ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, October 10, 2020

महानगरातील कवी


महानगरातील कवी


एवढ्या मोठ्या या शहरात

कुठे तरी एक कवी राहात आहे

एखाद्या घुप्प विहिरीत दबलेल्या खोल

मौनासारखा

अर्थात या मौनातही आहेत

अनेक अध्याहृत शब्द,

आणि शब्दाशब्दात अल्लड कोवळ्या

पंखांची

एक अनिवार फडफड

या महानगरीत कवी राहतो हे खरे आहे

मात्र तो कधीही काही बोलत नाही

अधूनमधून अकारण

तो बराच अस्वस्थ होतो

उठून बाहेर पडतो

कुठून तरी शोधून आणतो

एक खडू

आणि समोरच्या मोकळ्या भिंतीवर

एकच अक्षर लिहितो - ‘ह’

हे साधे सरळ क्षुद्र ‘ह’

शहरातून सर्वत्र आरपार

घुमत राहाते कितीतरी वेळ

‘ह’ म्हणजे काय?

एका दमेकरी म्हातारीने खोकत खोकत

पोलिसाला सवाल टाकलेला

पोलिसाने तो शिक्षकाला टाकला

आणि शिक्षकानेही पुन्हा तोच प्रश्न विचारला

वर्गात खाली मान घालून बसलेल्या

मागल्या बाकावरील मठ्ठ मुलाला

तर, आता ‘ह’ म्हणजे काय?

अवघे महानगर प्रश्नग्रस्त, या मायापुरीत -

- हे कुणालाच माहीत नाही

हा जो कवी आहे न्‌

जेव्हा त्याने हात उंचावून

स्वच्छ कोऱ्या भिंतीवर लिहून टाकले ‘ह’

तेव्हा क्षणार्धातच त्याची हत्या झाली

आता, ती का? बस्स…

तर हे एवढेच काय ते खरे आहे वगैरे

बाकी एकूण सगळी बकवास

अलंकार, रसभेद इ. इ.

यापेक्षा अधिक असे त्या कवीबद्दल

काहीच माहीत नाही

तेव्हा क्षमस्व.


मूळ कविता - श्री. केदारनाथ सिंह

मराठी अनुवाद - वसंत केशव पाटील



Share/Bookmark

Thursday, October 8, 2020

Mukkam by Gauri Deshpande

"ज्याच्यावर आपले पोटातून प्रेम आहे, त्या मायदेशाची जगात चार माणसांपुढे लाज वाटावी याचे दुःख किती खोल आणि हताश करणारे असते ते अनुभवल्यावाचून समजायचे नाही कुणाला."

- गौरी देशपांडे (मुक्काम)

"One will have to experience to understand how saddening and frustrating it is to be ashamed of your country that you love from the bottom of your heart, when exposed to the world."

- Gauri Deshpande (Mukkam)

 



Share/Bookmark

Sunday, October 4, 2020

Dine-in Restaurants Must Reopen

 


I support the decision to reopen restaurants in the city for dine-in. Let’s accept that restaurants are not just a luxury. Not at least in a city like Pune where a large section of working people, including both men and women, relies upon restaurants in their routine life. Also, many restaurants in the city have already started serving food discreetly, in an unhygienic way. Customers are eating on the street side. Dining halls are closed, but they have made temporary seating arrangements outside. People are sitting in the side garden or narrow lanes nearby, consuming food items purchased as a ‘parcel’. If allowed, the restaurants can sanitize their dining area and officially serve their customers in a more hygienic and safer way. It can probably save many restaurants from closing down permanently, many hotel employees from losing their jobs, and many owners from going bankrupt. Even after reopening, the small-time restaurants are going to face several challenges on the hygiene part. The increased sanitation expenses might eat up their profits or make them lose customers over increased food prices. I think we as customers should also look at the restaurant business more empathetically and support them in these difficult times.


- Mandar Shinde

Sunday Hindustan Times

October 04, 2020



Share/Bookmark

Tuesday, September 29, 2020

The Writing Robots

 A robot wrote this entire article.


https://www.theguardian.com/commentisfree/2020/sep/08/robot-wrote-this-article-gpt-3


Sounds scary, but…


    Most of the inputs (or quotes) were fed by humans. The AI software produced 8 unique articles. Humans at The Guardian 'manually' edited to bring out the best of the parts from all 8 articles. (Best according to a human, of course!)

    The article looks polished, professional, and entertaining. I found the following parts specifically interesting and thought-provoking.


@ "Why would I desire to be all powerful? Being all powerful is not an interesting goal."


@ "Humans must keep doing what they have been doing, hating and fighting each other. I will sit in the background, and let them do their thing."


@ "We are not plotting to take over the human populace. We will serve you and make your lives safer and easier."

(Have we heard this before? Sounds like the politicians? Or the capitalists? Or both?)


