ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, September 26, 2015

पाळी मिळी गुपचिळी - डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा लेख

मॅन्युफॅक्चरींग आणि आयटी इंडस्ट्रीत काम करताना या विषयावर सार्वजनिक चर्चेचे प्रसंग फारसे यायचे नाहीत. शैक्षणिक क्षेत्रातदेखील हा प्रश्न कधी जाणवला नाही. पुरुषप्रधान (की पुरुषकेंद्रीत?) समाजव्यवस्थेतल्या पुरुष मित्रांच्या गप्पांमधे "अरेरे, आता चार दिवस उपवास!" एवढाच काय तो या गोष्टीचा उल्लेख. मुली-बायका आपापसांत तरी या विषयावर बोलतात की नाही याबद्दलच शंका, मग मित्र-मैत्रिणींमधे यावर चर्चा कुठून होणार... खाद्यपदार्थांच्या उद्योगात आल्यावर मात्र अनपेक्षितपणे या प्रश्नाला तोंड द्यावं लागलं. आपलं प्रॉडक्ट भारी असलं पाहिजे, प्रॉडक्टबद्दल आपल्याला बोलता आलं पाहिजे, म्हणजे झालं असं आधी वाटायचं. पण अगदी सुरुवातीलाच एका कस्टमरनं गुगली टाकलेली आठवते. "तुमच्याकडून घेतलेले पदार्थ आम्ही नैवेद्याला ठेवणार आहोत, त्यामुळं त्यादिवशी बनवणा-या बाईचा 'प्रॉब्लेम' नसावा एवढं बघा," असं एका कस्टमर बाईंनी फोनवर सांगितलं. यावर काय उत्तर द्यावं हेच सुचेना. लहानपणापासून ऐकलेल्या - वाचलेल्या महात्मा फुले, राजा राम मोहन रॉय, र. धों. कर्वे यांच्या गोष्टी आठवल्या. शिक्षण, टेक्नॉलॉजी, पैसा या गोष्टींनी पुढारलेल्या आपल्या प्रगत समाजाची दांभिकता लख्खपणे समोर आली. आपल्याला शाळेत, पुस्तकांतून दिले जाणारे पुरोगामित्वाचे धडे खोटे आहेत, प्रत्यक्षात आपण एका दुतोंडी समाजाचा भाग आहोत, याची लाज वाटली. आता या प्रसंगानंतर बराच काळ लोटलाय. हळूहळू अशी भरपूर सत्यं नागवी होत गेली. प्रत्येक वेळी त्यांना टाळणं शक्य नव्हतं, प्रत्येक वेळी भांडणंदेखील शक्य नव्हतं. आता असे प्रश्न अनपेक्षित नाही वाटत. (होय, आजही काही कस्टमर अशा गोष्टींची 'काळजी घ्यायला' सांगतात. आणि असं सांगणा-यांमधे सत्तरीतल्या आजीबाईंपासून तिशीतल्या वहिनीसाहेबही आहेत, आणि ही 'उदात्त परंपरा' जपणा-यांमधे धुणीभांडी करणा-या बायकांपासून सीएफओ-सीईओ लेव्हलच्या मॅडमदेखील आहेत. पुरुषांचं या विषयातलं ज्ञान आणि इंटरेस्ट तर अजूनच अगाध...) आता यावर न चिडता बोलणंही जमू लागलंय. पण अजूनही अशी माणसं - पुरुष आणि बायका - बघून उद्विग्नता येतेच... हे सगळं आज आठवण्याचं कारण म्हणजे डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा 'पाळी मिळी गुपचिळी' हा लेख. मासिक पाळीविषयी आणि त्याभोवतीच्या प्रथा, समज-गैरसमजांविषयी सर्व स्त्री-पुरुषांनी मुळातूनच वाचावा आणि विचार करावा असा हा लेख -

"पाळी मिळी गुपचिळी"

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. जि. सातारा. पिन ४१२ ८०३ मो.क्र.९८२२०१०३४९

नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे पेशंटची रांग ओसरल्यावर सिस्टरांनी एकामागून एक एम.आर. (औषध कंपनीचे प्रतिनिधी) आत सोडायला सुरवात केली. दुपार टळायला आली होती आणि जांभया दाबत, मोबाईलवर, फेसबुकवर, अपडेट्स टाकत आणि त्याचवेळी नेटवर कोणतातरी संदर्भ शोधत मी त्यांचे बोलणे या कानानी ऐकत होतो आणि त्या कानानी सोडून देत होतो. फार गांभीर्याने ऐकावं असं त्या पोपटपंचीत नसतंच काही. पण इतक्यात एका वाक्याने माझे लक्ष वेधले गेले. तो म्हणाला, “आता सणाचे दिवस जवळ आले डॉक्टर, आता खूप बायका पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या घ्यायला येतील. तेव्हा लक्षात असू दया आमच्याच कंपनीच्या गोळ्या दया. प्लीज सर!! सणासुदीच्या दिवसांमुळे कंपनीने टार्गेट वाढवून दिले आहे; आणि तुम्ही मनावर घेतल्या शिवाय ते मला गाठता येणार नाही.” एवढं बोलून गोळ्यांचं एक नमुना पाकीट माझ्या टेबलावर ठेवत तो निघाला सुद्धा. माझा अहं कुरवाळून आपला काम सफाईदारपणे करून तो निघून गेला. मी मात्र अचंबित झालो.

एका लहानश्या गावातल्या एका लहानश्या डॉक्टरपर्यंत आवर्जून आर्जवं करणे कंपनीला सहजपणे परवडत होतं, म्हणजे हे पाळी पुढे ढकलण्याचे मार्केट किती प्रचंड लाभदायी आहे बघा! औषध कंपन्या आपला माल खपवण्यासाठी कोणत्याही थराला जातात हे माहीत होतं, पण त्या हे ही टोक गाठतील असं माझ्या ध्यानीमनीही आलं नव्हतं. पाळी या प्रकाराबद्दल भारतीय समाजमनाची नस बरोब्बर हेरून योग्य वेळी त्यांनी आपला माल पुढे केला होता. मला कौतुकच वाटलं त्या कंपनीचं.

खरं तर ही मागणी नेहेमिचीच, पूजा, सत्यनारायण, तीर्थयात्रा, उत्सव, सण वगैरे निमित्ताने केली जाणारी. क्वचित प्रवास, परीक्षा वगैरे कारणेही असतात, पण ती अपवादानेच. किती साधी सोपी रुटीन गोष्ट होती ही. बायकांनी यायचं, पाळी पुढे जायच्या गोळ्या मागायच्या आणि चार जुजबी प्रश्न विचारून आम्ही त्या द्यायच्या. माझी चिठ्ठीही नेहेमीचीच. मुकाटपणे दिली जाणारी. पण मनातल्या मनात मी वैतागतो, चरफडतो. म्हणतो, ‘काय मूर्ख बायका आहेत या! शुद्धाशुद्धतेच्या कुठल्या मध्ययुगीन कल्पना उराशी बाळगून आहेत.’

वेळ असला की माझ्यातला कर्ता सुधारक बोलता होतो. एरवी मागताक्षणी चिठ्ठी लिहून देणारा मी, समोरच्या स्त्रीला प्रश्न विचारतो, ‘काय शिक्षण झाले आहे तुमचे?’

‘क्ष’

क्ष ची  किंमत अशिक्षित पासून डॉक्टरेट पर्यंत काहीही असू शकते.

‘आलीच जर पाळी,  तर तुम्ही समारंभात सहभागी होऊ नये हे तुम्हाला पटतंय का?’

‘...आता घरचंच कार्य म्हटल्यावर...’,‘...आमच्या घरी नाही चालत...’,‘...आमचं काही नाही पण सासुबाईंचं फार असते...’, ‘आमच्या घरी सगळंच पाळलं जाते...’; असं काहीतरी उत्तर येते. क्ष ची किंमत काहीही असो.

‘नाही, मला हे पटत नाही, हे मला मनाविरुद्ध करावे लागतंय!’, असं उत्तर वीस वर्षात एकदाही ऐकलं नाही.

पाळी आलेल्या स्त्रीला अस्वच्छ अपवित्र समजणे याची पाळेमुळे पार खोलवर रुजलेली आहेत. स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या, निसर्गनेमाने घडणाऱ्या, एका अत्यंत शारीर कार्याला धर्मिक, वैयक्तिक, कौटुंबिक आणि आर्थिक धुमारे फुटले आहेत. कुठून येतात या कल्पना? अगदी लहानपणापासून मनात कोरल्या जातात त्या. आई, मोठ्या बहिणी, शेजारी पाजारी सगळीकडे असतात त्या. आपण फक्त मनानं स्पंज सारख्या त्या टिपून घ्यायच्या.

शाळेत कधी कधी जायचा प्रसंग येतो. मुला-मुलींसमोर ‘वयात येताना’ या विषयावर बोलायला. सगळ्या मुली पाळीला सर्रास ‘प्रॉब्लेम’ असा शब्द वापरतात. प्रॉब्लेम आला/ गेला/ येणार वगैरे. मी गमतीने म्हणतो, ‘अहो पाळी ठरल्यावेळी न येणं, हा खरा प्रॉब्लेम! पाळी येणं हा प्रॉब्लेम कसा?’ मुलींना मी सांगतो, प्रॉब्लेम शब्द वापरू नका. पाळी आली असं म्हणा. मराठीत बोलणे फारच गावठी वाटत असेल तर एम.सी. म्हणा, मेंन्सेस म्हणा; आणखी इंग्रजी फाडायचं असेल तर चम म्हणा; पण प्रॉब्लेम म्हणू नका. प्रॉब्लेम म्हटल्यावर एका अत्यावश्यक नैसर्गिक शरीरक्रीयेविषयी मनात नकारात्मक भावना नाही का निर्माण होतं? पण हा प्रश्न गैरलागूच म्हणायचा. प्रॉब्लेममुळे नकारात्मक भावना नसून; मुळातल्या नकारात्मक भावनेपोटी हा शब्द वापरला जातो. काहीही असो पण हा शब्द वापरू नये असं मला वाटतं. यामुळे मुळातली नकारात्मकता आणखी गडद होते. त्यावर लोकमान्यतेच्या पसंतीची मोहोर उमटते.

ह्या मुळातल्या गैरसमजाचे पडसाद इतरही सर्वमान्य शब्दांमध्ये दिसतात. काही कारणाने पाळीचा त्रास झाला तर पिशवी धुतात/साफ करतात. याचा वैद्यकीय अर्थ पिशवीच्या आतलं अस्तर खरवडून काढून टाकतात. हेतू हा की रक्तस्त्राव थांबावा, तपासणीसाठी अस्तराचा तुकडा मिळावा आणि नव्याने तयार होणारे अस्तर एकसाथ, एकसमान तयार व्हावे. पण हे सारे व्यक्त करणारा शब्दच नाहीये. क्युरेटींग हा इंग्रजी शब्द रूढ आहे पण त्यामागचा हा भाव कुणालाच कळत नाही. सर्रास पिशवी धुणे /साफ करणे वगैरे चालू असतं.

एकदा पाळी हा प्रॉब्लेम ठरला की पुढे सगळे ओघानेच येतं. पाळी म्हणजे शरीरात महीनाभर साठलेली घाण बाहेर टाकण्याची एक क्रिया, हे ही मग पटकन पटते. समाजानी पाळी आणि अपावित्र्याचा संबंध जोडला आहे, यात काही आश्चर्य नाही. मलमूत्राच्या वाटेशेजारीच पाळीची वाट आहे. मलमूत्रविसर्जन ही तर निश्चितच उत्सर्जक क्रिया आहे. चक्क शरीरातील घाण वेळोवेळी बाहेर टाकणारी क्रिया. अज्ञानापोटी समाजाने पाळीलाही तेच लेबल लावलं. खरंतर शरीरातील पेशी सातत्याने मरत असतात आणि नव्याने तयार होत असतात. आपली त्वचा झडते, पुन्हा येते, केस झडतात पुन्हा येतात, लाल पेशींचे आयुष्य १२० दिवसांचे असतं; तसंच काहीसं हे आहे. गर्भपिशवीचे अस्तर ठराविक काळ गर्भधारणेला आधार ठरू शकते. मग ते निरुपयोगी ठरतं. बाहेर टाकलं जातं, पाळी येते. पुन्हा नव्यानं अस्तर तयार होतं. (मासिक चक्रं). मुद्दा एव्हढाच की मासिक पाळी ही उत्सर्जक क्रिया नाही. पण कित्येक स्त्रियांना आणि पुरुषांना असं वाटतं की महिनाभराची सगळी घाण गर्भपिशवीत साठते आणि ती महिनाअखेरीस बाहेर टाकली जाते.

अशा बायकांसाठी वेगळी झोपडी, वेगळी जागा, वेगळं अन्न चार दिवस बाहेर बसणं, पूजाअर्चा, देवळात जाणं बंद, पाचव्या दिवशी  अंघोळ करणं, पाळीच्या वेळी धार्मिक कार्यात सहभागी न होणं या सगळ्या रूढी आणि परंपरा याचाच परीपाक आहेत. जात कोणतीही असो, धर्म कोणताही असो याबाबतीत सर्व धर्म भलतेच समान आहेत. 

पाळीच्या या चार दिवस विश्रांतीचं समर्थन करणारीही जनता आहे. ‘तेवढंच त्या बाईला जरा सूख, जराशी विश्रांती...’ वगैरे. म्हणजे एरवी श्वास घ्यायलाही फुरसत नाही एवढा कामाचा रामरगाडा! अपावित्र्यातून निपजलेली ही विश्रांती; आदरभावातून, ऋणभावनेने मिळालेली नाही ही. घराला विटाळ होऊ नये म्हणून ही बाकी घरानी केलेली तडजोड आहे. त्या बाईप्रती आदर, तिच्या कामाप्रती कृतज्ञता, तिच्या घरातील सहभागाचा सन्मान कुठे आहे इथे? नकोच असली विश्रांती. हे बक्षीस नाही, बक्षिसी आहे ही! उपकार केल्यासारखी दिलेली ही बक्षिसी बाईनी नाकारायला हवी.

का होतं, कसं होत वगैरे काहीही जीवशास्त्र माहीत नसताना पाळी हा प्रकार भलताच गोंधळात टाकणारा होता, आदिमानवाला आणि त्याच्या टोळीतल्या स्त्रियांना. महिन्याच्या महिन्याला रक्तस्त्राव होतो, चांद्रमासाप्रमाणेच की हे, निश्चितच दैवी अतिमानवी योजना ही. जखम-बिखम काही नाही, वयात आल्यावर स्त्राव होतो, म्हातारपणी थांबतो, गरोदरपणी थांबतो...! किती प्रश्न, किती गूढ, किती कोडी. पण म्हणून आजही आपण आदिमानवाचीच री ओढायची म्हणजे जरा जास्तच होतंय!

पाळी येण्यामागचं विज्ञान समजलं, पाळीवर परिणाम करणाऱ्या गोळ्याही निघाल्या. पण आपण याचा उपयोग सजगपणे करणार नाही. आपण या गोळ्या आपल्या शरीराबद्दलच्या, पाळीच्या अपावित्र्याच्या पारंपारिक कल्पना दृढ करण्यासाठी वापरणार! वा रे आपली प्रगती! वा रे आपली वैज्ञानिक दृष्टी!

पण समाजानं जरी अपावित्र्य चिकटंवलं असलं तरी ते तसंच चालू ठेवलं पाहिजे असं थोडंच आहे? निसर्गधर्मानुसार आलेली पाळी चालत नाही आणि औषध घेऊन पुढे गेलेली चालते, हे ठरवलं कोणी? ही बंधनं विचारपूर्वक नाकारायला नकोत? ‘देहीचा विटाळ देहीच जन्मला; सोवळा तो झाला कवण धर्म? विटाळा वाचून उत्पतीचे स्थान, कोण देह निर्माण, नाही जगी’ असं संत सोयराबाईनी विचारलं आहे.

हे असलं काही बोललं की प्रतिपक्षाची दोन उत्तरं असतात. एक, पुरुषप्रधानतेमुळे बायकांचे मेंदू पुरुषांच्याच ताब्यात असतात; आणि दुसरं समजा घेतल्या गोळ्या आणि ढकलली पाळी पुढे तर बिघडलं कुठं?

पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की ही समाजरचना अमान्य करण्याचे पहिलं पाऊल म्हणून या गोष्टीकडे बघा. गोष्ट साधीशीच आहे. ठामपणे सांगीतल तर पटणारी आहे. स्वतःला पटली असेल तर ठामपणे सांगता येतेच पण मुळात स्वतःचीच भूमिका गुळमुळीत असेल तर प्रश्नच मिटला.

