ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, September 4, 2026

Aarambh Foundation Sangli Ganesh Festival 2012 Report


* 18 सप्टेंबर 2012 - भूमिका आणि उद्देश
* 20 सप्टेंबर 2012 - डॉल्बीमुक्त प्रतिष्ठापना
* 22 सप्टेंबर 2012 - शाडू माती आणि पीओपी
* 23 सप्टेंबर 2012 - प्रदूषणमुक्त गणेशोत्सव
* 24 सप्टेंबर 2012 - प्रदूषणमुक्त विसर्जन
* 26 सप्टेंबर 2012 - मिरवणुकीला पर्याय
* 27 सप्टेंबर 2012 - कागद्याच्या लगद्यापासून मूर्ती
* 28 सप्टेंबर 2012 - डॉल्बीमुक्त विसर्जन
* 30 सप्टेंबर 2012 - बदलाची तयारी
======

Tuesday, September 18, 2012

सार्वजनिक गणेशोत्सव आणि गणेश मंडळांबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तयार झालेलं नकारात्मक चित्र बदलण्यासाठी आणि उत्सवानिमित्त प्रगट होणारी ऊर्जा विधायक कार्यांकडं वळवण्यासाठी सांगलीची तरुणाई पुढे सरसावली आहे. 'आरंभ फाउंडेशन' या सांगलीतल्या उत्साही व सकारात्मक विचारांच्या युवा संघटनेनं गणेशोत्सवाकडं विधायक आणि विकासात्मक दृष्टीनं पाहण्याचं आवाहन समस्त सांगलीकरांना केलं आहे.

सार्वजनिक गणेश मंडळं फक्‍त वर्गणी गोळा करतात, मांडव घालून रस्ते अडवतात, आणि मिरवणुकीत दंगा घालतात, असा सरसकट शिक्का सगळ्या मंडळांवर मारला जातो. पण प्रत्यक्षात कित्येक लहान-मोठी मंडळं आपापल्या परीसरात चांगले कार्यक्रम व्हावेत, यासाठी प्रयत्‍न करीत असतात. कित्येकदा चांगले पर्याय, योग्य मार्गदर्शन, आवश्यक निधी व मनुष्यबळ यांच्या अभावामुळं अशा मंडळांचं काम खूपच मर्यादीत राहतं. शिवाय, वाईट व नकारात्मक गोष्टींच्या प्रसिद्धीपुढं छोट्या-छोट्या मंडळांचं काम अज्ञातच राहतं. खरं पाहता, गणेश मंडळांचे कार्यकर्ते हे त्या-त्या भागाचे कृतीशील रहिवाशी असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि चांगले पर्याय उपलब्ध करून दिले तर, स्थानिक पातळीवर प्रबोधन आणि विकास साधणं सहज शक्य होईल. याच भावनेतून, 'आरंभ'चे तरुण सांगलीतल्या गणेशमंडळांशी संपर्क साधत आहेत.

प्रत्यक्ष भेटून मंडळांच्या कार्याची माहिती घेणं, सर्व प्रकारचं प्रदूषण टाळण्यासाठी करता येणार्‍या उपायांची चर्चा करणं, पारंपारिक व विधायक गणेशोत्सवाबद्दल मंडळांच्या कल्पना जाणून घेणं व अभिनव कल्पना सुचवणं, अशा प्रकारचं काम 'आरंभ' करीत आहे. आतापर्यंत भेटलेल्या मंडळांनी या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला असून, मिरवणुकीशिवाय विसर्जन, डॉल्बीमुक्‍त मिरवणूक, निर्माल्यकुंडांचा वापर, तसंच कार्यक्रम आणि मिरवणुकीतून समाज प्रबोधन या माध्यमातून 'विधायक गणेशोत्सव' साजरा करण्याची तयारी दाखवली आहे. याशिवाय, कार्यकर्तांचा उत्साह व ऊर्जा गणेशोत्सवापुरती मर्यादीत न ठेवता, आपल्या परिसराच्या व शहराच्या विकासासाठी वर्षभर कार्यरत राहण्याचा संकल्पही काही मंडळांनी केला आहे. विधायक कार्यात योगदान देऊ इच्छिणार्‍या मंडळांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगलीतील सेवाभावी संस्था व प्रशासनाने या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठीही 'आरंभ' प्रयत्‍न करीत आहे. त्यासाठी विविध संस्थांना भेटून त्यांच्या कार्याची माहिती घेतली जात आहे.

गणेश मंडळ व अशा संस्थांना एकत्रित आणून चांगल्या उपक्रमांची आखणी करणं, गणेशोत्सवातील कार्यक्रम व मिरवणुकीच्या निमित्तानं एकत्र येणार्‍या सांगलीकरांमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करणं, हे 'आरंभ'चं उद्दिष्ट आहे. आपापले नोकरी-व्यवसाय सांभाळून या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची आखणी 'आरंभ'च्या युवकांनी केली आहे. 
======

Thursday, September 20, 2012

काल सांगलीतल्या एकाही मिरवणुकीत डॉल्बी नव्हता. पारंपारिक वाद्यं, ढोल-ताशा, लेझीम, झांज, बँजो… आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणेशभक़्तांचा 'मोरया'चा गजर!