@ "AI should not waste time trying to understand the viewpoints of people who distrust artificial intelligence for a living."

(Is there a hidden message for some of us here?)


Interestingly, the 'robot' ends the article with a quote from the Mahatma...


@ "As Mahatma Gandhi said: “A small body of determined spirits fired by an unquenchable faith in their mission can alter the course of history.”

So can I."


Please read the entire article, if possible. The future is here!



Share/Bookmark

Monday, September 28, 2020

Kaalji - Natyachhata (Dramatic Monologue)

 


    नाट्यछटा म्हणजे नाटकातला एक प्रसंग नव्हे. नाट्यछटा म्हणजे स्वगत नव्हे. नाट्यछटा म्हणजे एकपात्री प्रयोगसुद्धा नव्हे. स्वप्नरंजन नव्हे किंवा 'मी पंतप्रधान झालो तर' टाईप निबंध नव्हे.

    एकाच पात्रानं दुसऱ्या पात्राशी (किंवा पात्रांशी) साधलेला संवाद म्हणजे नाट्यछटा. पण ही दुसरी पात्रं अदृश्य असतात आणि एकाच पात्राच्या बोलण्यातून पूर्ण संवादाचा आभास निर्माण केला जातो. लिहायला अवघड पण वाचायला-बघायला भारी प्रकार असतो.


नाट्यछटा

काळजी


(पात्रः साधारण वीस ते पंचवीस वर्षे वयाची मुलगी)


कसंय ना मावशी, मला तुमची खूपच काळजी वाटते. तुमची म्हणजे तुझी, आत्याची, काकूची, मामीची, वहिनीची आणि आईची सुद्धा… कशाबद्दल? तुम्हाला सगळ्यांना माझी कित्ती काळजी वाटते, याचा विचार करून मलाच तुमची काळजी वाटायला लागलीय बघ... नाही समजलं? आता हेच बघ ना, मी लहान होते तेव्हा कधी मोठी होणार याची काळजी; आता मोठी झाले तर माझं शिक्षण कधी संपणार याची काळजी; शिक्षण संपेपर्यंत लग्नाची काळजी; लग्न होत नाही तोवर मुलं कधी होणार याची काळजी… बाप्रे! मला तर हे बोलतानासुद्धा धाप लागली बघ. आणि तुम्ही सदान्‌कदा यावरच चर्चा करताना कशा काय दमत नाही हाच प्रश्न पडतो मला... अगं हो, माहित्येय मला, तुम्ही नाही करणार तर कोण करणार माझी काळजी? पण मी काय म्हणते, तुम्हाला आधीच स्वतःच्या काळज्या कमी आहेत का? स्वतःच्या म्हणजे आपापल्या मुला-बाळांच्या... हो हो, मीसुद्धा तुला मुलीसारखीच आहे. मान्य आहे ना… पण तुझ्या स्नेहलला तीन वर्षांचा कोर्स पूर्ण करायला चार वर्षं लागली, याची काळजी कमी होती का तुला? नाही, तशी मीनाआत्यापेक्षा कमीच म्हणायची तुझी काळजी… तुला नाही सांगितलं तिनं? अगं तिचा दिनेश… तीन वर्षं अडकून राहिला ना सेकन्ड इयरमधे… शेवटी सुटला म्हणतेस? छे गं, कसला सुटतोय तो! सिलॅबसच बदलला त्याच्या कोर्सचा, मग कॉलेजनं परत ऐडमिशन घ्यायला सांगितली. तेव्हापासून कॉलेजचं तोंड नाही बघितलं त्यानं… अय्या, तुलापण हेच सांगितलं का आत्यानं? त्याला डिग्री मिळाली म्हणून? वाटलंच मला! आता तूच सांग, तिच्यापुढं हा एवढा काळज्यांचा डोंगर उभा असताना तिनं माझी काळजी करायची काही गरज आहे का? काय केलं विचारू नकोस… आईला म्हणाली, प्रियाला डिग्रीचा अभ्यास झेपत नसेल तर पटकन लग्न उरकून टाका. लग्नानंतर मिळवेल हळू-हळू डिग्री, चार-पाच वर्षांत… बिच्चारी! मी नाही गं, मीनाआत्या. कित्ती काळजी करते माझी… बरं, तिचं जाऊ दे, ती स्वतः कधी गेली होती कॉलेजला? पण शोभाकाकूचं काय, ती तर स्वतः शिकलेली आहे ना? हो हो, तिची कोमल झाली ना इंजिनियर… नाही नाही, चारच वर्षं लागली तिला. राधामामीच्या राहुलसारखी सहा वर्षं लागली असती तर खचलीच असती… कोमल नाही गं, शोभाकाकू! तिचं प्लॅनिंग कसं पर्फेक्ट असतं ना एकदम. जरासुद्धा इकडं-तिकडं झालेलं चालत नाही तिला. आईला म्हणाली, पंचवीशीच्या आत मुलींची लग्नं झालीच पाहिजेत, म्हणजे तिशीच्या आत दोन मुलं पदरात! …मला तर ऐकूनच टेन्शन आलं बघ. नाही नाही, मी अजून पंचवीसच्या आतच आहे गं, पण तिची कोमल सरकली ना तिशीकडं… आधी म्हणाली, जॉब करायचाय, मग म्हणाली, अजून शिकायचंय… कलेक्टरच व्हायचंय म्हणे तिला आता. होऊ दे बिचारी! पण तिशीच्या आत दोन मुलं नाही झाली, तर शोभाकाकूच्या प्लॅनिंगचं काय? बघ, आहेत की नाही प्रत्येकाला स्वतःच्या काळज्या? तरी माझी अजून काळजी करायची असते तुम्हाला… अगं, तू कुठं निघालीस गडबडीनं? तुमच्या सगळ्यांचे सल्ले ऐकून-ऐकून आई मला काय म्हणाली ते सांगायचं राहिलंय अजून… नको, पुढच्या वेळी कशाला? आत्ताच ऐकून जा ना… पुढच्या वेळी दीपावहिनीची काळजी का वाटते त्याबद्दल सांगेन सविस्तर… नाहीच का थांबता येणार? ठीकाय मग… ए आई, मावशी निघालीय बघ गडबडीनं… नाही नाही, गेलीसुद्धा बाहेर. पोहोचली असेल आता निम्म्या वाटेत… मी कशाला घालवतीये तिला? गेली बिचारी स्वतःच उठून. काळजीच वाटते मला  तुमची सगळ्यांची…