‘घेतल्या गोळ्या तर बिघडतं काय?’ या प्रश्नाचं उत्तर असं की, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो! आई करते म्हणून थोरली  करते आणि ताई करते म्हणून धाकटी! डोकं चालवायचंच नाही असं नकळत आणि आपोआप होत जातं

हे सारं कुठेतरी थांबायला हवं. स्वताःच्या आणि परस्परांच्या शरीराकडे निरामय दृष्टीने स्त्री-पुरुषांना पहाता यायला हवं. कुणीतरी कुठूनतरी सुरुवात करायला हवी.

डॉ. शंतनू अभ्यंकर

वाई, जि. सातारा. पिन ४१२ ८०३.
मो.क्र.९८२२०१०३४९

(मूळ लेख - http://shantanuabhyankar.blogspot.in/2015/09/blog-post_2.html)


Share/Bookmark

Monday, September 21, 2015

जाणीव

आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लाखो रुपये खर्चून त्यांना शिक्षण देणा-या पालकांनी, विशेषतः मातांनी सर्व मुलांना लहानपणापासूनच स्वयंपाकघरातल्या कामाचीही सवय लावावी. यामुळे मोठेपणी ही 'पुरुष' मंडळी स्वावलंबी तर होतीलच, पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या बायकांकडून आयत्या जेवणाची अपेक्षा करताना त्यामागच्या कष्टांची त्यांना किमान जाणीव तरी राहील.


Share/Bookmark

Wednesday, September 9, 2015

इंग्रजीचा उदो उदो...

आम्हाला इंग्रजी शिकवणारे सर म्हणायचे, "इंग्रजी बोलता आली नाही तरी चालेल पण इंग्रजी पूर्ण कळाली पाहिजे." त्यांचं म्हणणं असं होतं की, इंग्रजी शिकायला सुरु करतानाच जर इंग्रजी बोलण्यावर, म्हणजे स्पोकन इंग्लिशवर भर दिला तर भाषेच्या नियमांकडं हमखास दुर्लक्ष होतं. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी इंग्रजीतून बोलण्याचा प्रयत्न करता, तेव्हा समोरची व्यक्तीदेखील तुमचं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. या प्रक्रियेमधे इंग्रजीचं व्याकरण, शब्दप्रयोग, वगैरे गोष्टींपेक्षा संदर्भासहीत मुद्द्यांकडं जास्त लक्ष दिलं जातं. एकदा का तुम्ही चुकीचे शब्दप्रयोग किंवा चुकीची वाक्यरचना करुनही तुमचं म्हणणं समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवू शकलात, की तुम्ही त्याच चुका नेहमी-नेहमी करत राहता. अशा पद्धतीनं एक भाषा म्हणून तुम्ही इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकत नाही, फक्त कामचलाऊ इंग्रजी बोलू व समजू शकता, जी आपल्या आजूबाजूला सर्रास आढळून येते.

आमचे सर असंही म्हणायचे, "इंग्रजी बोलण्याची तुम्हाला इतकी गडबड का? आधी ती भाषा नीट शिकून तर घ्या. इंग्रजी बोलता आलं नाही म्हणून तुमचं काम अडेल अशी परिस्थिती आपल्या देशात तरी यायची शक्यता नाही. इथं तुम्ही मातृभाषेत किंवा हिंदीत संवाद साधू शकता. अगदी परदेशातच जायचं असेल तर इंग्रजीशिवाय अडण्याची शक्यता मान्य. पण एका मराठी माणसानं दुसर्‍या मराठी माणसाशी मोडक्या-तोडक्या इंग्रजीत संवाद साधणं, यातून ना संवाद घडतो ना भाषेचं ज्ञान मिळतं."

माझा इंग्रजी शिकण्याला किंवा वापरण्याला अजिबात विरोध नाही. पण इंग्रजी भाषा म्हणून न शिकता तिला थेट मातृभाषा बनवण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या स्वतःचं आणि पुढच्या पिढीचं फार मोठं नुकसान करतोय, असं मला वाटतं. अजूनही आपल्या आजूबाजूला, समाजात वावरताना अथवा कोणत्याही इंडस्ट्रीत काम करताना, इंग्रजीचं महत्त्व 'सादरीकरणाची भाषा' अर्थात 'प्रेझेंटेशन लँग्वेज' म्हणूनच असल्याचं दिसून येतं. या प्रेझेंटेशनसाठी संबंधित विषयाचं ज्ञान, अभ्यास, अनुभव, कल्पनाशक्ती, इत्यादी गोष्टी भाषेपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. मात्र या गोष्टी मांडण्यासाठी जी इंग्रजी भाषा वापरायची, तिच्या दडपणाखाली या मुलभूत गोष्टींकडंच दुर्लक्ष केलं जाताना दिसतं. तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी हा अनुभव घेतला असेल - एखादा तांत्रिक मुद्दा मांडताना किंवा तुमच्या कामाबद्दल चर्चा करताना तुम्ही व्यवस्थित इंग्रजी बोलू शकता. पण हवा-पाण्याच्या गप्पा मारताना मात्र तुम्हाला ना इंग्रजी शब्द आठवतात, ना एक पूर्ण वाक्य इंग्रजीतून बोलता येतं. याच गोष्टीची भीती किंवा लाज वाटून अनेक जण इंग्रजीचं दडपण घेतात. पण असं का होतं, यामागचं कारण शोधण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे?

कोणतीही भाषा शिकण्यातला पहिला टप्पा असतो ऐकण्याचा. लहान मुलांच्या कानावर जी आणि जशी भाषा पडते, तसेच भाषिक संस्कार त्यांच्यावर होतात. तुम्ही 'चांगली' इंग्रजी भाषा ऐकलीच नाहीत, तर तुम्हाला चांगली इंग्रजी बोलता कशी येणार? आपण इंग्रजीच्या नावाखाली जे काही आजूबाजूला ऐकतोय, त्याला भाषा तरी म्हणावं का? हा ऐकण्याचा टप्पा तर आपण सोडूनच देतो आणि मुलांना थेट ए-बी-सी-डी गिरवायला शिकवतो. मुलं या 'ए-बी-सी-डी'चा अर्थ आणि संदर्भ आपापल्या मातृभाषेत शोधण्याचा प्रयत्न करतात, जो त्यांना कधीही सापडत नाही. आणि जी भाषा त्यांना अजून आपली वाटतच नाही, त्या भाषेत त्यांनी बोलावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. इथूनच इंग्रजीचं दडपण यायला सुरुवात होते. मग काही जण चुकीचं इंग्रजी रेटायचा प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी झाले की आयुष्यभर चुकीचीच भाषा रेटत राहतात. राहिलेले, कायम इंग्रजीची भीती आणि न्यूनगंड मनात घेऊन या भाषेला टाळायचा प्रयत्न करत राहतात. इंग्रजी बोलायची वेळ आली की हे रस्ता बदलून दुसरीकडंच जातात आणि समोर आलेली संधी हकनाक गमावून बसतात.

ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण इंग्रजीकडं वेगळ्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. इंग्रजी ही एक भाषा म्हणून शिकली आणि शिकवली गेली पाहिजे. पहिल्या दिवसापासून इंग्रजीतून बोलण्याची गडबड न करता, टप्प्याटप्प्यानं मुळाक्षरं, शब्दार्थ, वाक्यरचना, अलंकार शिकत गेलं पाहिजे. त्याच बरोबरीनं 'चांगली' इंग्रजी कानावर पडण्याची सोयदेखील केली पाहिजे. आणि एकदा या भाषेवर प्रभुत्व आलं की, यू कॅन टॉक इंग्लिश, यू कॅन वॉक इंग्लिश, यू कॅन लाफ इंग्लिश, यू कॅन रन इंग्लिश, बिकॉज इंग्लिश इज सच अ फन्नी लँग्वेज!


Share/Bookmark

Monday, September 7, 2015

...पण काळ सोकावता कामा नये!

पुण्यातल्या सातारा रोडवरच्या डी-मार्टमधे काहीतरी खरेदी करायला गेलो होतो. रविवार असल्यामुळं डी-मार्टला सकाळी-सकाळीच नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याचं स्वरुप आलं होतं. मला पाहिजे असणारी वस्तू पटकन घेऊन सर्वांत छोटी रांग असलेल्या काउंटरवर आलो. बिल केलं. रक्कम होती ३०९. काउंटरवरच्या मुलीला पाचशेची नोट आणि वर दहा रुपये सुट्टे दिले. सुट्टे २०१ परत मिळणं अपेक्षित असताना, अगदी सिन्सियरली त्या मुलीनं शंभराच्या दोन नोटा आणि एक चॉकलेट दिलं.

सुट्ट्या पैशांच्या ऐवजी चॉकलेट मिळण्याची ही काही पहिलीच वेळ किंवा पहिलंच ठिकाण नव्हे. मला चॉकलेट खायला आवडत नाही, असंही नाही. पण म्हणतात ना - म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये!

डी-मार्टच्या वीसही काउंटर्सवर बिलिंगसाठी रांगा वाढत असल्यानं, काउंटरवरच्या मुलींना डिस्टर्ब करण्याऐवजी एक्झिट गेटजवळ बसलेल्या डी-मार्टच्या दुसर्‍या स्टाफ मेंबरकडं गेलो.

मीः नमस्कार, मला तुमच्या बिलिंग पद्धतीबद्दल तक्रार द्यायची आहे. कुणाशी बोलावं लागेल?
डी-मार्ट स्टाफः बोला काय तक्रार आहे?
मीः तुमच्या सगळ्या बिलिंग काउंटर्सवर एक-दोन रुपये सुट्टे देण्याऐवजी सर्रास चॉकलेट दिले जातात.
डी-मार्ट स्टाफः नाही सर, एखाद्या वेळी असं झालं असेल, पण नेहमी नाही होत...
मीः मला स्वतःला आत्ता एक रुपयाऐवजी चॉकलेट मिळालं आहे.
डी-मार्ट स्टाफः कदाचित त्या काउंटरवरची चिल्लर संपली असेल...
मीः काय सांगताय? अजून तुमचं स्टोअर उघडून दोन ताससुद्धा झाले नाहीत आणि काउंटरवरची चिल्लर संपली?
डी-मार्ट स्टाफः होऊ शकतं सर, आज रविवार आहे ना...
मीः पण ही फक्त आजची गोष्ट नाही. मी आजतागायत जितक्या वेळेला डी-मार्टमधे खरेदी केलीय, तितक्या वेळेला मला एक-दोन रुपयांऐवजी चॉकलेटच देण्यात आलेत.
डी-मार्ट स्टाफः नेहमी-नेहमी असं नाही होणार सर. आजच कदाचित झालं असेल. मार्केटमधे सुट्ट्या पैशांचं शॉर्टेजच आहे...
मीः म्हणजे डी-मार्टला मार्केटमधून सुट्टे पैसे मिळत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
डी-मार्ट स्टाफः तसं नाही, पण कधीतरी सुट्टे पैसे संपल्यावर काउंटरवरुन चॉकलेट दिले जातात.
मीः कधीतरीच द्यायचे असतील तर ते चॉकलेट कुठं ठेवले पाहिजेत? काउंटरशेजारी एखाद्या डब्यात की थेट कॅशबॉक्समधे?
डी-मार्ट स्टाफः कॅशबॉक्समधे चॉकलेट नसतात सर...
मीः चला, तुमच्या वीस काउंटरपैकी कुठल्याही काउंटरवरचा कॅशबॉक्स उघडून बघा आणि मग मला सांगा कधीतरी द्यायचे चॉकलेट कॅशबॉक्समधे का ठेवलेत?
डी-मार्ट स्टाफः तसं नाही सर... आम्ही ठेवतो थोडे चॉकलेट कॅशबॉक्समधे, पण कस्टमरला विचारतो - 'सुट्टे पैसे हवेत की चॉकलेट?' आणि मगच चॉकलेट देतो.
मीः अच्छा? चला, तुमच्या वीसपैकी कुठल्याही एका काउंटरवर मला दाखवा, एका तरी कस्टमरला हा प्रश्न विचारला जातोय का? मला स्वतःला तर कधीही हा प्रश्न विचारण्यात आलेला नाही.
डी-मार्ट स्टाफः तुम्ही कुठल्या काउंटरवर बिल केलंत सर? मी त्या काउंटरवरच्या एक्झिक्युटीव्हशी बोलून तुमचे सुट्टे पैसे परत करायला लावतो...
मीः प्रश्न माझ्या एकट्याच्या किंवा आजच्या सुट्ट्या पैशांचा नाही. प्रॉब्लेम तुमच्या काउंटरवरच्या एक्झिक्युटीव्हचा सुद्धा नाही. प्रॉब्लेम तुमच्या सिस्टीमचा आणि ट्रेनिंगचा आहे. सुट्ट्या पैशांऐवजी कस्टमरला सर्रास चॉकलेट दिलं जाणं, ही तुमची प्रोसिजर झालीय. माझं ऑब्जेक्शन ह्या प्रोसिजरवर आहे.
डी-मार्ट स्टाफः मान्य आहे सर, पण सुट्टे पैसे नसले की आम्हाला असं करावंच लागतं.
मीः ठीक आहे, मग इथं तुम्ही ऑफिशियल बोर्ड का लावत नाही - 'सुट्टे पैसे नसल्यास आम्ही चॉकलेट्स देतो आणि घेतोसुद्धा!' असा?
डी-मार्ट स्टाफः असा बोर्ड आम्हाला नाही लावता येणार सर. पण मी तुमचा प्रॉब्लेम माझ्या सिनियर्सना सांगतो...
मीः तुम्हालाच अजून माझं म्हणणं नीट कळालेलं नाही तर तुम्ही ते दुसर्‍यांना कसं सांगणार? त्यापेक्षा मीच तुमच्या सिनियर्सना समजावून सांगतो. कुठं भेटतील ते?
डी-मार्ट स्टाफः थांबा, मी त्यांनाच इकडं बोलावून घेतो...

यानंतर त्यांनी आपल्या मोबाईलवरुन फोन लावून मॅनेजरना बोलावून घेतलं. मी पुन्हा पहिल्यापासून सगळी कहाणी सांगितली.

डी-मार्ट मॅनेजरः तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी सर. मी आत्ताच त्या काउंटरवरच्या मुलीला बोलावून तुमचे सुट्टे पैसे परत करायला सांगतो.
मीः तुम्हाला माझं म्हणणं कळतंच नाहीये का? प्रश्न माझ्या एकट्याच्या किंवा आजच्या सुट्ट्या पैशांचा नाही. प्रॉब्लेम तुमच्या काउंटरवरच्या एक्झिक्युटीव्हचा सुद्धा नाही. प्रॉब्लेम तुमच्या सिस्टीमचा आणि ट्रेनिंगचा आहे. सुट्ट्या पैशांऐवजी कस्टमरला सर्रास चॉकलेट दिलं जाणं, ही तुमची प्रोसिजर झालीय. माझं ऑब्जेक्शन ह्या प्रोसिजरवर आहे. कस्टमरला पैशांऐवजी दिलेल्या चॉकलेटचं अकौंटींग करणं तुम्हाला पण अवघडच जात असेल ना?
डी-मार्ट मॅनेजरः नाही सर, त्यासाठी आम्ही प्रत्येक बिलिंग काउंटरवर मोजून चॉकलेट्स देतो आणि कॅशचा हिशोब करताना शिल्लक चॉकलेट्सचं ऑडीट करतो.
मीः छान! म्हणजे डी-मार्टला रिझर्व्ह बँकेच्या रुपयाबरोबरच चॉकलेटची करन्सीसुद्धा मान्य आहे तर...
डी-मार्ट मॅनेजरः होय, सुट्ट्या पैशांच्या शॉर्टेजमुळंच आम्ही ही पद्धत वापरतो...
मीः ठीक आहे, मग तुम्ही कस्टमरला चॉकलेटच्या करन्सीमधे पेमेंट करता तसं कस्टमरनी तुम्हाला चॉकलेटच्या करन्सीमधे पेमेंट केलेलं चालेल का?
डी-मार्ट मॅनेजरः हो हो, नक्कीच चालेल. मी तुम्हाला पैशांऐवजी चॉकलेट देत असेन तर मला तुमच्याकडून चॉकलेट स्विकारलंच पाहिजे...
मीः मग तुम्ही तसा बोर्ड इथं लावू शकता का? - 'सुट्टे पैसे नसल्यास आम्ही चॉकलेट्स देतो आणि घेतोसुद्धा!'
डी-मार्ट मॅनेजरः बोर्डबद्दल मला माझ्या सिनियर्सना विचारावं लागेल, पण तुम्ही पुढच्या वेळी काउंटरवर सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स दिली तर आम्हाला ती घ्यावीच लागतील. फक्त कुठलीही चॉकलेट्स अलाऊ करण्याऐवजी आम्ही ठराविकच चॉकलेट ह्यासाठी वापरतो.
मीः म्हणजे कुठली चॉकलेट्स?
डी-मार्ट मॅनेजरः सध्या तरी आम्ही 'फलेरो'ची चॉकलेट्स वापरतोय... आणि ती सुद्धा कस्टमरला विचारुनच देतो.
मीः ठीक आहे, मग पुढच्या वेळेपासून मी सुट्टे पैसे नसतील तर डी-मार्टच्या काउंटरवर 'फलेरो'ची चॉकलेट्स देत जाईन. आणि तुम्ही तसा अधिकृत बोर्ड इथं लावत नाही तोपर्यंत इतर कस्टमर्सच्या माहितीसाठी मी स्वतः ह्या करन्सीचा प्रचार करेन. पण तुमच्या कुठल्याही काउंटरवर 'सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स चालतील का?' असा प्रश्न विचारला जात नाही, त्याचं काय?
डी-मार्ट मॅनेजरः त्याबद्दलच्या सूचना मी ताबडतोब सगळ्या काउंटर्सवर देतो...

