ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, December 31, 2023

तुझ्याचसाठी...


 
मी एक पाकळी
तुझ्याचसाठी
शोधून आणली
संध्याकाळी
हसलीस तू अन्
उजळून गेला
रात्रीचा चंद्रमा...

मग पुन्हा दुसरी
सकाळ झाली
शोध पाकळी
सुरूच राही
हसशील तू या
आशेवरती
रात्रीही जागल्या...

- मंदार
३१/१२/२०२३



Share/Bookmark

Friday, November 17, 2023

Career, Care, and Gender

 

The married mothers I interviewed felt balancing work and care was too difficult. Wives left jobs as their husbands rarely showed any aptitude for childcare and household management. One of the women I spoke to said that she and her husband had been at business school together: 'But once I was pregnant, we decided that I would leave work as his skills as a father could not substitute for my skills as a mother. It was a practical decision.' Another said, 'Somedays, I am so angry that I want to shout at everyone. The only words my husband and in-laws will exchange with me are about food and clothes. Nothing else. I had to quit work and take care of my son, and it's been tough finding the right job again. There are fewer opportunities and too many candidates. I keep telling my husband that he should pay me a salary for all the work I do at home!'

…from Shrayana Bhattacharya's book - 'Desperately Seeking Shah Rukh'


मी ज्यांची मुलाखत घेतली अशा, लग्न आणि मुलं झालेल्या महिलांच्या दृष्टीनं, पैसे देणारं काम आणि घरातल्यांची काळजी घेण्याचं काम, या दोन गोष्टींचा बॅलन्स राखणं अवघड आहे. मुलांची काळजी घेणं आणि घरातली कामं मॅनेज करणं याबाबतीत नवऱ्यांची क्षमता क्वचितच दिसत असल्यामुळं बायकांनी नोकऱ्या सोडल्याचं दिसून आलं. मी ज्यांच्याशी बोलले त्यापैकी एकीनं सांगितलं की, ती आणि तिचा नवरा एकाच बिझनेस स्कूलमधे (कॉलेजमधे) शिकलेः 'पण मी प्रेग्नंट राहिल्यावर आम्ही लगेच निर्णय घेतला की मला माझं काम सोडायला लागेल, कारण बाप म्हणून त्याच्याकडं असलेलं स्किल माझ्या आई असण्याच्या स्किलसाठी पर्याय ठरू शकणार नव्हतं. आमच्या दृष्टीनं हा प्रॅक्टिकल निर्णय होता.' दुसरी म्हणाली, 'कधी कधी मी एवढी चिडते की मला सगळ्यांवर ओरडावंसं वाटतं. माझा नवरा आणि माझे सासरचे लोक माझ्याशी फक्त खाणं आणि कपडे याबद्दलच बोलतात. दुसरं काही बोलतच नाहीत. मला माझ्या मुलाची काळजी घेण्यासाठी माझं काम सोडायला लागलं, आणि आता पुन्हा चांगला जॉब मिळणं खूपच अवघड झालंय. अपॉर्चुनिटी खूप कमी आणि कॅन्डिडेट खूप जास्त झालेत. मी घरात करत असलेल्या या सगळ्या कामाबद्दल माझ्या नवऱ्यानं मला पगार दिला पाहिजे असं मी त्याला सारखं सांगत राहते!'

…श्रयाना भट्टाचार्य यांच्या 'डेस्परेटली सीकिंग शाहरुख' या पुस्तकातून



Share/Bookmark

Monday, November 13, 2023

A Pure Relationship


 "A pure relationship is where a social relation is entered into for its own sake, for what can be derived by each person from a sustained association with another; and which is continued only insofar as it is thought by both parties to deliver enough satisfactions for each individual to stay within it."

- Sociologist Anthony Giddens



Share/Bookmark

Saturday, November 4, 2023

Did you watch this movie?

चार-पाच महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातल्या एका स्कूल टीचरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, शाळेमधे डान्स करताना…

मग त्यात काय एवढं, असं वाटत असेल तर हे वाक्य पुन्हा वाचा…

चार-पाच महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातल्या एका शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, शाळेमधे फिल्मी गाण्यांवर नाचताना…

आता त्रास झाला? शिक्षिका आणि नाच? फिल्मी गाण्यांवर? शाळेमधे? ज्ञानाचं पवित्र मंदिर, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, वगैरे वगैरे… आणि सस्पेन्ड! अर्थात, बातम्यांमधे तरी तसंच सांगितलंय की, संबंधित शिक्षिकेला या कृत्याबद्दल निलंबित करण्यात आलं… असो!

'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' नावाचा एक मराठी सारण भरलेला हिंदी सिनेमा रिलीज झालाय, हे किती लोकांना माहितीय? मिखिल मुसाले आणि परिंदा जोशी (भारी नाव आहे ना!) यांनी लिहिलेली एक सामाजिक सस्पेन्स थ्रिलर फिल्म… बरंचसं शूटींग पुण्यात झालंय, त्यामुळं पुण्यातले कॅफे, रस्ते, गल्ल्या, पाट्या, वगैरे बघायला मिळतात… निमरत कौर, राधिका मदान, सुमित व्यास, यांच्यासोबत आपला चिन्मय मांडलेकर, आपला सुबोध भावे, आपले शशांक शेंडे, आपले किरण करमरकर, आणि ‘आमची’ भाग्यश्री पटवर्धनसुद्धा आहे… स्टोरी, डायलॉग्ज, सिनेमॅटोग्राफी, बॅकग्राऊंड स्कोअर, हे सगळं मस्त जमून आलंय…. पण अजून एक भारी गोष्ट म्हणजे, या सिनेमात ‘नाटक’सुद्धा आहे… असो!

पिक्चरची स्टोरी इथं सांगण्यात काही पॉइंट नाही… ‘अ’ ने ‘ब’ ला मारलं आणि ‘क’ ने ते शोधून काढलं, असं उलगडून काहीच सांगता येणार नाही… सगळं कॉम्प्लिकेटेड आहे, गुंतागुंतीचं आहे… बरं-वाईट, चूक-बरोबर, नैतिक-अनैतिक, कायदेशीर-बेकायदेशीर, या संकल्पनांना आव्हान देणारा, या चौकटी तोडून-मोडून एक नवीनच वर्तुळ बनवणारा अनुभव असं या सिनेमाचं वर्णन करता येईल… सुरुवातीला आपण बाहेरुन यातल्या पात्रांच्या आयुष्यात डोकावायला लागतो, आणि शेवटी आपणच या वर्तुळाचा केंद्रबिंदू बनून परिघावर चालत राहिलेल्या या सगळ्यांकडं बघत राहतो… सगळे चालतायत, पण पोहोचणार कुणीच नाही… आपल्या इच्छा, कृती, आणि त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया, यांचा सतत विचार करत, भूतकाळाकडून चालायला सुरुवात तर केलीय, पण वर्तुळच असल्यानं भविष्याऐवजी पुन्हा भूतकाळाकडंच पावलं सरकत राहतात, असं शेवटी लक्षात येतं…

या सिनेमातला प्रत्येक सीन एक स्वतंत्र अनुभव आहे… आपल्या आत डोकावून बघायची संधी आहे… आपण त्या सिच्युएशनमधे कसे वागलो असतो, याचा विचार केल्यास त्रास आहे… विचार न केल्यास नुसताच पात्रांचा आणि घटनांचा भास आहे…

“स्टेजवरच्या कलाकारासाठी नाटकातला सगळ्यात भयंकर क्षण कुठला असेल, तर आता पडदा पडावा असं वाटत असताना पडदा न पडणं!”

