ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, January 12, 2023

Parting With Words

How important is it
To talk about death
Is it necessary at all
Can't we just live
And then leave
Silently, when it is time
It is a personal choice
Of course
Whether you decide
Parting in silence
Or parting with words

'Parting With Words… न होना केवल शब्दों में' is a beautiful performance where poetry meets death. And death is not always a depressing thought. It is unavoidable, no doubt. The only thing you can surely predict about your own future. But this is an attempt to arrest the feelings in words and serve them in a bearable, rather pleasurable format to an audience young and old. Yes, the concept is gold and the presenters are gems. Rupali, Aanand and Ashwini have brought to us a mix of English and Hindi poems talking about parting, about losing, about missing, about the end, about death. It's all about losing someone close to you, losing something you've loved and treasured, losing your self, too. It's also about hoping for a new beginning and it's about knowing that there's not another beginning. Basically, it's about being free - breaking free. Or whatever way you take it. Thank you, Annand, Rupali, Ashwini and The Box team, for this wonderful experience. It is perhaps for the first time that I have heard about death and parting for an hour or so and I want to hear that again, from you. Looking forward to experiencing parting with beautiful words again!

Mandar Shinde
9822401246
12/01/2023





Share/Bookmark

Sunday, January 8, 2023

Blind Trust and Mad Love - Marathi Couplet


विश्वास आंधळा अन्‌ ती प्रीत वेडी होती

तुटल्यावरी कळाले रेशीम बेडी होती


- मंदार


#poetry #marathi #sher #love #handwriting

 



Share/Bookmark

Tuesday, December 27, 2022

Discovery of India - Title Song

पंडीत नेहरूंच्या 'डिस्कवरी ऑफ इंडीया' पुस्तकावर आधारित 'भारत एक खोज' नावाची मालिका दूरदर्शनवर लागायची. श्याम बेनेगलांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेचं शीर्षक गीत वसंत देव यांनी लिहिलं होतं. ऋग्वेदातल्या एका श्लोकावरून (१०ः१२९ः१) ही हिंदी रचना तयार केली होती.

नासदासीन नो सदासीत तदानीं नासीद रजो नो वयोमापरो यत।
किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद गहनं गभीरम॥

सृष्टि से पहले सत नहीं था
असत भी नहीं
अंतरिक्ष भी नहीं
आकाश भी नहीं था
छिपा था क्या, कहाँ
किसने ढका था
उस पल तो
अगम अतल जल भी कहां था

सृष्टि का कौन है कर्ता?
कर्ता है या विकर्ता?
ऊँचे आकाश में रहता
सदा अध्यक्ष बना रहता
वही सचमुच में जानता
या नहीं भी जानता
है किसी को नहीं पता
नहीं पता
नहीं है पता
नहीं है पता

वो था हिरण्य गर्भ सृष्टि से पहले विद्यमान
वही तो सारे भूत जाति का स्वामी महान
जो है अस्तित्वमान धरती आसमान धारण कर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर

जिस के बल पर तेजोमय है अंबर
पृथ्वी हरी भरी स्थापित स्थिर
स्वर्ग और सूरज भी स्थिर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर

गर्भ में अपने अग्नि धारण कर पैदा कर
व्यापा था जल इधर उधर नीचे ऊपर
जगा जो देवों का एकमेव प्राण बनकर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर

ऊँ! सृष्टि निर्माता, स्वर्ग रचयिता पूर्वज रक्षा कर
सत्य धर्म पालक अतुल जल नियामक रक्षा कर
फैली हैं दिशायें बाहु जैसी उसकी सब में सब पर
ऐसे ही देवता की उपासना करें हम हवि देकर
ऐसे ही देवता की उपासना करें हम हवि देकर


Share/Bookmark

Sunday, November 27, 2022

शब्देविण संवादु...

