ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, March 31, 2020

Ghost Story for Children

स्मशानातला चाकू
(लेखकः मंदार शिंदे  9822401246)

टिपू, दिपू, आणि गोपू तिघं मित्र होते. दिवसभर काम करुन संध्याकाळी एकत्र भेटत होते. रोज भेटण्यासाठी त्यांचा अड्डा ठरला होता. बस स्टँडच्या जवळ एक फेव्हरिट वडापावचा गाडा होता. गरम-गरम वडापाव खायला तिघांनाही आवडायचं. तोंडी लावायला मिरचीसारखं गप्पांचं पुराण चालायचं. कुठल्याही गोष्टीला तिखट-मीठ लावायची तिघांनाही सवय होती. चविष्ट गप्पा मारण्यात रोजची संध्याकाळ सरत होती.

एकदा टिपूनं बोलता-बोलता वेगळाच विषय काढला. म्हणाला, “माझ्या काकांनी सांगितलेली एक गोष्ट सांगू का तुम्हाला?”

 “सांग की, काकांची सांग, मामांची सांग, मग बाबांची सांग, दादांची सुद्धा सांग…” दिपू त्याला चिडवत म्हणाला.

“ऑणि हो, नॉनाँची ऑणि टॉटाँची रॉहिलीच की… त्योंची पॉण साँगून टॉक,” तोंडात गरम-गरम वडापाव कोंबत गोपू म्हणाला.

“राहू दे, तुम्हाला माझी चेष्टा केल्याशिवाय करमतच नाही ना?” टिपू रागानं बोलला.

“अरे नाही… तसं नाही… तू चिडू नकोस. गोष्ट सांग. आम्ही नाही चेष्टा करणार. काय रे गोप्या?” दिपूनं गोपूकडं बघत डोळे मोठ्ठे केले.

“हॉ हॉ, साँग साँग… गॉष्ट साँग…” गोपूचा तोबरा भरलेलाच होता.

“अरे, माझे काका सांगत होते…” टिपूनं गोष्ट सांगायला सुरुवात केली, “त्यांचा एक मित्र अचानक वारला. कशामुळं सांग?”

“चार्जिंग संपलं असेल त्याचं,” तोंडातला वडापावचा घास संपवून गोपू बोलला. दिपूच्या तोंडातला वडापाव मात्र फुर्रकन्‌ बाहेर उडाला.

“दिप्या, ह्या गोप्याला सांगून ठेव. आपण असली चेष्टा खपवून घेणार नाय,” टिपूचा पारा पुन्हा चढला.

“ए गोप्या, गप बस की रे. ओ दादा, अजून एक वडापाव कोंबा ह्याच्या तोंडात, म्हणजे थोडा वेळ शांत बसेल. तू सांग रे गोष्ट, टिपू…” दिपूनं सगळी व्यवस्था लावली आणि हातातल्या वडापावचा लचका तोडला.

“तर काका सांगत होते की, त्यांचा एक मित्र अचानक वारला. बरोब्बर एक महिन्यापूर्वी. आणि वारल्यावर त्याला स्मशानातसुद्धा न्यायची गरज नाही पडली. का बरं, सांग बघू?”

“का रे, तूच सांग,” गोपू काहीतरी बोलायाच्या आत दिपू पटकन बोलला. गोपूला तसाही नवीन वडापाव मिळाला होता, त्यामुळं त्याचा टिपूच्या गोष्टीतला इंटरेस्ट आपोआप कमी झाला होता.

“अरे, माणूस कुठं मरतो? घरी किंवा हॉस्पिटलमध्ये. आणि मग त्याला घेऊन जातात स्मशानामध्ये. पण काकांचा मित्र मेला चक्क स्मशानामध्ये!! मग त्याला स्मशानात कसं घेऊन जाणार?” टिपू उत्साहानं सांगू लागला.

“पण काय रे…” गोपूनं वडापाव खाण्याच्या मधल्या वेळेत प्रश्न विचारला, “तुझ्या काकांचा हा मित्र स्मशानात गेला होता कशाला?”

“मरायला!! तुला काय करायच्यात रे नसत्या चौकशा? तू वडापाव खा गपचूप!” दिपू त्याच्यावर खेकसला आणि टिपूकडं वळत म्हणाला, “तू मर… सॉरी, सॉरी… तू गोष्ट सांग.”

“हां, तर मागच्या महिन्यात काकांचा मित्र काहीतरी कामासाठी गावाला गेला होता. रात्री तिकडून निघायला झाला उशीर. बिचारा एकटाच त्याच्या गाडीवरुन येत होता. तरी बरं, पौर्णिमेची रात्र होती. चंद्राच्या उजेडात रस्ता स्पष्ट दिसत होता.”

“चंद्राच्या उजेडात का बरं? गाडीचे लाईट बंद होते काय?” गोपूचा वडापाव संपला होता बहुतेक. टिपू आणि दिपूनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं.