असो! एखाद्या रहस्यकथेचं खरं यश कशात असतं माहितीये? रहस्याचा उलगडा झाला तरी कथा संपली नाही असं वाटण्यात… ‘अँड दे हॅप्पिली लिव्ह्ड एव्हर आफ्टर’ असं इथं वाटत नाही… ‘अँड दे रिमेइन्ड रेस्टलेस एव्हर आफ्टर’ असं म्हणता येईल फार तर…

'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' नक्की बघा… थिएटरला बघायला मिळाला तर तुम्ही नशिबवान; नाही तर ओटीटी, युट्युब, कुठंतरी येईलच, त्यावर डोळे ताणून बघू शकता… इथं लिहिलेल्या गोष्टींचे रेफरन्स सिनेमात मिळतीलच… नाही मिळाले तरी हरकत नाही… कदाचित तुम्हाला काहीतरी वेगळं दिसेल, सापडेल… डुबकी मारून तर बघा…

जाता जाता, थोडं नॉलेज शेअरिंग करतो… असंच, जनरल नॉलेज… ‘फाइव्ह स्टेजेस ऑफ ग्रीफ’बद्दल ऐकलंय का? एखादी अप्रिय, दुःखद घटना घडली तर त्यानंतर कुठल्या पाच टप्प्यांमधून आपण जातो, याबद्दलचं ‘क्युब्लर-रॉस ग्रीफ सायकल’ माहिती असावं, म्हणून सांगतोय… अर्थात, प्रत्येकजण या पाचही टप्प्यांमधून आणि तेसुद्धा त्याच क्रमानं जात असेलच असं अजिबात नाही… पण सर्वसाधारणपणे, नकार किंवा अस्वीकार (डिनायल), राग (अँगर), बार्गेनिंग (याला मराठीत काय म्हणतात, कुणास ठाऊक), नैराश्य (डिप्रेशन), आणि स्वीकार (ऍक्सेप्टन्स), असे दुःख सहन करायचे पाच टप्पे आहेत… आपण कुठल्या टप्प्यावर आहोत, त्याप्रमाणं आपल्या प्रतिक्रिया आणि कृती घडत असतात… त्या टप्प्यावर, त्या वेळी ती कृती, ती प्रतिक्रिया कदाचित योग्य असेल, समर्थनीय असेल; पण त्यातून बाहेर पडल्यावर आपल्यालाच ती योग्य वाटेल याची खात्री देता येईल का, माहिती नाही… असो!

सिनेमा बघा, गाणी ऐका, डान्स करा… तुम्ही शिक्षक असाल, पोलिस असाल, कलाकार असाल, किंवा आणखी कुणी… पण सगळ्यात आधी, त्या वर्तुळाच्या मध्यभागी एक माणूस आहे… त्याच्याकडं पण लक्ष द्या थोडं, जमलं तर…

मंदार शिंदे
०२/११/२०२३





Share/Bookmark

Thursday, September 21, 2023

Government School Adoption Scheme

Sharing my views on the recent government decision to allow adoption of government schools by corporates.

According to the Right To Education Act 2009, four types of schools are recognized in India - (1) Schools owned and run by the Government; (2) Schools privately owned but fully or partially funded by the Government; (3) Minority and special schools; (4) Privately owned and self-funded schools.

The corporates and private players already have an option to invest in (and earn from) the education sector under category 2 and category 4 schools. The category 1 schools primarily ensure universal access to elementary education for every child in the country. The government is responsible for making all resources available in category 1 schools.

The recent decision by the state government seems to be the next phase after (i) Voluntary donations by individuals and companies, (ii) Public Private Partnerships, and (iii) Compulsory public contribution (Lok Sahabhag). This will further reduce the stake and say of the government in primary education, along with reducing financial provisions in the budget. This is expected to lead towards costlier (not necessarily better) infrastructure, discrimination and restricted access for children, especially from vulnerable backgrounds, higher dependence on the will and changing interests of the corporates, etc. If you check the contents of the Government Resolution dated 18th September 2023, the corporates are invited to supply everything from chalks to uniforms, textbooks to drinking water, and student counselling to teacher training.

The corporates will be benefitted by the principle of low investment for higher returns, as they will get the land and established school structure (including the goodwill and knowledge base) to project their contribution to the society at a multiplied proportion. For example, a corporate has to invest a huge amount for building and running a private school (under category 4 mentioned above). They can now distribute the same amount to multiple government schools, against which all those schools will be renamed after the corporates with the accountability still remaining with the government.

I feel that corporates should be allowed to build and run schools under category 2 and 4 under the principle of choice of the parents, and the government must run the schools under category 1 under the principle of rights of the people. People in power are trying to sell the public-owned systems for their own and corporates' benefit. This doesn't look good in the present and sounds scary for the future.


Mandar Shinde
21/09/2023



Share/Bookmark

Friday, September 15, 2023

Article on Screen Time

Are parents responsible for increasing children's screen time?

If parents don't want any rules or restrictions regarding phone usage and screen time, why would children want them?

Written by Mukta Chaitanya
September 11, 2023


Have you ever noticed how parents easily give phones to their children so that even very young children finish their food quickly, sit in one place without pestering the parents, and don't interfere with the parents’ work and then gradually children get used to the phone? What do most children under the age of ten to twelve do with their mobile phones? They play games. And children above that age go beyond games and start interacting on WhatsApp, Instagram, Facebook.

If parents don't want any rules or restrictions regarding phone usage and screen time, why would children want them? And who will ensure whether they follow the rules or not? Today, parents do not have as much control as they think they have over what and how reaches their children. Moreover, children imitate their parents when it comes to smartphones. Children learn to use their own phones by watching their parents use smartphones. Children pay close attention to how the adults around them use their phones. Be it chatting on WhatsApp for hours or taking the phone to the bathroom. What and how are parents' internet and smartphone usage habits; they influence the children. So how to face all this is the biggest question in front of the parents. To solve this problem, parents need to consider the following five points.

1) Internet, social media and smartphones are important revolutions of modern times. They are embedded in our existence, an integral part of our existence; they cannot be completely deleted but that does not mean that we should surrender to them and become their slaves. If parents want to worry about their children's screen time, they need to worry about their own screen time first. If their habits change, it can be easier for children to change.

2) Once we become parents, we start believing that all the rules in the world are only for our children and by implementing those rules, we can discipline our children. There cannot be one rule for children and different for parents when it comes to mobile phones. Parents should be disciplined before children are disciplined. Children should be able to see whether their parents' screen time is healthy or not.

3) Children need to see that parents are doing many things beyond the screen, not involving the phone. It should be seen that parents are reading books, exercising, no phone nearby, no headphones, parents are gardening, or doing any of their hobbies. This can increase children's interest in doing offline activities.

4) After going to the hotel, parents and children keep their heads stuck in their phones.. Never do this. Children will only understand that the time we go out together is important when parents or other adults put away their phones and chat with each other and with the children. Let kids see that chatting offline is just as fun.

