ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, March 9, 2020

SMC GR Simplified

संवादाची सोपी भाषा…

मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या पालकांचा सहभाग घेण्यासाठी 'शाळा व्यवस्थापन समिती' हा प्रकार अस्तित्वात आला. समितीचे सदस्य होणाऱ्या पालकांना शाळेसंदर्भात काही अधिकार आणि जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. पण गंमत म्हणजे, पालकांनाच या प्रकाराची माहिती नीटशी कळालेली नसते, मग ते अधिकार वापरणार कसे आणि जबाबदारी पार पाडणार कशी?

पालकांना या समितीची रचना, कार्ये, महत्त्व समजावून सांगण्यासाठी शाळा पातळीवर त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. शासनाकडून, शाळेकडून, काही संस्थांकडून हे काम गेल्या दहा वर्षांपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरु आहे. पण महाराष्ट्र राज्याचा आणि त्यातल्या शाळांचा आवाका लक्षात घेतला तर हे काम किती अवघड आहे याची कल्पना येईल.

गडचिरोली जिल्ह्यातल्या घाटी, रांगी, मार्कंडादेव, अशा काही आश्रमशाळांमध्ये गेलो होतो. आश्रमशाळेमध्ये आजूबाजूच्या परिसरातली मुलं-मुली शिकण्यासाठी राहतात, त्यांच्या पालकांशी 'शाळा व्यवस्थापन समिती'बद्दल चर्चा करायची होती. ही चर्चा आधारलेली होती महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागानं १४ डिसेंबर २०१८ तारखेला काढलेल्या शासन निर्णयावर.

शासन निर्णय नावाच्या डॉक्युमेंटला मराठीत जी.आर. असं म्हणतात. तर या जी.आर.च्या प्रथम पृष्ठावरील प्रथम परिच्छेदातील (म्हणजे पहिल्या पानावरच्या पहिल्या पॅराग्राफमधली) काही शब्द/वाक्यरचना उदाहरणादाखल अशी आहे - 

व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक, वरिष्ठ 
पातळीवरून मंजुरी, विलंबित निर्णयांचा विपरित परिणाम, सर्वसमावेशक शासन निर्णय निर्गमित करण्याचे प्रस्तावित, वगैरे वगैरे...

तर शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी, म्हणजे पालकांशी चर्चा करण्याआधी एक महत्त्वाचं काम करायला लागणार होतं, ते म्हणजे हा जी.आर. मराठीत ट्रान्सलेट करणं. सोप्या, सुटसुटीत, आणि लक्षात राहील अशा पद्धतीनं अधिकृत माहिती कशी सांगता येईल असा विचार करत होतो. शेकडो वर्षांपूर्वी समाज साक्षर नसताना, संपर्काची माध्यमं उपलब्ध नसताना, सगळ्या लोकांपर्यंत महत्त्वाचे विचार कसे पोहोचवले जात होते, हे आठवलं आणि तीच पद्धत पुन्हा वापरायचा मोह झाला.

शासकीय आश्रमशाळा
'शाळा व्यवस्थापन समिती' रचना

समिती करावी स्थापन। शाळेचे करण्या व्यवस्थापन।
पालक शिक्षक मिळून। चालवावी शाळा॥

शासनाचा असावा सहभाग। निधी पुरवावा आवश्यक।
मार्गदर्शक नि प्रशिक्षक। रहावी भूमिका॥

पालकांची समिती प्रथम। शिकवून करावी सक्षम।
मुलांसाठी सर्वोत्तम। निर्णय घ्यावा॥

मुलांच्या हिताची खातरी। पालक समितीची जबाबदारी।
त्यासाठी नसावी जरुरी। शासन मंजुरी॥

निर्णयांच्या ठेवी नोंदी। जमाखर्च हिशेब मांडी।
मुख्याध्यापकांची मोठी। जबाबदारी॥

निधी जमा होई। समितीच्या बँक खाती।
खर्च झाला पुन्हा येई। निरंतर॥

मूल ज्याचे शाळेत। तोच होई अध्यक्ष।
आमदार नि खासदार। मागे राही॥

मुख्याध्यापक अधीक्षक। सचिव आणि सहसचिव।
बैठक चर्चा निर्णयांची। व्यवस्था करिती।

विद्यार्थी आणि विद्यार्थिनी। मुलांचे हे प्रतिनिधी।
समस्या नि सूचना मांडती। ठामपणे॥

एक सदस्य स्थानिक। शोधावा तो जाणकार।
यंत्रणा योजना प्रक्रियांवर। भाष्य करी॥

एकूण सदस्य अठरा-वीस। पैकी बारा पालक।
सहा तरी किमान। महिला असाव्या॥

समितीची करावी रचना। दोन वर्षांनी पुन्हा पुन्हा।
नवनवीन पालकांना। संधी मिळावी॥

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष। दोघांचेही शिक्षण।
लेखन आणि वाचन। आवश्यक॥

समितीचे जे जे सदस्य। ओळख त्यांची विशेष।
सर्वांना मिळावे अवश्य। ओळखपत्र॥

गडचिरोली जिल्ह्यातल्या रामगड, येंगलखेडा, सोनसरी, कोरची, कारवाफा, येरमागड, सोडे, भाकरोंडी, कुरंडीमाल, पोटेगाव, अशा दुर्गम गावांमधून आलेल्या पालकांशी या पद्धतीनं संवाद साधता आला. यातून मिळालेल्या माहितीचा प्रत्यक्ष किती उपयोग केला जातोय, हे स्थानिक संस्था अपेक्षा सोसायटी आणि संबंधित आश्रमशाळांचे मुख्याध्यापकच सांगू शकतील. पण जी.आर.मधून शासनाला नक्की काय सांगायचंय हे आम्हाला समजलं, असं पालकांना तरी वाटत होतं.

