते माणसांत रमायचे, आणि संध्याकाळची पिऊन झाली की कित्येकांची ऐशी-तैशी करुन टाकायचे. जेव्हा कृष्णचंद्रवाल्या घरी होते, तेव्हा त्यांचे जुने स्नेही ओम प्रकाश अश्क बरीच वर्षं त्यांच्यासोबत राहिले. एकदा माझ्यादेखतच अश्क साहेब म्हणाले होते पंजाबीतून,
“साहिर, दारु पिल्यावर तू शिवीगाळ का करायला लागतोस?”
साहिरनी पंजाबीतच उत्तर दिलं होतं, “दारु सोबत चकना पण पाहिजे ना यार.”
साहिरच्या मित्रमंडळीमध्ये एक डॉक्टर कपूर पण होते, जे स्वतः हृदयरोगी होते, पण साहिरचे डॉक्टर. साहिर म्हणत असत, “कपूर, मी तुला बघायला येऊ, की स्वतःला दाखवायला येऊ!”
त्या संध्याकाळी... त्या अखेरच्या संध्याकाळीही असंच झालं. दरम्यानच्या काळात, साहिरनी स्वतःचं घर बांधलं होतं. 'परछाइयाँ'. डॉ. कपूर वर्सोव्याच्या एका बंगल्यात जाऊन राहिले होते. जादू एक प्रचंड यशस्वी रायटर बनला होता. त्या संध्याकाळी साहिर, डॉ. कपूरना बघायला गेले होते. निरोप आला होता की त्यांची तब्येत ठीक नाही. हार्ट स्पेशलिस्ट डॉ. सेठ त्यांना बघायला येणार होते. बहुतेक रामानंद सागर पण होते तिथं. किंवा नंतर आले असतील. साहिरनी कपूरांच्या करमणुकीसाठी पत्ते मागवले आणि त्यांच्याच बिछान्यात बसून खेळू लागले. पत्ते वाटता-वाटता अचानक डॉ. कपूरनी पाहिलं, साहिरचा चेहरा आखडत चाललाय. बहुदा कळ दाबायचा प्रयत्न करत होते ते. कपूरनी आवाज दिला, 'साहिर'!
आणि त्याबरोबर साहिर, त्या बिछान्यात लवंडले. डॉ. सेठ येऊन पोहोचले. खूप प्रयत्न केला हृदय पूर्ववत करण्याचा. पण साहिर निवर्तले होते. डॉ. कपूरांना घाबरं-घुबरं झालेलं पाहून रामानंद सागर, त्यांना ताबडतोब तिथून हलवून आपल्या घरी घेऊन गेले.
साहिरचा ड्रायव्हर अन्वर धावत आला. त्यानं प्रेत ताब्यात घेतलं. यश चोप्रा त्यांच्या अगदी जवळ रहायचे. त्यांच्याकडं निरोप पाठवला तर ते श्रीनगरला गेले होते. त्यानंतर जादूला कळवलं. ड्रायव्हर नव्हता तर ते टॅक्सी घेऊन पोहोचले. आणि त्या टॅक्सीतून जादू, साहिरना त्यांच्या घरी घेऊन आले, परछाइयाँ मध्ये. अन्वर आणि टॅक्सीवाल्याच्या मदतीनं त्यांना वर घेऊन गेले. फर्स्ट फ्लोअर वर, जिथं ते रहायचे.
जादूनं जणू मौनव्रत घेतलं होतं. पण घरी पोहोचताच तो ज्या पद्धतीनं त्यांच्या गळ्यात पडून रडला, आयुष्यात कधी असा रडला नव्हता. रात्रीचा एक वाजला असेल. कुठं जायचं? कुणाला बोलवायचं? काही नाही केलं जादूनं. एकटा बसून राहिला त्यांच्या शेजारी. शेजार-पाजारचे लोक पोहोचले होते. एक शेजारी म्हणाला, थोड्या वेळात प्रेत आखडू लागेल. दोन्ही हात छातीवर घेऊन बांधून टाका. नंतर अवघड होऊन बसेल.
जादू अखंड रडत होता आणि लोक जे काही सांगतील ते सगळं करत राहिला.
मग सकाळ होता-होता लोकांना फोन करणं सुरु केलं. बातमी पसरत गेली तसतसे लोक जमा होऊ लागले. बसायला सतरंज्या काढा. इथल्या खुर्च्या हलवा. तिकडचा दरवाजा उघडा. लहान मुलासारखे, जादूचे अश्रू वाहतच होते आणि तो ही सगळी कामं करत होता.
अंत्ययात्रेच्या तयारीसाठी खाली आला तर पाहिलं की टॅक्सीवाला तिथंच उभा आहे.
“ऊफ्! सांगितलं का नाहीस? किती पैसे झाले तुझे?”
तो कुणी पापभीरु मनुष्य होता. ताबडतोब हात जोडले.
“मी साहेब... नाही पैशांसाठी नाही थांबलो. हे असं झाल्यावर कुठं जाणार होतो रात्री?”
जादूनं खिशातून पाकीट काढलं.
टॅक्सीवाला पुन्हा म्हणाला,
“नाही साहेब, राहू द्या साहेब.”
जादू जवळजवळ ओरडून म्हणाला, “हे घे, ठेव हे शंभर रुपये. मेल्यावर पण वसूल केले आपले पैसे.”
आणि धाय मोकलून रडू लागला.
ही साहिरच्या अंत्ययात्रेपूर्वीची गोष्ट आहे.