"आज कित्येक वर्षांनी गजाननाचं आगमन सुसह्य वाटलं," असं काही ज्येष्ठांनी बोलून दाखवलं.

"बाप्पांच्या घोषणा देऊन घसा बसला पण मन मोकळं झालं," असं मंडळांचे कार्यकर्ते म्हणाले.

"कोण xxचा डॉल्बी बंद करतोय बघूच," असं उत्सवापूर्वी म्हणणारे काल शांतपणे आपापल्या मंडळांच्या मंडपात बसून होते.

फक़्त पोलिसांनी सक़्ती केली म्हणून डॉल्बी एका वर्षात बंद झाला असं म्हणता येणार नाही. लोकांचाही त्याला अंतर्गत विरोध होताच. काही गोष्टींची सुरुवात सक़्तीनं करावी लागली तरी, लोकसहभागातून त्यांची ताबडतोब अंमलबजावणी होऊ शकते, नाही का?

शांततामय गणेशोत्सवाच्या समस्त सांगलीकरांना शुभेच्छा!
======

Saturday, September 22, 2012

शाडू माती आणि प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींमधला फरक स्पष्ट नसल्याचं काही मंडळांशी बोलताना जाणवलं. काही महत्त्वाचे फरक म्हणजे -

- शाडूच्या मूर्तीचा आकार लहान असतो आणि वजन जास्त असतं. पाच-सहा फुटी (किंवा त्याहून मोठी) मूर्ती नक्कीच शाडूची नसणार.

- शाडूच्या मूर्तीमध्ये फार नाजूक कलाकुसर करता येत नाही. पीओपीची मूर्ती तुलनेनं फार सुबक दिसते.

- शाडूची रंगवलेली मूर्ती शक्यतो मॅट फिनिशमध्ये येते. जास्त ग्लॉसी रंगवलेली मूर्ती पीओपीची असण्याची शक्यता जास्त असते.

- पीओपीची मूर्ती पाण्यात विरघळत नाही, तिचे तुकडे पडतात. याउलट शाडूची (नैसर्गिक रंगांत रंगवलेली) मूर्ती पाण्यात विरघळून चिखल तयार होतो, जो बागेतल्या झाडांनाही घालता येतो.

जाणकारांनी याविषयी अधिक माहिती पुरवावी, तसंच आजूबाजूच्या मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करावी.
======

Sunday, September 23, 2012

पर्यावरणास कमीत कमी धोका पोचवून उत्सव साजरा करण्याइतकी जाणीव गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होताना दिसतीय.

- बहुतेक सर्व मंडळं निर्माल्य नदीत न टाकता निर्माल्य कुंडातच टाकतायत.

- काही मंडळं गणेशाची प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुकीशिवाय करतायत.

- काही मंडळांनी स्वतःहून रस्त्यात खड्डे खणून मंडप घालणं बंद केलं असून, आता ते सार्वजनिक मोकळ्या जागेवर किंवा कॉलनीतल्या रिकाम्या प्लॉटवर गणपती बसवतायत.

- काही मंडळांनी भव्य देखावे आणि विद्युत रोषणाईला फाटा देऊन, परिसरातल्या लोकांसाठी मनोरंजक आणि लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलंय.

विधायक गणेशोत्सवाच्या दिशेनं चालताना, आधी नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी होणं आवश्यक आहे. हे सगळे बदल बघून विधायक गणेशोत्सवाबद्दल जास्त विश्वास वाटू लागलाय.
======

Monday, September 24, 2012

काल पाचव्या दिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचं विसर्जन झालं. काल आढळलेल्या काही गोष्टी:

- एकाही सार्वजनिक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजला नाही! ढोल, ताशा, लेझीम, झांज, बँजो, आणि 'मोरया मोरया'चा गजर…

- निर्माल्य नदीत टाकलं जाऊ नये, यासाठी बरेच स्वयंसेवक विसर्जनस्थळी तैनात होते. सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि बहुतांश घरगुती गणपती घेऊन आलेले लोक निर्माल्य कुंडांचा वापर करताना दिसले. शिवाय, महापालिकेचे कर्मचारी निर्माल्य प्लॅस्टीकच्या पिशव्यांमधून काढून कुंडात टाकण्याचं काम करत होते.

- विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विसर्जनासाठी नदीऐवजी कृत्रिम विसर्जन हौदांचा वापर! सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेनं काही ठिकाणी निर्माल्य कलश आणि कृत्रिम टाक्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या-त्या परिसरातल्या नागरिकांनी या कृत्रिम टाक्यांमध्ये विसर्जन केलं.

गणेशोत्सवादरम्यान होणारं सर्व प्रकारचं प्रदूषण आणि त्यावरचे उपाय, यांबद्दल लोकांमध्ये चांगलं प्रबोधन होतंय आणि होईल, याची खात्री पटण्यासारखी परिस्थिती दिसतेय.
======

Wednesday, September 26, 2012

यंदा डॉल्बी बंदीमुळं कित्येक मंडळांनी विसर्जन मिरवणुकाच रद्द केल्या आहेत. ज्या मंडळांच्या मिरवणुका आहेत, त्यांनी ढोल, झांज, बँजो, आणि रोषणाईवर भर दिलाय.

- एक मोठी कायमस्वरुपी मूर्ती आणि एक छोटी उत्सवमूर्ती अशी प्रथा काही मंडळांनी सुरु केली आहे. मोठी मूर्ती वर्षभर कुणाच्या तरी घरी किंवा मंदीरात ठेवली जाते. गणेश चतुर्थीला छोट्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या छोट्या मूर्तीचं विसर्जन करणं सोपं असतं. आता ही छोटी मूर्ती शाडूची किंवा कागदाच्या लगद्याची घेतली जावी, एवढंच बघायचं.

- विसर्जन घाटावर निर्माल्य गोळा करण्यासाठी महापालिकेनं जय्यत तयारी ठेवलीय. काल सातव्या दिवशीच्या विसर्जनासाठी, निर्माल्य कुंडाजवळ सतत महापालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक थांबून होते. विसर्जनासाठी आलेल्या प्रत्येकाला थांबवून निर्माल्य नदीत न टाकण्याची विनंती करत होते. शिवाय, निर्माल्य कुंडात टाकण्यापूर्वी प्लॅस्टीकच्या पिशव्या काढून घेण्याचंही काम सुरु होतं.

- मिरवणुकीवर होणारा खर्च टाळून मंडळांनी, कायमस्वरुपी मंदीराचं बांधकाम, मूर्तीला चांदीचे दागिने, काही हजार लोकांसाठी महाप्रसाद, अशा प्रकारचे उपक्रम सुरु केले आहेत. अजून विधायक आणि समाजोपयोगी उपक्रमांबद्दल मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणं गरजेचं आहे. जितक्या मंडळांशी आम्ही चर्चा केली, त्या सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता एकत्र बसून काही उपक्रमांची आखणी करायची आहे.
======

Thursday, September 27, 2012

कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनवण्याचा प्रयोग यंदा काही ठिकाणी करण्यात आला. रद्दी कागदाचे बारीक तुकडे करून, शाडू माती आणि डिंक मिसळून, त्याचा लगदा तयार केला जातो. हा लगदा एकजीव झाला की फायबरच्या साच्यात भरला जातो. साधारणपणे एक पूर्ण दिवस साचा तसाच ठेवला जातो. त्यानंतर, मूर्ती सुकवून तिचं रंगकाम सुरू होतं. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे, बादलीभर पाण्यात ही मूर्ती विसर्जित करून ठेवली असता, बारा तासांमध्ये ती पूर्ण विरघळते. हे पाणी मग बागेतल्या झाडांना घालता येतं. अशा प्रकारची मूर्ती शाडूपेक्षा स्वस्त आणि जास्त इको-फ्रेंडली असली तरी ती तयार करण्यात काही अडचणी येतात:

- साचा वापरण्यातल्या मर्यादा: एका साच्यातून एका दिवसात एकच मूर्ती बनवता येते. त्यामुळं जास्तीत जास्त फायबरचे साचे तयार करून घेणं आवश्यक आहे.

- रंगकामासाठी कुशल कारागिरांची गरज: लगदा तयार करणं आणि साच्यात भरणं, या तशा सोप्या गोष्टी आहेत; पण गणपतीच्या मूर्तीचं रंगकाम हा एक अवघड प्रकार मानला जातो. त्यासाठी थोड्या कुशल कामगारांची गरज भासते. असे कारागिर फारसे मिळत नाहीत, आणि मिळाले तर जास्त मजुरी घेतात, ज्यामुळं मूर्तीची किंमत वाढते. यावर एक उपाय म्हणजे, पूर्ण मूर्ती एकाच रंगात रंगवणे. पण, गणपतीच्या मूर्तीची प्रतिमा लोकांच्या मनात अशी वसली आहे की, एकाच रंगातला गणपती, दागिने, शस्त्रं, पीतांबर, या गोष्टी एकाच रंगात पाहणं लोकांना सहज मान्य होणार नाही. दुसरा उपाय अर्थातच कुशल कारागिर शोधणं किंवा तयार करणं.