राजकीय नेता म्हणजे आक्रमकपणे भाषण ठोकणारा वक्ता, हे समीकरण मोडीत काढलं अटल बिहारी वाजपेयी यांनी. तसंच, चांगला नट म्हणजे एका दमात मोठमोठी पल्लेदार वाक्यं डिलीव्हर करू शकणारा कलाकार, या गृहीतकाला छेद दिला विक्रम गोखले यांनी. वाजपेयींची भाषणं ऐकत आणि विक्रम गोखलेंचा अभिनय बघत आम्ही मोठे झालो. बोलल्या गेलेल्या किंवा बोलायच्या प्रत्येक शब्दाचा परिणाम एनहान्स करण्यासाठी शब्दांच्या आणि वाक्यांच्या मधले पॉजेस किती महत्वाचे असतात, ते या दोघांमुळं कळालं. मोठमोठी वाक्यं बोलताना दम लागतो म्हणून थांबणं वेगळं आणि शब्दा-वाक्यांमधल्या नेमक्या जागा ओळखून तिथं नेमके पॉजेस घेणं वेगळं! या दोघांना ते जसं जमलं तसं इतर कुणाला क्वचितच जमलं असेल - राजकारण आणि अभिनय दोन्ही क्षेत्रांत.

सुरुवातीला त्यांच्या गंभीर भूमिकाच बघायला मिळाल्यामुळं असेल, पण 'वजीर'मधल्या विक्रम गोखलेंना 'माझे राणी माझे मोगा' गाण्यात बघताना काहीतरी वेगळंच वाटायचं. पण पुढं 'लपंडाव' बघितला आणि त्यांच्या अभिनयाची रेन्ज लक्षात यायला लागली.

लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, अशा मराठीतल्या दिग्गज कलाकारांना हिंदी सिनेमात अगदीच किरकोळ कामं करताना बघून वाईट वाटायचं. विक्रम गोखलेंनीसुद्धा हिंदी सिनेमात व्हिलनचे वगैरे रोल केले. पण नंतरच्या काळात 'हम दिल दे चुके सनम' किंवा 'भुलभुलैया' यासारख्या मेनस्ट्रीम मूव्हीजमध्ये त्यांना महत्वाच्या रोलमध्ये बघून भारी वाटलं होतं.

कारगील युद्धाच्या वेळी विक्रम गोखलेंनी दिलीप कुमारला उद्देशून लिहिलेलं पत्र पेपरमध्ये वाचलं होतं. पाकिस्तान सरकारनं दिलीपकुमारला दिलेला 'निशाण-ए-पाकिस्तान' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर निषेध म्हणून दिलीपकुमारनी परत करावा, असं जाहीर आवाहन त्या पत्रात केलं होतं. त्यातली राजकीय भूमिका, देशभक्तीची संकल्पना, वगैरे तेव्हाच्या वयानुसार आणि आकलनानुसार योग्यच वाटलं होतं; पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे, एक कलाकार, एक नट इतकी स्पष्ट भूमिका घेऊ शकतो आणि इतक्या मुद्देसूदपणे जाहीररित्या मांडू शकतो, याबद्दल वाटलेली कौतुकाची भावना जास्त मोठी होती.

विक्रम गोखलेंना टीव्ही आणि सिनेमाच्या स्क्रीनवर खूप बघितलं. नाटकातला त्यांचा स्टेजवरचा अभिनय बघायची संधी मात्र मिळाली नाही. मागच्याच आठवड्यात जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी'मध्ये त्यांना बघून बरं वाटलं. तसं बघितलं तर, संपूर्ण सिनेमात एकच वाक्य त्यांना वेगवेगळ्या प्रसंगात म्हणायचं होतं. पण न बोलता त्यांनी चेहरा आणि विशेषतः डोळ्यांमधून इतर कलाकारांशी आणि प्रेक्षकांशी साधलेला संवाद आणखी कुणाला जमला असता असं वाटत नाही.

काही कलाकारांचे संवाद, त्यांनी बोललेले शब्द, त्यांच्या ॲक्शन्स आपल्याला त्यांची आठवण करून देत राहतात. विक्रम गोखलेंच्या धीरगंभीर आवाजासोबतच त्यांचे प्रेग्नंट पॉजेस आणि त्यांचा शब्देविण संवादु नेहमी आठवत राहील हे नक्की...

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
२७/११/२०२२


Share/Bookmark

Wednesday, October 12, 2022

A Reluctant Love Story (Political Post)


मला पनीर घालून बनवलेली भाजी आवडते; पण पालक आवडत नाही. पालक पनीर काही लोकांची आवडती डिश असू शकेल. पालक पनीर बनवणं ही मार्केटची गरजदेखील असू शकेल. पण याचा अर्थ मी पनीर सोडून पालकाची स्तुती करावी असा होत नाही. पालक न वापरता पनीरची भाजी कुठे मिळते याचा मी शोध घेऊ शकतो किंवा तशी भाजी मिळेपर्यंत वाट बघू शकतो.

पालक तोंडात गेला की कसंतरी वाटत असताना फक्त पालक आणि पनीरची युती झाल्यामुळं पालकाला गोड मानून घ्यावं, असं मला वाटत नाही. शिवसेना (बाळासाहेबांची, धर्मवीरांची, उद्धवची, राजची, अमितची, आदित्यची, किंवा आणखी कुणाची) म्हणजे धार्मिक आणि प्रादेशिक अस्मितेचा फायदा घेऊन राजकारण करणारी टोळी आहे. निवडणूक आयोगानं त्यांना राजकीय पक्षाचा दर्जा दिलेला असला तरी सेनेच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं वागणं एखाद्या टोळीसारखंच राहिलेलं आहे.

२०१९ मध्ये राजकीय अपरिहार्यतेमुळं शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊन महाविकास आघाडी स्थापन करावी लागली. अचानक कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या समर्थकांना शिवसेना नावाचा पालक गोड लागायला लागला. अकार्यक्षमतेला संयमी भूमिका म्हटलं जाऊ लागलं. पोकळ घोषणांना दुर्दम्य आशावाद म्हटलं जाऊ लागलं. अव्यावहारिक आवाहनांना कौटुंबिक साद समजलं जाऊ लागलं. भाजपा सोबत गेलेल्या गुन्हेगारांचं शुद्धीकरण होतं, त्याच धर्तीवर काँग्रेससोबत आलेल्या शिवसेनेचं पापक्षालन झाल्यासारखं वाटायला लागलं. कोणताही महत्त्वाचा, लोकोपयोगी निर्णय न घेता, अननुभवी नेतृत्वाला आश्वासक नेतृत्व मानलं जाऊ लागलं.

पदरी पडलं आणि पवित्र झालं, असं समजून (किंवा खरोखर मनापासून ही जोडी स्वीकारून) अपयशांवर पांघरुण घालण्याच्या आणि कोरड्या आडातून पोहरा भरून काढण्याच्या धडपडीत मूळच्या काँग्रेसी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, संतुलित नेत्यांची आणि त्याहून जास्त सामान्य कार्यकर्त्यांची भयानक दमछाक आणि फरफट झालेली मागच्या अडीच वर्षात दिसून आली. ही दमछाक आणि फरफट नुसती विनोदीच नाही, तर केविलवाणी सुद्धा आहे.

काय तो पक्ष, काय ते चिन्ह, काय ते नेते, एकदम बोगस आहे सगळं. तरीसुद्धा आपला वेळ, बुद्धी, ताकद खर्च करून काही माणसं कुठलीतरी बाजू घ्यायचा प्रयत्न करताना दिसताहेत. हरकत नाही, ज्याची त्याची निवड.

पण यामुळं खरे मुद्दे बाजूला पडताहेत. मूळ प्रश्नांवर ना युती सरकार काम करतंय, ना आघाडी सरकार. पण कुठली तरी बाजू घ्यायच्या धडपडीत 'खरं' राजकीय विश्लेषण, परखड मतप्रदर्शन सध्या कुणीच करत नाही, याचं वाईट वाटतंय. खरं बोलल्यामुळं कुणीतरी दुखावलं जाणारच; पण म्हणून गप्पच बसायचं किंवा एक बाजू पकडून खोट्याला खरं म्हणायची धडपड करत रहायचं, हे दोन्ही पर्याय पटत नाहीत.

असो. विषय राजकीय असला तरी चिंतन बौद्धिक आणि व्यक्तिगत आहे, त्यामुळं सूचना आणि प्रतिक्रिया अर्थातच अपेक्षित नाहीत. धन्यवाद !

मंदार शिंदे
१२/१०/२०२२

 


Share/Bookmark

Saturday, September 10, 2022

Awaken the real power within you... Brahmastra!

सिनेमा म्हणजे करमणूक. एन्टरटेनमेन्ट. खऱ्या आयुष्यातल्या समस्या, दुःख, निराशा विसरायला लावणारे तीन तास, खोटी आशा, खोटी नाती, खोटे प्रसंग; पण करमणूक १००% खरी.

अचाट शक्तीचे अफाट प्रयोग, कल्पनेपलीकडची कल्पना, पौराणिक संदर्भांची आजच्या वास्तवाशी बेमालूम जोडणी, प्रेम-बिम, नाच-गाणी, दसरा-दिवाळी, भांडण - लढाई, रहस्य, अस्त्र-शस्त्र… ब्रह्मास्त्र!

आपण कोण आहोत, आपल्यामधे काय शक्ती आहेत, याची कल्पनाच नसलेला रणबीरचा 'शिवा'. कुठलीही विशेष शक्ती नसताना केवळ प्रेमाखातर जीव धोक्यात घालणारी आलियाची 'ईशा'. आपल्याला नेमून दिलेलं काम बजावताना दुसरा कुठलाही विचार न करणारी मौनीची 'जुनून'. आपल्या छोटया-मोठ्या शक्तींचा योग्य वेळी वापर करणारे शिष्य आणि अस्त्र-शस्त्रांचं प्रशिक्षण देण्याऐवजी स्वतःच्या आतमधे असलेली शक्ती जागवायला शिकवणारे अमिताभचे 'गुरुजी'. एवढ्याच पात्रांनी तीन तास आपल्याला खिळवून ठेवणं शक्य असताना, थोड्याच वेळासाठी येऊन आपला पॉवर-पॅक्ड परफॉर्मन्स देणारा नागार्जुन. आणि सिनेमा रिलीज होईपर्यंत सस्पेन्स ठेवलेला (पण आता सांगायला हरकत नाही असा) - 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची खरी ताकद - मेन अट्रॅक्शन - शाहरुखचा 'सायंटीस्ट मोहन भार्गव'.

जबरदस्त स्पेशल इफेक्ट्स, जे फक्त आणि फक्त मोठ्या स्क्रीनवरच बघावेत. सुसाट वेगानं धावणारी आणि धक्क्यांमागून धक्के देणारी गोष्ट. एकामागून एक घडत जाणाऱ्या महत्त्वाच्या घटना बघताना मधे-मधे श्वास घ्यायला फुरसत देणारी गाणी. आणि सगळी गोष्ट एकदाच सांगून संपवून टाकण्याऐवजी पहिल्या गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीबद्दल उत्सुकता निर्माण करून सोडणारा शेवट.