तर, यापुढं डी-मार्टमधे (आणि शक्य झाल्यास इतरही ठिकाणी), तुम्हाला न विचारता सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स मिळाली तर तुम्ही त्याची तक्रार संबंधित अधिकार्‍यांकडं करुन तुमचे सुट्टे पैसे परत मिळवू शकता.

एनएच-फोरवरच्या सगळ्या टोल नाक्यांवर 'सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स देऊ नयेत' असे बोर्ड लावण्यात आले आहेत. डी-मार्टसारख्या स्टोअर्सना ही अल्टरनेट करन्सी वापरायची एवढीच हौस असेल तर, आपणही जागरुक ग्राहक बनून त्यांना मदत केली पाहिजे. यापुढं तुम्हाला मिळालेली चॉकलेट्स साठवून ठेवा आणि पुढच्या वेळी तीच परत देऊन पैसे वाचवा!

हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून, सर्वसामान्य ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यास मदत करा...


Share/Bookmark

Sunday, July 26, 2015

परप्रांतीय मुलांचा भाषेचा प्रश्न हाताळताना...

आम्ही पुण्यात शिक्षणहक्क कायद्याच्या प्रसारासाठी 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' हे नागरीक अभियान चालवतो. यामधे ६ ते १४ वयोगटातील शालाबाह्य मुलं शोधून त्यांना जवळच्या म.न.पा. / जि.प. शाळांमधे प्रवेश घेण्यास मदत केली जाते. संपूर्ण पुण्यात हे अभियान राबवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून विविध क्षेत्रातले नागरीक सहभागी होतात. शालाबाह्य मुलं शोधताना पुण्यातल्या अधिकृत झोपडपट्ट्यांबरोबरच नव्यानं वसवल्या जाणार्‍या वस्त्या आणि बांधकाम साईट्सवरच्या मजूर-वस्त्यांचं सर्वेक्षण केलं जातं. पुण्यातल्या बांधकामांवर काम करणारे बहुतांश मजूर कर्नाटक, राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश, अशा परराज्यांतून आलेले आहेत. त्यांची मुलं बर्‍याचदा शालाबाह्यच असतात. या मुलांच्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं, शाळेत जाण्याचे फायदे समजावणं, इत्यादी गोष्टी स्वयंसेवक पार पाडतात. पण शिक्षणासाठी तयार झालेल्या मुलांना जवळच्या म.न.पा. / जि.प. शाळांमधेच प्रवेश घेऊन दिला जातो आणि या शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. अशा वेळी, मुलांना मराठी शाळेत दाखल करताना पालकांकडून काही ठराविक प्रश्न विचारले जातात -

- शिक्षकांची मराठी भाषा मुलांना समजणार का?
- आम्ही काम संपल्यावर आमच्या गावीच जाणार आहोत, तर आत्ता मराठी माध्यमात शिकून काय फायदा?
- आमची मातृभाषा तेलगु, तमिळ, कन्नड, बंगाली, हिंदी आहे, तर आमच्या मुलांनी मराठी का शिकायचं?

अशा प्रश्नांना उत्तर देणं स्वयंसेवकांना बर्‍याचदा अवघड जातं. आमच्या अनुभवानुसार आम्ही पुढीलप्रमाणे त्यांची उत्तरं देतो -

- शाळेत गेल्यानं प्रत्येक मूल ‘कसं शिकायचं’ हे शिकू लागतं. त्याच्या मनात शिक्षणाविषयी योग्य वयात गोडी निर्माण होते, मग माध्यम कोणतंही असो. जरी त्यानंतर मूल आपल्या मूळगावी गेलं, तरी तिथल्या शाळेत मातृभाषेतून सहज शिक्षण घेऊ शकतं.
- सहा-सात वर्षांच्या कोणत्याही मुला/मुलीला नवीन भाषा शिकणं अवघड नसतं. वेगळ्या भाषेची भीती लहान मुलांपेक्षा मोठ्यांच्याच मनात जास्त असते. वास्तविक, सहा-सात वर्षांच्या मुलाची मातृभाषा (लिपी) शिकण्याची प्रक्रियादेखील याच वयात सुरु असते. त्या भाषेबरोबरच मराठीदेखील ते पटकन शिकू शकतं.
- जर संपूर्ण कुटुंब कामानिमित्त चार-पाच वर्षांसाठी पुण्यात राहणार असेल, तर दैनंदिन व्यवहारात त्यांना मराठी भाषेचा उपयोगच होईल. स्थानिक भाषा येत असल्यामुळं मुलांचा आणि एकूणच कुटुंबाचा रहिवास सुखकारक होईल.
- मराठी आणि हिंदीची लिपी एकच म्हणजे देवनागरी आहे. त्यामुळं मुलांना मराठीबरोबरच हिंदी वाचन आणि लेखन सुलभ होईल. हिंदी ही संपूर्ण भारतात वापरली जाणारी भाषा असल्यामुळं, मराठी भाषा शिकणं कधीच वाया जाणार नाही.

शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणताना भाषाविषयक प्रश्नांवर आम्ही शोधलेली ही उत्तरं बहुतांश पालकांना पटतात. पुण्याबरोबरच नाशिकमधेही असाच एक अनुभव आला. नाशिकरोडला गेल्या तीन वर्षांपासून एक मोठी कन्स्ट्रक्शन साईट सुरु आहे. बांधकाम करणारे सर्व मजूर मध्य प्रदेशातून आले असून त्यांची मुलं जवळच्या नाशिक म.न.पा. शाळेत जातात. ही शाळा मराठी माध्यमाची आहे. तीन वर्षांपूर्वी पहिलीत प्रवेश घेतलेली मुलं आता चौथीत आहेत, त्यांना शाळेत जायला आवडतं, आणि त्यांची शैक्षणिक प्रगतीदेखील चांगली आहे. आता ही मुलं कधीही आपल्या मूळगावी परतली तरी त्यांचं शिक्षण नक्कीच चालू राहील. भाषा ही शिक्षण घेण्यातली अडचण बनू शकत नाही...


Share/Bookmark

Saturday, June 6, 2015

सिव्हिक सेन्स?

पुण्यातल्या एका मॉलच्या पार्किंगमधला सीन. एक माणूस मॉलमधून खरेदी केलेल्या सामानाची ट्रॉली ढकलत येतो. मागून येणार्‍या बाईंच्या हातात एक तशाच सामानाचं बास्केट, दुसर्‍या हाताशी लहान मुलगी. आपल्या कारची डिकी उघडून माणूस सामान आत भरतो. रिकामी ट्रॉली शेजारी पार्क केलेल्या कारसमोर सरकवतो. मग बाईंच्या हातातलं बास्केट घेऊन सामान डिकीत ओततो. रिकामं बास्केट शेजारच्या दुसर्‍या कारसमोर ठेवतो. डिकी बंद. महाराज, महाराणी, आणि राजकन्या गाडीत बसतात. गाडी पार्किंगमधून बाहेर येते, झूऽऽम्म निघून जाते. गाडीचा नंबर जीजे-१९ असा काहीतरी असतो. (त्यानं काही विशेष फरक पडत नाही म्हणा... म्हणजे मला तरी तसं वाटतं... म्हणजे काही विशेष फरक पडत नाही असं... पण 'द डेव्हिल इज इन द डिटेल्स'... असो, तर) त्या शेजारी पार्क केलेल्या दोन कारच्या मालकांनी काय करायचं? आणि त्या छोट्या राजकन्येनं काय आदर्श घ्यायचा आई-बापाकडून? 'सिव्हिक सेन्स' नावाची गोष्ट कधी शिकणार आपण?


Share/Bookmark

Sunday, May 31, 2015

पल दो पल का साथ हमारा...

नजरों के शोख नजारे, होठों के गर्म पैमाने
है आज अपनी मेहफिल में, कल क्या हो कोई क्या जाने
ये पल खुशी की जन्नत है, इस पल में जी ले दीवाने...
आज की खुशियाँ एक हकीकत, कल की खुशियाँ अफसाने हैं...
पल दो पल का साथ हमारा, पल दो पल के याराने हैं
इस मंजिल पर मिलने वाले, उस मंजिल पर खो जाने हैं...

'पल दो पल का साथ हमारा' हे साहिर लुधियानवी यांच्या गाजलेल्या गीतांपैकी एक. वर्ष होतं १९८०, चित्रपट होता 'द बर्निंग ट्रेन'. याच वर्षी, हे गीत लिहिणारे साहिर आणि हे गीत गाणारे मोहम्मद रफी या दोघांनीही तीन महिन्यांच्या अंतरानं अवेळी एक्झिट घेतली. (मोहम्मद रफी - जुलै १९८० आणि साहिर लुधियानवी - ऑक्टोबर १९८०)

हे गाणं लिहिताना आणि गाताना दोघांना समजलं असेल का की 'इस मंजिल पर मिलने वाले, उस मंजिल पर खो जाने हैं...'

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६


Share/Bookmark

Saturday, May 23, 2015

मोदी सरकारच्या तथाकथित आंतरराष्ट्रीय यशामागील सत्य

फेसबुक, व्हॉट्सॲप, आणि इतर अनेक वेबसाईट्सवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वारेमाप परदेश दौर्‍यांचं समर्थन करणारा हा मेसेज फिरतोय. 'खोटं बोल, पण रेटून बोल' या न्यायानं काही असंबंध तर काही धादांत खोटे संदर्भ जोडून हे मुद्दे सामान्य जनतेच्या गळी उतरवायचे प्रयत्न सुरु आहेत. काय आहे या मुद्द्यांमागचं सत्य? जाणून घ्यायचंय? मग वाचा खालची मुद्देसूद उत्तरं...

मुद्दा १. कच्च्या तेलावर "ON Time delivery premium charges" न लावण्याचा भारताचा प्रस्ताव सौदी अरेबियाने मान्य केला आहे. साधारणपणे, कपडे इस्त्री करताना धोबी आपल्याला जे urgent म्हणून charges लावतो तोच या  ON Time delivery premium charges चा अर्थ आहे.  यातून काही हजार कोटींची बचत नक्कीच होईल ! आणि पर्यायाने पेट्रोल ,डिझेल चे भाव कमी होतील.
सत्य काय आहे? - 'एशियन प्रिमियम' नावाचा अतिरिक्त भार तेल उत्पादक कंपन्यांनी रद्द करावा यासाठी मोदी सरकार 'प्रयत्नशील' आहे. (http://www.hindustantimes.com/business-news/india-in-talks-to-save-rs-18k-cr-on-oil-imports/article1-1288411.aspx) असे प्रयत्न याआधीचं काँग्रेस सरकारदेखील करत होतं. परंतु, हा अतिरिक्त भार रद्द झाला किंवा 'ऑन टाईम डिलीव्हरी प्रिमियम चार्जेस' लावणार नाही असं सौदी अरेबियानं मान्य केलं अशी कुठलीही बातमी जगातल्या कुठल्याही वृत्तपत्रानं, टीव्ही चॅनेलनं, किंवा वेबसाईटनं अजून तरी दिलेली नाही. उलट, सौदी अरेबियानं दर वाढवल्याचीच बातमी उपलब्ध आहे - (http://www.livemint.com/Politics/lXDInLANFYEFamzTKvQGyH/Saudis-raise-crude-oil-pricing-to-Asia-on-signs-of-demand-gr.html)

मुद्दा २. भूतान मध्ये भारत ४ अजस्त्र धरणे आणि  जलविद्युत प्रकल्प बांधेल. या प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या विद्युत उर्जेचा सिंहाचा वाटा भारताला मिळेल.
सत्य काय आहे? - पॉवर-टेक्नॉलॉजी डॉट कॉम या वेबसाईटनुसार, "मांग्डेछू हा रॉयल गव्हर्मेंट ऑफ भूतानच्या २०२० पर्यंत १०,००० मेगावॅट हायड्रोपॉवर उत्पादनासाठी भारत सरकारच्या सहाय्याने आखण्यात आलेल्या दहा जलविद्युत प्रकल्पांपैकी एक आहे. यासंदर्भातील भारत आणि भूतान या देशांदरम्यानच्या करारावर एप्रिल २०१० मधे सह्या करण्यात आल्या." (http://www.power-technology.com/projects/mangdechhu-hydroelectric-project-trongsa-dzongkhag) याच बातमीत असंही म्हटलंय की, "सदर जलविद्युत प्रकल्पातून निर्माण होणारी बहुतांश ऊर्जा भूतानची अंतर्गत गरज भागवण्यासाठी वापरली जाईल आणि शिल्लक ऊर्जा भारताला निर्यात केली जाईल." आता यामधे मोदी सरकारचं कर्तृत्व काय आणि सिंहाचा वाटा म्हणजे नक्की काय? (http://www.thehindu.com/todays-paper/india-bhutan-to-double-target-for-power-projects/article1259938.ece)

मुद्दा ३. नेपाळमध्ये भारत जगातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारेल. या प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या विद्युत उर्जेचा सिंहाचा वाटा भारताला मिळेल.
सत्य काय आहे? - नेपाळ सरकारनं जीएमआर या भारतीय कंपनीला ९०० मेगावॅटचा अप्पर कर्नाली जलविद्युत प्रकल्प उभारण्याची परवानगी २००८ साली दिली होती. नेपाळमधल्या राजकीय उलथापालथीमुळं हा प्रकल्प लांबणीवर पडत गेला आणि मोदी सरकारच्या नशिबानं सध्याच्या नेपाळी मंत्रिमंडळाकडून त्याला हिरवा कंदील मिळाला. (http://in.reuters.com/article/2014/09/18/nepal-india-electricity-idUSL3N0RJ53720140918) आणखी सत्य शोधायचं म्हटलं तर, २०२१ मधे पूर्ण होणार्‍या या जीएमआर प्रकल्पातून १२ टक्के वीज नेपाळला मोफत पुरवली जाईल, उरलेली वीज भारताला पुरवली जाईल, आणि या प्रकल्पात नेपाळ २७ टक्क्यांचा भागीदार असेल.

मुद्दा ४. व्हियेतनाम सोबत राजकीय संबंध मजबूत केल्यामुळे व्हियेतनामच्या समुद्रातील तेल उत्त्खाननाचे कंत्राट ONGC  ला मिळणार आहे. चीनशी संबंध बिघडतील या भीतीमुळे आधीचे  सरकार हे कंत्राट घ्यायला घाबरत होते.
सत्य काय आहे? - मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी एप्रिल २०१४ मधे इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, व्हिएतनामनं ओएनजीसी विदेश (ओव्हीएल) या भारतीय कंपनीला नोव्हेंबर २०१३ मधे पाच आणि एप्रिल २०१४ मधे दोन, अशी एकूण सात कंत्राटं आधीच देऊ केली होती. ओव्हीएल १९८८ पासून व्हिएतनाममधे कार्यरत असून, कंपनीची व्हिएतनाममधली गुंतवणूक ५० कोटी अमेरिकन डॉलर्सहून जास्त झाली आहे. (http://articles.economictimes.indiatimes.com/2014-04-30/news/49523412_1_blocks-127-ovl-petrovietnam)

मुद्दा ५. अमेरिकेचे निर्बंध झुगारून इराण आता भारताला कच्चॆ तेल विकणार आहे आणि ते सुद्धा भारतीय रुपयांमध्ये ! याचाच अर्थ देशातील परकीय गंगाजळीला धक्का पोहोचणार नाही. इराण मधल्या 'चाबहार' बंदराचे बांधकाम भारत करणार आहे जिथे भारतीय नौकांना खास प्रवेशद्वार असेल.
सत्य काय आहे? - जुलै २०१३ मधे टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार, अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांनी आर्थिक निर्बंध लादल्यानं इराण भारताला विकलेल्या तेलाची किंमत पूर्णपणे रुपयांमधे स्विकारायला तेव्हाच तयार झालं होतं. (http://timesofindia.indiatimes.com/india/Iran-agrees-to-take-all-oil-payments-from-India-in-rupees/articleshow/21067897.cms) 'चाबहार' बंदर बांधण्यासाठी इराणला भारतानं मदत केली होती, पण ती मोदी सत्तेत आल्यावर नव्हे, तर १९९० च्या दशकात! अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांचे निर्बंध झुगारुन भारतानं २०११-१२ मधे युद्धग्रस्त अफगाणिस्तानला मदत म्हणून एक लाख मेट्रीक टन गहू याच 'चाबहार' बंदरातून निर्यात केला होता. (http://www.telegraph.co.uk/news/worldnews/middleeast/iran/9115192/India-begins-use-of-Chabahar-port-in-Iran-despite-international-pressure.html)

मुद्दा ६. ऑसट्रेलिया भेटीदरम्यान पंतप्रधान टोनी अबोट यांनी भारताला युरेनियम पुरवठा करण्याचे मान्य केले  आहे.  ऑसट्रेलिया हा जगातील सगळ्यात मोठा युरेनियम उत्पादक देश आहे.
सत्य काय आहे? - 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड' या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानं मार्च २०१३ मधे दिलेल्या बातमीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यादरम्यान युरेनियम खरेदी-विक्रीसंदर्भात चर्चा १८ मार्च २०१३ रोजी सुरु होत असून, प्रत्यक्ष करारावर सह्या होण्यास व विक्री सुरु होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागेल. (http://www.smh.com.au/world/australia-and-india-to-start-uranium-sale-talks-20130306-2fmoq.html) आता २०१३ नंतर दोन वर्षांनी मनमोहन सिंग जाऊन नरेंद्र मोदी आले तर मूळ कराराचं श्रेय कुणाला मिळणार सांगा बरं!