~~0~~
साहिर आणि जादू
Friday, July 22, 2011
दिल-जले...
Tuesday, July 19, 2011
तो ज़िंदा हो तुम...
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो
तो ज़िंदा हो तुम
नज़र में ख़्वाबों की बिजलीयाँ लेके चल रहे हो
तो ज़िंदा हो तुम
हवा के झोंकों के जैसे आझाद रहना सीखो
तुम एक दरीया के जैसे लेहरों में बेहना सीखो
हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें
हर एक पल इक नया समाँ देखे यह निगाहें
जो अपनी आँखों में हैरानियाँ लेके चल रहे हो
तो ज़िंदा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो
तो ज़िंदा हो तुम
- जावेद अख़्तर
(ज़िंदगी ना मिलेगी दोबारा)

तो ज़िंदा हो तुम
नज़र में ख़्वाबों की बिजलीयाँ लेके चल रहे हो
तो ज़िंदा हो तुम
हवा के झोंकों के जैसे आझाद रहना सीखो
तुम एक दरीया के जैसे लेहरों में बेहना सीखो
हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें
हर एक पल इक नया समाँ देखे यह निगाहें
जो अपनी आँखों में हैरानियाँ लेके चल रहे हो
तो ज़िंदा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो
तो ज़िंदा हो तुम
- जावेद अख़्तर
(ज़िंदगी ना मिलेगी दोबारा)
तो ज़िंदा हो तुम...
Labels:
Zindagi Na Milegi Dobara,
संग्रह,
हिंदी
अपने होने पर मुझको यकीं आ गया...
पिघले नीलम सा बेहता यह समा,
नीली नीली सी खामोशियाँ,
ना कहीं है ज़मीं ना कहीं है आसमाँ,
सरसराती हुई टेहनियाँ पत्तियाँ,
कह रही है बस एक तुम हो यहाँ,
बस मैं हूँ, मेरी साँसें हैं और मेरी धडकनें,
ऐसी गेहराइयाँ, ऐसी तनहाइयाँ, और मैं... सिर्फ मैं.
अपने होने पर मुझको यकीं आ गया.
- जावेद अख़्तर
(ज़िंदगी ना मिलेगी दोबारा)

नीली नीली सी खामोशियाँ,
ना कहीं है ज़मीं ना कहीं है आसमाँ,
सरसराती हुई टेहनियाँ पत्तियाँ,
कह रही है बस एक तुम हो यहाँ,
बस मैं हूँ, मेरी साँसें हैं और मेरी धडकनें,
ऐसी गेहराइयाँ, ऐसी तनहाइयाँ, और मैं... सिर्फ मैं.
अपने होने पर मुझको यकीं आ गया.
- जावेद अख़्तर
(ज़िंदगी ना मिलेगी दोबारा)
अपने होने पर मुझको यकीं आ गया...
Labels:
Zindagi Na Milegi Dobara,
संग्रह,
हिंदी
दिल आखिर तू क्यूँ रोता है...
जब जब दर्द का बादल छाया
जब घूम के साया लेहराया
जब आँसू पलकों तक आया
जब यह तनहा दिल घबराया
हमने दिल को यह समझाया
दिल आखिर तू क्यूँ रोता है
दुनिया में यूँही होता है
यह जो गेहरे सन्नाटे हैं
वक्त ने सबको ही बाँटे हैं
थोडा ग़म है सबका किस्सा
थोडी धूप है सबका हिस्सा
आँख तेरी बेकार ही नम़ है
हर पल एक नया मौसम है
क्यूँ तू ऐसे पल खोता है
दिल आखिर तू क्यूँ रोता है
- जावेद अख़्तर
(ज़िंदगी ना मिलेगी दोबारा)

जब घूम के साया लेहराया
जब आँसू पलकों तक आया
जब यह तनहा दिल घबराया
हमने दिल को यह समझाया
दिल आखिर तू क्यूँ रोता है
दुनिया में यूँही होता है
यह जो गेहरे सन्नाटे हैं
वक्त ने सबको ही बाँटे हैं
थोडा ग़म है सबका किस्सा
थोडी धूप है सबका हिस्सा
आँख तेरी बेकार ही नम़ है
हर पल एक नया मौसम है
क्यूँ तू ऐसे पल खोता है
दिल आखिर तू क्यूँ रोता है
- जावेद अख़्तर
(ज़िंदगी ना मिलेगी दोबारा)
दिल आखिर तू क्यूँ रोता है...
Labels:
Zindagi Na Milegi Dobara,
संग्रह,
हिंदी
Sunday, July 17, 2011
बूँदे बारीश की...
Friday, July 15, 2011
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...
आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद

जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...
दुःखाला आधार नको का? तेहि कधीतरी येते
दोस्त होऊनी हातच माझा अपुल्या हाती घेते,
जो जो येईल त्याचे स्वागत, दार न कधीही बंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...
झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे
साधा कोरा कागदही कधी चंद्र होऊनी हासे,
सर्वत्रच तो बघतो धुंदी, डोळे ज्याचे धुंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...
कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळूवार
हात होतसे वाद्य : सुरांचे पाझरती झंकार,
प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...
- कवी मंगेश पाडगांवकर
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...