“तर चंद्रप्रकाशात गाडी चालवत तो येत होता. मध्यरात्रीची वेळ होती. नदीवरचा पूल ओलांडून स्मशानाजवळ आला, तसा त्याच्या कानांवर कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. ‘वाचवा, वाचवा’ असा…”

“मग?” दिपू आता टिपूच्या गोष्टीत पुरता घुसला होता. गोपूनं दोघांकडं एक तुच्छ कटाक्ष टाकत तिसरा वडापाव खायला घेतला.

“मग काय, गाडी तशीच वळवून तो निघाला आवाजाच्या दिशेनं. आवाज कुठून येतोय, ते शोधण्याच्या नादात लक्षातच नाही आलं की आपण स्मशानात येऊन पोहोचलोय!”

“बापरे! मग?” दिपूनं आवंढा गिळत विचारलं.

“आजूबाजूला अर्धवट जळालेल्या चिता आणि राख बघून तो घाबरला. परत जाण्यासाठी गाडी वळवायचा त्यानं प्रयत्न केला, पण गाडीचं हॅन्डलच वळेना. गाडी सरळ-सरळ पुढंच जात राहिली. विशेष म्हणजे, त्यानं किल्ली फिरवून गाडी बंद केली. तरीपण गाडी पुढं जातच राहिली, जातच राहिली…”

“उतारावर असेल गाडी, त्यात काय एवढं?” गोपूनं खांदे उडवले. त्याच्याकडं लक्ष न देता टिपू पुढं सांगू लागला.

“गाडी वळेना, बंद होईना, ब्रेकसुद्धा लागेना. घाबरुन तो जोरजोरात ओरडू लागला. पण एवढ्या मध्यरात्री त्याचा आरडा-ओरडा ऐकायला तिथं कोण असणार?”

“म… म… मग काय झालं?” घाबरत-घाबरत दिपूनं विचारलं.

“मग काय? त्याची गाडी जोरात जाऊन धडकली एका मोठ्ठ्या झाडावर. आणि जागच्या जागीच मेला बिचारा. आता कुणी म्हणतं धडकल्यामुळं मेला, कुणी म्हणतं घाबरल्यामुळं मेला. पण स्मशानातच मेला एवढं खरं!” टिपूनं आपली गोष्ट संपवली आणि गार झालेल्या वडापावचा एक घास घेतला.

“बाप रे! कसलं भयानक आणि विचित्र मरण आलं बिचाऱ्याला…” कपाळावर जमा झालेला घाम पुसत दिपू म्हणाला.

“काही नाही रे, दारु पिऊन गाडी चालवत असणार नक्कीच. मी सांगतो. हॅन्डल वळलंच नाही, ब्रेक लागलाच नाही, किल्ली फिरवूनसुद्धा गाडी बंदच झाली नाही. ऐकून घेतोय म्हणून काहीपण सांगायचं का?” गोपू वैतागून म्हणाला.

“हे बघ, माझ्या काकांनी सांगितलेली गोष्ट आहे. मी जशीच्या तशी तुम्हाला सांगितली, अज्जिबात तिखट-मीठ न लावता…” वडापाव खाता-खाता टिपू बोलला.

“हो का? तिखट-मीठ न लावता?” टिपूच्या हातातल्या वडापावकडं बघत गोपू म्हणाला, “मग मला एक सांग, तुझ्या काकांचा हा मित्र रात्री मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच लोकांना सापडला असेल ना?”

“हो, बरोबर आहे,” टिपू पटकन म्हणाला.

“बरोबर आहे ना? मग त्याला स्मशानातून आवाज ऐकू आला, त्याच्या गाडीचं हॅन्डल वळत नव्हतं, ब्रेक लागत नव्हता, किल्ली फिरवूनसुद्धा गाडी बंद झालीच नाही… हे सगळं त्यानं तुझ्या काकांना कधी सांगितलं? रात्री स्वप्नात येऊन का स्वर्गात पोहोचल्यावर पत्र पाठवून? काहीतरी थापा मारायच्या उगाच…”

“तुला अजिबात नाही ना पटत?” टिपूनं विचारलं.

“अज्जिबात नाही,” गोपू ठामपणे म्हणाला.

“भूत-बित काहीच नसतं असं तुला वाटतं ना? स्मशानात घाबरायचं काहीच कारण नसतं असं तुला वाटतं ना?” दिपूनं विचारलं.

“होय, असंच वाटतं. मी नाही घाबरत स्मशानात जायला.” गोपू म्हणाला.

“ठीकाय तर मग,” दिपू आणि गोपूकडं आळीपाळीनं बघत टिपू म्हणाला, “आज पौर्णिमा आहे. आज रात्री तू स्मशानात जाऊन दाखवायचं… एकट्यानं!!”

“चालेल. त्यात काय एवढं?” गोपू खांदे उडवत बोलला. “पण तुम्हाला पण यावं लागेल ना माझ्याबरोबर… मी खरंच गेलो की नाही ते बघायला? नाही तर, उद्या म्हणाल की मी खोटं-खोटं सांगतोय, स्मशानात जाऊन आल्याचं…”

“म… म… मी नाही येणार स्मशानात. त… त… तू जा रे टिपू ह्याच्याबरोबर. माझा तुम्हा दोघांवर पूर्ण विश्वास आहे,” दिपू बोलला.

“आपण जायची काहीच गरज नाही,” इकडं-तिकडं बघत टिपू काहीतरी विचार करु लागला. मग अचानक उठून तरातरा वडापावच्या गाडीकडं चालत गेला.

“बोलून-बोलून भूक लागली असेल बहुतेक,” त्याच्याकडं बघत गोपू बोलला. तेवढ्यात टिपू त्यांच्याकडं परत आला. येताना त्याच्या हातात कांदा कापायची सुरी होती.

“हे काय रे? ही सुरी कशाला आणली?” दिपूनं विचारलं.

“आता नीट ऐक, गोप्या. आज रात्री तू एकट्यानंच स्मशानात जायचं. सगळ्यात शेवटी नदीच्या काठावर जे मोठ्ठं झाड असेल त्याच्यावर ही सुरी खुपसून परत यायचं. उद्या सकाळी आम्ही दोघं जाऊन खात्री करुन येऊ की तू खरंच स्मशानात गेला होतास की नाही.”

“वा वा, क्या बात है! काय आयडीया काढलीस, टिपू. शाब्बास!!” दिपू आनंदानं टाळ्या वाजवत म्हणाला. त्याला आता गोपूबरोबर रात्री स्मशानात जायला लागणार नव्हतं ना.

“ठीक आहे. ठरलं!” असं म्हणत गोपूनं हात पुढं केला. टीपूनं एखादी तलवार द्यावी तशी दोन्ही हातांनी ती सुरी त्याला बहाल केली. आणखी एक-एक वडापाव खाऊन तिघं आपापल्या घराच्या दिशेनं निघून गेले.

ठरल्याप्रमाणं, मध्यरात्री गोपूनं गाडी काढली आणि निघाला स्मशानाच्या दिशेनं. थंडीचे दिवस होते. त्यानं अंगात घातलेल्या जॅकेटमधूनसुद्धा त्याला गार वारं लागत होतं. गाडी चालवताना त्यानं जॅकेटची चेन गळ्यापर्यंत ओढून घेतली.

पुलाच्या अलीकडंच त्यानं स्मशानाच्या कमानीतून गाडी आत घातली. संध्याकाळी मित्रांसमोर कितीही बढाया मारल्या तरी आत्ता मध्यरात्री स्मशानात गाडी चालवताना त्याला थोडी-थोडी भीती वाटू लागली. आजूबाजूला अर्धवट जळालेल्या चितांमधून धूर येत होता. लाकडं आणि राख चुकवत-चुकवत तो नदीच्या दिशेनं चालला होता. काठावरच्या मोठ्या झाडापाशी येऊन त्यानं गाडी बंद केली.

गाडीचा आवाज बंद होताच त्याला आजूबाजूचे आवाज स्पष्ट ऐकायला येऊ लागले. नदीच्या पाण्याची खळखळ, रातकिड्यांची करकर आणि झाडांवरच्या पानांची सळसळ त्याला भीतीदायक वाटू लागली. काम झाल्यावर लगेच निघता यावं म्हणून त्यानं गाडी वळवून परत जायच्या दिशेला तोंड करुन लावली. आता हॅन्डल न वळता अडकून बसलं तरी चालेल, आपली गाडी स्मशानाच्या बाहेरच जाईल, याची खात्री करुन त्यानं जॅकेटची चेन उघडली. जॅकेटच्या आतल्या बाजूला टिपूनं दिलेली सुरी त्यानं खोचून ठेवली होती. थरथरत्या हातात सुरी पकडून तो झाडाजवळ गेला.

आजूबाजूला कुणी आहे का, याचा कानोसा घेत गोपूनं सुरी उगारली आणि झाडाकडं न बघताच खस्सकन्‌ सुरी बुंध्यात खुपसली. सुरीवरची मूठ सोडून तो एक-दोन क्षण तिथंच उभा राहिला. त्याला वेगळं काहीच जाणवलं नाही. पाण्याची खळखळ, किड्यांची करकर, आणि पानांची सळसळ तशीच सुरु होती.

आता त्याचा धीर वाढला. ठरल्याप्रमाणं काम फत्ते झालं होतं. आता सकाळी टिपू आणि दिपू सुरी बघायला येतील. आपण आपलं मस्तपैकी घरी जाऊन ताणून देऊ. असा विचार करत तो गाडीच्या दिशेनं निघाला, तेवढ्यात…

मागून त्याचं जॅकेट कुणीतरी ओढतंय असं त्याला वाटलं. गोपूचा श्वास मधेच अडकला. मागं वळून बघायचंसुद्धा त्याचं धाडस झालं नाही. तो जोर लावून पुढं सरकू लागला.

त्यानं पुढं जायला जोर लावला की मागून तेवढ्याच जोरात कुणीतरी त्याला खेचत होतं. त्याचे पाय जागेवरच घसरु लागले. त्याच्याच पायांचा फरफर… फरफर… असा भीतीदायक आवाज येऊ लागला. त्याच्या जॅकेटवरची पकड एवढी घट्ट होती की, त्याला एक पाऊलसुद्धा पुढं टाकणं शक्य होत नव्हतं.