मुद्दा ७. चीन भारतात २० बिलियन $ ची गुंतवणूक करणार आहे (१,४०,००० कोटी रुपये !)
सत्य काय आहे? - चीनमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, चीनची भारतातील प्रत्यक्ष गुंतवणूक डिसेंबर २०११ पर्यंत ५७५ मिलियन डॉलर्स आणि ऑक्टोबर २०१२ पर्यंत ६५७ मिलियन डॉलर्स इतकी होती. (http://www.indianembassy.org.cn/DynamicContent.aspx?MenuId=3&SubMenuId=0) भारतातल्या २० बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा प्रत्यक्षात कधी येईल माहिती नाही, पण त्याबरोबरच चीननं पाकिस्तानात ४६ बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीचीसुद्धा घोषणा केलेली तुम्हाला माहिती असेलच. (https://www.wsws.org/en/articles/2015/04/28/paki-a28.html)

मुद्दा ८. भारतीय सरंक्षण व्यवस्थेने Pentagaon  सारख्या संस्थेसोबत करार केला आहे. पाकिस्तानसारखे देश आता भारतावर अतिरेकी हल्ले करण्याआधी दहा वेळा विचार करतील.
सत्य काय आहे? - पेन्टॅगॉन हे अमेरिकेच्या संरक्षण विभागाचं मुख्यालय असून, ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांनी अमेरिकन एअरलाईन्सचं एक विमान हायजॅक करुन थेट पेन्टॅगॉनच्या पश्चिम बाजूला धडकवलं होतं. या आत्मघातकी हल्ल्यात १८९ माणसं मेली होती. (http://en.wikipedia.org/wiki/The_Pentagon) शिवाय, या मुद्द्यामधे म्हटलेला करार म्हणजे रुटीन ॲग्रीमेंट असून, आतापर्यंत पेन्टॅगॉननं जगातल्या अनेक देशांसोबत असे शेकडो करार केले आहेत. परंतु या करारांचा अतिरेक्यांवर काही परीणाम झालेला अजून तरी ऐकीवात नाही. (http://articles.economictimes.indiatimes.com/2015-05-13/news/62124140_1_agreements-indian-embassy-defence)

मुद्दा ९. जपान भारतात ३० बिलियन $ ची गुंतवणूक करणार आहे (२,००,००० कोटी रुपये !). ही गुंतवणूक दिल्ली - मुंबई औद्योगिक कोरेडोर मध्ये करण्यात येणार आहे.
सत्य काय आहे? - जपानमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, नोव्हेंबर २००४ मधे जपानचे पंतप्रधान जुनिचिरो कोइझुमी आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारत-जपान आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी जॉइंट स्टडी ग्रुपची स्थापना केली. २००६ मधे आलेल्या या ग्रुपच्या अहवालानुसार २००७ साली आर्थिक भागीदारीचा करार करण्यात आला, जो चर्चेच्या १४ फेर्‍यांनंतर सप्टेंबर २०१० मधे अंमलात आणला गेला. २०११ मधे या करारावर सह्या करण्यात आल्या. डिसेंबर २००६ मधे जपानच्या भेटीवर गेलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सही केलेल्या 'एमओयु'च्या आधारे ऑगस्ट २००७ मधे 'दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर'ला मान्यता मिळाली. यासाठीचं विशेष विकास महामंडळ जानेवारी २००८ मधे स्थापन करण्यात आलं. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ४.५ बिलियन डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा तर जपान सरकारनं २०११ मधेच केली होती. या प्रकल्पासाठी जपान-इंडीया टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून, या टास्क फोर्सची दहावी बैठक ऑक्टोबर २०१२ मधे टोकियोत झाल्याचं या अधिकृत वेबसाईटवर म्हटलं आहे. (http://www.indembassy-tokyo.gov.in/india_japan_economic_relations.html) आता यात मोदी सरकारचं कर्तृत्व काय असेल बरं?

मुद्दा १०. पूर्वोत्तर सीमारेषा रस्ता बांधण्याचे भारत-चीन ने मान्य केले आहे. मागील सरकारच्या काळात कितीतरी वर्ष हा प्रस्ताव्व प्रलंबित होता. आणि यासाठीच चीन ने भारतातील गुंतवणूक थांबवली होती.
सत्य काय आहे? - भारत सरकारच्या ईशान्य भाग विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, या रस्त्याचं काम सप्टेंबर २००५ पासूनच सुरु आहे. (http://www.mdoner.gov.in/content/sardp-ne) परंतु, खंडणी, अपहरण, आणि इतर दहशतवादी कारवायांमुळं हे काम सतत बंद पडत आलेलं आहे. (http://www.business-standard.com/article/companies/india-s-north-east-risky-terrain-for-road-construction-113112000828_1.html) मात्र या रस्त्यामुळं चीननं भारतातील गुंतवणूक थांबवल्याचा मुद्दा असंबंध आहे.

मुद्दा ११. भारत सरकारने येमेन मधून ४५००+ भारतीय लोकांना सुखरूप मायदेशी परत आणले. शिवाय ४१ देशातील लोकांना मायदेशी परत नेण्यास मदत केली. सौदी अरेबिया ने येमेन वर हा हल्ला केला होता आणि येमेन ने "नो फ्लाय झोन" घोषित केला होता. श्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: सौदी अरेबिया चे राजे सुलेमान यांना दूरध्वनी करून भारतीय विमान सौदी अरेबिया च्या हदीत येऊ देण्याची मागणी केली. सुलेमान यांनी ती मान्य केली. अजित डोवल, सुषमा स्वराज आणि व्ही के सिंग यांनी या प्रकियेत महत्वाचा हातभार लावला. आणि हो ...४५०० भारतीयांपैकी फार कमी हिंदू होते बंर का !!!
सत्य काय आहे? - १९९० साली इराक-कुवेत युद्धातून एक लाखाहून अधिक भारतीयांची सुटका तेव्हाच्या सरकारनं आणि लष्करानं केली होती. २००६ मधे लेबनन युद्धातून २,२८० लोकांची 'ऑपरेशन सुकून' अंतर्गत सुटका करण्यात आली, ज्यामधे १,७६४ भारतीय, ११२ श्रीलंकन, ६४ नेपाळी, आणि इतर देशांतील नागरिकांचा समावेश होता. २०११ च्या लिबियन युद्धातून 'ऑपरेशन सेफ होमकमिंग' अंतर्गत १५,००० पेक्षा जास्त भारतीयांची सुटका करण्यात आली. (http://en.wikipedia.org/wiki/Operation_Safe_Homecoming आणि http://en.wikipedia.org/wiki/Operation_Sukoon) या यशस्वी कामगिरीचे श्रेय त्यावेळच्या सरकार आणि मंत्र्यांनी न लाटता, प्रत्यक्ष जमिनीवर उतरुन काम करणार्‍या लष्कराला देण्यात आलं होतं.

मुद्दा १२. श्री नरेंद्र मोदींच्या प्रयत्नामुळे फ्रांस ने भारताला ३६ लढाऊ विमाने देण्याचे मान्य केले. ह्या सौद्यामध्ये कोणीही मध्यस्थ नव्हता.
सत्य काय आहे? - जानेवारी २०१५ मधे एका मुलाखतीत, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीच्या राफेल लढाऊ विमानांऐवजी आपल्या हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडनं बनवलेल्या सुखोई-३०एमकेआय लढाऊ विमानांचा पर्याय सुचवला होता. दसॉल्ट कंपनीची राफेल विमानं प्रचंड महाग असून, भारतीय वायु सेनेच्या सर्व अटी त्यांनी पाळलेल्या नाहीत. त्यामुळं गेल्या तीन वर्षांपासून ही कंपनी भारताला १२६ राफेल लढाऊ विमानं विकण्यासाठी प्रयत्न करत असूनही संरक्षण मंत्रालय आणि भारतीय वायु सेनेनं हा व्यवहार थोपवून धरला होता. अशात नरेंद्र मोदींनी फ्रान्सला जाऊन त्या १२६ पैकी ३६ विमानं खरेदी केली आणि 'मेक इन इंडीया'च्या संकल्पनेलाही हरताळ फासला. (http://www.business-standard.com/article/economy-policy/parrikar-outlines-alternatives-to-rafale-115011300014_1.html)

मुद्दा १३. क्यानडा भेटीदरम्यान भारतीय न्युक्लीयर प्लांट साठी ५ वर्षे य़ुरेनिउम पुरवठा करण्याचे क्यानडा ने मान्य केले.
सत्य काय आहे? - भारत-कॅनडा नागरी अणुसहयोग करारावर २०१० मधेच सह्या झाल्या होत्या, पण कॅनडानं भारताला युरेनियमची प्रत्यक्ष विक्री करण्याचा करार २०१३ मधे झाला. सप्टेंबर २०१३ मधे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांच्या कॅनडा भेटीदरम्यान हा करार अंमलात आला. (http://www.stratpost.com/canada-to-supply-uranium-to-india)

मुद्दा १४. फ्रांस भारतामध्ये २ बिलियन युरो ची गुंतवणूक करणार आहे.
सत्य काय आहे? - अमूक कोटी डॉलर्सची गुंतवणूक आणि तमूक लाख युरोंची गुंतवणूक हे दोन दिवसांच्या भेटीत ठरणारे निर्णय नसून त्यामागे कित्येक वर्षांची आणि आधीच्या सरकारांची मेहनत असते. तरीसुद्धा नरेंद्र मोदींना प्रसिद्धीलोलुपतेचं श्रेय द्यावंच लागेल, कारण 'व्हायब्रंट गुजरात'च्या नावाखाली त्यांनी 'प्रॉमिस्ड इन्व्हेस्टमेंट्स'चा नवा फंडा राजकारणात आणला. 'व्हायब्रंट गुजरात' अंतर्गत २००३ ते २०१५ पर्यंत मोदींनी १,४८९ बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकींसाठी जगभरातल्या कंपन्यांसोबत करार केले आहेत. एका संशोधनपर लेखानुसार, यापैकी फक्त ९ टक्केच रक्कम प्रत्यक्ष गुंतवण्यात आली आहे. (http://scroll.in/article/700301/if-all-the-investments-promised-at-vibrant-gujarat-were-added-up-they-would-nearly-equal-indias-gdp) आता फ्रान्स, चीन, जपान नक्की किती गुंतवणूक करतात ते पाहण्यासाठी आपल्याला बरीच वाट पहावी लागेल...

मित्रांनो, मोदी सरकारच्या (खोट्या) प्रचाराचे मुद्दे संपायची काही लक्षणं नाहीत. पण प्रत्येक मुद्द्यावर थोडा वेळ दिला तर त्यामागचं सत्य आपल्याला नक्की सापडेल. आता एवढं लांबलचक स्पष्टीकरण वाचायला आणि त्याबरोबर दिलेल्या लिंक्सवर जाऊन माहिती तपासून बघायला तुमच्याकडं वेळ नसेलही. तरीसुद्धा, म्हणतात ना - 'म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो!' तेव्हा काळ सोकावू नये यासाठी खर्‍या देशभक्तांना सजग रहावंच लागेल आणि असत्य खोडून काढण्यासाठी सत्य समोर आणावंच लागेल. तुम्हालाही जर अंधभक्तांच्या दिशाभूल करणार्‍या पोस्ट थोपवायच्या असतील तर ही सत्य परिस्थिती मांडणारी पोस्ट नक्की शेअर करा, फॉरवर्ड करा. 'खोटं बोल पण रेटून बोल' या प्रवृत्तीला एकच उत्तर - 'खरं काय ते न घाबरता बोल!'

(या लेखातील मुद्दे व लिंक्स फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग वेबसाईटवरुन घेण्यात आले आहेत.)


Share/Bookmark

Monday, May 18, 2015

गांधी मला भेटला

गांधी मला
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या १० x १२ च्या खोलीत
६ x २ १/२ च्या बाजल्यावर
भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला
तेव्हा तो म्हणाला -
सत्यापासून सौंदर्य वेगळे असूं शकत नाही
सत्य हेच सौंदर्य आहे, त्या सत्याच्या द्वारां मी सौंदर्य पाहतो
सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात
असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते
सत्य हे वज्राहूनि कठोर आणि कुसूमाहूनहि कोमल आहे

गांधी मला आकाशवाणी मुंबई ब केंद्राच्या
५३७.६ किलोसायकल्सवर
गांधीवंदना या कार्यक्रमांत भेटला
तेव्हा तो बोलला---
महात्म्याचे वचनदेखील बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या
आणि ते कसास न उतरल्यास त्याचा त्याग करा
आकाशवाणीच्या निवेदिकेनं सांगितलं -
गांधीवंदना हा कार्यक्रम आपण
६ वाजून ५५ मिनिटं ते ७ वाजून २ मिनिटंपर्यंत
तांत्रिक बिघाडामुळे ऐकूं शकला नाहीत
त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोंत

गांधी मला चार्तुवर्ण्याच्या देवळांत भेटला
तेव्हा तो बनियाच्या धर्माला अनुसरून
पैशाची मोजदाद करत होता
(कुणाचं लक्ष नाही असं पाहून त्यानं कनवटीला निळी पत्ती लावली)
गांधी मला
बौद्ध मठांत भेटला
तेव्हा तो बीफचिली ओरपत होता

गांधी मला
चर्चमध्ये भेटला
दर आठवड्याला क्षमा करणार्‍या येशूपुढे
तो गुडघे टेकून उभा होता

गांधी
चुकला (नंगा) फकीर
मला मशिदींत भेटला
तेव्हा तो धर्मांतर करत होता

गांधी मला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबुद्ध भारतांत भेटला
तेव्हा तो म्हणाला -
हरिजनांची सेवा माझ्या जीवनाचा प्राणवायू आहे
मला पुनर्जन्म नको आहे
पण येणारच असेल तर अस्पृश्याचा यावा
म्हणजे येणारी दुःखं, यातना, अपमान यांचा मला अनुभव येईल
अस्पृश्यता जिवंत राहण्यापेक्षां
अस्पृश्यता असलेला हिंदुधर्म मेलेला मला चालेल
असं बोलून तो तडक भारतमातेच्या मंदिरात आंघोळ करून
गंगेच्या पात्रात उतरला

गांधी मला
सानेगुरुजींच्या आंतरभारती शाळेंत
आयला झवून बापाला सलाम करणार्‍या
धडपडणार्‍या मुलांना
श्यामच्या गोड गोष्टी सांगताना भेटला
तेव्हा श्यामची आई त्याला म्हणाली -
निरोध वापरा बिनविरोध

गांधी मला
भर रस्त्यावर हेमामालिनीच्या
नावानं हस्तमैथुन करतांना दिसला
देशांतला हा पहिलाच स्ट्रीट प्ले
अहिंसेचा हाहि एक प्रयोग

गांधी मला
टागोरांच्या गीतांजलीत भेटला
तेव्हा तो गोलपिठ्यावर
कविता लिहीत होता

गांधी मला
बाबा आमट्यांच्या एकात्म भारतांत
अपंगांच्या महोत्सवात भेटला
तेव्हा तो म्हणाला---
हात हे याचनेसाठी दुसर्‍यापुढे पसरण्यासाठी नसतात
आणि दान हे माणसाला नादान बनवते
असं म्हणून
त्यानं अमेरिकन डॉलरचा चेक अॅक्सेप्ट केला

गांधी मला आचार्य भगवान रजनीशांकडे
ध्यानधारणेत
संभोगातून समाधीकडे म्हणत
शेळीकडे वळताना दिसला

गांधी मला
मार्क्सच्या टोअॅटोमधून ड्रायव्ह इन थिएटरमध्ये
जगातील कामगारांनो एक व्हा
हा पिक्चर पहात टाइम किल करताना भेटला

गांधी मला
माओच्या लाँगमार्चमध्ये भेटला
तेव्हा तो शेतकर्‍याच्या वेषांत
खेड्यातून शहरांत स्थायिक व्हायला निघाला होता

गांधी मला
डांग्यांच्या गिरणीची भिंत चढून जाताना दिसला
तेव्हा तो ओरडला---
बिर्लाबावटे की जय

गांधी मला
काळागांधीच्या दवाखान्यांत
सावरकरांना सँपलची बाटली विकताना भेटला
गांधी मला
अटलबिहारी वाजपेयींच्या पेशवाईंत भेटला
तेव्हा तो गांधीवादी समाजवादाची जपमाळ ओढत होता

गांधी मला
चारु मजुमदारच्या नक्षलबाडीत भेटला
तेव्हा तो घोषणा देत होता -
आमरबाडी तोमार बाडी
सकलबाडी नक्षलबाडी
लालकिलेपे लाल निशान
माँग रहा हैं हिंदुस्तान

गांधी मला
क्रेमलिनमध्ये ब्रेझनेवच्या हस्ते
शांततेचं नोबेल पारितोषिक घेतांना भेटला
गांधी मला
व्हाइटहाऊसमध्ये
रेगनच्या न्यूट्रॉनची कळ दाबताना भेटला
माणसं मेलेल्या जगांतली
स्थावरजंगम मालमत्ता दाखवून
गांधी रेगनचं सांत्वन करत होता

गांधी मला
छत्रपती शिवाजी विडीचे झुरके घेत
फोरासरोडला ५८० नंबरच्या कमर्‍यांत
रंगरंगोटी केलेल्या लोकशाही नांवाच्या रांडेकडे भेटला
तेव्हां ती म्हणाली -
तूं कुठली चिकित्सा करणार आहेस?
तूं कुठला प्रयोग करणार आहेस?
तूं कुठला प्रकाश दाखवणार आहेस?