Thursday, July 7, 2011
लेबर शॉर्टेज अर्थात कामगार टंचाई
(३ जुलै २०११ च्या ‘संडे टाइम्स ऑफ इंडिया’ मधील स्वामीनाथन अय्यर यांच्या लेखावर आधारित)
- २००४-०५ मधे ४२ टक्के असणारं वर्कर पार्टिसिपेशन (म्हणजे कामगारांचं एकूण लोकसंख्येशी असणारं प्रमाण) २००९-१० मध्ये ३९.२ टक्क्यांपर्यंत घसरलं. म्हणजेच, शंभर लोकांपैकी ४२ लोक काम करत होते, ते आता ३९ वर आले.
- देशाचा विकास ‘जॉबलेस ग्रोथ’ म्हणजे रोजगाराच्या संधी न वाढताच होतोय, अशी काही लोकांची तक्रार आहे.
- सरकारी अधिकार्यांचं म्हणणं आहे की बेरोजगारीचं प्रमाण २.३ टक्क्यांवरुन २ टक्क्यांवर आलंय. म्हणजेच ०.३ टक्के अधिक रोजगार निर्माण झालेत.
- वस्तुस्थिती अशी आहे की, काम करायची इच्छा असणार्या लोकांचीच संख्या कमी होत चाललीय.
कमतरता नोकर्यांची नसून कर्मचार्यांची आहे, विशेषतः महिला कर्मचार्यांची.
- वेगवान विकासामुळं रोजगाराच्या संधीही खूप वाढल्यात. पण सर्वत्र लेबर शॉर्टेज अर्थात कामगार टंचाई आहेच.
- रोजगाराविना विकास = अतिरिक्त कामगार = कमी मजुरी.
पण, कामगारांविना विकास = वाढती मजुरी.
म्हणजे काय?
जर आपल्या विकासामुळं रोजगाराच्या संधी वाढल्या नाहीत असं मानलं तर, भरपूर कामगार बेरोजगार दिसले असते. म्हणजेच, कामगारांचा मागणीपेक्षा जास्त पुरवठा झाल्यानं (डिमांड-सप्लाय रिलेशन), कमी मजुरीत जास्त कामगार उपलब्ध व्हायला हवेत.
प्रत्यक्षात, मजुरीचे दर वेगानं वाढलेले दिसून येतात. डिमांड-सप्लाय रिलेशननुसार, विकासाच्या वाढत्या वेगाबरोबर वाढत जाणार्या कामगारांच्या मागणीइतका पुरवठा होत नसल्यानं मजुरीचे दर वाढत चाललेत.
म्हणजेच, रोजगाराच्या संधी वाढतायत, पण कामगार उपलब्ध होत नाहीत. यापैकी मोठी घट आहे महिला कामगारांच्या संख्येत. कशामुळं?
- तरुण वर्गातल्या स्त्रिया नोकरीकडून उच्च शिक्षणाकडं वळतायत.
काम करण्याचं वय सर्वसाधारणपणे १५ ते ६० वर्षे मानलं जातं.
उच्च शिक्षण घेणार्यांचं प्रमाण वाढल्यानं १५ ते २५ वर्षांच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय. यामुळं आपल्या ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’लाही धक्का बसतोय.
- कुटुंबाचं उत्पन्न आणि मुलींचं शिक्षण यांत सुधारणा होऊ लागली की, सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली बायकांना घरी बसवायचं प्रमाण वाढतं.
- गेल्या काही वर्षांत महिला कर्मचार्यांची संख्या जवळपास साडे तीन कोटींनी कमी झालीय. कशामुळं?
- गरीब निरक्षर लोकसंख्येत ‘वर्कर पार्टिसिपेशन’ जास्त आढळतं.
कारण? कामाशिवाय बसून राहणं त्यांना परवडतच नाही. त्यामुळं कुटुंबातील स्त्री-पुरुष दोघंही काम करतात.
- उत्पन्न वाढू लागलं की वर्क पार्टिसिपेशन कमी होऊ लागतं, विशेषतः स्त्रियांचं.
- कुटुंबामध्ये एकापेक्षा दोघांचं उत्पन्न येणं कधीही चांगलं. दोघंही कमावते असणं जास्त फायदेशीर.
पण समाजामध्ये, खास करुन मध्यमवर्गीयांमध्ये, ज्या घरातल्या स्त्रिया नोकरी करत नाहीत (किंवा करावी लागत नाही), त्या कुटुंबांना जास्त प्रतिष्ठा मिळते. त्यांचं सोशल स्टेटस चांगलं आहे असं म्हटलं जातं.
- गरजेपेक्षा जास्त उत्पन्न मिळू लागलं की, बायकांनी नोकरी करायची गरज नाही असं ठरवून त्यांना घरी बसवलं जातं. थोडक्यात, स्त्रियांनी नोकरी करुन जे जास्तीचे (पोटेन्शियल) पैसे मिळाले असते, त्याच्या बदल्यात सोशल स्टेटस, सामाजिक प्रतिष्ठा विकत घेतली जाते.
- आणखी एक मुद्दा म्हणजे, अशिक्षित स्त्रिया कुठल्याही कामाला तयार असतात.
याउलट, सुशिक्षित स्त्रियांची अपेक्षा असते स्टेटसनुसार चांगला जॉब मिळण्याची. असे सिलेक्टीव्ह जॉब सर्वत्र उपलब्ध असतीलच असं नाही.
- एकंदरीत, कामगार टंचाई, विशेषतः स्त्री कामगार टंचाईवर मात करण्यासाठी गरज आहे सामाजिक दृष्टीकोन बदलण्याची. चेंज इन सोशल अॅटीट्यूड!