5) Practise what you preach. As parents we are double tongued, full of hypocrisy. It is usual for us to do the same 'something' in front of children that we don’t want the children to do. We as parents have told ourselves a lie that when we use mobile phones, it is only for work and when the children use mobile phones, it is just a timepass. We desperately keep trying to convince our children as well as ourselves about this… because it is our convenience as parents. But children can see the difference between what you preach and what you practise.

How can we blame the children if they feel that there could be nothing wrong if they did what their parents do and if they start behaving accordingly?

Many parents have a habit of checking their mobile as soon as they wake up in the morning or of constantly checking their mobile every fifteen minutes. Some parents become restless if the range is not available. Some parents are constantly clicking selfies and uploading them on Instagram. Some parents are happy to see the likes and comments they get there. If their happiness is interrupted, they get angry. Some parents put their heads in the phone when they come home from the office, before talking to their children. Some parents turn on the TV while they feed their children and get themselves engrossed in WhatsApp or social media. Some parents pat their children to sleep with one hand, while the other hand is checking the messages. When some parents go on a trip, they spend most of their time watching something on their smartphones. Some parents are constantly gossiping with someone… The list would still be long.

All this is going on in front of the children. Children are watching it. They pick up those habits as much as they can understand. So, before taking care of children's phones, it is better for adults to take care of their own phones!

(Translated by Mandar Shinde)

 


Share/Bookmark

Wednesday, September 13, 2023

Dil Feka, Tune Pakda... (Marathi Short Story)

 


“मराठी कविता म्हणजे फारच अवघड प्रकरण आहे बुवा,” माझा मित्र अगदी कळकळीनं बोलत होता.

“का रे, एवढं वैतागायला काय झालं?” मी विचारलं.

“वैतागणार नाही तर काय? चांगलं पोतंभर गहू घातलं गिरणीत, की मूठभर पीठ निघतंय बघ!”

माझ्या डोळ्यांसमोर, केस - मिशा - अगदी डोळ्यांच्या पापण्यादेखील पांढऱ्या झालेला माझा मित्र, एका मोठ्या पिठाच्या गिरणीच्या तोंडाशी, खाली वाकून, पीठ का येत नाही म्हणून मशिनमध्ये घुसू पाहतोय, असं चित्र उभं राहिलं. मला खुदकन् हसू आलेलं पाहून तो जास्तच वैतागला.

“हं, हसा हसा, तुम्हाला हसू येणारच. तुम्ही हिंदीत पण लिहिता ना…”

“अरे हो हो, असा एकदम हिंदी-मराठी भाषावाद का उकरून काढतोयस? आणि तुला कुणी नको म्हटलंय का हिंदीत लिहायला? तुझाच हट्ट ना - म्हणे, मातृभाषेशी प्रतारणा करणार नाही, वगैरे वगैरे…”

“करा, अजून चेष्टा करा गरीबाची…” तो अधिकच हिरमुसला. मीच मग समजुतीच्या सुरात विचारलं, “जाऊ दे रे ते सगळं, काय झालं ते तरी सांगशील का?”

“काय सांगायचं? अरे परवा शखूसाठी एक छान कविता केली होती.”

“शकू? कोण शकू?” मी त्याच्या मैत्रिणींची नावं आठवायचा प्रयत्न केला.

“शकू नाही रे, शखू.. श-खू… शिखा नाही का माझी मैत्रिण?”

“अच्छा अच्छा शिखा! ती नागपूरची? आणि एवढं चांगलं ‘शिखा’ नाव असताना ‘शकू’ काय म्हणतोस रे? तिचं काव्यात्मक नामकरण केलंयस की काय - शकुंतला, शाकंभरी, वगैरे?”

“छे छे, तसं काही नाही,” उगाचच लाजत तो म्हणाला, “ते आपलं आमचं खाजगीतलं काहीतरी…”

“खाजगीतलं? असू दे, असू दे. कवितेबद्दल काहीतरी सांगत होतास. की ते पण तुमचं खाजगीतलं काहीतरी...?”

“नाही रे, तेच तर सांगत होतो,” तो पुन्हा वैतागून बोलू लागला, “अरे ही शखू, म्हणजे शिखा, मूळची नागपूरची. सध्या मुक्काम पोस्ट पुणे. शिक्षण पूर्णपणे इंग्रजी माध्यमात…”

“वय किती? उंची? आणि…” मी पुढं विचारू लागलो.

“का रे, तुला काय करायचंय?” त्यानं रागावून विचारलं.

“तसं नाही रे, तू मला तिचा बायो-डाटा वाचून दाखवल्यासारखी माहिती सांगतोयस, म्हणून मीच मदत केली मुद्दे आठवायला…”

“अरे बायो-डाटा कुठला? मला सांगायचं हे होतं की मूळ गाव नागपूर आणि शिक्षण इंग्रजी माध्यमातलं. परीणाम - मराठीच्या नावानं बोंब, अगदी दोन्ही हातांनी…”

“आणि अशा पोरीला तू तुझ्या साजुक तुपातल्या मराठी कविता ऐकवतोस? ग्रेट आहेस यार!”

“कसला ग्रेट? ऐक तर खरं. हिच्यासाठी मी एक सुंदर कविता केली, माझ्या स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात लिहून तिला प्रेमानं वाचायला दिली.”

“मग?”

“मग काय? संध्याकाळच्या छान गार वाऱ्यात, झेड ब्रीजवर बसलो होतो. तिला सांगितलं, तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय म्हणून. तीही लाजली. मी खिशातून हा कवितेचा कागद काढला, तिच्यासमोर धरला, आणि तिला म्हणालो, वाच!”

“मग?”

“छान लाजत-बिजत तिनं कागद हातात घेतला, माझी कविता वाचली, आणि काय झालं कुणास ठाऊक, तिचा चेहरा एकदम अजीर्ण झाल्यासारखा झाला. माझ्याकडं एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून ती उठली, गाडीवर बसली, गाडी स्टार्ट केली आणि भुर्रकन निघून गेली.”
 
“बाप रे, मग तू काय केलंस?”

“काय करणार? तिच्याच गाडीवर बसून गेलो होतो ना. चालत चालत स्टॉपवर गेलो, बस पकडली आणि घरी आलो.”

“अरे, ते नाही विचारलं मी. काय केलंस म्हणजे, तिला थांबवायचा प्रयत्न नाही का केलास?”

“नाही रे बाबा, ती गाडी चालवत असली की ट्राफिक पोलिस पण तिला थांबवायला धजावत नाही. मी काय थांबवणार?”

“अशी काय डेंजर कविता दिलीस बाबा तिला वाचायला? काही चावट लिहिलं होतंस की काय?”

“छे, छे! असलं-तसलं काही लिहित नाय आपण. माझ्या मनातले, अगदी आतले भाव मांडले तिच्यासमोर…”

“बरं बरं, आता आणखी सांडू नकोस. काय लिहिलं होतंस सांगशील तर खरं.”

“ऐक हं,” आयताच श्रोता मिळाल्यानं त्याला स्फुरण चढलं. चेहऱ्यावर अगदी काकुळतीचे भाव आणून त्यानं मला त्या ऐतिहासिक ओळी ऐकवल्या -
“मम हृदयीचे भाव कळावे
तव हृदयी मज स्थान मिळावे,
मम नयनांची पुष्पांजली ही
स्वीकारून तव मुख उजळावे…”

“च्यायला, शिखा ग्रेट आहे यार,” त्याची लिंक तोडून मी म्हणालो. त्याच्या कवितेला दाद द्यायचं सोडून मी शिखाचं कौतुक का करतोय ते त्याला कळेना.