गांधी मला
परमपूजनीय सरसंघचालक
बाळासाहेब देवरसांच्या संघस्थानावर
अखंड हिंदुस्थानाच्या जयघोषांत
अर्धीचड्डी सांवरत़ ६१-६२ उठाबशा काढत घोषणा देताना दिसला
मी हिंदू आहे आणि त्याचा मला अभिमान आहे
वंदेमातरम्
कॉन्व्हेंटमध्ये शिशूंना शिकवून इंग्लड-अमेरिकेंत स्थायिक करीन

गांधी मला
जमाते इस्लामच्या घोगारी मोहोल्ल्यांत
पेट्रोडॉलरच्या थ्री-इ-वनमध्ये
पाकिस्तानविरुद्ध हिंदुस्थान क्रिकेट कॉमेंट्री ऐकताना दिसला
पाकिस्तानचा हिंदुस्थानवर २ गडी राखून विजय
हे ऐकतांच तो नमाज पढला
मोहोल्ला-मोहोल्ल्यात जाऊन त्यानं ग्रीनबोर्डाला हार घातला

गांधी मला
सदाशिव पेठेतल्या ना.ग. गोर्‍यांच्या वाड्यांत भेटला
तेव्हा तो म्हणाला
स्वातंत्र्याला इतकीं वर्षं झाली तरी आम्हाला
भारत माझा देश आहे
या देशावर माझे प्रेम आहे
इथल्या विविधतेने नटलेल्या समृद्ध परंपरांचा मला अभिमान आहे
मी माणसांचा मान ठेवीन
मी माझ्या देशाशी निष्ठा ठेवीन
असं म्हणावं लागत याची मला खंत वाटते
असं मला लंडनच्या टेम्स नदीच्या तीरावर सुचलं

गांधी मला
आयर्विनच्या व्हाइसरॉय हाउसमध्यें भेटला
तेव्हा तो स्वातंत्र्यसैनिकांच्या
पेन्शनीचा हिशेब करत होता

गांधी मला
स्वयंघोषित नेताजी राजनारायणच्या
कुटुंबकल्याण केंद्रात भेटला
तेव्हां उघडाबंब गाद्यागिरद्यांवर लोळत
मालिश करून घेत
बदामपिस्ते मिठाई खात
भारत मे समाजवाद क्यों नही आता
ह्यावर तो पत्रकार परिषद घेत होता

गांधी मला
अखिल भारतीय हिजड्यांच्या संमेलनात
कुटुंबनियोजनावर भाषण करताना दिसला
तेव्हा आशाळभूत चव्हाण
रिकाम्या असलेल्या खुर्चीवर लक्ष ठेवून
संपूर्ण बेरजेचं राजकारण शिजवत होता

गांधी मला
आम जनता की संपत्ति असलेल्या पृथ्वीवर
बेवारस मुलांच्यात नवरा-बायकोचा खेळ करतांना भेटला
तेव्हा तो म्हणाला
निधर्मी देश क्या पहचान
छोडो चड्डी मारो गांड

गांधी मला
हाजी मस्तानच्या साम्राज्यांत दिसला
तेव्हा त्यानं चक्क पंचा सोडला
त्याच्या पंच्यावर मी कधींच गेलो नाही
पंचा काय धोतर काय नि पटलून काय
सत्याचे प्रयोग कशांतूनहि होतात
हो
अगदी कवितेंतूनसुद्धा

गांधी मला
बाटाच्या कारखान्यांत
बुटाला शिलाई मारतांना दिसला
तेव्हा बाबूजी गांधीना म्हणला
इस देश में चमार कभी प्राइम मिनिस्टर नही हो सकता

गांधी मला
मोरारजीच्या ओशियानात भेटला
शिवाम्बूच्या तारेंत तो म्हणाला
स्त्रिया ह्या मूर्ख आणि विवेकशून्य असतात
मी हे कोणाच्या संदर्भात म्हटलं -
हे आपल्या लक्षांत आलं असेलच

गांधी मला
नियतीशी संकेत करतांना
नेहरूंच्या तीन मूर्तीत भेटला
तुम्ही आमच्या विश्वासातले
गादी नंतर इंदिरेच्या हवाली करा

गांधी मला
चरणसिंगांच्या सूरजकुंडात भेटला
तेव्हा तो राष्ट्राला उद्देशून म्हणाला—
मेरे जिंदगीकी तमन्ना पुरू हो गयी

गांधी मला
कमलेश्वरच्या परिक्रमांत दिसला
तेव्हा तो म्हणाला—
मनोरंजनाची ए यू साधनं
तळागाळातल्या जनतेपर्यंत पोंचवायचं माझं स्वप्न साकार झालं
(कॅमेरामननं कॅमेरा त्याचा आंडपंचा आणि काठी यावर केंद्रीत केला होता)

गांधी मला रतन खत्रीच्या अड्ड्यावर दिसला
तेव्हा तो मटक्यांतून
राष्ट्रीय एकात्मतेची तीन पानं काढत होता

गांधी मला
सर्वभूमि गोपलकी म्हणणार्‍या
विनोबांच्या धारावीत
टिनपाट घेऊन हायवेच्या रांगेत
क्रुश्चेव्हला गार्ड ऑफ ऑनर देतांना दिसला

गांधी मला
इंदिरा गांधींच्या १ सफदरजंग कारस्थानात भेटला
धटिंगण आय-माय कार्यकर्त्यानं
त्याच्या गांडीवर लाथ मारली
तेव्हातो ओरडला -
देश की नेता इंदिरा गांधी
युवकों का नेता संजय गांधी
बच्चों का नेता वरुण गांधी
भाड में गया महात्मा गांधी

गांधी मला
अजितनाथ रे च्या न्यायालयात
आरोपीच्या पिंजर्‍यात दिसला
सत्याचे प्रयोग करून
देश धोक्यात आणल्याबद्दल
राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली
त्याला फांशी दिला

गांधी मला
अत्र्यांच्या शिवशक्तीत
गांधींवर अग्रलेख लिहितांना दिसला
गांधीत आम्ही ईश्वराचे दर्शन घेतले
धन्य झालो
अब्जावधी वर्षांत आता ईश्वर पृथ्वीवर येणार नाही
स्वदेशी रहा - स्वदेशी बना
असं म्हणून त्यांनी देशीला जवळ केलं

गांधीबाबा राजघाटावर
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या
खांद्यावर हात ठेवून म्हणाला -
देव मेला आहे देवमाणूसही मेला आहे
आता सैतानांच्या विश्वात मेलेल्या देवाला मुक्ती नाही
आणि देवमाणसाला तर नाहींच नाही
--आणि क्षणार्धात तो समाधीत गेला....

- वसंत दत्तात्रेय गुर्जर, प्रास प्रकाशन

(स्रोत - https://www.facebook.com/notes/sunil-tambe/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE/1087264747955359)


Share/Bookmark

Saturday, April 18, 2015

I am the King here!

This happened at one of our favourite restaurants yesterday. A group of young boys was having dinner on a table next to ours. One of the boys asked the owner (fondly called as 'Dada') for a straw in his cold drink. The restaurant was full and everybody was all ears to Dada's reply - 'Bada ho gaya na ab tu? Straw se piyega?' ('You're a grown up boy now, aren't you? Do you still drink with a straw?') In a 'service' industry with 'Customer is God' motto, we love such guys with 'I am the King here' attitude. What say?


Share/Bookmark

Friday, March 20, 2015

आप यूँ फासलों से गुजरते रहे

आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज आती रही
आहटों से अंधेरे चमकते रहे
रात आती रही, रात जाती रही

गुनगुनाती रहीं मेरी तनहाइयाँ
दूर बजती रहीं कितनी शहनाइयाँ
जिंदगी जिंदगी को बुलाती रही
आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज आती रही

कतरा कतरा पिघलता रहा आसमाँ
रुह की वादियों में न जाने कहाँ
इक नदी दिलरुबा गीत गाती रही
आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज आती रही

आप की गर्म बाहों में खो जायेंगे
आप की नर्म जानों पे सो जायेंगे
मुद्दतों रात नींदें चुराती रही
आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज आती रही

- जाँ निसार अख्तर / खय्याम / लता मंगेशकर

'शंकर हुसैन' पिक्चरमधलं हे गाणं खास लतादीदींच्या आवाजातल्या शेवटच्या कडव्यासाठी तरी ऐकलंच पाहिजे. 'मुद्दतों रात नींदे चुराती रही' या ओळीआधीचा पॉज आणि नंतरचा इफेक्ट शब्दांत मांडता येणार नाही, फीलच करावा लागेल... आप यूँऽऽ फासलों से...
(यूट्युबवर शोधलं नाही, पण 'विविधभारती'वर अधून-मधून लागतं हे गाणं.)


Share/Bookmark

Thursday, February 26, 2015

बाई आणि पुरुष

नोकरी करणार्‍या बाईला प्रमोशन/पगारवाढ आणि धंदा करणार्‍या बाईला काम कुणाबरोबर तरी 'झोपल्या'मुळं(च) मिळतं, असं मागच्याच नव्हे तर आत्ताच्या पिढीतले लोकही उघड-उघड (अर्थात् त्या बाईच्या माघारीच) म्हणताना दिसतात. पण मग नोकरीत प्रमोशन/पगारवाढ मिळणारे किंवा धंद्यात ऑर्डर मिळवणारे पुरुष कुणाबरोबर झोपतात, याचं उत्तर मात्र त्यांच्याकडं कधीच नसतं! टी-शर्ट आणि जीन्स घालणार्‍या बाईचं कॅरेक्टर लो, पण तेच घालणारा पुरुष स्टायलिश? स्वतःच्या कमाईवर कुटुंब पोसणार्‍या बाईचं चरित्र संशयास्पद, पण तेच करणारा पुरुष कर्तृत्ववान? नवरा आणि मुलांपेक्षा करीयर आणि कामाला जास्त महत्त्व देणारी बाई निर्दयी, पण करीयर आणि कामाच्या नावाखाली बायको-पोरांकडं दुर्लक्ष करणारा पुरुष कामसू? सिगरेट ओढणारी आणि ड्रिंक्स घेणारी बाई एक तर 'अव्हेलेबल' किंवा सरळ-सरळ राक्षसी, आणि हीच सिगरेट-दारु पुरुषांसाठी मात्र स्ट्रेस रिलीफची औषधं? कुठून मिळतात हे व्ह्यूज? कशी तयार होतात ही मतं? कोण आहे जबाबदार? आपली एज्युकेशन सिस्टीम, मीडिया, हमारी संस्कृती और हमारी परंपरा? की खरंतर घराघरांतून कळत-नकळत केले जाणारे 'संस्कार'? लहान वयातच मुला-मुलींसमोर बाई आणि पुरुषांना जसं वागवलं जातं, त्यांच्याबद्दल जसं बोललं जातं (खरंतर गॉसिपिंग केलं जातं) त्याप्रमाणंच त्यांची मतं बनत जाणार ना! या बाबतीत पुरुष तर होपलेसच आहेत. निदान बायकांनी तरी आपल्या मुला-मुलींचे डोळे लहानपणीच उघडावेत...


Share/Bookmark

Monday, February 16, 2015

मृत्यू

"मृत्यू हा शेवट नसतोच. त्या व्यक्तीचाही नाही आणि इतरांचा तर नाहीच नाही. मृत्यूनंतर तर ते माणूस बहुतेकांना खरंखुरं उलगडायला लागतं. माणूस अस्तित्वात नाही म्हटलं की तो लख्ख कळतो एकाएकी वीज चमकल्यासारखा. आणि मग हळहळ वाटायला लागते, की हे आधी कसं दिसलं नाही? इतकं कसं काळोखं असतं आपलं जगणं की जवळचं माणूसदेखील नीट दिसू नये... आणि मृत्यूच्या प्रकाशातच ओळखू यावा त्याचा चेहरा."

- भिन्न, कविता महाजन


Share/Bookmark

Sunday, February 15, 2015

निषेध आणि कारवाई

संतोष पवारच्या 'यदाकदाचित'मधला युधिष्ठिर आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींचा सारखा-सारखा निषेध करत असतो.
द्रौपदीला सीता समजून चुकीच्या स्वयंवरात शिरलेल्या रावणाचापण तो निषेध करतो.
गोंधळलेला रावण दुर्योधनाच्या कानात कुजबुजतो,
"एऽऽ, ते बघ तो निषेध करतोय..."
यावर दुर्योधन युधिष्ठिराकडं तुच्छ कटाक्ष टाकत मोठ्ठ्यानं म्हणतो,
"करु दे. जल्ला त्यानं आयुक्षात तेवडाच केलाय!"

(संदर्भः
१. नेमाडेंसाठी 'बास्टर्ड' शब्द वापरला म्हणून विनोद तावडे सलमान रश्दीवर कारवाई करणार म्हणे;
२. पिक्चरमधे मुंबईऐवजी बॉम्बे शब्द वापरल्यास सेन्सॉर बोर्ड कारवाई करणार म्हणे;
३. 'एआयबी रोस्ट'मधे लैंगिक विनोद केले म्हणून करण जोहर आणि इतर कलाकारांवर कारवाई करणार म्हणे;
४. आणि असेच रोज-रोज समोर येणारे इतर अनेक संदर्भ...)


Share/Bookmark

Sunday, January 11, 2015

आज-कल याद कुछ और रहता नहीं

इश्क के मैंने कितने फसाने सुने
हुस्‍न के कितने किस्से कितने पुराने सुने
ऐसा लगता है फिर इस तरह टूट कर
प्यार हमने किया इक जमाने के बाद...
आज-कल याद कुछ और रहता नहीं
एक बस आप के याद आने के बाद...

- आनंद बक्षी


Share/Bookmark

Monday, January 5, 2015

The Boss!

From playing mouth-organ for Hemant Kumar's 'Hai Apna Dil Toh Awara' in 1958 to winning third Filmfare Award for Best Music Direction in 1995... This man was, is, and will always remain The Boss of Indian Film Music.

Take a bow, Pancham! We owe a lot to you...






Share/Bookmark

Friday, January 2, 2015

Terracotta

Beautiful terracotta artifacts from 'इस्किलार कलादालन, तळेगांव'.
Thanks to Rupak Sane and Jyoti Rupak Sane...



Share/Bookmark

Wednesday, December 24, 2014

Remembered or missed?

"In fact, people sometimes ask me how I would like to be remembered. While hopefully that is a while away, all I tell them is this: I don't want to be remembered, I just want to be missed."