- स्त्रीचं करीयर - पुरुषाचं करीयर, किंवा नोकरीची व उत्पन्नाची ‘गरज’ यांतला स्त्री-पुरुष भेदभाव कमी झाल्यास, आणि
स्त्रियांच्या दृष्टीनं कामाच्या ठिकाणांची सुधारणा केल्यास,
लेबर शॉर्टेज किंवा कामगार टंचाई निश्चितच कमी होऊ शकेल.

- २००४-०५ मधे ४२ टक्के असणारं वर्कर पार्टिसिपेशन (म्हणजे कामगारांचं एकूण लोकसंख्येशी असणारं प्रमाण) २००९-१० मध्ये ३९.२ टक्क्यांपर्यंत घसरलं. म्हणजेच, शंभर लोकांपैकी ४२ लोक काम करत होते, ते आता ३९ वर आले.
- देशाचा विकास ‘जॉबलेस ग्रोथ’ म्हणजे रोजगाराच्या संधी न वाढताच होतोय, अशी काही लोकांची तक्रार आहे.
- सरकारी अधिकार्यांचं म्हणणं आहे की बेरोजगारीचं प्रमाण २.३ टक्क्यांवरुन २ टक्क्यांवर आलंय. म्हणजेच ०.३ टक्के अधिक रोजगार निर्माण झालेत.
- वस्तुस्थिती अशी आहे की, काम करायची इच्छा असणार्या लोकांचीच संख्या कमी होत चाललीय.
कमतरता नोकर्यांची नसून कर्मचार्यांची आहे, विशेषतः महिला कर्मचार्यांची.
- वेगवान विकासामुळं रोजगाराच्या संधीही खूप वाढल्यात. पण सर्वत्र लेबर शॉर्टेज अर्थात कामगार टंचाई आहेच.
- रोजगाराविना विकास = अतिरिक्त कामगार = कमी मजुरी.
पण, कामगारांविना विकास = वाढती मजुरी.
म्हणजे काय?
जर आपल्या विकासामुळं रोजगाराच्या संधी वाढल्या नाहीत असं मानलं तर, भरपूर कामगार बेरोजगार दिसले असते. म्हणजेच, कामगारांचा मागणीपेक्षा जास्त पुरवठा झाल्यानं (डिमांड-सप्लाय रिलेशन), कमी मजुरीत जास्त कामगार उपलब्ध व्हायला हवेत.
प्रत्यक्षात, मजुरीचे दर वेगानं वाढलेले दिसून येतात. डिमांड-सप्लाय रिलेशननुसार, विकासाच्या वाढत्या वेगाबरोबर वाढत जाणार्या कामगारांच्या मागणीइतका पुरवठा होत नसल्यानं मजुरीचे दर वाढत चाललेत.
म्हणजेच, रोजगाराच्या संधी वाढतायत, पण कामगार उपलब्ध होत नाहीत. यापैकी मोठी घट आहे महिला कामगारांच्या संख्येत. कशामुळं?
- तरुण वर्गातल्या स्त्रिया नोकरीकडून उच्च शिक्षणाकडं वळतायत.
काम करण्याचं वय सर्वसाधारणपणे १५ ते ६० वर्षे मानलं जातं.
उच्च शिक्षण घेणार्यांचं प्रमाण वाढल्यानं १५ ते २५ वर्षांच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय. यामुळं आपल्या ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’लाही धक्का बसतोय.
- कुटुंबाचं उत्पन्न आणि मुलींचं शिक्षण यांत सुधारणा होऊ लागली की, सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली बायकांना घरी बसवायचं प्रमाण वाढतं.
- गेल्या काही वर्षांत महिला कर्मचार्यांची संख्या जवळपास साडे तीन कोटींनी कमी झालीय. कशामुळं?
- गरीब निरक्षर लोकसंख्येत ‘वर्कर पार्टिसिपेशन’ जास्त आढळतं.
कारण? कामाशिवाय बसून राहणं त्यांना परवडतच नाही. त्यामुळं कुटुंबातील स्त्री-पुरुष दोघंही काम करतात.
- उत्पन्न वाढू लागलं की वर्क पार्टिसिपेशन कमी होऊ लागतं, विशेषतः स्त्रियांचं.
- कुटुंबामध्ये एकापेक्षा दोघांचं उत्पन्न येणं कधीही चांगलं. दोघंही कमावते असणं जास्त फायदेशीर.
पण समाजामध्ये, खास करुन मध्यमवर्गीयांमध्ये, ज्या घरातल्या स्त्रिया नोकरी करत नाहीत (किंवा करावी लागत नाही), त्या कुटुंबांना जास्त प्रतिष्ठा मिळते. त्यांचं सोशल स्टेटस चांगलं आहे असं म्हटलं जातं.
- गरजेपेक्षा जास्त उत्पन्न मिळू लागलं की, बायकांनी नोकरी करायची गरज नाही असं ठरवून त्यांना घरी बसवलं जातं. थोडक्यात, स्त्रियांनी नोकरी करुन जे जास्तीचे (पोटेन्शियल) पैसे मिळाले असते, त्याच्या बदल्यात सोशल स्टेटस, सामाजिक प्रतिष्ठा विकत घेतली जाते.
- आणखी एक मुद्दा म्हणजे, अशिक्षित स्त्रिया कुठल्याही कामाला तयार असतात.
याउलट, सुशिक्षित स्त्रियांची अपेक्षा असते स्टेटसनुसार चांगला जॉब मिळण्याची. असे सिलेक्टीव्ह जॉब सर्वत्र उपलब्ध असतीलच असं नाही.