“का रे, ती का ग्रेट?”

“नाही तर काय? अरे असलं काहीतरी वाचून ती मुलगी चक्क शांतपणे निघून गेली.”

“बघ ना, माझ्या कवितेची, माझ्या प्रतिभेची ही किंमत?” त्याचा इगो खूपच दुखावला गेला होता.

“अरे कसली डोंबलाची प्रतिभा? साधा कॉमन सेन्स नाही यार तुला.”

“का, काय झालं?” तो पुन्हा हिरमुसला.

“साल्या, एक तर इंग्लिश मिडियमच्या मुलीशी मैत्री करायची, तिला झेड ब्रीजवर घेऊन जायचं, ते पण तिच्याच गाडीवरून. आणि तिथं बसून तिला हे असलं काहीतरी वाचायला द्यायचं. ती पण खरंच ग्रेट आहे. मी असतो ना तिच्या जागी, तुला उचलून पुलावरून खाली फेकून दिलं असतं, निघून जाण्यापूर्वी.”

“हे अति होतंय बरं का,” माझं बोलणं त्याला फारच लागलं असावं. “काय लिहायला पाहिजे होतं मग मी?”

“अरे, जरा वाचणारं कोण आहे, वातावरण कसं आहे, याचा अंदाज घेऊन लिहावं. थोडं रोमँटीक, थोडं फिल्मी, अगदी हलकं फुलकं…”

“म्हणजे कसं?”

“म्हणजे असं काहीतरी -
दिल मेरा आवारा 
चाहे तेरे दिल का कमरा,
नैनों में फूलों का गजरा 
खिल उठेगा मुखडा तुम्हारा…”

“अरारारारा… काय रे, काय पण कविता. काय ते कल्पना-दारिद्रय!"

“वा रे वा! कल्पना-दारिद्रय काय? 'तव हृदयी स्थान मिळावे' म्हणजे रहायला 'कमरा' हवा असंच ना? आणि 'नयनांची पुष्पांजली’ म्हणजे कल्पनेची भरारी काय रे? 'नैनों में फूलों का गजरा' म्हणजे वेगळं काय म्हटलं मी? तुझ्या रबराच्या चपलेसारख्या शब्दबंबाळ कवितेपेक्षा माझी शायरी मख्खनसारखी नाही का उतरणार घशात?”

“अरेरेरेरेरे, कुठुन बुद्धी झाली आणि तुला सांगायला आलो? अरे, काय तुझी भाषा, काय तुझ्या उपमा? नैनों में गजरा काय, रबराची चप्पल काय, अरे कशाचा कशाला संबंध तरी लागतोय का?”

“करेक्ट! अगदी असंच वाटलं असणार शिखाला. मम हृदयीचे तव हृदयीचे, मुखात माशी कडमडली,” मी मुद्दाम त्याला डिवचलं.

“बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही हिंदीत लिहिता ना. मातृभाषेची खिल्ली उडवणारच तुम्ही.” तो पुन्हा हिंदी-मराठी वादावर घसरला.

“अरे, त्याचा काय संबंध इथं? मी मराठी वाईट आणि हिंदी भारी असं थोडंच म्हणतोय? फक्त आपण कुणासमोर, कुठं, काय बोलायचं याचं भान राखावं माणसानं.” मी माझा मुद्दा मांडला.

“असं कसं, असं कसं? एक तर सोयीस्कर बदल करून ठेवलेत हिंदी भाषेत. मला तर वाटतं, पूर्वी सगळेच मराठीत बोलत असणार; पण गाणी लिहायला बसले की शब्द जुळवत-जुळवत काहीतरी वेगळीच भाषा बनत गेली असेल. तुमच्यासारख्या सगळ्यांनी मिळून मग गाणी लिहायची वेगळी भाषाच मंजूर करून घेतली असेल तेव्हाच्या राजा-महाराजांकडून. कसली सोयीस्कर भाषा आहे - इकडून तिकडून चार शब्द गोळा करायचे - दिल, प्यार, नैना, सावन, असे काहीबाही - आणि झाली गाणी तयार. एकदम सुरात. यमक जुळणार, चाल बसणार. नाही तर आम्ही, बसलोय मराठीचं दळण घालून.” तो अगदी पोटतिडकीनं बोलत होता.

“सोयीस्कर भाषा कसं काय म्हणतोयस तू हिंदीला?” मी विचारलं.

“हे बघ, हिंदीमध्ये मराठीपेक्षा मुळाक्षरं कमी, जोडशब्द कमी, जिभेला त्रास कमी. मराठीत मात्र उच्चाराइतकी मुळाक्षरं, जड-जड जोडाक्षरं. कशी जुळवायची यमकं, कशी बसवायची चाल?”

“म्हणजे? हिंदीत अक्षरंच कमी आहेत असं तुला म्हणायचंय की काय?”

“होच मुळी! आता मला सांग, मराठीत जर आपण काळा-निळा म्हणू शकतो, तर हिंदीत बोलताना काला-निला का म्हणायचं? हे 'ळ' 'कुठे गायब झालं हिंदीतून?”

“आयला खरंच की! माझ्याही कधी डोक्यात आलं नाही. हिंदी बोलणाऱ्यांची जीभ वळत नसेल बहुतेक ‘ळ’ म्हणायला.”

“वा रे वा! त्यांच्या तोंडाचा आकार काय वेगळा असतोय का? आणि त्यांचं जाऊ दे, तुला तर ‘ळ’ म्हणता येतं ना?”

“मग काय, येतंच मुळी. हे बघ - श्रावणात घन निळा बरसला; घननीळा, लडीवाळा, झुलवू नको हिंदोळा…”

“बास, बास, कळालं तुझी जीभ किती वळवळते ते. आता मला सांग, तुला ‘ळ’ माहिती असूनही हिंदीमध्ये लिहिताना तू ‘ल’ का वापरतोस?”

“म्हणजे, तसं… तसंच असतं बुवा हिंदीत,” मला खरंच सुचलं नाही.

“तसंच म्हणजे कसं?” त्याला आता उत्साह आला होता. “तसंच म्हणजे कसं? मी सांगू? तसंच म्हणजे सोयीस्कर! म्हणजे आधी ओळी अशा सुचल्या असणार -
यशोमति मैंया से बोले नंदलाला,
राधा क्यों गोरी, मैं क्यों काळा?”

त्यानं या ओळी गाऊन दाखवल्यावर मला हसू आलं. "खरंच की, म्हणजे ‘हम काळे है तो क्या हुवा दिळवाळे हैं’ असं काहीतरी लिहायला लागलं असतं नाही का?”

“बरोब्बर!” त्याला आता हुरूप चढला होता. “तर मग, त्या काळच्या सर्व कवी, गीतकारांनी एकत्र येऊन ही अशी त्रास देणारी मुळाक्षरं शोधून काढली आणि त्या सगळ्यांना कवितेच्या, गाण्यांच्या देशातून हद्दपार करून टाकलं. ज्ञ, ळ, ण, अशी ती दुर्दैवी अक्षरं होती,” एखाद्या इतिहासकाराच्या आविर्भावात तो हे सगळं बोलत होता.