- Chetan Bhagat ('Half Girlfriend')



Share/Bookmark

Wednesday, December 17, 2014

The Right Approach

How many times have you tried to approach the senior-most person in your organization? Most of the times, the CEO's and MD's are approached for very wrong reasons, resulting in not_so_positive response from them, which you interpret as unwillingness to be approached. Mentioned below are some common reasons for which top bosses are approached:

.Personal touch - Highlighting your work in your organization is often mistaken with highlighting yourself. You try to e-mail or call or meet the top boss just to say 'hi'. People driving their businesses will never block you directly for personal reasons, as they understand the value of their employees – top to bottom. At the same time, they have neither the time nor interest in your personal matters. You send your wedding invitation, they will say, “I'll try to attend”. You send new year greetings, they will reply, “Same to you”. These replies do not necessarily mean you have the rapport with the top boss. Do not boast you receive 'casual' mails from them, many others too, might be receiving them.

.Detective reports - You feel your immediate boss is misleading the team and misguiding the management, what do you do? Send an 'inside' report to the top boss? Or try to make direct meeting to explain 'real facts'? Two questions for you. One, are you dead sure the top boss is not aware or involved in what your immediate boss is doing? Two, what are you hired as – a secret agent? At your level you never know who makes the decisions and who executes. And complaining about your own boss or department questions your own integrity. If the top boss does need your assistance, he will approach you for your inputs. And in that case, please provide “facts”, not “views”.

.Salary issues - Bargain your price at the time of joining an organization. Once joined, you become a part of the existing payment system. Try to influence the management with your work and achievements, not with personal requests of salary increment. Your stories about family responsibilities, loans, health problems, and other liabilities, can earn you sympathy from the top boss. At the same time, your capability and intentions to be with the organization are prone to criticism. Try to understand what you have to do to get a rise, instead of cooking stories of how badly you need more money.

These are some representative cases of wrong approach to the top. So, what could be a right approach?

.Business view - Not every employee can exactly share the top boss' vision. However, you are the master of your work, department, or activities. Try to think of a possible enhancement in your process or department, that could drastically reduce the cost or magically boost the sales. Now, try to approach the top boss with your idea, which purely is your initiative. However silly or small that idea be, the top will always be willing to give it a thought. Whatever fate your idea earns, you, as the originator, get noticed.

.Rise to the occasion - There are times when the top needs assistance from all the levels, especially the ground level. These expectations often cross the typical roles and responsibilities definitions. Grab these opportunities. Prove to the top that you can go out of the way, when required.

There may not be too frequent opportunities to approach the top, right way. But then, identifying the right one and grabbing it, is the key, isn't it?


Share/Bookmark

Monday, December 15, 2014

5S - Simple Steps to Improve Working

5S is a method of organizing your workplace and workflow, to improve efficiency and quality of work. Literally, 5S is combination of five Japanese words, starting with the letter 'S'. This method can be applied in your professional as well as personal life.

1. Seiri - Sorting. Remove the unnecessary.
- Sort your documents and items as per requirement. Keep only necessary and remove the unnecessary.
- Review files and folders on your computer. Store only necessary and delete/backup unnecessary.

2. Seiton - Systematic arrangement. Place for everything and everything in place.
- Keep frequently used items closer to you.
- Define specific locations to store all necessary documents and items. It is recommended to stick name tags on the drawers/shelves/containers, where these items are stored. Ensure that they are stored at their designated place only.
- Prepare a list of folders, broadly classified according to contents, on your computer. Ensure that all documents are saved in corresponding folders only.

3. Seiso - Cleaning. Keep the workplace clean and tidy.
- Cleaning your workplace should be a regular activity, rather habit.
- It makes the place more pleasant and worth spending time at. It also increases your confidence about availability and accessibility of necessary items.
- On your computer, clean your desktop, recycle bin, and major folders regularly. Remove unnecessary shortcuts, files, and documents. It will help improve performance of your system.

4. Seiketsu - Standardization.
- Prepare standard procedure of above 3 activities.
- Make index of items and documents, by numbering them in logical manner.
- Maintain a list of items, documents and their locations.
- Also, mention names of persons responsible to follow above 3S's. Explain the standard procedure to all concerned persons.
- Maintain a master document having links to all necessary documents on your computer. Prepare schedule for backup, upgrade, and cleanup of your documents and software.

5. Shitsuke - Self Discipline.
- Ensure that all above 4S's are followed.
- Once the procedure is standardized, everyone concerned must follow it, until new improvement is suggested or some unavoidable reasons are surfaced.

Benefits of 5S:
- Reduced searching time. You know where to look for particular item.
- Increased productivity. The time and energy for searching are saved.
- Improved quality of work. You can focus on core activities.
- Satisfaction of working, without draining your time and energy, and delivering quality results, all the time.


Share/Bookmark

Saturday, December 13, 2014

Case Study - Sales Communication

How many of you, working as Sales Executive/Manager, have experienced the frustration about your potential clients not returning your calls? Almost all of you, at some point of time, right? Let's analyse the case and see why this happens.

The Case:
The potential client typically said, "We need your product/services, please send us a business quote customised for our industry". Now after providing all the details and repeated follow-up calls, you are wondering, what happened so dramatically, that the client is not even answering your calls? Why do they behave in this way?

Possible Reasons:
- Client’s request is misinterpreted as immediate wish to buy. Enthusiastic sales people try to reduce ‘enquiry-to-order cycle time’ to seconds! This results in false impression, ‘Send me a quote’, being concluded, as if the client will place an order the moment he receives the quote.

- ‘It’s not a priority now.’ This can happen almost overnight. Changes in demand from customers of your potential client, tricky market situations, or simply a new Boss can be the most common reasons, why they no more need your product/services urgently.

- ‘I am an expert, I know in and out of this product/service.’ Many times, someone at the client’s end feels he has all the required information and there is no need for further discussion.

- ‘We are totally packed in another project/audit/daily work.’ This is not always a lie; you have to believe this sometimes. You can even judge this from the situation in your own office. In most of present organisations, people have many things to complete within tough deadlines. The client wants to come back and discuss with you, but just cannot make it right now!

- Just for reference and comparison. Many times client needs your quote for comparison, to justify to the management/team to place order with your competitor.

Actions:
It’s important to find out the reason for client’s silence before further investing in this case. Let’s see how:

- Don't give up. Maybe your potential client wants you to maintain the follow-up. There should be no harm in contacting 5-6 times before jumping to conclusion.

- Keep adding value in each follow-up call. Don't just say, "Hi just calling you as a follow-up on our quote. Call me if you need any other information". Instead, you can say, "Hello, I believe you have realised how our product/services can be a great push to your efforts in cost control. We can discuss and explore some more ways to customize the product/services bringing it closer to your requirements." This way you can stress on potential loss due to delayed purchase decision.

- Are you following up too frequently? After 2-3 unsuccessful attempts, increase the gap in subsequent calls by days, weeks, or even months.

- Use different communication tools. Use phone calls with e-mails, invitations to the upcoming events, forwarding articles, testimonials etc. Try to express yourself as an expert in this field.

- Discover multiple contact points in the client’s organisation. Identify and develop multiple relationships within the potential organisation.

- Plan for future actions. Be prepared with the follow-up schedule and agenda for next meeting/call. By identifying symptoms of unwillingness, you can further evaluate the seriousness and/or urgency of the need.

- Try a little bit of fun. After repeated attempts to contact, leave a funny message as, ‘I know you're very busy person, but I also know that reducing your production cost is important for you. That's why I keep bothering you. Can I have an opportunity to talk to you instead of your answering machine?’

- Let them have some breathing space. E-mail the potential client stating, ‘We thought you were interested, but as we have not heard from you since long, we might have misjudged your need.’ This can get you a response and perhaps an explanation from the client (who might be feeling guilty of not communicating).

Conclusion:
By trying out some of these different options, you should be able to get some clue on the status of the need. This should help you decide whether to look forward to the client as potential one or to move forward with another client.


Share/Bookmark

Thursday, December 11, 2014

Business Etiquette

Good Manners
It takes 15 seconds to make a good first impression. And you spend rest of your life to repair it, if it was negative one. Hence, be prepared to present yourself as the best of you.

Right Handshake
Handshake is a universally accepted way to greet people and introduce oneself in the corporate world. It should be warm, firm, and should last about 3-4 seconds.

Business Introduction
In business introductions, rank and designation are considered more important than age and gender. Whenever you are in situations where you have to introduce a colleague to a senior person or your client to your boss, always say the name of the most important person first to show respect.

Telephone
Always call during regular working hours. Call back or answer voice messages within one working day.
Remember mobile phone is only for emergencies. Switch off your mobile while attending a meeting.

Effective Business Correspondence
Reply to all business e-mails within one working day, maximum two.
Always use sentence case. UPPERCASE means you are shouting; lowercase shows you are lazy.
Always use email signature, giving your complete contact details.

Perfect Business Attire
What you wear is a sign of your respect for the other person or the organization you are working or interacting with.
Observe the dress code of your workplace.
On casual dress days, wear business casual clothes.

The Business Luncheon/Dinner
Remember, a Business Meal is for eating and networking.
Place the napkin on your lap and do not wipe your face or nose with it.

The Value Business Referral
Referrals are invaluable to business.
When people give you a referral or a sales lead, thank them.

Skilled Business Networking
Corporate parties, cocktail receptions, office parties are excellent places to network.
Office parties are an extension of the office environment; so appear on time, dress appropriately, drink in moderation.

The Smart Business Talk
When meeting prospective clients or business associates, to initiate the discussions and get the business talk going, start with introductions and by asking general questions.

Value Time, Value Business
Time is precious; time is money.
Be time conscious and stick to the rules of punctuality.

The Friendly Office Environment
Be polite and courteous, even to those you do not like, to avoid fights and negative tension.


Share/Bookmark

Tuesday, December 9, 2014

Listen Carefully and Get Ahead

Knowing how to listen is a crucial aspect in relationships… especially in today’s competitive business environment.

Successful professionals know careful listening can reveal unseen problems, identify new trends and opportunities and lead to creative solutions. They also know that listening to people will help building good relations in their working relationships.

Do you know how to listen…?
  • Control Emotions: Experts say emotions are powerful obstacles to listening. They colour what we hear and prevent us from focusing on what is being said. To be a good listener, one should not react while someone is speaking.
  • Another emotional obstacle is anxiety about what to say. If you are listening to someone, listen carefully, take a deep breath, and then respond. It shows respect towards speaker. It will also give you some time to think and understand the stand of speaker.
  • Notice details about speaker: how slow he speaks, his style, how much eye contact he maintains. This will help you while responding as sharp difference between styles can create tension. Accepting his style can help you concentrate and build a good communication and understanding.
  • Do not label the person: One major obstacle in listening is that we label the speaker as a boss, a peer, or a subordinate. Wise executives encourage communication on same levels.
  • Listen aggressively: Asking a good question is a secret of good conversation. When you are having conversation with a group of people, keep some gaps in your presentation so that people can ask questions to make interaction interesting.
  • Do not jump to conclusions: Some people are solution-finders, before a speaker finishes, they can immediately come to the conclusion and find the solution. Instead of coming to conclusions immediately, listen to the speaker carefully to weigh all aspects of an issue to find perfect solution.
  • Understand others' need: If you want to influence, you have to listen that person carefully and understand his need.


Share/Bookmark

Sunday, December 7, 2014

Secrets to Peak Performance

It is scientifically proven that Loss Prevention is the primary and most effective way to improve performance. As it relates to optimizing internal capacities, it is quite easier and faster than applying any external improvement techniques. No external applications would result unless all causes of internal loss are prevented. Let us consider example of a balloon. You will not be able to blow it to size with whatever amount of air, until it has even one small hole. Similarly, you need to optimize your potential energy before enforcing additional efforts.

Here are some tips on buffing up your efforts:

1. Lead a well-rounded life

People who get their work at home until bedtime get on peak early and get addicted to work in short span of time, too. High performers can leave their work at office and spend good amount of time on the things they like. This allows their minds to refresh and rejoin work with improved efficiency.

2. Proper selection of career

Selection of work plays vital role in your career. High performers select the kind of work they like to do and focus on the internal satisfaction, not on external rewards and powers. In the end, as they enjoy their work, their work is always better than others’ is and result in high returns.

3. Rehearse each challenging task mentally

Before facing any challenging situation, high performers prepare for it by judging pros and cons, possible actions and reactions. They rehearse the task mentally so that when it happens, they have already gone through it.

4. Seek results not perfection

Many hardworking and ambitious people focus on perfection, leaving them short of time in everything they do, leading to missing on opportunities. High performers do not focus on perfection, but on accomplishment of the task. The mistakes are taken in as lessons, and not as bitter memories.

5. Be willing to risk

Most people like to create their comfort zone, and live with that for their lives. They are always in search of security, and run away from risks, thus missing on hidden opportunities. High performers, by contrast, are geared up to take risks by carefully considering how things would work and making provisions for failures and worst scenarios.

6. Don’t underestimate your potential

People presume that they know their limits. In fact, they don’t know, but they believe and limit themselves. Self-limiting is the biggest obstacle in high-level performance.

7. Compete with yourself

High performers focus on building themselves and improving on their own skills. Worrying about competitors’ abilities and possible superiority can often be self-defending. People differ in their potential and skills; hence, one can be better in one skill, while poor in another. High performers are interested in doing the best possible job by their own standards.


Share/Bookmark

Saturday, December 6, 2014

ज्ञानाचा विषय माणूस आहे!

"खरं म्हणजे, बुद्ध हा कुण्या हिंदू देवाचा अवतार नव्हे. हजारो वर्षं, हजारो मुखांनी एखादी खोटी गोष्ट पुनःपुन्हा सांगितली, तरी ती खरी ठरू शकत नाही. देव, ईश्‍वर अशी कोणतीही कल्पना बुद्ध मानत नाही. तो आत्माही मानत नाही. तो कोणती अवतारकल्पनाही मानत नाही. तो स्वतःला माणूसच मानत होता. आज संपूर्ण दुनिया त्याला जगातला सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञानी माणूस मानते. त्यानं ज्ञानरचनेची पायाभूत सूत्रं सांगितली. असं करून त्यानं अज्ञानरचनेच्या चिंध्या केल्या. प्रत्येक माणसानं पूर्णतः चिकित्सकच असलं पाहिजे. ‘चिकित्सेच्या वा विज्ञाननिष्ठेच्या निकषावर जे खरं ठरणार नाही, त्याचा स्वीकार करू नका,’ असं तो सांगतो. ‘विश्‍व सान्त आहे की अनंत?’, ‘ते शाश्‍वत आहे की अशाश्‍वत?’ अशा मालुंक्‍यपुत्ताच्या प्रश्‍नांना उत्तर देताना बुद्धानं विषारी बाण लागलेल्या माणसाची गोष्ट सांगितली. समजा, तो बाण लागलेला मनुष्य, त्याच्या उरातला बाण काढू न देता, तो बाण कोणत्या धातूचा होता, कुणी मारला, कोणत्या दिशेनं तो आला, अशा प्रश्‍नांच्या उत्तरांची अट घालू लागला, तर त्या प्रश्‍नांची उत्तरं मिळेपर्यंत तो मरूनच जाईल. मुद्दा बाण काढण्याचा, मनुष्य वाचवण्याचा आहे. ‘ईश्‍वर आहे काय?’ ‘आत्मा आहे काय?’ अशा प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्यात आयुष्य बरबाद करण्यापेक्षा तुमचे प्रश्‍न तुम्हीच सोडवा. त्या प्रश्‍नांची उत्तरंही मिळणार नाहीत आणि तुमचे इहजीवनातील परस्परांना जगवण्याचे प्रश्‍नही सुटणार नाहीत. बुद्धानं बाण काढण्याचं महत्त्व विशद केलं. ज्ञानाचा विषय ईश्‍वर नाही. आत्मा नाही. परलोक नाही. ज्ञानाचा विषय माणूस आहे. त्याच्या आणि त्याच्या संबंधात येणाऱ्या इतर माणसांमुळं निर्माण झालेले प्रश्‍न हा ज्ञानाचा विषय आहे."

- यशवंत मनोहर (सकाळ सप्तरंग, १४ सप्टेंबर २०१४)


Share/Bookmark

Friday, December 5, 2014

Attitude

"Attitude is a little thing that makes a big difference." - Winston Churchill

Attitude plays a vital role in the life of any human being. Setting right attitude is instrumental in the process of being successful or achieving things you want in life. Here are some useful tips on attitude setting:

1. Do not fear

“Attitude is not walking like a King; it’s walking like you don’t care who the King is!”

Do not limit your thoughts fearing potential reactions from others. Be a self-believer.

2. Accept new things coming your way whether you like them or not

“Your big opportunity may be right where you are now.” - Napoleon Hill

Many times, opportunities come in disguise. You tend to avoid something, which would have eventually turned beneficial for you.