- एकंदरीत, कामगार टंचाई, विशेषतः स्त्री कामगार टंचाईवर मात करण्यासाठी गरज आहे सामाजिक दृष्टीकोन बदलण्याची. चेंज इन सोशल अॅटीट्यूड!
- स्त्रीचं करीयर - पुरुषाचं करीयर, किंवा नोकरीची व उत्पन्नाची ‘गरज’ यांतला स्त्री-पुरुष भेदभाव कमी झाल्यास, आणि
स्त्रियांच्या दृष्टीनं कामाच्या ठिकाणांची सुधारणा केल्यास,
लेबर शॉर्टेज किंवा कामगार टंचाई निश्चितच कमी होऊ शकेल.
लेबर शॉर्टेज अर्थात कामगार टंचाई
Wednesday, July 6, 2011
तरिही वसंत फुलतो
<-- Sudheer Moghe -->
प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो,
तरिही वसंत फुलतो, तरिही वसंत फुलतो
जे वाटती अतूट, जाती तुटून धागे,
आधार जो ठरावा, त्यालाच कीड लागे,
ऋतु कोवळा अखेरी तळत्या उन्हात जळतो,
तरिही वसंत फुलतो, तरिही वसंत फुलतो
<-- Mandar Shinde -->
भासे जरि उदास, आयुष्य हे सुंदर असते,
नजरे-नजरे मधले, हे फसवे अंतर असते,
आयुष्या वीटलो म्हणुनी, मृत्यु का सखा भासतो,
तरिही वसंत फुलतो, तरिही वसंत फुलतो

प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो,
तरिही वसंत फुलतो, तरिही वसंत फुलतो
जे वाटती अतूट, जाती तुटून धागे,
आधार जो ठरावा, त्यालाच कीड लागे,
ऋतु कोवळा अखेरी तळत्या उन्हात जळतो,
तरिही वसंत फुलतो, तरिही वसंत फुलतो
<-- Mandar Shinde -->
भासे जरि उदास, आयुष्य हे सुंदर असते,
नजरे-नजरे मधले, हे फसवे अंतर असते,
आयुष्या वीटलो म्हणुनी, मृत्यु का सखा भासतो,
तरिही वसंत फुलतो, तरिही वसंत फुलतो
तरिही वसंत फुलतो
Monday, June 20, 2011
प्रवास
आठवतो मला सखे तुझा सहवास
धुंद करणारा तुझ्या आठवांचा भास,
सोबती तू येता मग मला असे वाटे
संपू नये कधी असा देखणा प्रवास...
तुझ्याच कुशीत होई मन शांत माझे
तुझ्याच श्वासात हरवती श्वास माझे,
थांबू नये कधी श्वासांची चढाओढ
संपू नये कधी असा देखणा प्रवास...
तुझ्याच डोळ्यांना ठावे माझे सारे भाव
माझ्या आसवांना ठावे फक्त तुझा गाव,
तुझ्या-माझ्या डोळ्यांत हा चाले लपंडाव
संपू नये कधी असा देखणा प्रवास...
घेऊन गेलीस सखे पाखरांची गाणी
माझ्याकडे काय, फक्त तुझ्या आठवणी,
रचतो त्या आठवांची गाणी आता खास
संपू नये कधी असा देखणा प्रवास...
- अक्षर्मन
धुंद करणारा तुझ्या आठवांचा भास,
सोबती तू येता मग मला असे वाटे
संपू नये कधी असा देखणा प्रवास...
तुझ्याच कुशीत होई मन शांत माझे
तुझ्याच श्वासात हरवती श्वास माझे,
थांबू नये कधी श्वासांची चढाओढ
संपू नये कधी असा देखणा प्रवास...
तुझ्याच डोळ्यांना ठावे माझे सारे भाव
माझ्या आसवांना ठावे फक्त तुझा गाव,
तुझ्या-माझ्या डोळ्यांत हा चाले लपंडाव
संपू नये कधी असा देखणा प्रवास...
घेऊन गेलीस सखे पाखरांची गाणी
माझ्याकडे काय, फक्त तुझ्या आठवणी,
रचतो त्या आठवांची गाणी आता खास
संपू नये कधी असा देखणा प्रवास...
- अक्षर्मन
९८२२४०१२४६
प्रवास
यूँ लगता है...
यूँ लगता है तुम, मेरे ही आस-पास हो
यूँ लगता है यह, अब आखरी पडाव हो,
यूँ लगता है अब, सच सारे सपने हो, जब-
पलमें छुप जाती हो, पलमें दिख जाती हो...

यूँ लगता है यह, अब आखरी पडाव हो,
यूँ लगता है अब, सच सारे सपने हो, जब-
पलमें छुप जाती हो, पलमें दिख जाती हो...
यूँ लगता है...
Wednesday, June 15, 2011
कृष्णावतार
माझ्यासाठीही कधी कृष्ण अवतरला होता,
स्वार्थी दुनियेच्या गोंगाटात -
मधुर पाव्याचा सूर बरसला होता...
माझ्यासाठीही कधी कृष्ण अवतरला होता,
एकटेपणाच्या शापाला माझ्या -
रास-लीलेचा उःशाप मिळाला होता...
माझ्यासाठीही कधी कृष्ण अवतरला होता,
मोक्षाची याचना करता करता -
जगण्यातला आनंद अनुभवला होता...
माझ्यासाठीही कधी कृष्ण अवतरला होता...