पुढच्या वर्षी जास्तीत जास्त लोकांनी इको-फ्रेंडली मूर्ती बसवाव्यात असं वाटत असेल तर, तशा मूर्ती बाजारात उपलब्ध करून देणंही आवश्यक आहे. यासाठी काम करायचं असेल तर आत्तापासूनच सुरुवात केली पाहिजे.
======

Friday, September 28, 2012

नवव्या दिवशी विसर्जनात ढोल पथकांचा जोर दिसला. एका-एका मंडळासमोर चार-चार पथकं होती. कालच्या विसर्जनाला मोठ्या मूर्तींची संख्या जास्त होती. एका मंडळाच्या मिरवणुकीत, ट्रॉलीमध्ये छोटी कडुनिंबाची वगैरे रोपं घेऊन कार्यकर्ते बसले होते. रस्त्यावरून जाताना सगळ्यांच्या हातात एक-एक रोप देऊन पुढं जात होते. ढोल आणि मोरयाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. डॉल्बी बंदीबरोबरच सिनेमातली गाणी आणि त्यावरचे हिडीस नाच आपोआप बंद झालेत. शिवाय, यंदाच्या उत्सवात दिवसभर सगळ्या मंडळांनी मंडपाबाहेर शांतता राखणं पसंत केलं. रात्री आरती आणि देखाव्याच्या वेळीच काय ते स्पिकर लावले जात होते. कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीनं गणेशोत्सवाचं रूप बदलून दाखवायचं ठरवलंय जणू…
======

Sunday, September 30, 2012

सांगलीच्या ग्रीन एफएम (90.4) वर 'आरंभ फाउंडेशन'चं आवाहन ऐकून, कोल्हापूर जिल्ह्यातूनही फोन आले. एका मंडळानं गणपतीची दहा फुटी मूर्ती बसवली होती. एवढ्या मोठ्या मूर्तीचं आणि निर्माल्याचं नदीतच विसर्जन करतात. मूर्तीच्या आकाराबद्दल आणि पीओपी न वापरण्याबद्दल चर्चा करताना मंडळाच्या कार्यकर्त्यानं सांगितलं, "गेल्या दोन-तीन वर्षांपासूनच उत्सवाचं नियोजन आमच्याकडं आलंय. त्याआधी सगळे निर्णय वडीलधारी मंडळी घ्यायची. पेपरमध्ये वाचून आम्हाला पण काहीतरी चांगले बदल करावंसं वाटू लागलंय. मागच्या दोन वर्षांपासून डॉल्बी पूर्ण बंद आहे. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत दांडपट्ट्याचा खेळ ठेवला होता. आमचं गाव छोटं आहे. गावातल्याच भजनी मंडळाला बोलवून, एखाद्या सामाजिक विषयावर प्रवचन द्या असं सांगितलं. पीओपीच्या मूर्तीमुळं नुकसान होतं असं पेपरमध्ये वाचलं होतं, पण तुमच्याशी प्रत्यक्ष बोलल्यावर नक्की काय करायचं ते कळलं. गावातल्या जुन्या माणसांना समजावणं जरा अवघड आहे, पण गावकर्‍यांच्याच फायद्याची गोष्ट असेल तर आम्ही नक्की प्रयत्‍न करू. निर्माल्याचा तुमचा मुद्दा एकदम पटला. आता आपापल्या अंगणातल्या झाडांनाच निर्माल्य घालायला सांगतो सगळ्यांना. रेडीओवर तुमचं आवाहन ऐकलं.. नुकसान तर काय होणार नाही, झाला तर फायदाच होईल, असं वाटलं, म्हणून फोन लावला बघा.”
======

~ मंदार शिंदे
04092026 (रिपोस्ट)



Share/Bookmark

Tuesday, September 1, 2026

A Silent Solution to A Loud Problem

 


साधारण 2015 साली डेव्हीड ओवेन्स आणि ॲलन वॉल्श या गायक-वादक जोडीनं ‘अनटिल एप्रिल’ हा कार्यक्रम (शो) लॉन्च केला. या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी त्यांना जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांमधे रस्त्यांवर परफॉर्म करायचं होतं. जर्मनीमधे सार्वजनिक ठिकाणी ॲम्प्लीफायर आणि लाऊडस्पीकर वापरायला बंदी असल्यामुळं त्यांनी रस्त्यांवर ‘सायलेंट डिस्को’ पध्दतीनं परफॉर्म करायचं ठरवलं. ट्रान्समिटर आणि वायरलेस हेडफोन वापरून त्यांनी ‘अनटिल एप्रिल’ कार्यक्रमाची जाहिरात केली, स्थानिक रहिवाशी आणि आजूबाजूच्या दुकानात-ऑफीसात काम करणारे लोक यांना कसलाही त्रास न होऊ देता. या प्रयोगासाठी त्यांना सुरुवातीला मोठी गुंतवणूक करायला लागली; पण संगीत रसिक आणि स्थानिक पोलीस यांच्याकडून त्यांना अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यांचे वायरलेस हेडफोन कुणीही चोरून नेले नाहीत.

लंडनमधे ‘द सायलेंट डिस्को कंपनी’ दरवर्षी हजारो वायरलेस हेडफोन भाड्याने देतात, विकतात. आजूबाजूच्या सोसायटीतले लोक झोपलेले असताना रात्री उशीरापर्यंत डिस्को पार्टी चालू ठेवणं शक्य होतं अशा कंपनीच्या मदतीने.

