ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, September 28, 2014

बक्षिसं, पदव्या, मानमरातब, प्रसिद्धी, पैसा...

"बक्षिसं, पदव्या, मानमरातब, प्रसिद्धी, पैसा हे येऊन फक्त आपली पाठ थोपटतात आणि पुन्हा धावत राहायचं बळ देतात. तेही महत्त्वाचं असतं. म्हणजे, मॅरेथॉन धावताना रस्त्यात पाण्याचा ग्लास देत, पाठीवर थोपटून प्रोत्साहन देणारे असतात ना, तशी बक्षिसं वगैरे असतात. तिथे फार रेंगाळायचं नसतं. पाण्याचा एक घोट घेत, जरा फ्रेश होऊन पुढे जायचं असतं. पाणी देऊन फ्रेश करणा-या त्या थांब्याचं महत्त्व आहेच, पण त्या पाण्याच्या ग्लाससाठी धावायचं नसतं!"

- नविन काळे ('मज्जानो मंडे' या पुस्तकातून)


Share/Bookmark

Tuesday, September 23, 2014

शिवसेना आणि दलित

"शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधे सुरुवातीच्या काळात सर्व जातीच्या तरुणांचा भरणा होता. नेतेमंडळी उच्चभ्रू वर्गातील असली तरी कार्यकर्त्यांमधे मराठ्यांपासून वैश्य-वाण्यापर्यंत आणि भंडार्‍यांपासून कुणब्यांपर्यंत, तसेच माळ्यांपासून अन्य अनेक जातिजमातींचा समावेश असे. प्रारंभीच्या काळात मराठी माणूस आणि त्याची आर्थिक उन्नती हा राजकीय स्वरुपापेक्षा सामाजिक स्तरावरील हाती घेतलेला कार्यक्रम हे त्यामागील मुख्य कारण होतं. जातीपातींचा विचार न करता, फक्त मराठी माणसाचा विचार करणारी संघटना, अशी प्रतिमा याच काळात निर्माण होत होती. पण शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्रित आलेल्या या तरुणांमधे सुरुवातीच्या काळात राजकीय महत्त्वाकांक्षा मात्र निर्माण झालेली नव्हती. राजकीय विचारसरणीनं प्रेरित झालेल्या कार्यकर्त्यांचं जातवार विभाजन हे त्या काळात वेगवेगळ्या पक्षांच्या छत्राखाली पूर्वीच झालं होतं. यशवंतराव चव्हाणांची घट्ट पकड असलेला काँग्रेस हा बहुजन समाजाचं म्हणजेच मराठ्यांचं राजकारण करत होता आणि काही प्रमाणात तरी ओबीसी (अर्थात, तेव्हा ओबीसी या शब्दाचा जन्म व्हायचा होता) काँग्रेसबरोबरच होते. जनसंघामधे शेटजी-भटजीचा विचार चालायचा, तर दलितांचा मुक्काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या छावण्यांमधे असायचा. पण त्याचवेळी महाराष्ट्रात सामान्यतः ३०-३५ टक्के असलेल्या मागासवर्गीयांना म्हणजेच प्रामुख्याने दलितांना सत्तेच्या सोयीच्या राजकारणासाठी आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न प्रमुख राजकीय पक्षही एकाचवेळी करत असत. १९७४ मधे मध्य-दक्षिण मुंबईत लोकसभेची पोटनिवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसचे उमेदवार रामराव आदिक यांना शिवसेना आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला होता; पण आश्चर्याची बाब अशी, की शिवसेना आणि दलित यांच्यातील संघर्षाची पहिली ठिणगीही याच निवडणुकीच्या वेळी पडली. त्यानंतर पुढे सेनेने सातत्याने दलितविरोध हीच भूमिका कायम ठेवली. इथं शिवसेनेनं दलितांविरोधातील हा पहिला आक्रमक आणि हिंसक पवित्रा प्रबोधनकारांच्या १९७३ मधे झालेल्या निधनानंतरच घेतला, हे नमूद करणं जरुरीचं आहे. सर्वसमावेशक विचार हा प्रबोधनकारांचा बाणा होता. त्यामुळेच ते असेपर्यंत दलितांच्या विरोधात जाण्याची शिवसेनेची हिंमत नव्हती, हाच या प्रकाराचा अर्थ आहे. पुढे १९८० च्या दशकात मराठवाड्यात आपलं बस्तान बसवताना तर शिवसेनेला या दलितविरोधी भूमिकेचा खूपच फायदा झाला. १९८४-८५ मधे हिंदुत्व-रक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्याचा दावा केल्यानंतर, शिवसेनेच्या दलितविरोधी भूमिकेला अधिकच जोर चढला... मूळातच 'मराठी माणूस' असा सोयीचा विषय घेऊन मुंबई-ठाण्यापुरतं राजकारण करणार्‍या शिवसेनेने तोपावेतो कोणत्याही स्वरुपाची ठोस सामाजिक भूमिका कधीच घेतली नव्हती. त्यामुळे मराठवाड्यातसुद्धा ही दलितांच्या विरोधातील भूमिका घेणं शिवसेनेला सोयीचं गेलं."