स्वार्थी दुनियेच्या गोंगाटात -
मधुर पाव्याचा सूर बरसला होता...
माझ्यासाठीही कधी कृष्ण अवतरला होता,
एकटेपणाच्या शापाला माझ्या -
रास-लीलेचा उःशाप मिळाला होता...
माझ्यासाठीही कधी कृष्ण अवतरला होता,
मोक्षाची याचना करता करता -
जगण्यातला आनंद अनुभवला होता...
माझ्यासाठीही कधी कृष्ण अवतरला होता...
कृष्णावतार
Friday, May 20, 2011
Sunday, May 1, 2011
Saturday, April 23, 2011
Tuesday, April 12, 2011
युस बहरचं जबरदस्त मोटरसायकल डिझाईन (Video)
युस बहर आणि फॉरेस्ट नॉर्थ सादर करीत आहेत - मिशन वन, एक सुरेख, शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटरसायकल. त्यांच्या निराळ्या (पण समान) बालपणाच्या स्लाईड्समधून दिसेल, एकत्रित काम करण्यातून जुळलेली त्यांची मैत्री - आणि त्यांनी पाहिलेलं समान स्वप्न.
(Click 'View subtitles' and select 'Marathi')
युस बहरचं जबरदस्त मोटरसायकल डिझाईन (Video)
Sunday, April 10, 2011
Saturday, April 9, 2011
Wednesday, March 16, 2011
Wednesday, March 2, 2011
'वाहवा' - कवी म. भा. चव्हाण

आधुनिक मराठी गझलचे प्रणेते, कवी म.भा.चव्हाण यांच्या 'वाहवा' या गझला, रुबाया आणि शेरोशायरीच्या संग्रहासाठी गझलसम्राट सुरेश भट यांनी लिहिलेली प्रस्तावना -
“श्री. म. भा. चव्हाण ह्यांचा हा पहिला गझलसंग्रह! ह्या संग्रहात त्यांच्या एकूण ५२ निवडक गझला आहेत. मी स्वतः या गझला निवडलेल्या आहेत आणि त्यात वेचक तेवढेच शेर राहू दिलेले आहेत. या संग्रहाच्या निमित्ताने 'गझल' हा एक सुंदर मराठी काव्यप्रकार महाराष्ट्रात लोकप्रिय होऊन रुजायला निश्चित मदतच होणार आहे.
तसा विचार केला तर श्री. म. भा. चव्हाण यांनी आजपर्यंत कविता, पोवाडा, लावणी, अभंगापासून वगापर्यंत सर्वच प्रकार हाताळलेले आहेत. पण माझे स्वतःचे असे मत आहे की, त्यातल्या त्यात त्यांना गझल व लावणी हे दोन काव्यप्रकार फार धार्जिणे आहेत. निखळ मराठी भाषा आणि मराठमोळा अभिव्यक्ती ही चव्हाणांच्या लिखाणाची अंगभूत वैशिष्ट्ये आहेत.
आज मराठी गझल हा नितांत सुंदर काव्यप्रकार महाराष्ट्रातील बहुजन समाजाने, सामान्य जनतेने उचलून धरलेला आहे. रसिक तर आधीपासूनच आहेत; पण उत्तम गझल लिहिणारेही निर्माण होत आहेत.
श्री. म. भा. चव्हाण या नव्या साहित्यिक वस्तुस्थितीचे जिवंत उदाहरण आहेत!
काव्य असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, जो अस्सल असेल तोच शेवटापर्यंत आणि शेवटानंतरही टिकतो; आणि उसने चन्द्रबल आणून काही काळापुरते 'पुढे' येणारे लोक फक्त मागेच जात नाहीत, तर काळाच्या गर्तेत खोल गाडले जातात. त्यांची नावनिशाणीही शिल्लक उरत नाही.
या गझलसंग्रहानंतरचा काळ म्हणजे श्री. म. भा. चव्हाण यांची खरी कसोटी आहे. मराठी माणसांना हा गझलसंग्रह आवडणार आहे, याची दखल घेतली जाईल हे मला ठाऊक आहे; पण हा तर प्रारंभ आहे. चव्हाणांनी याहून अधिक सुंदर लेखन सातत्याने केले पाहिजे आणि स्वतःचे व काळाचे भान ठेवले पाहिजे.
आज श्री. म. भा. चव्हाण यांचा हा गझलसंग्रह आपण वाचत आहात. उद्या फक्त चव्हाणच नव्हेत, तर त्यांच्या पाठोपाठ अनेक प्रतिभाशाली कवींचे गझलसंग्रह मराठी माणसांना वाचायला मिळणार आहेत. इतर काव्यप्रकारांबरोबरच मराठी गझलही महाराष्ट्रात फुलत जाणार आहे.
गझल लिहिणारे कवी इतर कोणत्याही काव्यप्रकाराला दूषणे देत नसतात. दुसर्याला नावे ठेवून स्वतःच्या निर्मितीचा अस्सलपणा आणि मोठेपणा शाबित करता येत नसतो. सर्वांनी आपापल्या परीने लिहावे आणि मराठी मायबोली समृद्ध करावी. मराठी काव्याचे आकाश सार्या काव्यप्रकारांसाठी आहे आणि याउपरही कुणाचा आक्षेप असेल, तर श्री. म. भा. चव्हाण उत्तर देतील -
केलेस तू खरेदी आकाश हे कधी?
माझा पतंग मीही उडवून पाहिला!
माझा पतंग मीही उडवून पाहिला!