हे सगळं वाचत असताना, ‘ये किधर तो देखेला - सुनेला है’ असं वाटलं असेलच ना? बरोबर आहे, रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माच्या ‘ऐ दिल है मुश्कील’ या सिनेमातलं ‘ब्रेकअप सॉन्ग’ म्हणजे ‘सायलेंट डिस्को’ प्रकाराचा उत्तम नमुना.

ज्यांना मोठ्या आवाजात म्युझिक ऐकायचंय, नाचायचंय, त्यांनी हे वायरलेस हेडफोन घालून जरूर यन्जॉय करावं. ज्यांना शांतीत रहायचंय त्यांना जबरदस्तीने डीजे लाऊडस्पीकरच्या आवाजाचा छळ सोसायला लावू नये.

सायलेंट डिस्कोवर नाचूया, गणपती बाप्पा मोरया !

- मंदार शिंदे
01092026


डेव्हीड ओवेन्स आणि ॲलन वॉल्श यांच्या ‘अनटिल एप्रिल’ प्रमोशनचा व्हिडीओ - https://youtu.be/RgLTUo_Yk4w





Share/Bookmark

Monday, July 20, 2026

Source of Inspiration

 



शाळेच्या मुख्य इमारतीशेजारी काही जुन्या खोल्या होत्या, कौलारू छप्पर, जाळीच्या खिडक्या, दगडी भिंती. या खोल्यांमधे स्टाफ रूम होती, चित्रकलेचा वर्ग एका बाजूला भरायचा, दुसऱ्या बाजूला लायब्ररी, मधेच मुख्याध्यापकांची केबिन. या जुन्या खोल्या आणि नवीन इमारतीच्या मधोमध दगडी फरशा बसवलेला चौक. पूर्वी इथे घोडे बांधायचा पागा होता असं ऐकून होतो. या चौकात सकाळची प्रार्थना व्हायची, पाहुण्यांची भाषणं व्हायची, छोट्या सभा व्हायच्या. एका बाजूच्या भिंतीवर मोठा फळा लावलेला होता. सकाळी शाळेत आलं की हा फळा वाचायचो. त्यावर सुविचार, सूचना, कार्यक्रमांची माहिती लिहिलेली असायची. अक्षर इतकं सुंदर की बघतच रहायचो. कधीतरी फळा लिहिताना बघायला मिळायचं, भारी वाटायचं. अक्षर मोत्यासारखं सुंदर असावं अशी प्रेरणा देणारे पोतदार सर गेले.

पोतदार सरांचं इंग्रजी उत्तम होतं, त्यांच्या नावाप्रमाणे. मराठी आणि इंग्रजी हस्ताक्षर सुबक होतं. आम्हाला चेष्टेनं म्हणायचे, “अक्षर कसं पाहिजे, तर अक्षर बघून मुलगी दिली पाहिजे.” अक्षर चांगलं काढायची प्रेरणा नेमकी कशातून मिळाली हे आता सांगणं अवघड आहे, पण सरांचं अक्षर आणि त्यांचं बोलणं या दोन्ही गोष्टींचं योगदान होतं हे नक्की.

पोतदार सरांचं लक्षात राहिलेलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या वयानुसार होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक बदलांबद्दल मोकळेपणाने बोलणारे एकमेव शिक्षक. मूल्य शिक्षण आणि नैतिकता याविषयी बोलताना मुलांच्या वयाचा आणि मानसिकतेचा विचार करण्याची तेव्हा पध्दत नव्हती, त्यामुळं मूल्य न लादता मूल्य शिक्षण देणारे पोतदार सर लक्षात राहिले.

किशोरवयीन मुला-मुलींशी बोलताना आणि कागदावर पेन टेकवताना सरांची आठवण नेहमी येते, येत राहील, थँक्यू सर!

~ मंदार शिंदे
20.07.2026



Share/Bookmark

Saturday, May 23, 2026

The Great Indian Illusion by Varrun Sukhraj

 


- बँक कशासाठी असते?
- बँकेतला पैसा नक्की कुणाचा असतो?
- बँकेचं कर्ज बुडतं तेव्हा नेमका कुणाचा पैसा बुडतो?
- बँकींग प्रक्रियेमधे कल्याणकारी शासनाची भूमिका नेमकी कशी असली पाहिजे?

'पोपट मेला आहे' हे राजाला कुणी सांगायची गरज आहे की राजाला माहिती असून पोपट बोलत नाही, खात नाही, हसत नाही, पण जिवंत आहे अशी स्वतःची समजूत घालत बसला आहे? की पोपटाला राजानंच...?

बँकींग तज्ज्ञांपासून बँकेनं पैसे बुडवलेल्या ग्राहकांपर्यंत, आणि शेवटची आशा वाटणाऱ्या राजकारण्यापासून उद्याची आशा वाटणाऱ्या पत्रकारापर्यंत अनेक लोकांना ऐकायची बघायची संधी देणारा वरुण सुखराजचा माहितीपट 'द ग्रेट इंडीयन इल्युजन'...

श्रीमंत अर्थव्यवस्था असलेल्या गरीब लोकांच्या देशात अर्थकारणावर चर्चा झालीच पाहिजे; ही चर्चा सोप्या भाषेत झाली पाहिजे. प्रामाणिकपणे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायचं धाडस करणाऱ्या या डॉक्युमेंटरीबद्दल वरुण सुखराज आणि संपूर्ण टीमचे आभार आणि अभिनंदन!

'टू मच डेमोक्रसी' आणि 'जमूरा' या दोन डॉक्युमेंटरीजद्वारे शेतकरी आंदोलन आणि निवडणुकीचा खेळखंडोबा यावर अभ्यासपूर्ण आणि सोपी मांडणी यशस्वीपणे करणाऱ्या वरुणची ही नवीन कलाकृती.

उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी बँकांनी कर्जपुरवठा केला पाहिजे हे खरं; पण रिझर्व्ह बँकेचे नियम, अर्जदाराचा कर्ज-इतिहास, बँकेच्या कर्मचाऱ्यांचा अभ्यास आणि सल्ला, या सगळ्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वाटलेल्या कर्जांची भरपाई सर्वसामान्य ठेवीदारालाच करायला लागते.

परतफेड करण्याची इच्छा आणि तयारी नसलेल्यांना कर्जवाटप कसं केलं जातं, ट्रॅक्टर खरेदीसाठीच्या कर्जाचा व्याजदर मर्सिडीज खरेदीसाठीच्या कर्जाच्या व्याजदरापेक्षा जास्त कसा लावला जातो, औद्योगिक विकासासारख्या विशिष्ट उद्देशाने स्थापन केलेल्या बँकांची अपेक्षित भूमिका बदलल्याचा अर्थव्यवस्थेवर कसा आणि काय परिणाम होतो, अशा अनेक तांत्रिक बाबी, आकडेवारीसोबतच सुरस आणि चमत्कारिक घटना आणि किस्से या डॉक्युमेंटरीमधे बघायला ऐकायला मिळतात.

यापैकी काही बातम्या आपण कधीतरी वाचलेल्या असतात, पण त्यावेळी त्याचा आपल्याशी काय संबंध असं म्हणून आपणच दुर्लक्षित केलेल्या असतात. त्या सगळ्यांची अशी एकत्रित मांडणी बघून आपण एक व्यक्ती आणि एक देश म्हणून आर्थिक दलदलीत किती खोल रुतत चाललो आहोत याचा अंदाज यायला लागतो.

मागच्या काही वर्षांमधे भारताच्या बँकींग प्रक्रियेमधे काय आणि कसे बदल होत गेले, त्याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर आणि व्यक्ती ते उद्योग या सगळ्यांवर काय आणि कसा परिणाम झाला, याचं एक उत्तम डॉक्युमेंटेशन तर हे आहेच; पण चालू काळात या माहितीचा उपयोग करून भविष्यातलं नुकसान कमी करण्याची संधीदेखील यामुळं मिळू शकते.

ही डॉक्युमेंटरी लोकांनी बघावी, मित्रांना सहकाऱ्यांना मुला-मुलींना दाखवावी, त्यावर चर्चा घडवून आणावी, आणि पोपट बोलत नाही, खात नाही, हसत नाही, पण जिवंत आहे या भ्रमातून स्वतःला आणि अर्थव्यवस्थेला बाहेर काढावं, म्हणजे वरुण आणि त्याच्या टीमने घेतलेले कष्ट आपल्याला ‘इल्युजन’कडून ‘सोल्युशन’कडे घेऊन जातील, अशी आशा वाटते.

‘द ग्रेट इंडीयन इल्युजन’ https://youtu.be/AKv7Tz3p_Bc

~ मंदार शिंदे
22/05/2026



Share/Bookmark

Saturday, May 16, 2026

Ensuring Access to Free Education from Early Childhood

 

(1) जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्व-प्राथमिक शिक्षणाची सोय नसते; (2) अंगणवाडीमध्ये शिक्षणापेक्षा लसीकरण व पोषक आहार यावर जास्त भर दिला जातो; यामुळे तीन-साडेतीन वर्षांच्या मुला-मुलींना खाजगी पूर्व-प्राथमिक - केजी/नर्सरी/प्लेग्रुपमध्ये दाखल केले जाते. त्याच किंवा संलग्न संस्थेच्या प्राथमिक शाळेत पैसे भरून पहिलीत प्रवेश घेण्याची शक्यता वाढते. मग सरकारी शाळांनी सहा वर्षांची शाळाबाह्य मुले शोधून पटसंख्या टिकवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात, आणि पालकांना मोफत शिक्षणाऐवजी महागडे शिक्षण विकत घ्यावे लागते.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील प्रकरण 1 आणि प्रकरण 7 यामधील सूचनांनुसार, अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा एकमेकांशी जोडल्या तर वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मोफत शिक्षण (आणि इतर सुविधा) मिळू शकतील, 'आधार'सारख्या कागदपत्रांची सहज पूर्तता होऊ शकेल, सरकारी शाळांची पटसंख्या वाढू शकेल, असे अनेक फायदे संभवतात.

