ऐसी अक्षरे
Monday, September 19, 2016
संवाद पिढ्या-पिढ्यांचा
आजच्या तरुण पिढीमधे (म्हणजे होर्डींगवरच्या निबर चेह-यांच्या 'युवा' नेतृत्वांमधे नव्हे, खरोखर तरुण - विशीतल्या मुला-मुलींमधे) खूप एनर्जी आहे, फक्त तिला व्यवस्थित चॅनेल मिळालं पाहीजे. त्यांच्याशी किंवा त्यांच्याबद्दल बोलताना-वागताना आधीच्या पिढ्या (इन्क्लुडींग अस) थोड्या असूया आणि थोड्या न्यूनगंडाच्या शिकार झालेल्या मला दिसतात. 'आमच्या वेळी असं नव्हतं' या टोमण्यांमधून ही असूया दिसते, तर 'हल्लीची पिढी खूपच स्मार्ट आणि फास्ट आहे' या कौतुकमिश्रित तक्रारीमधे आपण मागं पडत चालल्याची भावना (आणि भीती) व्यक्त होते. या दोन्हींच्या फ्रस्ट्रेशनमधून पुढच्या पिढीला दाबण्याचे आणि नावं ठेवण्याचे प्रकार घडताना दिसतात. या दोन पिढ्यांमधला संवाद सुधारण्यासाठीकुणीतरी काम करायची गरज आहे, असं मला वाटतं!
Labels:
marathi,
मुक्तविचार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment