ऐसी अक्षरे
Saturday, December 30, 2017
Friday, December 29, 2017
Thursday, December 14, 2017
‘सप्तसुर संगीत अकादमी’चे भव्य वार्षिक सादरीकरण
‘सप्तसुर संगीत अकादमी’चे भव्य वार्षिक सादरीकरण
गेल्या पाच वर्षांपासून पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरात शास्त्रीय / उपशास्त्रीय गायन, तसेच तबला, पखवाज, हार्मोनियम, गिटार, इत्यादी वाद्यांचे प्रशिक्षण देणा-या ‘सप्तसुर संगीत अकादमी’चे भव्य वार्षिक सादरीकरण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे गुरुवारी पार पडले. सुमारे १०० विद्यार्थी कलाकारांनी यावेळी आपली कला सादर केली. शास्त्रीय रागावर आधारित गीतांपासून ते भक्तीगीते, भावगीते, गझल, लावणी, आणि कव्वालीपर्यंत विविध गीतप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी गायलेल्या सर्व गीतांना विद्यार्थ्यांनीच वाद्यांची साथ दिली. तसेच तबला, पखवाज आणि हार्मोनियम यांच्या जुगलबंदीतून आपले विशेष कौशल्य दाखवण्याची संधीदेखील ‘सप्तसुर’च्या विद्यार्थ्यांना मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांनी व्यासपीठावर एकत्र येऊन ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे गीत निरनिराळ्या भाषांमधे सादर केले. संगीत प्रशिक्षक योगेश कुनगल, उत्तरा जावडेकर-पेंडसे, महेश बधे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सादरीकरण करण्यात आले. मंदार शिंदे व निकीता कुनगल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
प्रसिद्ध व्याख्याते व योगगुरु डॉ. दत्ता कोहिनकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, तर मराठी चित्रपट व मालिका क्षेत्रातील सुरेश विश्वकर्मा, अन्वय बेंद्रे, चेतन चावडा, आशुतोष वाडेकर, योगिनी पोफळे, राहुल वेलापूरकर, इत्यादी ता-यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व कलाकारांचे कौतुक केले. ‘सप्तसुर संगीत अकादमी’त प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थी कलाकारांचे पालक, मित्रपरिवार, तसेच अनेक संगीतप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
‘सप्तसुर संगीत अकादमी’चे भव्य वार्षिक सादरीकरण
Friday, December 1, 2017
Thursday, November 2, 2017
Tuesday, October 24, 2017
Thursday, October 19, 2017
सरकारी सेवा की धंदा?
बिझनेसमधे फायदा किंवा तोट्याची जबाबदारी मालकाची असते, कर्मचार्यांची नाही. कंपनी तोट्यात आहे म्हणून काम करणार्या लोकांचे पगार न देणं (किंवा कमी देणं) हा मालकांसाठी सोयीस्कर उपाय आहे.
कॉस्ट कटींग किंवा कॉस्ट कन्ट्रोलचे शेकडो पर्याय उपलब्ध असताना, सगळ्यात आधी कर्मचार्यांच्या पगारावर टांच आणली जाते. हे संबंधित मालकांचं किंवा व्यवस्थापनाचं अपयश आहे. खाजगी आणि सरकारी कर्मचार्यांकडून अपेक्षित क्वालिटीची सेवा न मिळणं किंवा प्रोफेशनॅलिजम नसणं, याला अशी पगार-बचाव प्रवृत्तीसुद्धा कारणीभूत आहे.
आपण येता-जाता ज्यांना सहज शिव्या घालतो, त्या सरकारी बँका, सरकारी शाळा, सरकारी दवाखाने, सरकारी वाहतूक, यांचा मुलभूत उद्देश सेवा पुरवणे हा आहे. खाजगी बँका/शाळा/वाहतूक वगैरेंशी त्यांची स्पर्धा किंवा तुलना चुकीचीच आहे. जनतेच्या सोयीसाठी प्रसंगी तोट्यात जाऊनही या सेवा पुरवल्या गेल्या पाहिजेत. प्रत्येक सेवेचा नफा-तोटा न काढता, सरकारच्या एकत्रित कामाची बॅलन्स शीट बघितली पाहिजे. पण बिझनेस आणि प्रॉफीटच्या नावाखाली, कमअक्कल राजकारणी आणि चमकोगिरी करणारे अधिकारी यांनी चुकीची धोरणं राबवून आणि काम करणार्या लोकांच्या पगारात लुडबूड करुन या सेवांची वाटच लावली आहे.
सरकारी शिक्षक, पोलिस, एसटी कर्मचारी, अशांचे पगार पुरेसे किंवा वेळेवर होत नसतील, किंवा त्यांना काम करण्यासाठी योग्य साधनं मिळत नसतील, तर त्यांच्याकडून चांगल्या सेवेची अपेक्षा करणार कशी?
पैसा हीच नोकरी करणार्या माणसाची मुख्य प्रेरणा असते. मग ती नोकरी एसटी ड्रायव्हरची असो की सीमेवर लढणार्या जवानाची. आपण नको त्या ठिकाणी इमोशनल होऊन त्यांच्याकडून बिनपैशाच्या उत्तम सेवेची अपेक्षा कशी करु शकतो? सरकारची धोरणं आणि अव्यवस्थापन सरकारी सेवेच्या नफा-तोट्याला जबाबदार असतं. त्याचा फटका आहे त्या परिस्थितीत काम करणार्यांना आणि जनतेला का बसावा?
(कामचुकार कर्मचार्यांवर ताबडतोब आणि कडक कारवाई झालीच पाहिजे. पण सरकारी सेवांमधल्या राजकारणामुळं अशा लोकांना पाठीशी घातलं जातं, ज्याचा फटका इतर काम करणार्या लोकांना जास्त बसतो.)
- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
सरकारी सेवा की धंदा?
Subscribe to:
Posts (Atom)