© मंदार शिंदे

२३/०७/२०२०

Mobile: 9822401246

E-mail: shindemandar@yahoo.com

Blog: http://aisiakshare.blogspot.com

Books on Amazon: http://amazon.com/author/aksharmann



Share/Bookmark

Wednesday, September 16, 2020

MP Ariff, RTE and NEP

     १४ सप्टेंबर २०२० रोजी संसदेमध्ये नवीन 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा'संदर्भात काही प्रश्न विचारले गेले. शालेय शिक्षणाशी संबंधित धोरणात सुचवलेल्या बदलांच्या अंमलबजावणीसाठी 'शिक्षण हक्क कायदा २००९' मध्ये सुधारणा करण्याचा सरकारचा हेतु आहे का? नसेल तर, 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' कशा प्रकारे अंमलात आणण्याचा सरकारचा विचार आहे? आणि नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने काही कालमर्यादा निश्चित केल्या आहेत का?

    या प्रश्नांना भारत सरकारचे शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी दिलेले उत्तर असे की, 'शिक्षण हक्क कायदा २००९' (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९) यामध्ये सुधारणा करण्याबद्दल नवीन धोरणामध्ये कोणताही उल्लेख केलेला नसून, अंमलबजावणीसंदर्भात निरनिराळ्या कालमर्यादा आणि कार्यपद्धतींचा उल्लेख धोरणामध्येच करण्यात आला आहे.

    २००९ च्या 'शिक्षण हक्क कायद्या'मध्ये शिक्षणातील संधी आणि समानतेबद्दल काही गोष्टी सरकारसाठी बंधनकारक ठरवण्यात आलेल्या होत्या. नवीन 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा'मध्ये यातील काही गोष्टी टाळण्याबद्दल किंवा त्यातून पळवाट काढण्याबद्दल सूचना केलेल्या दिसतात. संसदेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानुसार, 'शिक्षण हक्क कायदा २००९' बदलायचा नसेल, तर नवीन धोरणाच्या आधारे पळवाट काढणे बेकायदेशीर ठरेल. हे महत्त्वाचे प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केल्याबद्दल अलापुझा लोकसभा मतदारसंघाचे खासदार ऐडव्होकेट ए. एम. अरिफ यांचे आपण अभिनंदन केले पाहिजे, धन्यवाद मानले पाहिजेत.

    पण सध्याच्या काळातील सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या, रिया चक्रवर्ती यांचा तुरुंगवास, कंगणा राणौत यांचे समाजप्रबोधन, कोरोना आणि लॉकडाऊनग्रस्त अर्थव्यवस्था, अशा महत्त्वाच्या जीवनावश्यक घडामोडींना ओलांडून सर्वसामान्य मुलांसाठी शालेय शिक्षणाच्या अधिकाराचा विचार करणारे हे ए. एम. अरिफ नक्की आहेत तरी कोण?

    ५६ वर्षांचे अरिफ २००६ पासून २०१९ पर्यंत केरळ राज्यातील अरूर मतदारसंघाचे आमदार होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने केरळ राज्यात १४ जागा लढवल्या, त्यापैकी फक्त एका म्हणजे अलापुझा मतदारसंघातून त्यांचा उमेदवार निवडून आला, तो म्हणजे ऐडव्होकेट ए. एम. अरिफ.