श्री. म. भा. चव्हाण ह्यांच्या ह्या गझलसंग्रहामुळे मराठी काव्यक्षेत्रात एक उल्लेखनीय भर पडणार आहे, हे निश्चित.”
- सुरेश भट
'वाहवा' - कवी म. भा. चव्हाण
Friday, January 14, 2011
ज्युलियन असांजः जगाला विकीलीक्सची गरज का आहे? (Video)
वादग्रस्त वेबसाईट 'विकीलीक्स' संवेदनशील अधिकृत कागदपत्रं आणि व्हिडीओ मिळवून प्रसिद्ध करते. संस्थापक ज्युलियन असांज, जे चौकशीसाठी अमेरिकी अधिकार्यांना हवे आहेत, ते बोलताहेत 'टेड'च्या ख्रिस अँडरसन सोबत, ही साईट कशी चालते, तिनं काय साध्य केलंय - आणि त्यांना स्फूर्ती कुठुन मिळते, यांबद्दल.
(Click 'View subtitles' and select 'Marathi')
ज्युलियन असांजः जगाला विकीलीक्सची गरज का आहे? (Video)
Tuesday, January 11, 2011
ज्युलिया स्वीनी यांचं "ते" संभाषण
जेव्हा ज्युलिया स्वीनींच्या ८ वर्षांच्या मुलीनं बेडकांच्या प्रजननाबद्दल शिकण्यास सुरुवात केली - आणि त्यानंतर हुशारीनं काही प्रश्न विचारले, तेव्हा सत्यकथनाचा कितीही प्रयत्न केला तरी ज्युलिया स्वीनींना शेवटी धडधडीत खोटं बोलावंच लागलं.
(Click 'View subtitles' and select 'Marathi')
ज्युलिया स्वीनी यांचं "ते" संभाषण
सुनिता कृष्णनचा लैंगिक गुलामगिरीविरुद्धचा लढा (Video)
सुनिता कृष्णन यांनी आपलं आयुष्य वेचलं स्त्रिया आणि मुलांना मुक्त करण्यासाठी लैंगिक गुलामगिरीतून, जो एक करोडो रुपयांचा वैश्विक बाजार आहे. या साहसपूर्ण भाषणात, त्या सांगताहेत तीन जबरदस्त गोष्टी, सोबत स्वतःची कथा सुद्धा, आणि या तरुण पिडीतांना त्यांचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी अधिक माणुसकीच्या दृष्टीकोनातून मदत करण्याचं आवाहनही करताहेत.
(Click 'View subtitles' and select 'Marathi')
सुनिता कृष्णनचा लैंगिक गुलामगिरीविरुद्धचा लढा (Video)
स्वामी दयानंद सरस्वतीः करुणेचा अभ्यासपूर्ण शोध
स्वामी दयानंद सरस्वतींनी, वैयक्तिक विकास व करुणेच्या जाणीवेचे समांतर मार्ग आपल्यासमोर उलगडले आहेत. असहाय्य अर्भकावस्थेपासून, इतरांची काळजी घेण्याइतपत निर्भय होण्यापर्यंतच्या आत्मबोधाच्या सर्व पायर्या ते आपल्याला दाखवतात.
(Click 'View subtitles' and select 'Marathi')
स्वामी दयानंद सरस्वतीः करुणेचा अभ्यासपूर्ण शोध
इमाम फैजल अब्दुल रौफः अहंकार सोडा, दयाळू बना
इमाम फैजल अब्दुल रौफ, कुराण, रुमीच्या कथा, आणि मोहम्मद व येशूच्या उदाहरणांतून दाखवून देतात की, आपल्यातील प्रत्येकाला दयाळू बनण्यापासून रोखणारी एकच गोष्ट आहे - आपण स्वतः
(Click 'View subtitles' and select 'Marathi')
इमाम फैजल अब्दुल रौफः अहंकार सोडा, दयाळू बना
नंदन निलेकणी यांच्या भारताच्या भविष्याबद्दलच्या कल्पना (Video)
आउटसोर्सिंगमध्ये अग्रेसर असलेल्या 'इन्फोसिस'चे दूरदर्शी प्रमुख कार्यकारी अधिकारी, नंदन निलेकणी, भारताची सध्याची प्रगतीची घोडदौड सुरू राहिल की नाही, हे ठरविणार्या चार प्रकारच्या कल्पना समजावत आहेत.
(Click 'View subtitles' and select 'Marathi')
नंदन निलेकणी यांच्या भारताच्या भविष्याबद्दलच्या कल्पना (Video)
शुक्ला बोसः एका वेळी एका मुलाचं शिक्षण (Video)
शुक्ला बोस यांच्या मते, गरीबांचं शिक्षण म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नव्हे. त्या आपल्या परिक्रमा ह्युमॅनिटी फाउंडेशनबद्दल सांगत आहेत, जे निराशाजनक आकडेवारीच्या पलीकडं जाऊन आणि प्रत्येक मुलाला स्वतंत्र व्यक्ती मानून, भारतातील झोपडपट्ट्यांमध्ये आशेचा किरण आणत आहे.
(Click 'View subtitles' and select 'Marathi')
शुक्ला बोसः एका वेळी एका मुलाचं शिक्षण (Video)
केन रॉबिन्सन म्हणतात - शाळा मारुन टाकतात निर्मितिक्षमता (Video)
सर केन रॉबिन्सन एका मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण संभाषणातून मांडत आहेत संकल्पना एका अशा शिक्षण व्यवस्थेची जिथं निर्मिताक्षमता (दडपली जाण्याऐवजी) जोपासली जाते.