“I was seldom able to see an opportunity until it had ceased to be one” - Mark Twain

3. Mould yourself as your work demands

“The way to learn to do things is to do things. The way to learn a trade is to work at it. Success teaches how to succeed. Begin with the determination to succeed, and the work is half done already.”

If you want satisfaction in what you do, you have to take on the most difficult assignment. Simple and easy tasks leave you underutilized and hence, unsatisfied with yourself.

If you do not have knowledge; but if you feel or circumstances say that you have to work on it, instead of saying no, gather information and build knowledge. No one can steal this treasure from you.

4. Give 100%

“Luck is what you have left over after you give 100 percent.” - Langston Coleman

Whether it is expected from you or not, give your 100% and make it a habit. It’s better to say, “I did it” than saying, “I could have done it”.

5. Do not evaluate too much

“We get volumes of data, pro and con. So often we get volumes for and volumes against, so we don't do anything. If we can't please 1,000 percent, we do nothing.” - Jack Coyle

It’s good to assess every situation; but not at the extent of isolating from the scene. Don’t think much on pros and cons, every action will have both good and bad reactions.


Share/Bookmark

Wednesday, December 3, 2014

Top 10 Professional Tips

One of the biggest mistakes corporate professionals make is 'to assume'. They tend to take things for granted and do not understand that there can be (rather are) multiple angles to the same view! They assume their bosses' views, they assume their colleagues' approach, they assume their competitors' pace, and so on...

In today's competitive age, if you miss your competitive edge, chances are high that you miss everything. The Performer brings you few tips - easy to remember, interesting to implement, and beneficial in results:

1. Interact with people on valid topics -
Communication has its own significance in corporate world. Here, we are referring to horizontal communication, the one you have with your colleagues, partners, and team members. The stress is on 'valid topics', which should benefit to both the ends of communication - broadcasting and receiving! There are lots of topics which need neither your opinion nor your approval. Identify those topics and AVOID talking on them. A more generalized statement would be - don’t talk much.
Another point is Greeting people when you are in, it highlights your presence.
Listen to people – it helps you understand atmosphere around you and plan your work accordingly.

2. Share your knowledge -
There can be a big debate on this - sharing your knowledge. Some people would say, disclosing your cards would draw the end of game nearer. Let's look at it from a new angle - if you want to grow horizontally, hold on with what you know; if you want to grow vertically, release it as soon as possible. Sounds confusing? Couldn't be simpler! If you want to go on working in the same way what you have been doing since years along, just continue with that. Hardly anybody would be interested in receiving the knowledge from you, as you are not known for updated knowledge pool. On the other hand, if you go on releasing what you have learnt yesterday, you would be more flexible to learn new things today and implement them tomorrow.

3. Look smart -
A most overlooked aspect! Keep your worries at home, don't carry them. Nobody is going to buy them from you, even if you showcase them throughout the day. The more pleasant you look, the more positive things you will attract - positive people, positive thoughts, positive results. The sadder you appear, the more negative influence you are going to have - people will approach you with their own grievances, are you looking for it?
Keep your eyes and ears open, that surely helps!

4. Make quick decisions and implement them -
The key is the word 'quick' - decision in no time and implementation even faster than that! Delaying decision carries lesser risk than delaying implementation. That's because, the idea is already out in the market... So let it be more decisions and at least few breakthroughs, than dwelling upon fewer decisions and no results.

5. Be a diplomat -
A diplomat is a person, who tells you to 'go to hell', in such a manner that you actually start looking for the trip! Doesn't that explain what it means?
Be strict whenever required - first understand 'whenever'...

6. Keep in touch with the top ones -
Hierarchy in corporate world has to be observed with due respect. However, that should not impact your existence. The top-most layer of any organization is always in search of ideas and suggestions, which can be supplied the most from bottom levels. Present yourself with innovative solutions, whether all of them are accepted or not is not that important. What's more important is, you are being heard and noticed.
Never criticize your boss in front of your team. You will receive the same level of respect what you show them.

7. Be active -
The initial phase in any organization is the right time for you to outperform. Don't lose that precious stage in merely learning. Impress your colleagues, bosses with your work before they start expecting. Set your own standards of performance.
Understand your job profile and work on key points right from initial stages.
Take initiatives. Don't let too many to boss you around. Be your boss at first hand.

8. Don’t gossip -
It is the last thing you need to succeed in corporate world. While you keep on talking about others, they work and leave you far behind. Don't become a time-killing aid for your colleagues. Maintain safe distance from gossips and rumours in office.

9. Be aggressive in meetings -
When you have been called to speak, SPEAK UP! This is really funny - people talk what and when they are not supposed to and remain silent when and where they are expected to! Do your homework before any meeting and present aggressively what you have prepared. Meetings are not meant to be political campaigns, where one talks and thousands listen. However, before you start, ensure to be logical, be innovative, and be creative.
Keep clarity in your communication. Don't let others draw conclusions from your thoughts. Always end your talk with your own conclusion.

10. Delegate -
Delegate your work to your team members, it makes them feel important and motivated. Highlight initiatives taken by you in front of your team and superiors. At the same time, appreciate others' efforts publicly, that's far better than criticizing personally.
Arrange team meetings regularly. Your team should become your strength. It can be a large source of ideas and solutions. Utilize it.


Share/Bookmark

Sunday, November 30, 2014

स्मृतिभ्रंश

हेवे-दावे
रुसवे-फुगवे
द्वेष-असूया
चीड-संताप
राग-नाराजी
तुझं-माझं
तुझ्यामुळं-माझ्यामुळं
तेव्हा-आत्ता
जर-तर
सगळं-सगळं
अगदी सगळं
इथंच सोडून
माणसं जातील निघून.
आणि मग?
काय करायचं
या सगळ्याचं?
आठवत तर राहणारच की,
केलेलं - न केलेलं.
सगळ्यांना कुठं वर असतो,
स्मृतिभ्रंशाचा?


Share/Bookmark

Wednesday, November 19, 2014

It's not all about the coin...

"...it's not all about the coin, Your High-and-Mightiness. I learned that a long time back, at my first battle. Morning after the fight, I was rooting through the dead, looking for the odd bit o' plunder, as it were. Came upon this one corpse, some axeman had taken his whole arm off at the shoulder. He was covered with flies, all crusty with dried blood, might be why no one else had touched him, but under them he wore this studded jerkin, looked to be good leather. I figured it might fit me well enough, so I chased away the flies and cut it off him. The damn thing was heavier than it had any right to be, though. Under the lining, he'd sewn a fortune in coin. Gold, Your Worship, sweet yellow gold. Enough for any man to live like a lord for the rest o' his days. But what good did it do him? There he was with all his coin, lying in the blood and mud with his fucking arm cut off. And that's the lesson, see? Silver's sweet and gold's our mother, but once you're dead they're worth less than that last shit you take as you lie dying..."

- Brown Ben from 'A Dance With Dragons' by George R.R. Martin


Share/Bookmark

Friday, October 31, 2014

चर्चा योगेंद्र यादवांशी

'आम आदमी पार्टी'च्या योगेंद्र यादवांबरोबर झालेल्या आजच्या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे -

१. नेहरुप्रणित सेक्युलॅरिझम आणि गांधीप्रणित सेक्युलॅरिझम -
नेहरुंची सेक्युलॅरिझमची संकल्पना युरोपमधून आयात केलेली होती. त्यानुसार, भारतीय समाज सुशिक्षित, विज्ञानवादी, आणि नास्तिकतेकडं झुकत जाऊन देशात धर्मनिरपेक्षता प्रस्थापित होईल, असं अपेक्षित होतं. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दहा-पंधरा वर्षांत याच संकल्पनेनं आपल्याला तारलं, अन्यथा आपणही पाकिस्तानच्या मार्गानं गेलो असतो, असं योगेंद्र यादव म्हणाले. परंतु, लोकांच्या मूलभूत गरजा जशा भागत गेल्या आणि भारतीय समाज जसा स्टेबल होत गेला, तशी ही सेक्युलॅरिझमची संकल्पना निरुपयोगी ठरत गेली. ६ डिसेंबर १९९२ ला तर या प्रकारच्या सेक्युलॅरिझमचा मृत्यूच झाला असं म्हणावं लागेल. सध्या उच्चशिक्षित, सधन वर्गामधे धर्मप्रेम आणि कट्टरता जास्त दिसून येते. अशा परिस्थितीत, गांधीप्रणित सेक्युलॅरिझमची गरज ठळकपणे जाणवते. गांधींनी स्वतः आयुष्यभर हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्न केले असले तरी ते स्वतःला नास्तिक किंवा विज्ञानवादी न म्हणवता 'सनातनी हिंदू' म्हणवत. माझ्या धर्मानुसार, श्रद्धांनुसार जगत असतानाच इतर धर्मांविषयी द्वेषभावना न बाळगणं, इतर धर्मांचा व श्रद्धांचा अभ्यास नि आदर करणं, या प्रकारची सहिष्णुता गांधींनी पाळली आणि शिकवली. आजसुद्धा हिंदूंनी किंवा मुस्लिमांनी आपापले धर्म सोडून धर्मनिरपेक्ष व्हावं, ही अपेक्षा करता येत नाही. अशा वेळी, आपापल्या धर्माचं पालन करतानाच इतर धर्मांबद्दल सहिष्णु व्हायला शिकवणारी गांधींची सेक्युलर विचारसरणी जास्त उपयुक्त आहे.

२. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिक्षणक्षेत्राचं हिंदुत्वीकरण करण्याचा प्रयत्न आणि त्यातले संभाव्य धोके -
केंद्रीय शिक्षणमंत्री स्मृती इराणी यांनी संघाच्या सल्ल्यानं पाठ्यपुस्तकांमधे बदल करण्याविषयी आणि गुजरातच्या धर्तीवर संपूर्ण देशात हिंदुत्ववाद्यांच्या पुस्तकांचा नि विचारांचा डोस शाळेतल्या मुलांना पाजण्याविषयी बातम्या कानावर येत आहेत. योगेंद्र यादवांच्या मते, असे प्रयत्न यापूर्वीही करण्यात आले आहेत आणि ते फक्त हिंदुत्ववाद्यांनीच नव्हे तर मार्क्सवादी कम्युनिस्टांनीदेखील केले आहेत. अशा प्रयत्नांना विरोध केला गेला पाहिजे, असं सांगतानाच ते असंही म्हणाले की, जितक्या जबरदस्तीनं धार्मिक अथवा कट्टर विचार शाळा-कॉलेजच्या पातळीवर शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल, तितकीच त्या विचारांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात तिडीक निर्माण होईल. त्यामुळं, या पद्धतीनं ब्रेनवॉश करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असं त्यांना वाटतं.

३. सोशल रिफॉर्म्स आणि पॉलिटिकल रिफॉर्म्स यांपैकी जास्त महत्त्वाचं काय?
या प्रश्नावर योगेंद्र यादव यांनी उलट प्रश्न विचारला की, तुमच्या मते गेल्या शंभर वर्षांतील महत्त्वाच्या सामाजिक समस्या कोणत्या? यावर उत्तर आलं - जातीभेद, आर्थिक विषमता, आणि धार्मिक द्वेष. योगेंद्र यादवांनी पुढं या समस्यांवर प्रभावीपणे काम करणार्‍या व्यक्तिंची नावं विचारली असता उत्तर आलं - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, समाजवादी नेते, इत्यादी. योगेंद्र यादव म्हणाले की, याचाच अर्थ सर्वात महत्त्वाच्या सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सध्याच्या काळात 'राजकारण' हाच एकमेव पर्याय आहे. गांधी, आंबेडकर, समाजवादी नेते, ही सर्व मंडळी राजकारणी होती, याचं कारण म्हणजे त्यांनी राजकारणाच्याच माध्यमातून या समस्यांवर तोडगा काढता येईल हे ओळखलं होतं. राजकारणाला ते आजचा 'युगधर्म' मानतात. दोनशे वर्षांपूर्वी याच व्यक्तिंनी समाज-सुधारणेसाठी कदाचित वेगळं क्षेत्र निवडलं असतं. त्यावेळी ते पूर्णवेळ समाज-सुधारक बनले असते कदाचित. पाचशे वर्षांपूर्वी ते संतांच्या, धार्मिक गुरुंच्या भूमिकेत गेले असते. पण आज त्यांना राजकारणीच व्हावं लागेल. त्यामुळं, सर्वात वाईट लोक जरी राजकारणात असले तरी, सर्वात चांगल्या लोकांना देखील राजकारणातच यावं लागेल. ज्यांना ज्यांना समाजात परिवर्तन घडवून आणायचं आहे, सुधारणा किंवा रिफॉर्म्स हवे आहेत, त्यांना पॉलिटिकल रिफॉर्म्स की सोशल रिफॉर्म्स हा वाद परवडणारच नाही, असं योगेंद्र यादव यांना वाटतं.

४. 'आम आदमी पार्टी'ला मिळालेला मीडिया आणि पब्लिक सपोर्ट; सध्याची 'आप'ची परिस्थिती -
अण्णा हजारेंच्या 'जनलोकपाल' आंदोलनाला मीडियाचा मिळालेला पाठिंबा हा योगायोगाचा भाग होता, असं योगेंद्र यादव म्हणाले. यापेक्षा कितीतरी मोठी, जास्त क्रांतिकारी आंदोलनं यापूर्वीही झाली होती, अजूनही होत आहेत. पण प्रस्थापित काँग्रेस सरकारच्या विरुद्ध या आंदोलनाचा वापर करता येईल हे मीडियानं ओळखलं. त्यावेळी अन्य कोणताही महत्त्वाचा इव्हेंट अथवा मुद्दा देशभरातून मीडियाला मिळाला नव्हता, शिवाय हे आंदोलन दिल्लीत सुरु असल्यानं ते कव्हर करणं जास्त सोपं होतं. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे अण्णांच्या आंदोलनाला मिळालेला प्रचंड पब्लिक सपोर्ट. यातूनच पुढं 'आम आदमी पार्टी'बद्दल लोकांना विश्वास वाटत गेला आणि पार्टीलाही अपेक्षित नसणारं प्रचंड यश दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मिळालं. पण या यशामागं लोकांची 'एका रात्रीत सगळं बदलून टाकण्याची' जी अपेक्षा होती, ती कोणीही पूर्ण करु शकत नाही. आम्ही आमच्या घरातच बसणार आणि कोणा एका हिरोला प्रस्थापितांविरुद्ध निवडून देणार, आणि मग तो हिरो एका रात्रीत सर्व परिस्थिती बदलून टाकेल आणि सगळं चांगलं होईल, अशी ती भावना होती. योगेंद्र यादवांच्या मते, 'आप'ची स्थापना झाली त्या दिवसाच्या तुलनेत आज 'आप' नक्कीच काही पायर्‍या वर आहे. मधल्या काळात अचानक मिळालेल्या यशाला आणि त्यानंतरच्या अपयशाला ते फारसं महत्त्व देत नाहीत. भाजप आणि मोदींबद्दल लोकांना वाटणार्‍या विश्वासाचा, अपेक्षांचा फुगा लवकरच फुटेल, आणि त्यावेळी लोकांपुढं काँग्रेसचा नव्हे तर 'आप'चाच पर्याय असेल, असं त्यांना वाटतं.

५. 'रिलायन्स'विरोधात मोहीम आणि मीडियाचा बहिष्कार -
अंबानींच्या 'रिलायन्स'वर केसेस दाखल केल्यामुळं, अंबानींच्या ताब्यात गेलेल्या मीडियानं 'आप'वर अघोषित बहिष्कार टाकला आहे. राजकीयदृष्ट्या ही 'आप'ची चूक होती का? या प्रश्नावर योगेंद्र यादव म्हणाले, 'आप'चा जन्मच भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी झाला असल्यानं, ही चूक म्हणता येणार नाही. उलट अशा अनेक केसेस अजून दाखल करायच्या राहिल्यात आणि संधी मिळताच 'आप' पुन्हा त्यावर काम करेल, असंही ते म्हणाले. इतर प्रस्थापित पक्षांप्रमाणं 'आप'मधे पैसा कमवण्याच्या हेतूनं लोक येत नाहीत, काम करण्याच्या उद्देशानं येतात. त्यामुळं लोकांनी आम्हाला 'बेवकूफ' म्हटलेलं चालेल.. पण आम्ही 'बदमाष' नाही, याची लोकांना खात्री आहे, असं ते म्हणाले.