“हं, लहानपणी मलाही प्रश्न पडायचा - ते शाळेत शिकवतात ते ‘विज्ञान’ आणि टीव्हीवरच्या हिंदी बातम्यांमध्ये म्हणतात ते ‘विग्यान’ वेगळे आहेत की काय?”

“आता पुढं ऐक - मराठीत शब्द होता ‘डोळे’. इतका सुंदर अवयव, पण त्या ‘ळ’नं केला ना घोटाळा? आता यमक काय जुळवायचं कवितेत - सांग बरं…”

मी आपलं असंच काहीतरी बोललो -
“माझे डोळे, तुझे गोळे,
तोंडात बोळे, चोंबाळे!”

“अरेरेरेरे, चुकलो, चुकलो तुला विचारून,” तो परत वैतागला.

“अरे मी काय केलं? तूच सांगितलंस ना, डोळे यमकात बसवायला." मी.

“चूक झाली कविराज. आता ते डोळे यमकातून काढून परत खोबणीत बसवा. तर मी काय सांगत होतो - ‘डोळे’ यमकात बसत नाहीत म्हटल्यावर आले ‘नैना. आता ‘नैना’ची यमकं बघ - नैना, रैना, है ना, ना ना… कसं अगदी काव्यात्मक वाटतै ना?”

“होय रे, म्हणूनच ‘नैना’शिवाय गाणं लिहिलंच जैना!” मी तेवढ्यातल्या तेवढ्यात तारे तोडले.

“आता पुढचा शब्द बघ - रात्र! ओळी अशा लिहिल्या असणार -
‘जिंदगी भर नहीं भूलेगी वो पावसाळी रात्र…’
आता या ‘रात्री’ला यमक काय जुळवायचं - मात्र की पात्र?”

“हा हा हा… ते ‘पात्र’ भारी बसंल बरं का त्यात -
‘जिंदगी भर नहीं भूलेगी वो पावसाळी रात्र
कितना रडवेला है वो भारत भूषण का पात्र…’”

“गप रे, कशालाही काहीही जोडतोयस तू. तर, ते ‘रात्र’ त्रास देऊ लागल्यावर तिथं आलं ‘रात’. आता बघ जादू - रात, बात, मात, मुलाकात, जजबात… कसलं फिल्मी झालं ना एकदम?”

“हं, बरोबर!” मी मनातल्या मनात पुढची यमकं जुळवत म्हणालो.

“आणि हृदयावर तर काही बोलायलाच नको. त्याचं तर एकदम ‘दिल’ करून टाकलं आणि गाणी अशी टपा-टपा टपा-टपा पडायला लागली गारांसारखी. मी सांगतो, हा ‘हृदय’ शब्द कुठल्याच यमकात, कुठल्याच सुरात बसत नसल्यानं हजारो प्रतिभाशाली कवींची कारकीर्द अकाली खुंटून संपली असावी…”

“...तुझ्यासारखी!” मी उगाच चेहरा पाडून म्हणालो. त्यानं ते खरंच मनावर घेतलं. त्याचा चेहराही पडला.

“हो ना, किती कष्टानं, रात्री जागून कविता करायच्या. आणि भाषेच्या मर्यादेमुळं आमची प्रतिभा पाण्यात जायची.”

“हं,” मी त्याचं सांत्वन करत म्हणालो, “आता एखादी दुःखाची वेदना पोचवेल अशी कविता करून ऐकव शिखाला.”

“मी पण तोच विचार करतोय. पण आत्ता कविताच सुचत नाहीये. कालच संदीप सरांची एक कविता वाचली. तीच द्यावी म्हणतोय माझ्या सुंदर हस्ताक्षरात लिहून…”

मला परत तोच सीन आठवला. शिखाच्या गाडीवरून दोघं झेड ब्रीजवर जाणार; तो आपल्या खिशातून कवितेचा कागद काढून तिच्या हातात देणार; ती लाजत, हसून तो कागद घेणार; त्यावरच्या 'सुंदर' हस्ताक्षरातल्या काही अगम्य ओळी वाचणार; आणि मग…

“कुठली रे, कुठली कविता?” मी मुद्दाम विचारलं.

त्याला पुन्हा स्फुरण चढलं. जरा आठवल्यासारखं करून त्यानं कविता म्हणायला सुरुवात केली -
“हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळकन्”

मगाचच्या सीनमध्ये मी ह्या ओळी बसवून खो-खो हसत सुटलो. त्याचा चेहरा कावरा-बावरा झाला. हे ‘अती’ होतंय हे लक्षात आल्यानं मी हसू आवरलं. खिशातून डायरी-पेन काढलं. चार ओळी खरडल्या. कागद फाडून त्याच्या हातात दिला आणि सांगितलं, “हे तिला समजेल अशा भाषेत लिहिलंय. तुझ्या भावना पुरेपूर पोचतील असा प्रयत्न केलाय. मी निघतो आता. मी गेल्यावर वाच आणि काय झालं ते नक्की सांगायला ये…” बोलत बोलतच मी निघालो. अजून एक क्षणही हसू दाबून ठेवणं अशक्य होतं, म्हणून.

डायरीतल्या पानावर लिहून दिलेल्या ओळी होत्या -
“दिल फेका -
तूने पकड़ा,
तूने छोड़ा -
हुआ टुकडा.”


- मंदार शिंदे
(‘जत्रा’ जुलै-ऑक्टोबर २०१४)
९८२२४०१२४६



Share/Bookmark

Friday, August 11, 2023

Aa Tod De Deewar (Hindi Poem)

आ तोड़ दें दीवार अपने बीच जो आयी

चल बाँधते हैं राह दिलों को जोड़नेवाली

प्यार के पुलों से जोड़ेंगे दुनिया सारी

चल बाँधते हैं राह दिलों को जोड़नेवाली


मैं कौन, कौन है तू

मैं ना जानू, जाने ना तू

चल छोड दे यह भेद, ना बनना तू अविचारी

चल बाँधते हैं राह दिलों को जोड़नेवाली


यह हिंदू, वह मुस्लिम क्यूँ है

भेद है कैसा, मानव सारे

जाती या धर्मों से हमको मानवता प्यारी

चल बाँधते हैं राह दिलों को जोड़नेवाली


तूफान, हमको डरातें

दरिया में है उठती लहरें

चल लेकर इसमें नाव अपनी तैरनेवाली

चल बाँधते हैं राह दिलों को जोड़नेवाली


प्यार के पुलों से जोडेंगे दुनिया सारी

चल बाँधते हैं राह दिलों को जोड़नेवाली


(कवी वसंत माने यांच्या मराठी गीताचा हिंदी अनुवाद)


Share/Bookmark

Monday, July 3, 2023

एक 'भारी' अनुभव!



नुकताच केदार शिंदेचा 'महाराष्ट्र शाहीर' येऊन गेला. लगेच 'बाईपण भारी देवा' सिनेमाचा ट्रेलर बघायला मिळाला. बहुतेक हा सिनेमा आधी बनवून तयार असावा. नावावरून आधी वाटलं, बाई'पण' भारी असते असं काहीतरी म्हणायचंय की काय! पण ट्रेलर बघितल्यावर कळालं, 'बाईपण' भारी असतं असं म्हणायचंय. विषय थोडा 'क्लिशे' वाटला खरा; पण केदार शिंदे ‘क्लिशे’ विषय घेऊन ‘विषय खोल’ सिनेमा बनवू शकतो, हे माहिती असल्यानं सिनेमा बघणार हे ठरलंच होतं.