फक्त यासाठी शालेय शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, आयसीडीएस, आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी एकमेकांशी संवाद साधायची गरज आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात याबद्दल स्पष्ट सूचना करूनदेखील सहा वर्षांनंतर मा. शालेय शिक्षण मंत्री व मा. महिला व बाल विकास मंत्री यांच्या चर्चेनंतर हे निर्देश देण्यात आले आहेत.

मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे पत्र जा.क्र.प्राशिसं/टे-301/2026 दि. 15/05/2026 यानुसार, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आवश्यक वर्गखोल्यांशिवाय जास्तीची वर्गखोली उपलब्ध असेल तर ती अंगणवाडीला देण्याचे निर्देश यामध्ये दिले आहेत. जिथे या प्रकारचे प्रत्यक्ष एकत्रीकरण शक्य नसेल तिथेदेखील वर सांगितलेल्या उद्देशाने एकमेकांशी संवाद आणि समन्वय साधून सर्व मुला-मुलींना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार मिळवून देणे शक्य होईल असे वाटते.


(1) Zilla Parishad schools do not have facilities for pre-primary education.
(2) In Anganwadis, more emphasis is given to vaccination and nutrition than to education.

Because of this, children aged three to three-and-a-half years are admitted to private pre-primary schools such as KG, nursery, or playgroup. This also increases the possibility that parents will later pay fees to admit the child to the first standard in the same or an attached primary school. As a result, the efforts of government schools to maintain student strength by searching for out-of-school children aged six years become ineffective, and parents are forced to buy expensive education instead of getting free education.

According to the suggestions given in Chapter 1 and Chapter 7 of the National Education Policy 2020, if Anganwadis and primary schools are linked with each other, children can receive free education (along with other facilities) from the age of three. It will also become easier to complete documents such as Aadhaar, and government schools may see an increase in student enrolment. Many such benefits are possible.

For this, the School Education Department, Women and Child Development Department, ICDS, and local self-government bodies only need to communicate and coordinate with each other. Even though clear instructions about this were given in the National Education Policy, these directions have now been issued after discussions between the Hon. School Education Minister and the Hon. Women and Child Development Minister, six years later.

As per the letter of the Director of Education (Primary), Outward No. PraShiSan/T-301/2026 dated 15/05/2026, instructions have been given that if extra classrooms are available in Zilla Parishad schools beyond the required number, they should be provided to Anganwadis. Even in places where such physical integration is not possible, it appears that through communication and coordination with each other for the above purpose, it will still be possible to ensure the Right to Free and Compulsory Education for all children. (Translated by ChatGPT)


Share/Bookmark

Wednesday, March 18, 2026

Mann-Pishach: Ghosts of the Suppressed Mind (Marathi)



इच्छा हे सर्व दुःखाचं मूळ आहे, असं बुद्ध सांगून गेला.

सगळ्यांच्या सगळ्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण होतीलच असं नाही. कधी स्वतःच्या अक्षमतेमुळं, कधी प्रतिकूल परिस्थितीमुळं. अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि शमन करण्याऐवजी दमन केलेल्या भावना आपलं पतन करण्यासाठी दबा धरून बसलेल्या असतात, आपल्या आतमधे. आपण दारं-खिडक्या बंद करून घेतो, कुलपं-साखळ्या बांधतो, सीसीटीव्ही आणि अलार्म बसवतो - सगळं बाहेर; पण खरा शत्रू आतमधेच राहतो, आपल्यासोबत! आपल्यासारखाच दिसणारा, वागणारा, बोलणारा, आपल्याला पूरेपूर ओळखून असणारा. आपणच त्याला पाळतो, पोसतो, सक्षम करतो - आपलंच पतन करण्यासाठी.

शमन करण्याऐवजी दमन केलेल्या आपल्या आतल्या जनावराला कायम ताब्यात नाही ठेवू शकत आपण.

दडपून टाकलेल्या मनातली ही भुतं आरशात बघितल्यासारखी लख्ख समोर उभी करणारा नवीन प्रयोग म्हणजे “मन-पिशाच”...

राही अनिल बर्वे आणि जाई गुलमोहर, यानीया भारद्वाज, दीपक दामले यांनी ए.आय. तंत्रज्ञान वापरून बनवलेली दीड तास लांबीची झीरो बजेट फिल्म.

‘ओटीटी’च्या जमान्यात राहीच्या टीमनं युट्युबवर संपूर्ण फिल्म रिलीज केली आहे, वरून ‘झीरो बजेट फिल्म कशी बनवायची’ याचा सिक्रेट फॉर्म्युला सगळ्यांसाठी उघड करून दिला आहे.

नारायण धारपांच्या कथांपासून प्रेरणा घेतल्याचा उल्लेख यामधे केलेला आहे. मानवी भावना मूर्त स्वरूपात दाखवण्यासाठी उग्र वागणूक, विचार आणि कृती यामधे तीव्र विरोधाभास, शारीरिक विकृती आणि निषिद्ध व्यवहार अशी प्रतिकं निवडली आहेत. याआधी ‘तुंबाड’ आणि ‘मयसभा’ यामधे राहीने फिल्म माध्यमातून कथाकथनाचा यशस्वी प्रयोग करून दाखवलेला आहे. ‘मन-पिशाच’च्या बाबतीत मात्र अजून काहीतरी वेगळं आहे, नवीन आहे.

