मी म्हणजे 'मी' नाही, कळले तुला भेटल्यावर
पावसाची गाणी म्हटली, भिजलो अन् सुकलो
भिजवणारे फक्त पाणी नव्हते, कळले सुकल्यावर
जे जे गुणदोष होते आवडले, प्रेमात पडताना
वाटले ते ते बदलावेसे, एकदा प्रेमात पडल्यावर
नशा नको कसलीच, होते वाटत नेहमी नेहमी
जरा घेऊनी झिंगू, वाटे पुन्हा उतरल्यावर
पैसा-अडका बंगला-गाडी दाग-दागिने कमविले
तरीही खरे जगलोच नाही, कळले आयुष्य सरल्यावर
- अक्षर्मन
No comments:
Post a Comment