गोपूला दरदरुन घाम फुटला. खळखळ… करकर… सळसळ… फरफर… असे सगळे आवाज त्याच्या कानांमध्ये घुमू लागले. अंगातला सगळा जोर एकवटून त्यानं एक जोरदार किंकाळी फोडली आणि जागेवरच बेशुद्ध झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी गोपूला जाग आली. टिपू आणि दिपू त्याच्या समोर उभे होते. नदीच्या पाण्याची खळखळ आणि झाडावरच्या पानांची सळसळ सुरुच होती. फक्त रातकिड्यांची करकर आणि त्याच्या पायांची फरफर थांबली होती.

“टिपू… दिपू… तुम्ही…. मी… मी… म्हणजे मी अजून जिवंत आहे? त्या… त्या… भुतानं मला मारलं नाही? मी… मी जिवंत आहे?” गोपू आनंदानं ओरडू लागला.

टिपू आणि दिपू पोट धरुन खो-खो हसत होते.

“भूत…? कसलं भूत…? कुठं आहे भूत…?” दोघांनी विचारलं.

“त्या… त्या झाडावर भ… भ… भूत आहे. त्यानं माझं जॅकेट धरुन ठेवलं रात्री…” गोपू अजून घाबरलेलाच दिसत होता.

“तुझं जॅकेट धरुन ठेवलं…? भुतानं…? हॅ हॅ हॅ” गोपूकडं आणि त्या झाडाकडं आळीपाळीनं बघत दोघं हसत होते.

ते का हसतायत हे गोपूला कळेना. त्यानं धीर करुन मान हळूहळू वळवली आणि आपलं जॅकेट धरुन ठेवणाऱ्या झाडाकडं बघितलं. पण तिथं त्याला भूत-बित काहीच दिसलं नाही. त्याला दिसला - झाडाला चिकटलेला त्याच्या जॅकेटचा कोपरा आणि… जॅकेटच्या कोपऱ्यात त्यानंच रात्री खस्सकन्‌ खुपसून ठेवलेली कांदा कापायची सुरी !!

=== 0 ===


Share/Bookmark

Sunday, March 22, 2020

Samantar Web Series Review

Samantar -  A Story of Two Parallel Lives
(Mandar Shinde 9822401246)


As humans, we’re always fascinated with the concept of knowing our future in advance. Astrology, palmistry, face reading, numerology, and all other arts of predicting the future have survived and thrived as businesses on the basis of two important human emotions - Fear and Hope about the unknown and uncertain future! This has inspired numerous creations in the form of stories, novels, films, and what not…

Suhas Shirvalkar was a popular Marathi writer who successfully handled a wide range of genres, such as suspense stories, detective stories, courtroom drama, horror stories, novels covering social issues, etc. Witty punch lines and philosophical deliberations have been essential highlights of his writings. Popularly known as Su.Shi. among his fans, Shirvalkar delivered hundreds of novelettes, novellas, and collections of stories based on interesting concepts, most of which were absolutely unique in the Marathi literary world. Su.Shi. was a master storyteller with a knack of presenting scenes and characters before his readers in a lively and realistic manner. Most of his works have attracted film and TV serial makers due to their structure very similar to a screenplay, with minute detailing of characters, locations, and scenes. One Marathi film, Devaki, based on his novel went on to win the national award, while Duniyadari based on his highly popular novel with the same name was one of the commercially successful Marathi films in recent times.

Satish Rajwade, an enterprising director from Marathi film industry has come up with a web series based on Samantar, another popular novel penned by Su.Shi. Samantar is a story of two individuals having no relation with each other, except a strange fact that they share the same fate with each other. Interestingly, one of them is almost a generation older than the other, implying that the life he has lived in the past will be lived in the future by the other individual. More interestingly, they’re destined to meet in flesh and blood, creating a situation where the elder one can actually warn the younger one against potential threats in his future life and can guide him to live an unsurprising life forever. This could be an oversimplified summary of the plot for Satish Rajwade’s Samantar web series currently running on MX Player. However, life is not that simple or so much predictable. You may know your future, but will you be able to change it? That’s what the web series talks about.

As mentioned earlier, Su.Shi. has written his books almost similar to executable scripts. Yet it is very challenging to convert his books into films because of heavy expectations from the huge fan following of Su.Shi. On-screen adaptations are bound to be compared with original books, and popularity of the books has already set the standards at a very high level. Casting is a tough task because the actors need to match with visual images of the characters already created by Su.Shi. in the imagination of his readers. The fans expect the stories to be presented on the screen exactly as they imagined - not a penny less, not a penny more. So the director is left with very little scope for cinematic liberty and on-screen improvisation. Satish Rajwade seems to have struck the balance well because most of the Su.Shi. fans who were skeptical about the web series before its release, are found to be going gaga over it post release.