- प्रकाश अकोलकर ('महाराष्ट्राचे राजकारण : नवे संदर्भ' या पुस्तकातून)


Share/Bookmark

Sunday, September 21, 2014

प्रदेशाचा आणि व्यक्तीचा परस्परांवर परिणाम

"शरद पवार हे बारामतीचे. त्या भागाच्या औद्योगिक विकासाला पवारांचा हातभार लागला, पण स्वतःची म्हणूनही गती होती. कविवर्य मोरोपंत बारामतीचे. महाराष्ट्रातील पाटपाण्याची पहिली योजना म्हणजे नीरा कालवा योजना. तिची सुरुवात १८८५ मधे झाली. म्हणजे देशात काँग्रेसची चळवळ सुरु झाली, पुण्यात फर्ग्युसन कॉलेज सुरु झाले, त्यावर्षीच बारामतीचे लोक बागायती शेती करायला लागले. सहकारी साखर कारखान्याचा लल्लूभाई सामळदास यांचा पहिला प्रयोग बारामतीतच झाला. त्याच फसलेल्या कारखान्याच्या जागी सध्याचा माळेगाव कारखाना उभा आहे. प्रवरानगरचा कारखाना उभा करण्यासाठी झालेल्या बैठकीला गोविंदराव जिजाबा पवार हजर होते. काकडे, जाचक, शेंबेकर, दाते, पवार या मंडळींनी बारामतीत बागायत आणि साखर कारखानदारी वाढविली. त्या वातावरणात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी राजकारण सुरु केले. बारामतीच्या जिरायती भागात त्यांनी फूड फॉर वर्क योजनेअंतर्गत पंचवीस वर्षांपूर्वी शंभर पाझर तलाव करून घेतले. आता तिथे मोठमोठे उद्योग उभे राहात आहेत."

- वरुणराज भिडे ('सत्याग्रही विचारधारा' जुलै १९९३च्या अंकातून)


Share/Bookmark

शिवसेना आणि काँग्रेस

"शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली आणि त्यापुढची दोन दशकं ठाकरे यांनी केवळ मुंबई आणि ठाणे याच परिसरातील महापालिकांच्या राजकारणावर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं होतं. कम्युनिस्ट आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या निर्घृण हत्येनंतर तापलेल्या वातावरणाचा फायदा उठवत, शिवसेनेनं आपला पहिला आमदार १९७० मधे विधानसभेत धाडला आणि पुढे अधूनमधून विधानसभाच नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही उतरुन बघितलं. १९६६ ते १९८५ या दोन दशकांत काँग्रेसशी साटंलोटं करुन शिवसेनेनं विधान परिषदेच्याही काही जागा हासील केल्या. या २० वर्षांच्या काळात शिवसेना एकीकडं डांगे - एस. एम. जोशी - अत्रे - जॉर्ज फर्नांडिस अशा नेत्यांना 'लक्ष्य' करीत होती आणि ते काँग्रेसच्या सोयीचं असंच राजकारण होतं... आज राज्यात काँग्रेसविरोधातील एक प्रमुख पक्ष म्हणून मान्यता मिळवणार्‍या या संघटनेनं पहिल्या दोन दशकांत सातत्यानं काँग्रेसलाच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या बळ पुरवलं. शिवसेनेच्या स्थापनेनंतर अवघ्या दहा वर्षांत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जारी केली, तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी त्याविरोधात आंदोलन केलं आणि बड्या राजकीय नेत्यांबरोबरच लक्षावधी कार्यकर्त्यांनी कारावासही पत्करला. पण, शिवसेनेनं मात्र आणीबाणीला पाठिंबा जाहीर केला होता! एवढंच नव्हे तर आणीबाणीनंतर जनता पक्षाचा प्रयोग फसला आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यावर १९८० मधे महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर ठाकरे यांनी थेट काँग्रेस प्रचाराची पालखी खांद्यावर घेऊन विधान परिषदेच्या दोन जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. यावर आताच्या तरुण शिवसैनिकांचा विश्वासही बसणं अवघड आहे..."