एवढी सगळी कारणं दिली असूनसुद्धा ज्यांना आपली करमणूक करून घ्यायची इच्छा नसेल, त्यांनी अजिबातच 'ब्रह्मास्त्र' बघायला जाऊ नये. हॅरी पॉटर, स्टार वॉर्स आणि हॉलिवूडच्या आणखी कुठल्या-कुठल्या सिनेमांशी तुलना करायची असेल तरी 'ब्रह्मास्त्र' बघायला जाऊ नये. आपल्या पुराणात खरी अस्त्रं कुठली होती आणि कुठलं अस्त्र कधी कुठं कसं वापरायचं याबद्दल आपल्याला उपजत ज्ञान असेल, तर मग 'ब्रह्मास्त्र' बघायचा विचारसुद्धा करू नये.

पण तीन तास 'भारी' वाटून घ्यायचं असेल, फॅन्टसी अनुभवायची असेल, जे प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात घडणार नाही ते स्क्रीनवर बघायची मजा घ्यायची असेल, (आणि तुम्ही रणबिर, आलिया, अमिताभ, नागार्जुन, मौनी यापैकी कुणाचेही किंवा सगळ्यांचे फॅन असाल...) तर नक्की मोठ्या स्क्रीनवर 'ब्रह्मास्त्र' बघाच.

…शाहरुखचे फॅन असाल तर वरून अकरावी ओळ वाचल्यावरच तुम्ही तिकीट बुक करायला गेला असाल, याची खात्री आहे!

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
९ सप्टेंबर २०२२



Cinema means entertainment. Entertainment entertainment entertainment. Three hours of relief from real life problems, sorrows, and disappointments. Cinema gives false hopes, portrays false relationships, presents false events; but the entertainment is 100% real.

Tremendous powers being exercised, imagination beyond imagination, subtle connection of mythological references with today's reality, love story, dance and songs, Dussehra-Diwali celebrations, battles and wars, mystery, weapons, Astra… Brahmastra!

Ranbir plays 'Shiva' who has no idea who he is, what powers he has. Alia plays 'Isha' who has no special powers, but risks her life only for the sake of love. Mauni plays 'Junoon' who does not think of anything else while doing the work assigned to her. Amitabh plays 'Guruji' who not only teaches students to use their small and big powers at the right time but also encourages them to awaken the power within themselves instead of training them with weapons. While these many characters could have kept us engrossed for three hours, Nagarjuna gives his power-packed performance in just a short time. And kept in suspense until the release of the movie (but it's okay to say now) - the real strength of 'Brahmastra' - the main attraction - Shahrukh playing 'Scientist Mohan Bhargava'.

Amazing special effects, which should only be seen on the big screen. A story that runs at a steady pace and gives one shock after another. Songs that give you time to breathe while catching up with the important events happening one after the other. And instead of just telling the story once and for all, there is an ending that leaves you curious about the next story generated from the first story.

Despite all these reasons, those who do not want to entertain themselves should not go to see 'Brahmastra' at all. Even if you want to compare it with Harry Potter, Star Wars and any other Hollywood movies, you should not go to see 'Brahmastra'. If you have instinctive knowledge about what were the real weapons in our Puranas and how to use which weapon when and where, then you should not even think of watching 'Brahmastra'.

But if you want to feel great for three hours, if you want to experience the fantasy, if you want to enjoy watching on screen what will never happen in your real life, (and if you are a fan of any or all of Ranbir, Alia, Amitabh, Nagarjuna, Mouni...) then definitely watch 'Brahmastra' on the big screen.

…If you are a fan of Shah Rukh, you must have gone to book the ticket only after reading the eleventh line from above!

- Mandar Shinde 9822401246
9th September 2022



Share/Bookmark

Thursday, September 1, 2022

Why this veil?

दोस्ती का पर्दा है बेगानगी
मुँह छुपाना हम से छोड़ा चाहिए

- मिर्ज़ा ग़ालिब



कशास लपविशी तोंड, संशय लोक, घेती पुन्हा-पुन्हा
अशीच येऊन भेट, जशी तू थेट, भेटीशी इतरेजना

- अक्षर्मन


 



Share/Bookmark