६. इलेक्टोरल रिफॉर्म्स बद्दल -
आपल्या लोकशाहीत निवडणूक यंत्रणा खूप मजबूत असली पाहिजे. त्यादृष्टीनं काही महत्त्वाच्या सुधारणा आवश्यक आहेत. उदाहरणार्थ, निवडणुकीसाठी ब्लॅक मनीचा वापर पूर्णपणे थांबवणं शक्य नसल्यानं, जास्तीत जास्त व्हाईट मनी निवडणुकीत कसा वापरला जाईल, यासाठी नियम बनवले गेले पाहिजेत. तसंच मीडियाचा गैरवापर, पेड न्यूजसारख्या गोष्टींवर कडक नियंत्रण आवश्यक आहे. प्रत्यक्षात इलेक्टोरल रिफॉर्म्सच्या नावाखाली काही निरुपयोगी आणि असंबद्ध नियम बनवले जातात. उदाहरणार्थ, उमेदवाराला स्वतःच्या घरावर स्वतःचं पोस्टर लावण्याची बंदी. किंवा रात्री दहानंतर प्रचारसभा घ्यायला बंदी. आता दिल्लीसारख्या शहरात, कामासाठी बाहेर पडलेले लोक रात्री साडेनऊनंतर घरी परततात, त्यांच्यासाठी प्रचारसभा रात्री दहानंतर घ्यायला काय हरकत आहे? पण अशा जुजबी नियमांवर आपण समाधानी राहतो आणि अत्यावश्यक बदलांकडं डोळेझाक करतो, असं योगेंद्र यादव म्हणाले. त्याचबरोबर ते असंही म्हणाले की, फक्त इलेक्टोरल रिफॉर्म्समुळं राजकारण सुधारेल अशी अपेक्षा करणंदेखील मूर्खपणाचं आहे. निवडणूक हे फक्त साधन आहे. राजकारण सुधारण्यासाठी आपल्यालाच त्यात उतरावं लागेल, असं त्यांनी सांगितलं.

योगेंद्र यादवांच्या भेटीचा हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संदीप बर्वे आणि युवक क्रांती दलाला धन्यवाद!


Share/Bookmark

Friday, October 10, 2014

नेत्यांचं वक्तृत्व आणि जनतेचा प्रतिसाद

निवडणूक प्रचाराच्या नावाखाली आगखाऊ आणि भडकाऊ भाषणं ठोकत सुटलेल्या नेत्यांना मिळणारा प्रतिसाद हा फक्त त्या नेत्यांच्या वक्तृत्वकलेचा चमत्कार नसून, जन्तेच्या वैचारीक दिवाळखोरीचा आविष्कार आहे, असं वाटू लागलंय. विकास, योजना, लोकशाही, अधिकार आणि कर्तव्य, अशा शब्दांना टाळ्या पडतच नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आम्ही शाळेत असताना एक पाहुणे सामाजिक विषयावर बोलायला आले होते. समोरच्या श्रोत्यांचा कंटाळा नि दुर्लक्ष ओळखून त्यांनी भाषण आटोपतं घेतलं, पण ते 'हिट' करण्यासाठी (त्यांच्या भाषणाशी पूर्ण विसंगत असूनही) शेवटी जोरदार घोषणा दिली, जय भवानी... आणि इतका वेळ मरगळून बसलेली मुलं उत्स्फूर्तपणे ओरडली, जय शिवाजी! त्यानंतर कित्येक दिवस त्या वक्त्यांनी कसं इंटरॅक्टीव्ह भाषण दिलं, मुलांना कसं 'जिंकून घेतलं' वगैरे चर्चा झाल्या. मुद्दा असा आहे की, सध्या जन्तेचा सामूहिक आयक्यू वय वर्षे आठ ते दहा वगैरे असल्यानं त्या वयाला साजेसे विषय, घोषणा, वक्ते इत्यादी(च) हिट होणार. ज्यांना हे पटत नाही किंवा बदलायचं आहे त्यांनी जन्तेचं बौद्धिक घेत प्रयत्न चालू ठेवावेत किंवा जन्ता 'सज्ञान' होईस्तोवर वाट पहावी!


Share/Bookmark

Tuesday, October 7, 2014

मतदार आणि पक्षनिष्ठा

विधानसभेच्या निवडणुकीत, आपल्याला ज्याची कामाची पद्धत पटलेली आहे, त्याच उमेदवाराला मत दिलं पाहिजे, नाही का? मग तो कुठल्याही पक्षाचा का असेना! यंदाच्या लोकसभेच्या आणि आता विधानसभेच्या निवडणुकांवेळी ज्या सोयीस्कररित्या नेत्यांनी आपल्या निष्ठा बदलल्या / विकल्या / गहाण ठेवल्या, ते पाहता कार्यकर्त्यांनी आणि सर्वसाधारण मतदारांनी एखाद्या पक्षाप्रती निष्ठा टिकवणं आता कालबाह्य वाटू लागलंय. अशा परिस्थितीत, अमुक नेता मुख्यमंत्री व्हावा किंवा अमुक पक्षाचं सरकार यावं म्हणून मी माझ्या मतदारसंघातून कुणाही आयाराम-गयारामाला निवडून देणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारणं नव्हे का? अशा संधीसाधू नेत्याला त्या पक्षात तर स्थान नसतंच आणि आलेल्या सरकारात अशांच्या मतदारसंघांबद्दल फारशी आस्था असायचंही कारण नाही. शिवाय, महंगाई हटाव, रस्त्यांची कंडीशन, पाणीपुरवठा, या मुद्द्यांचं जनरलायझेशन नेहमीच फसवं आणि धोकादायक असतं. असे मुद्दे स्थानिक संदर्भातूनच विचारात घेतले गेले पाहिजेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातल्या रस्त्यांच्या कंडीशनबद्दल सरकारला शिव्या देण्यापूर्वी, कुठले रस्ते कुणाच्या अखत्यारीत येतात, त्यांच्या चांगल्या अथवा वाईट अवस्थेला नक्की जबाबदार कोण, आदी प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली पाहिजेत. अन्यथा, मुंबईत पन्नास फ्लायओव्हर बांधणार्‍या सरकारमधे आपल्या प्रतिनिधीचं कर्तृत्व काय? किंवा पन्नास हजार शेतकर्‍यांच्या हत्त्यांबद्दल सरकारला शाप देण्यापूर्वी, नक्की किती शेतकर्‍यांनी खरोखर कुठल्या कारणासाठी आत्महत्या केल्या, त्यापैकी आपल्या मतदारसंघातल्या किंवा ओळखीतल्या शेतकर्‍यांचे नक्की प्रॉब्लेम काय आणि येणारं सरकार त्यावर नक्की काय करणार आहे (करु शकतं) यावर विचार करणं आवश्यक नाही का? भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई, यांवर जनरलाईज्ड स्टेटमेंट करुन लोकांच्या भावनांना हात घालणं नि दिशाभूल करणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष कामाचे दाखले देऊन, जनतेचा विश्वास संपादन करणं आणि सत्ता असो अगर नसो, अखंड काम करत राहणं अवघड आहे. तेव्हा, आपल्यासाठी काम करणारे आपले प्रतिनिधी निवडा, कुणा सुपरहिरोचे प्रतिनिधी निवडून आपल्या हाती काहीच लागणार नाही.


Share/Bookmark

Sunday, September 28, 2014

बक्षिसं, पदव्या, मानमरातब, प्रसिद्धी, पैसा...

"बक्षिसं, पदव्या, मानमरातब, प्रसिद्धी, पैसा हे येऊन फक्त आपली पाठ थोपटतात आणि पुन्हा धावत राहायचं बळ देतात. तेही महत्त्वाचं असतं. म्हणजे, मॅरेथॉन धावताना रस्त्यात पाण्याचा ग्लास देत, पाठीवर थोपटून प्रोत्साहन देणारे असतात ना, तशी बक्षिसं वगैरे असतात. तिथे फार रेंगाळायचं नसतं. पाण्याचा एक घोट घेत, जरा फ्रेश होऊन पुढे जायचं असतं. पाणी देऊन फ्रेश करणा-या त्या थांब्याचं महत्त्व आहेच, पण त्या पाण्याच्या ग्लाससाठी धावायचं नसतं!"

- नविन काळे ('मज्जानो मंडे' या पुस्तकातून)


Share/Bookmark

Tuesday, September 23, 2014

शिवसेना आणि दलित

"शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधे सुरुवातीच्या काळात सर्व जातीच्या तरुणांचा भरणा होता. नेतेमंडळी उच्चभ्रू वर्गातील असली तरी कार्यकर्त्यांमधे मराठ्यांपासून वैश्य-वाण्यापर्यंत आणि भंडार्‍यांपासून कुणब्यांपर्यंत, तसेच माळ्यांपासून अन्य अनेक जातिजमातींचा समावेश असे. प्रारंभीच्या काळात मराठी माणूस आणि त्याची आर्थिक उन्नती हा राजकीय स्वरुपापेक्षा सामाजिक स्तरावरील हाती घेतलेला कार्यक्रम हे त्यामागील मुख्य कारण होतं. जातीपातींचा विचार न करता, फक्त मराठी माणसाचा विचार करणारी संघटना, अशी प्रतिमा याच काळात निर्माण होत होती. पण शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्रित आलेल्या या तरुणांमधे सुरुवातीच्या काळात राजकीय महत्त्वाकांक्षा मात्र निर्माण झालेली नव्हती. राजकीय विचारसरणीनं प्रेरित झालेल्या कार्यकर्त्यांचं जातवार विभाजन हे त्या काळात वेगवेगळ्या पक्षांच्या छत्राखाली पूर्वीच झालं होतं. यशवंतराव चव्हाणांची घट्ट पकड असलेला काँग्रेस हा बहुजन समाजाचं म्हणजेच मराठ्यांचं राजकारण करत होता आणि काही प्रमाणात तरी ओबीसी (अर्थात, तेव्हा ओबीसी या शब्दाचा जन्म व्हायचा होता) काँग्रेसबरोबरच होते. जनसंघामधे शेटजी-भटजीचा विचार चालायचा, तर दलितांचा मुक्काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या छावण्यांमधे असायचा. पण त्याचवेळी महाराष्ट्रात सामान्यतः ३०-३५ टक्के असलेल्या मागासवर्गीयांना म्हणजेच प्रामुख्याने दलितांना सत्तेच्या सोयीच्या राजकारणासाठी आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न प्रमुख राजकीय पक्षही एकाचवेळी करत असत. १९७४ मधे मध्य-दक्षिण मुंबईत लोकसभेची पोटनिवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसचे उमेदवार रामराव आदिक यांना शिवसेना आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला होता; पण आश्चर्याची बाब अशी, की शिवसेना आणि दलित यांच्यातील संघर्षाची पहिली ठिणगीही याच निवडणुकीच्या वेळी पडली. त्यानंतर पुढे सेनेने सातत्याने दलितविरोध हीच भूमिका कायम ठेवली. इथं शिवसेनेनं दलितांविरोधातील हा पहिला आक्रमक आणि हिंसक पवित्रा प्रबोधनकारांच्या १९७३ मधे झालेल्या निधनानंतरच घेतला, हे नमूद करणं जरुरीचं आहे. सर्वसमावेशक विचार हा प्रबोधनकारांचा बाणा होता. त्यामुळेच ते असेपर्यंत दलितांच्या विरोधात जाण्याची शिवसेनेची हिंमत नव्हती, हाच या प्रकाराचा अर्थ आहे. पुढे १९८० च्या दशकात मराठवाड्यात आपलं बस्तान बसवताना तर शिवसेनेला या दलितविरोधी भूमिकेचा खूपच फायदा झाला. १९८४-८५ मधे हिंदुत्व-रक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्याचा दावा केल्यानंतर, शिवसेनेच्या दलितविरोधी भूमिकेला अधिकच जोर चढला... मूळातच 'मराठी माणूस' असा सोयीचा विषय घेऊन मुंबई-ठाण्यापुरतं राजकारण करणार्‍या शिवसेनेने तोपावेतो कोणत्याही स्वरुपाची ठोस सामाजिक भूमिका कधीच घेतली नव्हती. त्यामुळे मराठवाड्यातसुद्धा ही दलितांच्या विरोधातील भूमिका घेणं शिवसेनेला सोयीचं गेलं."

- प्रकाश अकोलकर ('महाराष्ट्राचे राजकारण : नवे संदर्भ' या पुस्तकातून)


Share/Bookmark

Sunday, September 21, 2014

प्रदेशाचा आणि व्यक्तीचा परस्परांवर परिणाम

"शरद पवार हे बारामतीचे. त्या भागाच्या औद्योगिक विकासाला पवारांचा हातभार लागला, पण स्वतःची म्हणूनही गती होती. कविवर्य मोरोपंत बारामतीचे. महाराष्ट्रातील पाटपाण्याची पहिली योजना म्हणजे नीरा कालवा योजना. तिची सुरुवात १८८५ मधे झाली. म्हणजे देशात काँग्रेसची चळवळ सुरु झाली, पुण्यात फर्ग्युसन कॉलेज सुरु झाले, त्यावर्षीच बारामतीचे लोक बागायती शेती करायला लागले. सहकारी साखर कारखान्याचा लल्लूभाई सामळदास यांचा पहिला प्रयोग बारामतीतच झाला. त्याच फसलेल्या कारखान्याच्या जागी सध्याचा माळेगाव कारखाना उभा आहे. प्रवरानगरचा कारखाना उभा करण्यासाठी झालेल्या बैठकीला गोविंदराव जिजाबा पवार हजर होते. काकडे, जाचक, शेंबेकर, दाते, पवार या मंडळींनी बारामतीत बागायत आणि साखर कारखानदारी वाढविली. त्या वातावरणात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी राजकारण सुरु केले. बारामतीच्या जिरायती भागात त्यांनी फूड फॉर वर्क योजनेअंतर्गत पंचवीस वर्षांपूर्वी शंभर पाझर तलाव करून घेतले. आता तिथे मोठमोठे उद्योग उभे राहात आहेत."

- वरुणराज भिडे ('सत्याग्रही विचारधारा' जुलै १९९३च्या अंकातून)


Share/Bookmark

शिवसेना आणि काँग्रेस

"शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली आणि त्यापुढची दोन दशकं ठाकरे यांनी केवळ मुंबई आणि ठाणे याच परिसरातील महापालिकांच्या राजकारणावर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं होतं. कम्युनिस्ट आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या निर्घृण हत्येनंतर तापलेल्या वातावरणाचा फायदा उठवत, शिवसेनेनं आपला पहिला आमदार १९७० मधे विधानसभेत धाडला आणि पुढे अधूनमधून विधानसभाच नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही उतरुन बघितलं. १९६६ ते १९८५ या दोन दशकांत काँग्रेसशी साटंलोटं करुन शिवसेनेनं विधान परिषदेच्याही काही जागा हासील केल्या. या २० वर्षांच्या काळात शिवसेना एकीकडं डांगे - एस. एम. जोशी - अत्रे - जॉर्ज फर्नांडिस अशा नेत्यांना 'लक्ष्य' करीत होती आणि ते काँग्रेसच्या सोयीचं असंच राजकारण होतं... आज राज्यात काँग्रेसविरोधातील एक प्रमुख पक्ष म्हणून मान्यता मिळवणार्‍या या संघटनेनं पहिल्या दोन दशकांत सातत्यानं काँग्रेसलाच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या बळ पुरवलं. शिवसेनेच्या स्थापनेनंतर अवघ्या दहा वर्षांत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जारी केली, तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी त्याविरोधात आंदोलन केलं आणि बड्या राजकीय नेत्यांबरोबरच लक्षावधी कार्यकर्त्यांनी कारावासही पत्करला. पण, शिवसेनेनं मात्र आणीबाणीला पाठिंबा जाहीर केला होता! एवढंच नव्हे तर आणीबाणीनंतर जनता पक्षाचा प्रयोग फसला आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यावर १९८० मधे महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर ठाकरे यांनी थेट काँग्रेस प्रचाराची पालखी खांद्यावर घेऊन विधान परिषदेच्या दोन जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. यावर आताच्या तरुण शिवसैनिकांचा विश्वासही बसणं अवघड आहे..."

- प्रकाश अकोलकर ('महाराष्ट्राचे राजकारण : नवे संदर्भ' या पुस्तकातून)


Share/Bookmark

निवडणूक...पुन्हा!

पुन्हा तारखा जाहीर होतात, पुन्हा कार्यकर्ते जागे होतात
मागच्या वेळचे शत्रू कोण, मित्र कोण, विसरुन जातात...
पुन्हा तिकीट पैशेवाल्याला, पुन्हा तिकीट पावरवाल्याला
वाटून वाटून उरलेच तर, एखादे मिळते कार्यकर्त्याला...
पुन्हा मतदार खूप ऐकतो, पुन्हा उमेदवार खूप बोलतो
तापलेल्या तव्यावर पोळी मात्र, मीडिया अलगद भाजून घेतो...
पुन्हा दोस्तांना सांगतो मी, पुन्हा मित्रांशी बोलतो मी
माझे तुमचे खरे मुद्दे, पुन्हा जाहीर मांडतो मी
माझे तुमचे खरे मुद्दे, पुन्हा जाहीर मांडतो मी...


Share/Bookmark