- प्रकाश अकोलकर ('महाराष्ट्राचे राजकारण : नवे संदर्भ' या पुस्तकातून)


Share/Bookmark

निवडणूक...पुन्हा!

पुन्हा तारखा जाहीर होतात, पुन्हा कार्यकर्ते जागे होतात
मागच्या वेळचे शत्रू कोण, मित्र कोण, विसरुन जातात...
पुन्हा तिकीट पैशेवाल्याला, पुन्हा तिकीट पावरवाल्याला
वाटून वाटून उरलेच तर, एखादे मिळते कार्यकर्त्याला...
पुन्हा मतदार खूप ऐकतो, पुन्हा उमेदवार खूप बोलतो
तापलेल्या तव्यावर पोळी मात्र, मीडिया अलगद भाजून घेतो...
पुन्हा दोस्तांना सांगतो मी, पुन्हा मित्रांशी बोलतो मी
माझे तुमचे खरे मुद्दे, पुन्हा जाहीर मांडतो मी
माझे तुमचे खरे मुद्दे, पुन्हा जाहीर मांडतो मी...


Share/Bookmark

Monday, September 15, 2014

Think before you react!

Mr. K Laxman, a BJP MLA opposes Tennis star Sania Mirza being designated the brand ambassador of Telangana. Why? Because according to Mr. Laxman, Sania is "Pakistan's daughter-in-law". Well, however foolish this statement is, more foolish are his supporters who spread this ‘news’ through social media and in all other possible ways. This topic fuels hot discussions between pro-BJP and anti-BJP (or more specifically, between Hindutva-wadi and others). The objective of such statements is to keep the issue (of Hindu-Muslim) burning. Once this objective is achieved, the image-saver of BJP comes into picture. “Indian tennis star Sania Mirza meets Prime Minister Narendra Modi after her victory in the US Open mixed doubles!” All is well that ends well...

Sakshi Maharaj, a BJP MP from Unnao, publicly alleges that Madarasa's across the country are imparting “education of terror” and “love jihad”. He claims that Muslim youth in Madarasa's are being motivated for “love jihad” with offers of cash rewards - Rs.11 lakh for an “affair” with a Sikh girl, Rs.10 lakh for a Hindu girl, and Rs.7 lakh for a Jain girl. Usha Thakur, a BJP MLA in Madhya Pradesh (and also state BJP vice-president) has asked party workers to ensure that Muslim youths are not allowed to enter Garba venues in her constituency, Indore (3), during the upcoming annual Nav Durga festival. She alleges that Hindu girls are lured by Muslim youths and converted to Islam as part of the “love jihad” conspiracy to distort population ratio in the country. Another great discovery and our media-savvy young generation voluntarily jumps in to spread this ‘news’ through WhatsApp, Facebook, Twitter, and what not… Again, the objective of such statements is to keep the issue (of Hindu-Muslim) burning. Once this objective is achieved, the fire-fighter of BJP comes into picture. "Arey yeh Love Jihad hai kya? Hume nahi maloom!” says Home Minister Rajnath Singh in a press conference. Again, all is well that ends well…

This Modus Operandi works well with blind-followers and non-thinkers, who are available in huge numbers in our country. Throw a piece of bone and these followers keep chewing it for hours and days and months and years. They never try to verify whether it is a real bone or just a piece of rubber or wood thrown at them to fool them. Some non-highlighted MLA or MP or party leader makes a controversial and too obvious statement and the public is stirred with confused emotions and reactions. Then, someone from the top takes charge and denies or ‘disowns’ the statement or the person him/herself on behalf of BJP as a party. We have been seeing this since long now… once it was Babri issue, then Section 370, then reservation issue, then some trivial topics like Paki Bahu and Love Jihad. If you are among the followers, just stop and think before you perform your ‘duty to spread such news’ among your network. Think of what you are gaining from this, personally or as a society. Think what you would do when the top bosses of the party that you follow disown the very topic that you have already given your time, energy, and emotions to. Think how this is going to help our country become a superpower!

In short, think before you react! Think before you spread something foolish and baseless! Think before someone ‘uses’ you for their own personal benefit...


Share/Bookmark