The director has won half the battle with careful selection of actors. Having read the original novel some twenty years ago, I was curious about the cast since the day Rajwade announced this project. Apart from the two protagonists, I found Jayant Savarkar to be a pleasant surprise in the role of Swami, the astrologer. His character lays the cornerstone of this story and a weaker casting would have caused a poor first impression. Jayant Savarkar looks like the best choice here. Tejaswini Pandit and other supporting actors as well help the story develop in a speedy yet interesting manner. But there must be a very special mention about casting of two leading characters of the story.

This story is about Kumar Mahajan who is going through hardest time of his life when it dawns upon him that someone else in this world has already lived the exactly same life as his. So the life this other person, Sudarshan Chakrapani has lived in the past, will be lived in the future by Kumar Mahajan. The director Satish Rajwade has roped in Swwapnil Joshi as Kumar Mahajan and Nitish Bharadwaj as Sudarshan Chakrapani. Coincidentally (?) Nitish Bharadwaj is popularly known for the role of Shri Krishna in the grand TV serial Mahabharat by B. R. Chopra, while Swwapnil Joshi played the role of young Shri Krishna in Ramanand Sagar’s serial which followed Mahabharat on Doordarshan. In a way, Nitish Bharadwaj had already lived the on-screen life of Shri Krishna which was later to be repeated by Swwapnil Joshi, a striking similarity with the plot of this novel and web series, Samantar! I’m not sure if the director had this in his mind while casting the two actors, but it’s a great experience to watch them sharing the screen in a setup quite similar to their real lives.

Background score and cinematography add tremendous value to the story of Samantar. Beautiful drone shots from locations at Kolhapur and Konkan are a treat for the eyes. The background music has been able to achieve desired effects, setting the right mood and right pace during entire length of the web series. Last time I felt similar appreciation for the background score of Marathi movie, Tumbbad. Such experiments really look promising for the Marathi film industry.

This is the shortest length I could write after watching all episodes from first season of the web series. This would explain the amount of excitement it has brought among Su.Shi. fans. This gem of a writer has gifted us with books that are literally unputdownable (yes, that’s an official word in English language!). The director Satish Rajwade has been able to pull off the web series so well that we end up watching all episodes in one go. This can be considered as the greatest achievement on the scale applicable to original Su.Shi. creations. Very well done, Mr. Director and entire cast and crew! Next season of Samantar is highly awaited now.

- Mandar Shinde 9822401246
22/03/2020


Share/Bookmark

Saturday, March 21, 2020

Porasvada (Marathi Poem by Mardhekar)


"पोरसवदा"
बा. सी. मर्ढेकर यांची कविता


Share/Bookmark

Friday, March 20, 2020

The Idea That Won't Go Away...

He knew that information is an extremely powerful weapon that can be used to drive opinion.

He knew that information, true or false, could be used to shape a political agenda. 

He knew that words and images uttered repeatedly and deliberately, regardless of truthfulness, become accepted and part of the way people think and perceive others.

This can be used to ignite prejudices, paint individuals and groups, initiate opportunistic greed and other anti-social tendencies, transform dissent into hatred, and even turn citizen against citizen. 

He proved that controlling information was even more important than controlling the military and the economy. 

He wanted to control every sector of the society - including film, radio, posters, rallies and textbooks.  What he could not control he trivialized. 

He believed that it was “good fortune for governments that people do not think.”

Information he offered about his policies was sketchy and in some cases inept, but what he did was based on the idea that most individuals are conformists who do not think for themselves.

One of the tricks used was to manipulate public opinion through distortions, euphemisms, name-calling, fear, social pressure (you are either for us or against us) and denigrating minorities.

By repeatedly hammering words, phrases and ideas into a citizen’s thinking and by making it part of the culture, the propaganda becomes part of the language. Then no one stops to question the ideas and from where they originate. 

The purpose is to eliminate the capacity for critical thinking, thoughtful deliberation and discourse.

One trick is to hold political rallies in the evening hours. He said, “Never try to convert a crowd to your point of view in the morning sun. Instead the dim lights are useful - especially the evening when people are tired, their powers of resistance are low, and their complete emotional capitulation is easy to achieve.” 

He discovered that people wanted to be part of a movement, to plunge themselves into the joy and pleasure of being part of a great cause. That makes it easy to sell hatred, to blame others, to disparage minorities and to get away with it. 

His effective use of information and manipulation of public opinion has been studied, copied and utilized by some who lust for power.

He may be dead. But his ideas, methods and example live as strongly today as they did in the 1930s and 1940s. 

So, there it is. The idea that won’t go away. Call me loony if you wish.

On July 26, 2018, Bill Gindlesperger (Public Opinion) wrote this about him, who must not be named.




Share/Bookmark

Wednesday, March 18, 2020

Slow Down Zindagi

स्लो डाऊन, जिंदगी!

फक्त गाडीचा स्पीड कमी केल्यामुळं ९०% अपघात टाळता येणार असतील, तर १०० फुटात १० स्पीडब्रेकर बसवले पाहिजेत, असं आता वाटायला लागलंय.