(Click 'View subtitles' and select 'Marathi')
केन रॉबिन्सन म्हणतात - शाळा मारुन टाकतात निर्मितिक्षमता (Video)
Monday, January 3, 2011
Home Away From Home (Short Story)
Tushar was packing up for the day. Almost all of his assignments were near completion and he was getting ready for a week-long holiday.
It was his first year away from home and he was feeling quite homesick. He was missing his family so much and was always looking for a reason to be with them. Every festival in last few months had left him craving for celebration and his weak point, home-made delicacies. This time, he got his leave sanctioned well in advance, booked his tickets, did shopping for mom & papa, and was just waiting for next week to pass. This 15th January, he would be with his family celebrating Sankrant and enjoying mom-made sweets.
Thinking of his holiday plans, Tushar habitually refreshed his Inbox before shutting down his PC. Couple of new e-mails appeared. He ignored weekly maintenance notices from IT Dept and proceeded to check the last e-mail. It was from his manager, probably asking him to submit next week's schedule in advance. Tushar opened the e-mail with subject - “Urgent & Important!”
From: madhav.k@in2solutions.in
To: tushar.j@in2solutions.in, sandip.s@in2solutions.in
Cc: vaishali.d@in2solutions.in
Date: Friday, January 7, 2011, 5:57 PM
Subject: Urgent & Important!
Team,
Just to update you, I will be leaving for the 3-day conference on Monday. We have been invited for another conference in the same city next week. I would extend my stay and cover both the conferences. I would be back by 20th of this month.
Tushar,
Received your presentation. Appreciate your efforts & skill in pulling out all details so fast. This is going to help me a lot in the Outsourcing Managers' Conference! I would also like you to handle the client visit in my absence next week.
I will be available through e-mails & phone, in case you need any help.
Regards,
Madhav K
Manager – Operations
In2Solutions Pvt Ltd
Tushar read and re-read the e-mail in disbelief. All his plans were ruined in seconds. The holiday planning, train booking, festival shopping, all in vain! He re-read the e-mail to see if he could find a way out. Madhav, his manager, would be out of office; and Sandip or Vaishali, his colleagues, were too new to handle client visit. This obviously compelled him to cancel his leave and stay back with the work.
He sat there for some more time thinking about all his plans. When he could not think of any solution, he just replied the e-mail with an “Ok.”, shut his PC down and left for home.
Back home, Tushar called up his parents to inform the change in plan. His mother was very disappointed to hear that his leave was canceled. She had planned to prepare his favourite Gool Poli for Sankrant. But now, he was telling that he would not come. Tushar avoided talking in detail with his mother, as he himself was upset. He cut the conversation short and switched on his laptop to check personal e-mails.
While going through his Inbox, he could not keep his favourite food out of his mind. He opened a new window and googled “gool poli”. Along with many links to Gool Poli recipes, he found something different. It read -
“Khawakee - Love of Eating: Gool Poli on order...”
Being curious, Tushar clicked the link and whoa! He was taken to the world of special festival delicacies. Puran Poli, Ukadiche Modak, Khajachi Karanji, and yes, his favourite Gool Poli, too! He saw the actual product photographs and decided to call them first thing in the morning.
“Hello, is it Khawakee?”
“Yes, what do you want to order?”
“I found your website and saw Gool Poli photos. Can I order them for Sankrant next week?”
“Sure! You must have checked the rate and other details on our website. How many Poli's would you like to order?”
“I'd like to have 10 Poli's... no, make it 15, my roommates would also have. 15 Gool Poli's. Where do I collect them from?”
“No need to collect. They will be delivered to your home on specified day. Please give me your name and address.”
“What?? You'll deliver them at my place? Can't believe it! I'm not ordering pizza. It's Gool Poli, right?”
“Yes, you will receive your order at your place! We deliver Gool Poli, Puran Poli, Ukadiche Modak, all fresh items, at your doorstep.”
“And what about payment? Do I need to make any advance payment to you?”
“No advance! Just pay on delivery.”
“My goodness! So happy to hear that. Have to tell mom 'bout this! Please take down my address...”
“Yes, please!”
Tushar gave his address, contact number and confirmed his order details. As soon as this call ended, he called up his mom to tell her what he had found out. His mother, too, didn't believe what he was telling. But, she was happy to hear her son's cheerful voice. “Let's hope you get what you want,” was all she said.
Tushar was so excited about next Saturday, the Sankrant festival, that he forgot his ruined holiday plan and resumed to work on Monday.
The next Saturday, at the time specified by him, Tushar received his order of 15 Gool Poli's. He was so happy to see nicely packed sets of fresh mouth-watering Poli's. Just couldn't wait for tasting them. His roommates, too, liked the tasty Poli's and Tushar called up mom to tell her how happy he was.
He also called up Khawakee later in the day.
“Hello, this is Tushar.”
“Hello, thanks for your order. Hope you liked our Poli's”
“Absolutely! All of us liked them and would love to order more. Do you prepare these Poli's after Sankrant festival?”
“Yes, all of these items are prepared and delivered throughout the year.”
“Wow, that's great! Then I would like to order 20 Gool Poli's for next month, when I leave for my hometown. I want them for my mom. I'll confirm the date once my leave is sanctioned. Is that ok?”
“Sure, do let us know your schedule at your convenience!”
“Thanks, Khawakee!”
Home Away From Home (Short Story)
Subscribe to:
Posts (Atom)