तुम्हाला काय वाटतंय?

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
(संदर्भः महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दि. १४ डिसेंबर २०१८)


Share/Bookmark

Evadhe Lakshat Theva (Ghazal by Vinda Karandikar)


"एवढे लक्षात ठेवा" (गजल)
- विंदा करंदीकर


Share/Bookmark

Saturday, March 7, 2020

Baai (Poem)

“बाई”

पुरुष म्हणून जन्माला आल्यानं
मला आपोआप मिळालेला मोठेपणा
आणि बाई म्हणून जन्मल्यानं
तुझ्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या,
समानतेच्या गप्पा मारत स्वीकारलं
आपण सोयीस्करपणे जसंच्या तसं…

यात दोष ना तुझा ना माझा
दोष फक्त व्यवस्थेचा!

आणि व्यवस्था बदलणं म्हणजे
सोपी गोष्ट नव्हे…
त्याला लागतील शंभर-दीडशे
कदाचित पाचशे वर्षं.

एवढी मोठी लढाई तू नाही,
मीच लढू शकतो तुझ्यासाठी…

कारण मला फक्त गायची आहेत
गाणी तुझ्या क्रांतीची..
द्यायचे आहेत शब्द
तुझ्या व्यथा आणि वेदनांना..
मांडायची आहेत दुःखे तुझी
जाहीर सभा-भाषणांतून..
शे-दीडशे कदाचित पाचशे वर्षं…

एवढी मोठी लढाई तू नाही,
मीच लढू शकतो तुझ्यासाठी…

कारण तुला प्रत्यक्ष भोगायच्या आहेत
त्या व्यथा आणि वेदना.
आणि पुरवायचे आहेत शब्द
माझ्या भाषणांना आणि गाण्यांना.
ती गाणी ऐकत सोसत राहशील सारं
शे-दीडशे कदाचित पाचशे वर्षं
कधीतरी व्यवस्था बदलेल या आशेवर.

व्यवस्था बदलेल की नाही कोणास ठाऊक
पण एक दिवस मी जन्मेन बाई म्हणून
आणि तू जन्म घे पुरुष होऊन.
मग पाचशे वर्षं गायलेली गाणी
मी जगून बघेन पन्नास वर्षं.
एवढीशी खळबळ माजली व्यवस्थेत
तरी पुरे पाचशे वर्षांमध्ये…

- अक्षर्मन ९८२२४०१२४६


Share/Bookmark

Thursday, March 5, 2020

Ajunahi (Poem)

"अजूनही…"

अजूनही मोडकं-तोडकं
जुनं-पानं काहीतरी
वही, पाकीट, बुकमार्कसारखं
बनवत राहतो घरच्या घरी.
बाजारात विकत मिळतंच सगळं
वस्तू, जागा, माणसं, नाती..
तरीही त्याला मुद्दामच हौस
विकतपेक्षा बनवलेलीच बरी!
पाठकोरे कागद, पुडीचा दोरा,
गिफ्ट रॅप पेपर, तिकीटं, टाचणी..
वापरणार कधी ठाऊक नाही
साठवून तरी ठेवलीत खरी.
बाहेरचे हसतात, घरचे चिडतात
दरिद्री, कंजूष लक्षणं अशी..
म्हणतात, जगासोबत चालू नकोस
पण जगाकडं एकदा बघ तरी.
बघ, जग पुढं गेलंय... बघ
विज्ञान, तंत्रज्ञान, विकास, प्रगती...
तो म्हणतो, छान! लिहून ठेवेन
आणि बाहेर काढतो एक लाल डायरी.
आजची तारीख टाकतो पानावर
आणि लिहितो फक्त दोन ओळी -
'माणसाचं मशीन झालंय बहुतेक
माझी इच्छा नाही अजून तरी...'
मग पुन्हा मोडकं-तोडकं
जुनं-पानं काहीतरी
ग्रिटींग कार्ड, पेन स्टँडसारखं
बनवत बसतो घरच्या घरी…

- अक्षर्मन (९८२२४०१२४६)


Share/Bookmark

Sunday, February 23, 2020

Bifurcation of States

Thoughts about Bifurcation of States in India

Bifurcation of a large state causes significant change in its economic pattern.

Common arguments in support of bifurcation are:
Scope for a better, decentralized and participatory development process. Citizens’ hopes and desires are more effectively reflected in the policies of new state. Local residents enjoy exclusive control over resources available in the new state. Compact size of the state enables easier administration.

