ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, April 22, 2020

Cooperation is the key!

There is certainly no sense of love among the middle class and the general public about corporate and industry. But we have all come to the conclusion that there's no other choice if we wish to become a global superpower or don't want to miss the bus to prosperity.

There's an alternative to corporate industry, for sure. The co-operative movement. Cooperation has been the foundation of prosperity in Western Maharashtra. Co-operative societies can be set up and run in huge profits in all sectors like sugar industry, cotton mills, agricultural products and processes, education, banking, and so on. This isn't just a dream; it's our collective experience!

Industrialization promotes structure of one master and many servants / workers, which is a model complementary to capitalism. In co-operative societies, ownership of resources, profit, loss, liability, and risk is shared among the members.

It is not good for the industry if profit or resources are distributed among a lot of people (members). Because on the one hand, all the profits are less likely to return to the industry. Secondly, the more people are allowed to participate in decision making, the more time it takes, the more confusion it grows.

But the benefits of cooperation are far greater than the losses. As one compares the advantages and disadvantages of a dictatorship versus a democracy, one quickly comments as, "Our people need a dictator to set things right (pun intended)!" Nevertheless, listening to examples of dictatorships in history does not leave us unfrightened.

That's why cooperation seems to be the only cohesive, convincing, and profitable product/service model for us. A case study of the successful and unsuccessful organizations of the past can certainly be helpful in improving on this model according to today's technology and market demand. But if we leave the alchemy of co-op and choose to go for the white elephant of the corporate, would there be anything more unfortunate for us?

Remember, we cannot achieve prosperity without cooperation among the community!

- Mandar Shinde
9822401246


Share/Bookmark

Tuesday, April 21, 2020

Cooperation is the key! (Marathi)

कॉर्पोरेट कारखानदारीबद्दल मध्यमवर्ग आणि सर्वसामान्य लोकांमधे प्रेमाची भावना नक्कीच नाही. पण जागतिक महासत्ता बनण्यासाठी किंवा प्रगतीच्या स्पर्धेत मागं पडू नये यासाठी आपल्याकडं दुसरा कुठला पर्यायच नाही, अशी आपण सगळ्यांनी समजूत करून घेतलेली आहे.

कॉर्पोरेट कारखानदारीला पर्याय आहे - सहकार चळवळ. पश्चिम महाराष्ट्राच्या सुबत्तेचा पाया सहकारच आहे. साखर उद्योग, सूत गिरणी, कृषी उत्पादने व प्रक्रिया, शिक्षण, बँकींग, अशा सगळ्या क्षेत्रांमधे सहकारी संस्था उभ्या करता येतात आणि प्रचंड फायद्यात चालवता येतात, हे स्वप्न नसून अनुभव आहे!

औद्यिगिकीकरणामधे एक मालक आणि अनेक नोकर/कामगार ही भांडवलशाहीला पूरक रचना असते. सहकारी संस्थांमधे संसाधनांची मालकी, नफा, तोटा, जबाबदारी, जोखीम या सगळ्याची सभासदांमधे वाटणी होते.

खूप लोकांमधे (सभासदांमधे) प्रॉफीट किंवा रिसोर्सेस वाटले जाणं इंडस्ट्रीसाठी चांगलं नसतं. कारण एक तर, सगळं प्रॉफीट पुन्हा इंडस्ट्रीत यायची शक्यता कमी होते. दुसरं म्हणजे, निर्णय घ्यायला जितकी डोकी जास्त लावली जातील, तितके जास्त फाटे फुटत जातात, वेळ लागतो, गोंधळ वाढतो.

पण तोट्यांच्या तुलनेत सहकाराचे फायदे नक्कीच कितीतरी जास्त आहेत. जसं लोकशाही विरुद्ध एकाधिकारशाही यांच्या फायदे आणि तोट्यांची तुलना करताना कुणीही पटकन म्हणून जातो, "आपल्या लोकांना वठणीवर आणायला हुकूम-शहाच पाहिजे (पन इन्टेन्डेड)!" असं असलं तरी, इतिहासातली हुकुमशाहीची उदाहरणं ऐकूनच आपल्या अंगावर काटे आल्याशिवाय रहात नाहीत.