स्क्रिप्टवर मजबूत पकड, शार्प डायलॉग्ज, सुंदर फ्रेम्स, कलाकारांच्या ‘बाई’गर्दीत सुद्धा प्रत्येक पात्राला न्याय देणारं फूटेज, आणि पारंपारिक-आधुनिक संगीताचं बेमालूम मिश्रण, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे एक ‘भारी’ मराठी सिनेमा! रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, अशा दिग्गज आणि अनुभवी कलाकारांपासून, सुकन्या, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब, अशा वेगवेगळ्या वयोगटातल्या 'डॉन' बायकांना एकत्र आणायचं काम कौतुकास्पद आहेच; पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यापैकी कुठल्याही कलाकाराला भाव खायची संधी न देता, 'बाईपण भारी देवा' हा शेवटपर्यंत 'दिग्दर्शकाचा सिनेमा' राहतो आणि आपल्याला नेमकं कुणाचं काम आवडलं किंवा कुठला भाग आवडला, हे अजिबात ठरवताच येऊ नये, याची व्यवस्था केदारनं केलेली दिसते.

सिनेमाची स्टोरी किंवा खरंतर वेगवेगळ्या पात्रांच्या समांतर चालणाऱ्या स्टोऱ्यांचं कोलाज, या दृष्टीकोनातून विचार करण्याऐवजी, हा म्युझिकल प्रवास अनुभवणं मी कधीही प्रेफर करेन. परंपरा विरुद्ध मॉडर्न लाईफस्टाईल, एकत्र कुटुंब विरुद्ध विभक्त कुटुंब, करियर की घर, दुष्ट की सज्जन, चांगले की वाईट, असा कुठलाच सामना किंवा जय-पराजय या सिनेमामध्ये बघायला मिळणार नाही. बघणाऱ्यानं आपल्या आयुष्यातल्या पात्रांशी आणि प्रसंगांशी आणि परिस्थितीशी संबंध जोडायचा प्रयत्न केला तरी यातून कसलाही बोध, निर्णय, आदर्श मिळवता येणार नाही. जे घडतंय त्याची मजा घ्यायची, जे पटतंय ते बरोबर न्यायचं, पटत नसेल ते सोडून द्यायचं, असा हलका-फुलका सिनेमा आहे 'बाईपण भारी देवा!’ पु. ल. देशपांडेंच्या 'वाऱ्यावरची वरात'मध्ये सुरुवातीला सूत्रधार (म्हणजे खुद्द पु. ल.) म्हणे - "आजचा आमचा हा कार्यक्रम असाच आपला मजेचा आहे, हसून सोडून द्यायचा आहे. त्याच्यात उगीचच साहित्यिक मूल्य वगैरे पहायचं नाही हं! म्हणजे ते सापडणार नाहीच..." या ‘डिस्क्लेमर’नंतर 'वाऱ्यावरची वरात' बघितली, की त्यातल्या साहित्यिक मूल्यानं आणि जीवन दर्शनानं प्रेक्षकांचे डोळे दिपून जातात, पण ते त्यांच्या लक्षातसुद्धा येत नाही. केदार शिंदेचा हा सिनेमा असाच काहीसा अनुभव देतो, असं मला माझ्या अनुभवावरून नमूद करावंसं वाटतं.

सिनेमातल्या तांत्रिक गोष्टींवर इथं चर्चा करणार नाही, पण दोन प्रसंगांचा उल्लेख करायचा मोह टाळता येत नाहीये. झोया अख्तरच्या 'गली बॉय'मध्ये एका प्रसंगात रणवीर कारमध्ये बसलेला असतो आणि सभोवतालच्या रोषणाईचं प्रतिबिंब त्याच्या गाडीवर (त्याच्यावर नाही, त्याच्या गाडीवर) पडलेलं दिसतं. या सुंदर फ्रेमची आठवण करून देणारा एक उत्कृष्ट प्रसंग 'बाईपण भारी देवा' मध्ये बघायला मिळतो. कुठला ते प्रत्यक्ष स्क्रीनवर बघायला जावंच लागेल. दुसरा एक प्रसंग म्हणजे, 'टाईम मशीन’चं तंत्र वापरून भूतकाळ आणि वर्तमानकाळाची गुंफण करणारी एक सुरेख फ्रेम सिनेमाच्या शेवटच्या टप्पात बघायला मिळते. कथा, संवाद, संगीत, दृश्य प्रतिमा, रंगसंगती, या सगळ्या गोष्टींवर दिग्दर्शकाची हुकूमत एकाच वेळी दाखवणारे हे काही प्रसंग आहेत.

'बाईपण भारी देवा' या सिनेमाची स्टोरी म्हणजे एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. इथं फक्त सिनेमा बघून आलेला फील शेअर केला आहे. मोठ्या स्क्रीनवर हा फील घ्यायलाच लागतोय गड्यांनो... जा आणि भारी वाटून घ्या!

- मंदार शिंदे
०२/०७/२०२३
shindemandar@yahoo.com



Share/Bookmark

Friday, June 9, 2023

यदा कदाचित रिटर्न्स!

 


जवळपास बावीस वर्षांपूर्वी, म्हणजे १३ डिसेंबर २००१ या दिवशी, पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एक नाटक बघितलं. 'भीमाच्या गदेसारखी मजबूत कॉमेडी' अशी जाहिरात केली जात असलेलं संतोष पवारांचं 'यदा कदाचित'! प्रत्येक वाक्याला हसायला लावणारं आणि त्याच वेळी गंभीर विचार करायला लावणारं नाटक. स्टेजवर संतोष पवार आणि त्यांच्या टीमनं घातलेला धुमाकूळ न विसरता येण्यासारखा.

पुढं या नाटकाची सीडी हाती लागली. यूट्यूब आणि ओटीटीच्या जन्माआधीची गोष्ट. रेकॉर्डरवर ऑडीयो कॅसेटची ए आणि बी साईड आलटून-पालटून ऐकायची सवय होती. अशा वेळी नाटकाची सीडी मिळाल्यावर साहजिकच नाटकाची पारायणं सुरू झाली. त्यात दोन महत्त्वाची नाटकं म्हणजे, 'पती सगळे उचापती' आणि 'यदा कदाचित'. पुन्हा-पुन्हा बघून या नाटकांमधले डायलॉग पाठ झाले होते.

कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर कितीही वेळा हे नाटक बघितलं, तरी प्रत्यक्ष स्टेजवरचा धिंगाणा अनुभवणं वेगळीच गोष्ट. सध्याच्या काळातले जिवंत आणि ज्वलंत विषय रडत नाही, तर हसत-खेळत सोप्या पद्धतीनं लोकांसमोर मांडायचे, ही 'यदा कदाचित'ची खासियत. त्यासाठी ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रांपासून राजकीय आणि फिल्मी नेत्या- अभिनेत्यांपर्यंत कुणालाही स्टेजवर खेचून आणायला संतोष पवार कचरत नाहीत, घाबरत नाहीत. सोबत लावणी आणि गवळणीपासून बॉलिवूड डान्स आणि शारीरिक कसरतींचा तडका असतोच. म्हणजे एन्टरटेनमेन्टची फुल ग्यारंटी!

त्यामुळं 'यदा कदाचित रिटर्न्स'ची तयारी सुरू झाल्याचं कळाल्यापासून अपार उत्सुकता. मुंबई-ठाण्यापासून सुरुवात करत, शेवटी ८ जून २०२३ या दिवशी पुण्यातला शुभारंभाचा प्रयोग ठरल्याचं समजलं आणि बावीस वर्षांनंतर पुन्हा एकदा 'यदा कदाचित'ची जादू प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय भावना आणि अस्मिता घाऊक प्रमाणात दुखावल्या जाण्याच्या काळात, 'यदा कदाचित रिटर्न्स' क्वचित आडून आणि बहुतेकदा थेट भाष्य करतं. 'राजा नागडा आहे' आणि 'पोपट मेला आहे' हे सांगायला महान कलाकार आणि सेलिब्रिटी घाबरत असतील, तर त्यांनी 'यदा कदाचित रिटर्न्स' नक्की बघावं. त्यातून त्यांना प्रेरणा तरी मिळेल किंवा किमान सत्याची ओळख तरी पटेल.

नवीन संचातले कुठलेच कलाकार नवखे वाटत नाहीत आणि वीस सेकंदांच्या रील्सच्या जमान्यात दोन अंकी (मराठी) नाटकातली एनर्जी एकदाही ड्रॉप होत नाही, याबद्दल सर्व कलाकार आणि विशेषत: दिग्दर्शक कौतुकास पात्र आहेत. पात्रांची निवड आणि स्क्रिप्ट यावर चोख काम झालेलं आहे. कमरेखालचे विनोद करताना चावट आणि अश्लील यामधला बॅलन्स 'बऱ्यापैकी' साधला आहे. गाणी, संगीत, लाईट्स उत्तम आहेत.

'मराठी नाटक' म्हणजे लांबच लांब मोनोलॉग्ज, शब्दबंबाळ संवाद, मेलोड्रॅमाटीक स्क्रिप्ट, आणि 'विनोदी नाटक' म्हणजे अंगविक्षेप आणि चावटपणा, या दोन्ही संकल्पनांना छेद देणारा 'यदा कदाचित' हा एक यशस्वी प्रयोग आहे आणि तो आता 'रिटर्न' आला आहे. ही संधी सोडू नका!

०८/०६/२०२३

मंदार शिंदे (9822401246)



Share/Bookmark

Sunday, April 23, 2023

World Book Day

 


#WorldBookDay #जागतिकपुस्तकदिन वगैरे



Share/Bookmark

Thursday, April 20, 2023

Rains from Inside

 


बाहेर पडणारा पाऊस

खिडकीतून बघणारा मी

नकळत चिंब झालोय

तुझ्या आठवणींनी



Share/Bookmark

Sunday, April 16, 2023

Main Hoon Badal (Poetry)

 मैं हूँ बादल, मैं हूँ बादल

रंग है मेरा जैसे काजल

उडता फिरता आसमान में

धरती पर बरसाऊँ मैं जल

मैं हूँ बादल, मैं हूँ बादल


पेड और पौधे मुझको प्यारे

हरियाले और शीतल न्यारे

इनसे मिलने आऊँगा कल

मैं हूँ बादल, मैं हूँ बादल


मेरा काम है पानी देना

सूखे जग की प्यास बुझाना

नदियों का मैं भर दूँ आंचल

मैं हूँ बादल, मैं हूँ बादल


तुमने जब जब मुझको बुलाया

मैं भी दौडा दौडा आया

रुकने दो अब मुझको दो पल

मैं हूँ बादल, मैं हूँ बादल


- मंदार 9822401246



Share/Bookmark

Sunday, April 9, 2023

Planting Words...

 


पेडों की शाखों पे

पत्तों पे, फूलों पे

ढूँढ रहे हैं

तसवीर तुम्हारी

चेहरा तुम्हारा...



Share/Bookmark

Tuesday, April 4, 2023

MallPractice and The Show - Marathi Play

 अस्वस्थ झालो आहे
अशांत झालो आहे
सत्य विवस्त्र बघुनि
निशब्द झालो आहे

बेसावध त्या क्षणी
अचानक
डोळ्यांना जे दिसले
डोळे मिटल्यावर जे
येऊन
कानांवर आदळले
अनपेक्षित जरी
अनोळखी नव्हते
स्वीकारु की नको
अजुनि
द्विधेत पडलो आहे
अस्वस्थ झालो आहे
अशांत झालो आहे
सत्य विवस्त्र बघुनि
निशब्द झालो आहे

क्षणात हसरे
क्षणात रडवे
क्षणाक्षणाला
नाट्य हे घडते
नाटक म्हणुनि
सोडुनि देऊ
प्रयत्न करतो आहे
अस्वस्थ झालो आहे
अशांत झालो आहे
सत्य विवस्त्र बघुनि
निशब्द झालो आहे

कधी आरोपी
मीच बळी कधी
दोष कुणाचा
चूक कुणाची
शिक्षा द्यावी की
करुनि घ्यावी
मंथन करतो आहे
अस्वस्थ झालो आहे
अशांत झालो आहे
सत्य विवस्त्र बघुनि
निशब्द झालो आहे



ऋजुता सोमण, अतुल पेठे आणि प्रदीप वैद्य यांचा एक जादूचा प्रयोग सध्या सुरु आहे.
'मॉलप्रॅक्टीस ऍंड द शो' असं नाव आहे.

लाईट्स कमाल..
नृत्य कमाल..
संगीत कमाल..
कन्सेप्ट कमाल..
क मा ल !

आणखी काही सांगत नाही. सांगू शकत नाही.
ही जादू संपायच्या आधी बघा, एवढंच.
कदाचित जादू तशीच राहील,
पण ही जादूगार मंडळी गायब होतील.
मग परत येतील,
दुसरीच काहीतरी जादू घेऊन...
तोवर ही चुकवू नका.

'मॉलप्रॅक्टीस ऍंड द शो'
७ एप्रिल २०२३ पर्यंत(च)
द बॉक्स, कर्वे रोड, पुणे



Share/Bookmark

Monday, February 13, 2023

प्रोफाईल पिक


रंगीत रंगीत कपड्यांतलं

तुझं ताजं ताजं प्रोफाईल पिक

मी हळूच सेव्ह करुन ठेवतो

तुझ्या मोबाईल नंबरपुढं.


तुला दिसतात आकडे फक्त

फेसबुक प्रोफाईलवरच्या

लाईक आणि शेअरचे.


पण तुझ्या त्या रंगांनी खुललेलं

माझं ब्लॅक ऐन्ड व्हाईट फोनबुक

मी तुला कधीच नाही दाखवत.


भीती वाटते...

भीती वाटते चुकून कधी जर

लागलं फोनबुकला बोट तुझं,

तर उडून जातील रंग सारे

फुलपाखराच्या पंखांवरच्या रंगांसारखे.


आणि मागे उरेल फक्त

एक ब्लॅक ऐन्ड व्हाईट फोनबुक,

जिथं नसेल...