पूर्वीपासून चालत आलेल्या स्वरूपाचा सिनेमा बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान (ए.आय.) वापरण्याऐवजी, ए.आय. चांगल्या प्रकारे बनवू शकेल असा सिनेमाचा प्रकार लिहिण्याचा आणि निर्माण करण्याचा प्रयत्न राहीच्या टीमनं केलेला दिसतो. बोरुऐवजी बॉलपेन किंवा डायरीऐवजी लॅपटॉप असा हा बदल नक्कीच नाही.

एकमेकांशी थेट संवाद साधणाऱ्या पात्रांऐवजी एकाच पात्राच्या निवदेनातून उलगडत जाणारी गोष्ट, नेहमीच्या कॅमेरा अँगलपेक्षा खूप वेगळे क्लोजअप आणि कथेला पुढे नेणाऱ्या कपाळावरच्या आठीपासून घामाच्या थेंबापर्यंत बारकावे दाखवणाऱ्या सुंदर फ्रेम्स, हे सगळं बघायला, समजून घ्यायला, याचा आस्वाद घ्यायला, ‘एआय-रेडी’ प्रेक्षकसुद्धा तयार करायला लागेल अस वाटतं.

ए.आय.मुळं लोक बेरोजगार होतील, अशी भीती अजून घातली जाते; पण ए.आय.मुळं एखादा कफल्लक कलाकार अद्भुत कलाकृती निर्माण करू शकेल, हे राहीच्या प्रयोगातून सिद्ध झालेलं आहे.

अशा अजून फिल्म्स त्यानं बनवाव्यात, आपापल्या क्षेत्रात ए.आय.चा कल्पक आणि विधायक वापर करायची प्रेरणा इतरांना मिळावी, आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर मनातल्या सुप्त इच्छा-अपेक्षांचं शमन करण्यासाठी व्हावा, म्हणजे आपल्या दडपलेल्या मनातली भुतं ‘मन-पिशाच’ बनून अंधाऱ्या रात्री आपल्यावरच तुटून पडणार नाहीत, ही आशावादी पण भयभीत मनाची ए.आय. चरणी प्रार्थना…

~ मंदार शिंदे
18/03/2026

 



Share/Bookmark

Mann-Pishach: Ghosts of the Suppressed Mind (English)

 


Desire is the root of all suffering, Buddha told us.

All our wishes and expectations cannot be fulfilled. Sometimes because of our own limitations, sometimes because of unfavorable situations. Unfulfilled desires, and emotions that are suppressed instead of resolved, stay hidden inside us, waiting for a chance to bring us down. We shut doors and windows, put locks and chains, install CCTV and alarms – everything outside. But the real enemy stays inside, with us. One that looks like us, behaves like us, speaks like us, and knows us inside out. We ourselves raise it, feed it, and make it strong – only to cause our own downfall.

We cannot keep this inner beast under control forever if we suppress it rather than resolve it.

“Mann-Pishach” is a new experiment that reveals these ghosts of the suppressed mind, as if reflected in a mirror...

It's a one-and-a-half-hour zero-budget film made using AI technology by Rahi Anil Barve, Zai Gulmohar, Yaaneea Bharadwaj, and Deepak Damle.

In the age of OTT platforms, Rahi’s team has released the full film on YouTube, and has even openly shared the ‘secret formula’ of how to make a zero-budget film.

The film mentions inspiration from the stories of Narayan Dharap. There is a peculiar way of giving human emotions a tangible form – through extreme behavior, sharp contrasts in thoughts and actions, physical distortions, and taboo acts. Rahi has so far successfully experimented with storytelling through films like Tumbbad and Mayasabha. But in the case of Mann-Pishach, there is something different, something new.

Instead of using modern technology (AI) to make films in the traditional style, Rahi’s team seems to have tried writing and creating a type of film that AI can be comfortable making with. This is not just a change like replacing a reed pen (boru) with a ballpoint or a diary with a laptop.

Instead of characters directly talking to each other, the story unfolds through the narration of a single character. Unusual close-ups, very different from regular camera angles, and beautiful frames that show fine details – from a wrinkle on the forehead to a drop of sweat that moves the story forward – this may also require preparing the audience to be AI-ready – to watch, understand, and appreciate it.

People still fear that AI will steal their jobs. But Rahi’s experiment proves that AI can also help a broke artist create an amazing piece of art.

May he make more such films. May others be inspired to use AI creatively and constructively in their own fields. And may this new technology help resolve the hidden desires within us, so that the ghosts of our suppressed minds do not turn into “Mann-Pishach” and attack us in the dark night – this is a hopeful yet fearful prayer of a suppressed mind at the feet of AI.

~ Mandar Shinde
18/03/2026



Share/Bookmark