त्यामुळं आपल्याला मानवणारी, पटणारी, आणि फायदेशीर उत्पादन/सेवा पद्धत सहकाराचीच आहे. भूतकाळातल्या यशस्वी-अयशस्वी संस्थांचा केस स्टडी करुन आजच्या तंत्रज्ञानानुसार आणि मार्केट डिमांडनुसार या मॉडेलमधे सुधारणा नक्कीच करता येतील. पण सहकाराचा परीस सोडून कॉर्पोरेटचा पांढरा हत्ती दारात बांधायला गेलो तर आपल्यासारखे करंटे आपणच ठरु!

"विना सहकार नही उद्धार"

- मंदार शिंदे
९८२२४०१२४६


Share/Bookmark

Friday, April 10, 2020

Formatting the life... (Marathi Poem)

मान्य आहे..
मान्य आहे तुम्हीही लिहिली असेल
एखादी फेसबुक पोस्ट
या लॉकडाऊनमध्ये..
काढलं असेल एखादं चित्र
आणि केलं असेल अपडेट स्टेटस..
लाटल्या असतील चपात्या,
उकळला असेल चहा,
किंवा बनवली असेल एखादी
स्पेशल डिश - केक, पिझ्झा, फ्रूट सॅलड वगैरे..
सांगितल्या असतील मुलांना गोष्टी
फेसबुक लाईव्ह, झूम, युट्युब चॅनेल वगैरे..
भांडीसुद्धा घासली असतील आणि
फरशी पुसली असेल लख्ख..
मजा म्हणून, गंमत म्हणून,
क्वचित अभिमानानं,
काढले असतील या सगळ्याचे
फोटो, व्हिडीओ आणि काय काय..
पोस्टसुद्धा केले असतील आणि
मिळवले असतील लाईक्स, शेअर वगैरे..
हरकत नाही..
हरकत नाही, ही वेळच आहे अशी
निराशा, दुःख, भीतीनं भरलेली..
अशावेळी आधार लागतोच,
शाबासकीचा, कौतुकाचा, स्तुतीचा..
पण उद्या जेव्हा परिस्थिती बदलेल,
लॉकडाऊन संपेल, जग पुन्हा धावू लागेल,
तुमची स्वप्नं, तुमच्या आकांक्षा,
तुम्हाला खेचून नेतील तुमच्या घरांमधून..
आणि गळून पडतील तुमच्या हातातले
पेन, ब्रश, पुस्तक, भांडी, झाडू वगैरे..
तेव्हा विसरु नका या गोष्टी,
ज्यांनी तुम्हाला आनंद दिला
निराशेच्या काळात, भीतीच्या अंधारात..
आणि परत कधीच
अडवू नका, चिडवू नका, तुडवू नका, त्यांना -
जे नेहमीच करत आलेत या गोष्टी
तुमच्या आनंदासाठी, तुमच्या मदतीसाठी..
लेखक, चित्रकार, गायक, शेफ वगैरे..
तासन्‌तास उभे राहून
गॅससमोर, बेसिनसमोर, आणि
कोऱ्या कागदांसमोर..
ज्यांनी नेहमीच बनवलं काहीतरी
पूर्वी कधीच अस्तित्वात नसलेलं, आणि
केलं सादर तुमच्यासमोर..
जे तुम्ही वाचलं, ऐकलं, चाखलं, आणि
फेकलंसुद्धा कधी-कधी, कारण
कदाचित तुम्हाला कल्पनाच नव्हती -
प्रत्येकाला आधार लागतोच
शाबासकीचा, कौतुकाचा, स्तुतीचा..
त्यात काय एवढं, म्हणू नका
भिकेचे डोहाळे, म्हणू नका
छंद, टाईमपास, म्हणू नका
प्रत्येकाची किंमत पैशात करु नका..
आजची वेळ लक्षात ठेवा
तुम्हाला पडलेले कष्ट लक्षात ठेवा.
चला, आता फेसबुकवर एखादी पोस्ट लिहा,
कालचं अपूर्ण चित्र पूर्ण करा,
चहा उकळला असेल तर गॅस बंद करा..
व्हायरसनं पोखरलेलं आयुष्य
मुळापासून फॉरमॅट करा..
मुळापासून फॉरमॅट करा...

- अक्षर्मन
(मंदार शिंदे)
१०/०४/२०२०


Share/Bookmark