स्पीडब्रेकर चुकीच्या पद्धतीनं बांधले तर ते दुरुस्त करता येतील, पण स्पीडब्रेकर नसतीलच तर सुरक्षित गाडी चालवायची जबाबदारी लोक स्वतः घेत नाहीत असा अनुभव आहे.

मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, वाहने सावकाश चालवा, वाहने चालवताना मोबाईलचा वापर टाळा, वगैरे पाट्या आपल्याला फालतू वाटतात. आपण सिग्नल पाळत नाही. चौकात गाड्या उलट्या घालतो. नो एन्ट्रीचा बोर्ड आपल्याला अपमानास्पद वाटतो. ट्रॅफिक पोलिसाशी आपण वाद घालतो किंवा त्यालाच खिशात घालतो. फक्त स्पीडब्रेकर ही अशी गोष्ट आहे जी टाळता येत नाही. त्यावरुन जाताना स्पीड कमी करायलाच लागतो.

विनाकारण भरधाव गाडी चालवणाऱ्यांमुळं निष्पाप लोकांचा जीव जाताना बघून या निष्कर्षापर्यंत आलेलो आहे. स्पीडब्रेकरचा राग-राग करणाऱ्यांच्या भावना समजू शकतो, माझं मतसुद्धा काही वर्षांपूर्वीपर्यंत स्पीडब्रेकरविरोधीच होतं. पण आपल्या लोकांची वृत्ती लक्षात घेता, स्पीडब्रेकरला पर्याय नाही... 🛑🚗💨 🙏🙏

#SlowDownZindagi


Share/Bookmark

Monday, March 16, 2020

SMC Workshop at Satara


School Management Committee Workshop at Padegaon Tal. Lonand Dist. Satara

Parents, teachers and NGO representatives attended the workshop. Structure, roles and responsibilities of the committee were discussed.

SMC members, both parents and teachers emphasized on need of guidance and support for smooth and effective functioning of the committee.


Share/Bookmark

Tuesday, March 10, 2020

Corona, Media, and We The People

कोरोना घातक आहे, काळजी घेतली पाहिजे, वगैरे ठीक आहे. पण फोन लावला की खोकल्याचा आवाज आणि मिडीयामध्ये सारखे रुग्णांचे आकडे, हे जरा अतीच व्हायला लागलंय, नाही का?

मागे स्वाईन फ्ल्यू आला तेव्हा पेपरमध्ये 'डेली काउंट' प्रसिद्ध केला जायचा.

"रुग्णांची संख्या २५ च्या वर..."

"पुण्यात ३० वा रुग्ण आढळला..."

"राज्यात एकूण रुग्णांची संख्या ५२..." वगैरे वगैरे.

काही वर्षांपूर्वी असेच 'डेली काउंट' शेतकरी आत्महत्त्येचे दिले जायचे. आणि सोशल मिडीया यायच्या आधी एका वर्षी तर 'दहावी परीक्षेतील अपयशाने आत्महत्त्या'देखील ट्रेन्डीन्ग केल्या होत्या पेपरवाल्यांनी...

आज पुण्यात २ आत्महत्त्या, काल नागपुरात ३ आत्महत्त्या, परवा लातुरात ४ आत्महत्त्या, राज्यात एकूण १७ आत्महत्त्या, वगैरे वगैरे.

मग अचानक हा काउंट बंद झाला. म्हणजे शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्या थांबल्या का? मिडीयालाच ठाऊक!

दहा-एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सांगलीहून पुण्याला बसने प्रवास करत होतो. रात्री साडेअकराला ट्रॅव्हल्सची बस निघाली. स्वाईन फ्ल्यू पासून बचाव कसा करावा, यावर  मेसेज फिरत होते त्यावेळी. बसमध्ये सुद्धा चर्चा सुरु होती. 'पुण्यापर्यंत आलाय म्हणे स्वाईन फ्ल्यू...' अशी बातमी होती.

बस सांगलीमधून निघाली आणि थोड्या वेळात दिवे बंद झाले, निजानीज झाली. कात्रज नवीन बोगद्यापर्यंत बस पोहोचली तेव्हा जाग आली. आजूबाजूला बघितलं तर माणसं मास्क लावून बसली होती. होय, तेच पाच-दहा रुपयांना रस्त्याच्या कडेला विकत मिळणारे कापडी हिरवे मास्क! म्हणजे पुण्याची हद्द सुरु झाली की व्हायरसचं इन्फेक्शन सुरु होणार याची केवढी ती खात्री.. आणि जागतिक दर्जाच्या व्हायरसला थोपवण्यासाठी पाच रुपयांच्या मास्कवर किती तो विश्वास...

मिडीयाला चढलेला कोरोना फीवर उतरेपर्यंत व्हॉट्सऐपवरच बोलू आपण. बाकी काही नाही, पण त्या व्हायरसची वाटत नाही एवढी भीती कानात कुणीतरी खोकण्याची वाटते. समजून घ्या...