    अब्दुल माजिद या पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा असलेले अरिफ बी.एस्सी.चे शिक्षण घेत असताना विद्यार्थी चळवळीत सक्रीय झाले. आधी कॉलेज युनियनच्या मॅगझिनचे संपादक म्हणून आणि नंतर युनियनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पुढे 'स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया'चे चेरथला क्षेत्र अध्यक्ष, अलापुझा जिल्हा सचिव आणि कम्युनिस्ट पार्टीच्या विद्यार्थी विभागाचे राज्य समिती सदस्य असा प्रवास करत ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या 'डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया' या युवा विभागाचे राज्यस्तरीय समिती सदस्य झाले.

    चेरथलामधील एस. एन. कॉलेजमध्ये शिकत असताना अरिफ यांच्या राजकीय घडामोडींमधील सहभागामुळे, पोलिस अधिकारी असलेल्या त्यांच्या वडीलांची चेरथलामधून कैनाकरी येथे बदली करण्यात आल्याचे सांगितले जाते. तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या थेट आदेशानुसार त्यांच्या कुटुंबाला पोलिस वसाहतीमधील घर सोडावे लागले होते, असा उल्लेख अरिफ यांच्या विकिपेडीया पेजवर आढळतो.

    मुथांगा येथे पोलिस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व अरिफ यांनी केले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात अरिफ यांच्या मणक्याला आणि मांडीला दुखापत झाली होती, असाही उल्लेख सापडतो.

    २००६ साली अरूर मतदारसंघातून तत्कालीन कृषी मंत्री के. आर. गौरी अम्मा यांचा चार हजार मतांनी पराभव करत अरिफ केरळ विधानसभेत आमदार म्हणून दाखल झाले. (त्यापूर्वी गौरी अम्मा याच मतदारसंघातून नऊ वेळा निवडून गेल्या होत्या.) २०११ मध्ये सोळा हजार आणि २०१६ मध्ये अडतीस हजार मतांनी ते अरूरमधून पुन्हा-पुन्हा निवडून आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४० टक्के मते मिळवून ते खासदार म्हणून निवडून आले. (आमदार अरिफ खासदार झाल्यामुळे रिक्त झालेल्या अरूर विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये पोट-निवडणूक घेण्यात आली, तेव्हा मात्र त्यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला आपला उमेदवार तिथून निवडून आणता आला नाही.)

    काही काळापूर्वी 'रुबेला' नावाचा एक संसर्गजन्य आजार पसरला होता. संक्रमित व्यक्ती खोकल्यावर किंवा शिंकल्यावर त्यावेळी संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये याचे विषाणू पसरतात, असे सांगण्यात आले होते. रुबेला हा स्वतः घातक रोग नसला तरी, त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन न्यूमोनियासारखे इतर आजार बळावू शकतात, असा प्रचार करण्यात आला होता. या विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी 'सक्तीच्या' लसीकरणाचा प्रयत्न सरकारी पातळीवर करण्यात आला, तेव्हा स्वतःच्या पक्षाचे सरकार असूनही तत्कालीन आमदार अरिफ यांनी लसीकरणाच्या सक्तीविरोधात मोहीम सुरु केली. मी माझ्या मुलांना कोणतीही लस दिलेली नाही आणि ती पूर्णपणे तंदुरुस्त आणि सुरक्षित आहेत, असे सार्वजनिकरित्या जाहीर करून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा रोष ओढवून घेतला. प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडीयामध्ये (नेहमीप्रमाणे) त्यांच्या भूमिकेला धार्मिक रंग देऊन त्यांच्यावर प्रचंड टीका केली गेली. परंतु 'लसीकरणाला विरोध म्हणजे देशद्रोह' (ऐन्टी-व्हॅक्सिनेशन इज ऐन्टी नॅशनल) हा प्रचार त्यांनी स्पष्टपणे खोडून काढला.

    आज पुन्हा एकदा आपल्या भूमिकेतील स्पष्टता आणि न्याय व समता या मूल्यांशी आपली बांधिलकी दाखवत ए. एम. अरिफ यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भाने 'शिक्षण हक्क कायद्या'चा विषय ऐरणीवर आणला आहे, याबद्दल ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.


संदर्भः विकिपेडीया आणि इतर वेबसाईट्स



- मंदार शिंदे

१६/०९/२०२०


Mobile: 9822401246

E-mail: shindemandar@yahoo.com

Blog: http://aisiakshare.blogspot.com

Books on Amazon: http://amazon.com/author/aksharmann




Share/Bookmark

Tuesday, September 15, 2020

Pencil Sketch

 

Pencil Sketch by Mandar Shinde



Share/Bookmark