रंगीत रंगीत कपड्यांतलं

तुझं ताजं ताजं प्रोफाईल पिक

मी हळूच सेव्ह करुन ठेवलेलं

तुझ्या मोबाईल नंबरपुढं...


-  अक्षर्मन



Share/Bookmark

Friday, January 27, 2023

उत्खनन



खोदायला चालू केलं की,
उघडे पडायला लागतात
जमिनीचे थर.
पृष्ठभाग म्हणजे सरफेस,
मग मधला थर -
असंख्य गोष्टींनी भरलेला.
त्याखाली झिजलेला खडक -
तुकड्या-तुकड्यांमध्ये विखुरलेला.
मग मूळ खडक -
अभेद्य राहिलेला
अजून तरी.
या सगळ्यामध्ये झिरपणारं
नितळ स्वच्छ पाणी.
जितकं खोल जावं
तितकी विविधता
एकाच जमिनीत.

हे असंच काहीतरी
माणसाचं सुद्धा असतं,
नाही का?

खोदायला चालू केलं की,
उघडे पडायला लागतात
मनाचे थर.
सगळ्यांना दिसणारा चेहरा
म्हणजे सरफेस.
मग मधला थर -
इच्छा आकांक्षा भावनांनी भरलेला.
त्याखाली झिजलेला खडक -
अनुभव आणि आठवणींचा पसारा.
मग मूळ खडक -
भाव-भावनांच्या पलिकडचा,
अभेद्य राहिलेला
अजून तरी.
या सगळ्यामध्ये झिरपणारी
येणारी-जाणारी माणसं
बनणारी तुटणारी नाती.
जितकं खोल जावं
तितकी विविधता
एकाच माणसात.

काहीतरी विशिष्ट उद्देश
असल्याशिवाय करू नये
उत्खनन -
जमिनीचं आणि
माणसांचं सुद्धा.
नको असलेलंच काहीतरी
येईल उफाळून बाहेर,
आणि मग आवरता येणार नाही
दाबलेल्या भावनांचा,
आठवणींचा आवेग.

एवढं कळत असूनसुद्धा
उकरतच असतो आपण
मनावर साठलेली माती.
आणि नाराजसुद्धा होतो
जेव्हा लक्षात येते
आयुष्याची झालेली माती.


    नाटकातल्या पात्रांचं ‘उत्खनन’ सुरु असताना प्रेक्षकांच्या मनाचे पापुद्रे सुटू लागतात, ही ताकद प्रदीप वैद्यांच्या लिखाणाची की नरेश आणि कौमुदी या कलाकारांच्या सादरीकरणाची, हे ठरवणं या नाटकाच्या बाबतीत जरा अवघडच आहे. ‘उत्खनन’ या नाटकाचा विषय जितका गूढ आणि खोल आहे, तितकंच त्याचं व्हिज्युअल प्रेझेंटेशन प्रभावी आणि ठोस आहे. नाटकाचा सेट मल्टी-लेव्हल असल्यामुळं खोली आणि उंची दाखवणं (आणि समजणं) सोपं झालंय. लाईट्सचा आणि अंधाराचा योग्य वापर, विशेषतः खिडकीतून येणाऱ्या मर्यादीत उजेडाचा इफेक्ट एखाद्या जुन्या इंग्रजी सिनेमातल्या सीनची आठवण करून देतो. नरेशच्या आवाजात मोनोलॉग ऐकणं तर खास आहेच, पण कौमुदीचं व्हॉइस मोड्युलेशन आणि सेटवरचा सहज वावर खूपच इम्प्रेसिव्ह. याशिवाय, दिवस-रात्र आणि ऋतुबदलासाठी वापरलेले सेटवरचे काही सरप्राइज एलिमेंट्स प्रत्यक्ष बघूनच अनुभवले पाहिजेत. एकदा बघितल्यावर स्टोरी कळाली, या प्रकारातलं हे नाटक नाही. यातल्या प्रसंगांचे साक्षीदार होण्यासाठी पुन्हा-पुन्हा बघावंसं वाटेल असं हे नाटक आहे. पुढचा प्रयोग अजिबात चुकवू नका. न जाणो, नाटकातलं उत्खनन सुरु असताना तुमच्या मनावरची पण एखादी खपली निघू शकेल.

मंदार शिंदे
9822401246
27/01/2023




Share/Bookmark

Thursday, January 26, 2023

Pathaan




बॉलीवूड ही एक नशा आहे
आपलं दुःख, आपल्या अडचणी
आपली भांडणं, नकोशा आठवणी
सगळं विसरून, आपल्याला खेचून
घेऊन जातात एका वेगळ्या दुनियेत
स्वप्नांच्या, दोस्तीच्या, प्रेमाच्या दुनियेत
जिथं शत्रूसुद्धा बनतात मित्र
आणि आनंद भरून उरतो सर्वत्र
पडद्यावरच्या खोट्या दुनियेत
हरवून जातो माणूस प्रत्येक
हसतो, रडतो, नाचतोसुद्धा
जगतो ते क्षण पुन्हा पुन्हा
या दुनियेची किंमत काय
मोजणार किती, फेडणार काय
सिनेमा आणतो आपल्यासाठी
नाच, गाणी, गप्पा, गोष्टी
मोकळं मन आणि बाहू पसरून
आपण घेऊ त्याला रिचवून
अंगाअंगात भिनेल पुन्हा
बॉलीवूडची ही सॉलीड नशा

आज हे सुचायचं कारण म्हणजे
खूप वर्षांनंतर बघायला मिळालेली
थेटरमधली गर्दी,
शिट्ट्या, टाळ्या, नाच
थँक्स टू 'पठान'!

बॉलीवूड नीडेड अ पुश
वी मिस्ड यू, शाह रुख!



Share/Bookmark

Thursday, January 12, 2023

Parting With Words

How important is it
To talk about death
Is it necessary at all
Can't we just live
And then leave
Silently, when it is time
It is a personal choice
Of course
Whether you decide
Parting in silence
Or parting with words

'Parting With Words… न होना केवल शब्दों में' is a beautiful performance where poetry meets death. And death is not always a depressing thought. It is unavoidable, no doubt. The only thing you can surely predict about your own future. But this is an attempt to arrest the feelings in words and serve them in a bearable, rather pleasurable format to an audience young and old. Yes, the concept is gold and the presenters are gems. Rupali, Aanand and Ashwini have brought to us a mix of English and Hindi poems talking about parting, about losing, about missing, about the end, about death. It's all about losing someone close to you, losing something you've loved and treasured, losing your self, too. It's also about hoping for a new beginning and it's about knowing that there's not another beginning. Basically, it's about being free - breaking free. Or whatever way you take it. Thank you, Annand, Rupali, Ashwini and The Box team, for this wonderful experience. It is perhaps for the first time that I have heard about death and parting for an hour or so and I want to hear that again, from you. Looking forward to experiencing parting with beautiful words again!

Mandar Shinde
9822401246
12/01/2023





Share/Bookmark

Sunday, January 8, 2023

Blind Trust and Mad Love - Marathi Couplet


विश्वास आंधळा अन्‌ ती प्रीत वेडी होती

तुटल्यावरी कळाले रेशीम बेडी होती


- मंदार


#poetry #marathi #sher #love #handwriting

 



Share/Bookmark