बाय द वे, ८ः५० च्या शोची तिकीटं काढली असतील तर किती वाजता थिएटरमध्ये पोहोचावं, म्हणजे हॉस्पिटल के बाहर खडे होकर फू फू करनेवाला नंदू आणि फेफडे की बीमारीचा एक्स-रे बघणं टाळता येईल? कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावं ही विनंती!


Share/Bookmark

Monday, March 9, 2020

SMC GR Simplified

संवादाची सोपी भाषा…

मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या पालकांचा सहभाग घेण्यासाठी 'शाळा व्यवस्थापन समिती' हा प्रकार अस्तित्वात आला. समितीचे सदस्य होणाऱ्या पालकांना शाळेसंदर्भात काही अधिकार आणि जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. पण गंमत म्हणजे, पालकांनाच या प्रकाराची माहिती नीटशी कळालेली नसते, मग ते अधिकार वापरणार कसे आणि जबाबदारी पार पाडणार कशी?

पालकांना या समितीची रचना, कार्ये, महत्त्व समजावून सांगण्यासाठी शाळा पातळीवर त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. शासनाकडून, शाळेकडून, काही संस्थांकडून हे काम गेल्या दहा वर्षांपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरु आहे. पण महाराष्ट्र राज्याचा आणि त्यातल्या शाळांचा आवाका लक्षात घेतला तर हे काम किती अवघड आहे याची कल्पना येईल.

गडचिरोली जिल्ह्यातल्या घाटी, रांगी, मार्कंडादेव, अशा काही आश्रमशाळांमध्ये गेलो होतो. आश्रमशाळेमध्ये आजूबाजूच्या परिसरातली मुलं-मुली शिकण्यासाठी राहतात, त्यांच्या पालकांशी 'शाळा व्यवस्थापन समिती'बद्दल चर्चा करायची होती. ही चर्चा आधारलेली होती महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागानं १४ डिसेंबर २०१८ तारखेला काढलेल्या शासन निर्णयावर.

शासन निर्णय नावाच्या डॉक्युमेंटला मराठीत जी.आर. असं म्हणतात. तर या जी.आर.च्या प्रथम पृष्ठावरील प्रथम परिच्छेदातील (म्हणजे पहिल्या पानावरच्या पहिल्या पॅराग्राफमधली) काही शब्द/वाक्यरचना उदाहरणादाखल अशी आहे - 

व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक, वरिष्ठ 
पातळीवरून मंजुरी, विलंबित निर्णयांचा विपरित परिणाम, सर्वसमावेशक शासन निर्णय निर्गमित करण्याचे प्रस्तावित, वगैरे वगैरे...

तर शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी, म्हणजे पालकांशी चर्चा करण्याआधी एक महत्त्वाचं काम करायला लागणार होतं, ते म्हणजे हा जी.आर. मराठीत ट्रान्सलेट करणं. सोप्या, सुटसुटीत, आणि लक्षात राहील अशा पद्धतीनं अधिकृत माहिती कशी सांगता येईल असा विचार करत होतो. शेकडो वर्षांपूर्वी समाज साक्षर नसताना, संपर्काची माध्यमं उपलब्ध नसताना, सगळ्या लोकांपर्यंत महत्त्वाचे विचार कसे पोहोचवले जात होते, हे आठवलं आणि तीच पद्धत पुन्हा वापरायचा मोह झाला.

शासकीय आश्रमशाळा
'शाळा व्यवस्थापन समिती' रचना

समिती करावी स्थापन। शाळेचे करण्या व्यवस्थापन।
पालक शिक्षक मिळून। चालवावी शाळा॥

शासनाचा असावा सहभाग। निधी पुरवावा आवश्यक।
मार्गदर्शक नि प्रशिक्षक। रहावी भूमिका॥

पालकांची समिती प्रथम। शिकवून करावी सक्षम।
मुलांसाठी सर्वोत्तम। निर्णय घ्यावा॥

मुलांच्या हिताची खातरी। पालक समितीची जबाबदारी।
त्यासाठी नसावी जरुरी। शासन मंजुरी॥

निर्णयांच्या ठेवी नोंदी। जमाखर्च हिशेब मांडी।
मुख्याध्यापकांची मोठी। जबाबदारी॥

निधी जमा होई। समितीच्या बँक खाती।
खर्च झाला पुन्हा येई। निरंतर॥

मूल ज्याचे शाळेत। तोच होई अध्यक्ष।
आमदार नि खासदार। मागे राही॥

मुख्याध्यापक अधीक्षक। सचिव आणि सहसचिव।
बैठक चर्चा निर्णयांची। व्यवस्था करिती।

विद्यार्थी आणि विद्यार्थिनी। मुलांचे हे प्रतिनिधी।
समस्या नि सूचना मांडती। ठामपणे॥

एक सदस्य स्थानिक। शोधावा तो जाणकार।
यंत्रणा योजना प्रक्रियांवर। भाष्य करी॥

एकूण सदस्य अठरा-वीस। पैकी बारा पालक।
सहा तरी किमान। महिला असाव्या॥

समितीची करावी रचना। दोन वर्षांनी पुन्हा पुन्हा।
नवनवीन पालकांना। संधी मिळावी॥

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष। दोघांचेही शिक्षण।
लेखन आणि वाचन। आवश्यक॥