Although these justifications are not incorrect, a fundamental question still remains as: Limited economic base is going to limit developmental capabilities of the new state, isn’t it?

Therefore, these smaller states with limited economic capabilities remain dependent upon the Central Government for financial aid. So, the new state achieves political autonomy at the cost of economic autonomy. Is it really worth?

What if the process of bifurcation is going to limit the financial capabilities of new state? How will the newborn state generate revenue to achieve desired development? Isn’t that contradictory to the claim of ‘bifurcating larger states into multiple smaller states with the intention of achieving swift and balanced model of development’?

Flexible and rich revenue generating sources are centrally controlled by the Central Government and the smaller states keep expecting to receive financial aid for their own development. Does this comply with the federal structure of Indian states?

(Reference: Article by Mr. Abhay Tilak, Maharashtra Times, 20th November 2011)


Share/Bookmark

Smaller States Crisis

“…मोठ्या राज्याचे विभाजन घडवून आणण्याने त्या भूभागाच्या अर्थकारणाचा पॅटर्नच मुळापासून बदलून जातो. त्याचा परिणाम नव्याने अस्तित्वात येणाऱ्या राज्यांच्या आर्थिक आणि वित्तीय प्रकृतीवर अपरिहार्यपणे होतो. या सगळ्या गोष्टींचा आणि बदलांचा थेट संबंध नवनिर्मित राज्यांच्या विकास प्रक्रियेशी असतो. राज्य लहान असेल तर विकेंद्रित आणि सहभागात्मक विकासाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबवता येते, राज्यातील नागरिकांच्या आशा-अपेक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या विकासविषयक धोरणांमध्ये अधिक यथार्थपणे डोकावणे शक्य बनते, राज्यापाशी उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीवर स्थानिकांचेच नियंत्रण राहते, हे राज्य आकारमानाने आटोपशीर असेल तर तुलनेने अधिक सहजसुलभ बनते… अशा प्रकारची आर्थिक आणि विकाससंबद्ध समर्थने छोट्या राज्यांच्या निर्मितीचा पाठपुरावा करताना दिली जातात. ही सगळी स्पष्टीकरणे चुकीची अजिबात नाहीत; परंतु तरीही एक मूलभूत प्रश्न उरतोच. मोठ्या राज्याच्या विभाजनाद्वारे नव्याने अस्तित्वात आलेल्या, आकारमानाने लहान असणाऱ्या राज्यांचा आर्थिक पायाही जर आपातत्रः मर्यादितच असेल तर त्याचा प्रतिकूल परिणाम राज्याच्या विकासविषयक क्षमतांवर जाणवावा, हे ओघानेच येते. मग, अशा मर्यादित आर्थिक ताकद असलेल्या राज्यांना वित्तीय साहाय्यासाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहणे भाग पडते. म्हणजेच, राजकीय स्वायत्तता प्राप्त झाली तरी आर्थिक आणि वित्तीय स्वायत्तता धोक्यात येते. मग, या राजकीय स्वायत्ततेला व्यवहारात कितपत अर्थ उरतो? मुळात विभाजनामुळे आर्थिक क्षमताही जर मर्यादितच बनत असतील तर मग आर्थिक विकासासाठी त्या नवनिर्मित राज्याने पैसा आणायचा कोठून? निधीअभावी पुन्हा विकास रखडणारच असेल तर, ‘आर्थिक विकासाची प्रक्रिया गतिमान आणि संतुलित बनण्यासाठी मोठ्या राज्यांचे विभाजन करुन आकाराने लहान लहान असणारी राज्ये  निर्माण केली जावीत,’ या प्रतिपादनालाही मर्यादा पडतात. दुसरे म्हणजे, लवचिक आणि मुबलक महसूल देणारी साधने केंद्रसरकारच्या हातात एकवटलेली आणि त्याच केंद्राच्या अर्थसाह्यावर विसंबलेली आकाराने लहान असणाऱ्या राज्यांची पिलावळ आशाळभूतपणे केंद्रसरकारच्या तोंडाकडे बघते आहे, ही रचना निकोप संघराज्यपद्धतीचे गमक मानता येईल का, हा तात्विक प्रश्न उभ राहतो तो वेगळाच!”

- अभय टिळक
(महाराष्ट्र टाइम्स, २० नोव्हेंबर २०११)



Share/Bookmark

Friday, February 21, 2020

Shubh Mangal Zyada Saavdhan

"Do we see a love story between a boy and a girl and call it a heterosexual love story? Then why should we see a romance between a man and a man and call it a homosexual love story? It doesn’t make sense, does it?" asks Stutee Ghosh on The Quint.

So,
#ShubhMangalZyadaSaavdhan is just another love story you must watch. It talks about love, it talks about trust, it talks about family, it talks about relationships, and it talks in a natural as well as scientific yet comic language understood by Indians across all generations and all regions. Most importantly, it does not portray homophobic parents as 'villain in the love story'. It rather shows their confused and worried side in a very sensitive manner.

Director Hitesh Kewalya, Actor Ayushmann and entire team of Shubh Mangal Zyada Saavdhan deserve applause for their great work.

A must watch!




Share/Bookmark