समितीचे जे जे सदस्य। ओळख त्यांची विशेष।
सर्वांना मिळावे अवश्य। ओळखपत्र॥

गडचिरोली जिल्ह्यातल्या रामगड, येंगलखेडा, सोनसरी, कोरची, कारवाफा, येरमागड, सोडे, भाकरोंडी, कुरंडीमाल, पोटेगाव, अशा दुर्गम गावांमधून आलेल्या पालकांशी या पद्धतीनं संवाद साधता आला. यातून मिळालेल्या माहितीचा प्रत्यक्ष किती उपयोग केला जातोय, हे स्थानिक संस्था अपेक्षा सोसायटी आणि संबंधित आश्रमशाळांचे मुख्याध्यापकच सांगू शकतील. पण जी.आर.मधून शासनाला नक्की काय सांगायचंय हे आम्हाला समजलं, असं पालकांना तरी वाटत होतं.

तुम्हाला काय वाटतंय?

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
(संदर्भः महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दि. १४ डिसेंबर २०१८)


Share/Bookmark

Evadhe Lakshat Theva (Ghazal by Vinda Karandikar)


"एवढे लक्षात ठेवा" (गजल)
- विंदा करंदीकर


Share/Bookmark

Saturday, March 7, 2020

Baai (Poem)

“बाई”

पुरुष म्हणून जन्माला आल्यानं
मला आपोआप मिळालेला मोठेपणा
आणि बाई म्हणून जन्मल्यानं
तुझ्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या,
समानतेच्या गप्पा मारत स्वीकारलं
आपण सोयीस्करपणे जसंच्या तसं…

यात दोष ना तुझा ना माझा
दोष फक्त व्यवस्थेचा!

आणि व्यवस्था बदलणं म्हणजे
सोपी गोष्ट नव्हे…
त्याला लागतील शंभर-दीडशे
कदाचित पाचशे वर्षं.

एवढी मोठी लढाई तू नाही,
मीच लढू शकतो तुझ्यासाठी…

कारण मला फक्त गायची आहेत
गाणी तुझ्या क्रांतीची..
द्यायचे आहेत शब्द
तुझ्या व्यथा आणि वेदनांना..
मांडायची आहेत दुःखे तुझी
जाहीर सभा-भाषणांतून..
शे-दीडशे कदाचित पाचशे वर्षं…

एवढी मोठी लढाई तू नाही,
मीच लढू शकतो तुझ्यासाठी…

कारण तुला प्रत्यक्ष भोगायच्या आहेत
त्या व्यथा आणि वेदना.
आणि पुरवायचे आहेत शब्द
माझ्या भाषणांना आणि गाण्यांना.
ती गाणी ऐकत सोसत राहशील सारं
शे-दीडशे कदाचित पाचशे वर्षं
कधीतरी व्यवस्था बदलेल या आशेवर.

व्यवस्था बदलेल की नाही कोणास ठाऊक
पण एक दिवस मी जन्मेन बाई म्हणून
आणि तू जन्म घे पुरुष होऊन.
मग पाचशे वर्षं गायलेली गाणी
मी जगून बघेन पन्नास वर्षं.
एवढीशी खळबळ माजली व्यवस्थेत
तरी पुरे पाचशे वर्षांमध्ये…

- अक्षर्मन ९८२२४०१२४६


Share/Bookmark

Thursday, March 5, 2020

Ajunahi (Poem)

"अजूनही…"

अजूनही मोडकं-तोडकं
जुनं-पानं काहीतरी
वही, पाकीट, बुकमार्कसारखं
बनवत राहतो घरच्या घरी.
बाजारात विकत मिळतंच सगळं
वस्तू, जागा, माणसं, नाती..
तरीही त्याला मुद्दामच हौस
विकतपेक्षा बनवलेलीच बरी!
पाठकोरे कागद, पुडीचा दोरा,
गिफ्ट रॅप पेपर, तिकीटं, टाचणी..
वापरणार कधी ठाऊक नाही
साठवून तरी ठेवलीत खरी.
बाहेरचे हसतात, घरचे चिडतात
दरिद्री, कंजूष लक्षणं अशी..
म्हणतात, जगासोबत चालू नकोस
पण जगाकडं एकदा बघ तरी.
बघ, जग पुढं गेलंय... बघ
विज्ञान, तंत्रज्ञान, विकास, प्रगती...
तो म्हणतो, छान! लिहून ठेवेन
आणि बाहेर काढतो एक लाल डायरी.
आजची तारीख टाकतो पानावर
आणि लिहितो फक्त दोन ओळी -
'माणसाचं मशीन झालंय बहुतेक
माझी इच्छा नाही अजून तरी...'
मग पुन्हा मोडकं-तोडकं
जुनं-पानं काहीतरी
ग्रिटींग कार्ड, पेन स्टँडसारखं
बनवत बसतो घरच्या घरी…

- अक्षर्मन (९८२२४०१२४६)


Share/Bookmark